आचंद्र सूर्य नांदो, स्‍वातंत्र्य भारताचे

"स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना भारताची संपन्‍न सांस्कृतिक परंपरा जपणे हे आपले आद्यकर्तव्‍य आहे. हे कर्तव्‍य आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्‍या माध्‍यमातुन प्रभावीपणे पार पाडु. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमीत्‍त सर्वांना मनपुर्वक शुभेच्‍छा !!"

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सत्रात "मेरी माटी, मेरा देश" अर्थात "माझी माती, माझा देश" हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सत्रात आपण "मेरी माटी, मेरा देश" अर्थात "माझी माती, माझा देश" व "हर घर तिरंगा" हे अभियान राज्यात साजरे करत आहोत. आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपण आपल्या घरावर, आपला तिरंगा १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान फडकवावा."

श्री. विकास खारगे (भा.प्र.से.)
प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग.

संपन्न झालेले उपक्रम

22
Nov 23
राज्य संरक्षित स्मारकांचे जतन-दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले.

जागतिक वारसा सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ अंतर्गत सोनेरी महल सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर येथे मागील पाच वर्षात छत्रपती संभाजीनगर व नांदेड विभागा मार्फत झालेले जतन – दुरुस्ती कामंचे छायाचित्र प्रदर्शन दि. २२ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भरवीण्यता आले. व प्रदर्शनस निशुल्क प्रवेश ठेण्यात आले तसेच सदर कार्यक्रमाची उद्दघाटक- डॉ. तेजस गर्गे मा.संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. व मुकुंद भोगले इंटॉक्ट औरंगाबाद चॅप्टर उपस्थिती होते मा. संचालक साहेबांनी कार्यालयाती अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मनोग्त व्यक्त केले व विभागाचे कार्यपद्धती बदलती आहे याबाबत प्रशंसाही केले.

अधिक माहिती...
21
Oct 23
आयटीआय उमरखेड येथे प्रधानमंत्री दौड मॅरेथॉन स्पर्धा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून उमरखेड येथे पीएम स्किल रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ गो. सी. गावंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ. कदम, श्री समर्थ फॅब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल उमरखेडचे रामेश्वर बिच्चेवार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश शिंदे उमरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले विजेत्या व सहभागी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ नितीन भुतडा व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला व पुरुष गट यामध्ये एकूण 220 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये पुरुष गटात राम विलास राठोड याने प्रथम क्रमांक ब्रम्हा भिकु आडे याने द्वितीय क्रमांक व चेतन शंकर बाभुळकर याने तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटामध्ये काचंन गजानन जाधव हिने प्रथम, भक्ती दिनेश हातगांवकर हिने द्वितीय तर पूजा गजानन राठोड हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ढाणकी, श्रीराम प्लायवूड अँड हार्डवेअर पुसद, माहेश्वरी एजन्सी उमरखेड, गोदावरी अर्बन बँक उमरखेड यांच्यावतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. तसेच नितीन भुतडा यांच्यावतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना नास्ता व चहा तसेच रामेश्वर बिच्चेवार यांच्यावतीने पाणी व्यवस्था करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य डी.पी.पवार व संपूर्ण आयटीआयची टीम तसेच आरोग्य पथक, वाहतूक पोलीस यांनी सक्रिय सहभाग घेऊन पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

अधिक माहिती...
12
Oct 23
*इंदिरा महाविद्यालय कळंब येथे रसायनशास्त्र अभ्यासमंडळाची स्थापना*

स्थानिक इंदिरा महाविद्यालय कळंब येथील रसायनशास्त्र विभागातर्फे केमिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत जवादे , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. सरोज लखदिवे, इंदिरा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय , राळेगाव येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सतीश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रशांत जवादे सरांनी अभ्यासमंडळाचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दशरथ चव्हाण यांनी यावर्षी विभागातर्फे होणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली व रसायनशास्त्र अभ्यासमंडळ मधील नवनियुक्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. रसायनशास्त्र अभ्यासमंडळात अध्यक्ष क्रांतीकुमार अलोणे, उपाध्यक्ष युसरा काझी , कोषाध्यक्ष कु. काजल इंझाळकर, सचिव अजिंक्य धोबे ,सदस्य म्हणून विश्वजीत भुजाडे ,कु. पायल चांदोरे, तुबा काझी व कु. शिवानी डोडेवार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. निळकंठ नरुले यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्सा काझी तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल खांडेकर यांनी केले .या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्राची बोंडे ,डॉ. सुरज देशमुख , श्री नरेश कोकांडे व रसायनशास्त्र पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रम प्रसंगी डॉ. पांडुरंग इंगळे, प्रा. शितल राऊत ,डॉ. शरयू बोंडे ,प्रा. राहुल सिन्हा , प्रा. सखाराम सांगळे तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

अधिक माहिती...
9
Oct 23
इट राईट मिलेट मेळाव्याचे आयोजन

शहरात अन्न व औषध प्रशासन विभाग व माहेश्वरी मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारात समावेश करण्याबाबत जनजागृतीसाठी महेश भवन, यवतमाळ येथे इट राईट मिलेट मेळावा नुकताच संपन्न झाला. नागरिकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मिलेट्स रेसीपी व इतर पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या मेळाव्याचे उद्घाटन श्यामसुंदर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ जयश्री उघाडे, माहेश्वरी मंडळाचे चंद्रकांत बागडी, विजय लाहोटी, शोभा मुंधळा उपस्थित होत्या. यावेळी डॉ जयश्री उघाडे यांनी जंक फूडचे दुष्परिणाम, मिलेट्सचा आहारातील महत्त्व सांगितले व विविध शंकांचे निरसन केले. सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासह सकस व पोषण मुल्यांनी युक्त असे आहार घेणे आवश्यक आहे. भरड धान्य हे भारतीय अन्न संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेवून दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर करणे आजच्या फास्टफुडच्या काळात गरजेचे बनले आहे. भगर, नाचणी, राजगिरा, कुट्टु, बाजरी, ज्वारी, कोदो, कुटकी, कांगनी, सावा इत्यादी भरडधान्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे शरीरातल्या शुगर, कोलेस्टेरॉलच्या समस्या दुर होतात व ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मधुमेहच्या रुग्णांनी आहारात मिलेट्सचा समावेश केल्यास शुगर नियंत्रणात राहते. भरड धान्य हे कॅल्श‍ियम, आयर्न, फायबर व विटॅमीन्सने समृध्द असतात. कॅल्श‍ियममुळे हाडे मजबुत होतात, फायबरमुळे पाचन होण्यास मदत होते, आयर्नची भरपुर मात्रा असल्याने रक्त शुध्द होते व ते महिलांसाठी सुपर फुड म्हणून काम करते, असे मत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यांनी प्रास्ताविकात मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी घनश्याम दंदे, अमित उपलप व माहेश्वरी मंडळाचे महेश मुंदडा, अॅड वरुण भुतडा यांनी प्रयत्न केले.

अधिक माहिती...
9
Oct 23
डाक योजनांच्या जनजागृतीसाठी डाक सप्ताहाचे आयोजन

भारतीय डाक विभागाच्यावतीने संपूर्ण देशभरात डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ डाक विभागाच्यावतीने दि. 9 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. हा डाक सप्ताह 13 ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या विविध योजना तसेच डाक खात्याच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेला देवून जनजागृती करणे हा या मागचा उद्देश आहे. राष्ट्रीय डाक सप्ताहाचे निमित्ताने दि. 11 ऑक्टोबर रोजी डाक विभाग, यवतमाळ व डाक तिकीट संग्रह संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ अशा डाक तिकीटांचे भव्य प्रदर्शन महिला विद्यालय, महादेव मंदिर रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे. डाक तिकीट संग्रह करणे व त्यामधून आपल्या देशातील थोर क्रांतिकारी पुरुषांची, समाजसेवकांची माहिती तसेच कला, संस्कृती याची माहिती व्हावी हा या प्रदर्शनी मागचा मुख्य हेतू आहे. या प्रदर्शनीमध्ये निशुल्क प्रवेश आहे. या प्रदर्शनीला जनतेने तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यवतमाळ विभागाचे डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव, डाक तिकीट संग्रह संघाचे समन्वयक डॉ. योगेंद्र मारू यांनी केले आहे.

अधिक माहिती...
9
Oct 23
मियावाकी प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धनाची प्रेरणा देणारा

दिग्रसच्या पर्यटन वैभवात भर घालणारा अटल आनंदवन घनवन (मियावाकी) प्रकल्प दिग्रसवासियांसह सर्वांच्या पर्यटनासाठी उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धन व संरक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पुसद वन विभागाने दिग्रस शहराजवळील भवानी टेकडी परिसरामध्ये उभारलेल्या अटल आनंदवन घनवन या मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले, पुसद वन विभागाचे उपवनसंरक्षक डॅा. बी.एन.स्वामी, सहायक वनसंरक्षक साईनाथ नरोड, तहसिलदार सुधाकर राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, सुधीर देशमुख, रविंद्र अरगडे, ॲड. विवेक बनगिनवार, प्रणित मोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन म्हणाले की, वन विभागाने उजाड जमिनीवर विविध झाडे लावून परिसराचा कायापालट केला आहे. ही कौतुकाची बाब आहे. आज आपण एका संक्रमण परिस्थितीला सामोरे जात आहोत. ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक भागात मानव-वन्यप्राण्यांत संघर्षाच्या तक्रारी होत आहेत. आपण वन्यजीवांच्या हद्दीत चाललो का, हा देखील विचार करण्याची गरज आहे. ऋतुचक्र बदलल्याचे अनुभव येत आहे. पूर्वीच्या ऋतुचक्रासाठी वनसंरक्षण केले पाहिजे. जैवविविधतेचे चक्र पाळले पाहिजे. लोकांमध्ये वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याची भावना रुजवण्याची गरज आहे. वन संरक्षण केल्यास निसर्ग टिकून राहील. वन विभागही त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत आहे. नव्या पिढीला वने, पशुपक्षी, वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोणातून या भवानी टेकडी उद्यानात सुविधा निर्माण करावी. राज्याचा वन मंत्री असतांना लोकांच्या मागणीनंतर वन विभागाच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून दिग्रसवासियांसह शाळकरी विद्यार्थी, पर्यटनप्रेमींसाठी पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. येणाऱ्या काळात या भागाचा अजून विकास होणार आहे. वन विभागाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. या परिसरात पर्यटक, विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनसंवर्धनाविषयी माहिती होण्यासाठी सर्वस्तरावरचे गार्डन तयार झाले पाहिजे. वन विभाग हा जनहिताचे कार्य करणारा विभाग आहे, ही भावना नागरिकांनी बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. राठोड यांनी व्यक्त केली. यावेळी यवतमाळ वन वृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले यांनी प्रास्ताविकात मियावाकी प्रकल्पाची आणि वनविभागाच्या विविध योजनांची माहिती देवून वनसंवर्धनाचे आवाहन केले. मियावाकी प्रकल्प : मियावाकी ही जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी तयार केलेली पद्धत आहे. हे जंगल जलद वाढण्यास, घनदाट आणि नैसर्गिक होण्यास मदत करते. या पद्धतीमध्ये उजाड जमीनीवरही अनेक प्रकारची झाडे एकत्र लावता येतात, ज्यामुळे प्रजातींमध्ये संतुलित वातावरण निर्माण होते. परिणामी, झाडे दहापट वेगाने वाढतात आणि जंगले सामान्यापेक्षा ३० पट घनदाट होतात. या पद्धतीमध्ये केवळ स्थानिक देशी झाडे लावली जातात. याच पद्धतीने दिग्रसमधील भवानी टेकडी परिसरातील कोलुरा गावात वन विभागाने एक हेक्टर मुरबाड जमिनीचा पोत सुधारुन वनीकरणासाठी जागा तयार करुन या जागेवर तीस हजार रोपांची लागवड केली आहे. या अटल आनंदवन धनवन (मियावाकी) प्रकल्पात आवळा, आंबा, पेरु, फनस, वड, पिंपळ, बकुली, निम, कांचन, सिताफळ, चिकू, डाळींब अशी विविध रोपे लावण्यात आली आहे.

अधिक माहिती...
अनामवीरांची माहिती (Unsung Hero's)
  • लुईस फर्नांडिस

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मी थेरे

     यांचा जन्म १९२५ मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां- विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला१४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने रणगाड्यांमधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण

      यांचा जन्म १८९० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यावेळी निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यांमधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झोरवान सिंग

    हे मुंबई येथील रहिवासी, १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना हत्यारांची मदत केली आणि इतरांनासुद्धा या लढ्यात सामील व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहीत केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची क्रांतिकारकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. सप्टेंबर, १८५७ मध्ये त्यांना १० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८५८ मध्ये अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना जानेवारी १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झाकीउद्दिन सुलेमानजी

    हे मुंबईचे रहिवासी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळाबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान