स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

श्री. एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
आचंद्र सूर्य नांदो, स्‍वातंत्र्य भारताचे

"हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. हजारो लाखो हुतात्‍म्‍यांनी आपल्‍या प्राणांचे बलिदान देवुन वंदनीय भारतमातेला परकीयांच्‍या बेडयातुन मुक्‍त केले व स्‍वातंत्र्याचा मंगल कलश आपल्‍या हाती दिला. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना भारताची संपन्‍न सांस्कृतिक परंपरा जपणे हे आपले आद्यकर्तव्‍य आहे. हे कर्तव्‍य आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्‍या माध्‍यमातुन प्रभावीपणे पार पाडु. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमीत्‍त सर्वांना मनपुर्वक शुभेच्‍छा !!"

श्री. सुधीर मुनगंटीवार
मा. सांस्कृतिक कार्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य

संपन्न झालेले उपक्रम

22
Mar 23
जागतिक जल दिवस साजरा

ग्रामपंचायत च्या वतीने केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा कु-हा(तळणी) येथे जागतिक जल दिवस साजरा

अधिक माहिती...
15
Mar 23
*महादीप परीक्षा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारा. - मा. ना. संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ

शैक्षणिक सत्र 2022-23 मधील महादीप सामान्यज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त जिल्हा परिषद शाळांमधील 56 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना वरिल उद् गार मंत्री महोदयांनी काढले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हा उक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जि. प. शाळामधून राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला त्याचप्रमाणे,जिल्हास्तर अंतिम परीक्षेपर्यंत आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना यवतमाळ ते सेवाग्राम अशी हेलीकॉप्टर वारी करण्याची घोषणा ,मंत्रीमहोदयानी केली. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक हे सुद्धा कौतकास पात्र आहे.त्यांची ही दखल शासनस्तरावर घेण्यात येईल. असे प्रशंसोद्गार काढून मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले. यासमयी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, त्रॅकसुट, व सायकल भेट देऊन जिल्हा परिषद सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विनय ठमके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ज्योती भोंडे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, प्रशांत गावंडे अधिव्याख्याता डाएट यवतमाळ उपस्थित होते.

अधिक माहिती...
15
Mar 23
यवतमाळ ते मूर्तिजापूर गेज कनव्हर्जन आणि मेट्रोप्रकल्पाबद्दल यवतमाळच्या तरुणाने दिलेल्या निवेदनाला केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरींचा तत्काळ प्रतिसाद.

यवतमाळ ते मूर्तिजापूर रेल्वे लाईनचे नॅरोगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येत असलेल्या मालकी हक्काशी संबंधित अडचणींबद्दल आणि आणि यवतमाळ मध्ये मेट्रोप्रकल्प व्हावा याबद्दल एक पत्र केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरींना पाठवण्यात आले होते.ते पत्र प्राप्त होताच गतिशील असलेल्या मंत्री महोदयांनी श्री.अक्षय नागेश पांडे याला भेटीसाठी नागपूरला बोलवले.नुकतीच ही भेट झाली. श्री.नितीन गडकरी यांना अक्षयने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की उत्कृष्ट दर्जाच्या पांढर्‍या सोन्याच्या उत्पादनासाठी ओळखल्या जाणार्‍या यवतमाळ शहराला सद्यस्थितीत रेल्वेची सोय नाही. यवतमाळ ते मूर्तिजापूर रेल्वे लाईनचा मालकी हक्क ब्रिटीश कंपनीकडे असल्यामुळे या विकासकार्यात तांत्रिक व मालकी हक्काशी संबंधित अडचणी येत आहेत.श्री.नितीन गडकरी यांनी समस्या समजून घेतली व अक्षयने दिलेल्या पत्राबाबत श्री.नितीन गडकरी यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री.रावसाहेब दानवे यांना १५ फेब्रुवारी २०२३ रोजी पत्र लिहिले आहे, त्यात अक्षयच्या पत्राचा उल्लेख करत लिहिले आहे की, ब्रिटिश कंपनीकडे असलेल्या मालकीमुळे तांत्रिक व मालकी हक्काशी संबंधित अडचणींमुळे आतापर्यंत यवतमाळ-मुर्तिजापूर हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित होऊ शकला नाही.जर हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात आला तर यवतमाळची मुंबईशी कनेक्टिव्हिटी मजबूत होईल.शिवाय यवतमाळ ते श्रीक्षेत्र माहूर असा मेट्रोप्रकल्प झाल्यास त्याचा या क्षेत्राला फायदाच होईल असा विशेष उल्लेखदेखील श्री.नितीन गडकरींनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना लिहिलेल्या पत्रात केला आहे. यवतमाळ-मूर्तिजापूर गेज कनव्हर्जनचा समावेश पी.एम गतिशक्ती योजनेअंतर्गत झाल्यास या विकासकामाला गती मिळू शकते असे अक्षयला वाटते.

अधिक माहिती...
14
Mar 23
स्मार्ट प्रकल्पांतर्गत उपप्रकल्पासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंदु ह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील समुदाय आधारित संस्थांकडून (FPO/FPC) मुल्यसाखळी विकासाचे उपप्रकल्प राबविण्यासाठी २१ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज हे शेतमाल मुल्यसाखळी विकासाच्या उपप्रकल्पासाठी आहेत.मुल्यसाखळी विकासाचे उत्पादक भागीदारी उपप्रकल्प आणि बाजार संपर्क वाढ उप प्रकल्पा साठी सदर अर्ज मागविण्यात येत असून.अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स यांचा समावेश अवश्यक आहे. प्राप्त होणाऱ्या अर्जापैकी पात्र स्पर्धात्मक व उत्कृष्ट अर्जांना प्रकल्पाच्या ६० टक्के अनुदान उपलब्ध होणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष,अर्जाचा नमुना इत्यादी माहिती www.smart-mh.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून इच्छुकांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून डाऊनलोड करावा. किंवा जिल्हा अंमलबजावणी कक्ष (स्मार्ट) तथा प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालय,यवतमाळ येथून घ्यावा. परिपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक (आत्मा) कार्यालयत दिनांक २१ मार्च २०२३पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडून करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
14
Mar 23
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत कर्ज योजनेसाठी लाभार्थी निवड लॉटरी पद्धतिने

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये थेट कर्ज योजनेंतर्गंत कर्ज मिळविण्याकरिता प्रस्ताव सादर केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांची निवड चिठ्ठीद्वारे (लॉटरी पध्दतीने) होणार आहे. २१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,येथे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली कर्ज प्रकरण बैठकित सदर निवड करण्यात येणार आहे. मांतग,मांग,मांग-गारोडी,मादगी व मादिगा समाजातील कर्ज प्रकरण दाखल केलेल्या लाभार्थ्यांनी २१ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय,यवतमाळ येथे उपस्थित राहवे.तसेच महामंडळाच्या कार्यालयात स्वत: संपर्क साधून कर्ज प्रकरण यादीमध्ये समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच काही तक्रार असल्यास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय यवतमाळ येथे संपर्क साधावा असे जिल्हा व्यवस्थापक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या),यांनी कळविले आहे.

अधिक माहिती...
14
Mar 23
जिल्ह्यातील तरूण-तरूणींनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अल्पमुदतीचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १८ ते ४५ वर्ष वयोगटातील जिल्ह्यातील युवा तरूण-तरूणी यांना रोजगार मिळणे करिता व कौशल्य प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था धामणगाव रोड,यवतमाळ येथे देण्यात येणार आहे. यासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू असुन नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२३ पर्यंत सुरू आहे. ईच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतिसह अर्ज सादर करावा. सदर प्रशिक्षणाचा एकूण कालावधी हा ४५० तासाचा असणार आहे. या योजनेंतर्गत आठ प्रकारचे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. टू व्हीलर सर्विस टेक्निशियन, चार चाकी सर्विस टेक्निशियन, सी.एन.सी. ऑपरेटर टर्निंग, सी.एन.सी. ऑपरेटर, व्हर्टिकल मशीनिंग सेंटर, असिस्टंट सेंटरिंग कारपेंटर, इलेक्ट्रिशन डोमेस्टिक सोल्युशन, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर तसेच ब्युटी थेरपिस्ट (फक्त मुलींकरिता) असून सदर प्रशिक्षणासाठी निशुल्क प्रवेश देणे सुरू आहे. नोंदणी प्रक्रिया २५ मार्च २०२३ पर्यंत सुरू असून ईच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्राच्या कॉपीसह संस्थेचे समन्वयक श्री.चव्हाण यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थचे प्राचार्य व्ही. जे.नागोरे यांनी केले आहे.

अधिक माहिती...
अनामवीरांची माहिती (Unsung Hero's)
  • लुईस फर्नांडिस

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मी थेरे

     यांचा जन्म १९२५ मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां- विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला१४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने रणगाड्यांमधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण

      यांचा जन्म १८९० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यावेळी निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यांमधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झोरवान सिंग

    हे मुंबई येथील रहिवासी, १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना हत्यारांची मदत केली आणि इतरांनासुद्धा या लढ्यात सामील व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहीत केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची क्रांतिकारकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. सप्टेंबर, १८५७ मध्ये त्यांना १० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८५८ मध्ये अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना जानेवारी १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झाकीउद्दिन सुलेमानजी

    हे मुंबईचे रहिवासी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळाबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान