स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

श्री. एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
आचंद्र सूर्य नांदो, स्‍वातंत्र्य भारताचे

"हे वर्ष भारतीय स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष आहे. हजारो लाखो हुतात्‍म्‍यांनी आपल्‍या प्राणांचे बलिदान देवुन वंदनीय भारतमातेला परकीयांच्‍या बेडयातुन मुक्‍त केले व स्‍वातंत्र्याचा मंगल कलश आपल्‍या हाती दिला. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना भारताची संपन्‍न सांस्कृतिक परंपरा जपणे हे आपले आद्यकर्तव्‍य आहे. हे कर्तव्‍य आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्‍या माध्‍यमातुन प्रभावीपणे पार पाडु. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमीत्‍त सर्वांना मनपुर्वक शुभेच्‍छा !!"

श्री. सुधीर मुनगंटीवार
मा. सांस्कृतिक कार्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य

संपन्न झालेले उपक्रम

16
May 23
बालसंगोपन योजनेचा ९६८ बालकांना १ कोटी २५ लक्ष रुपयांचा लाभ वितरित नविन १०५० प्रस्तावाना मंजुरी

अनाथ, निराश्रीत, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने शासन बालसंगोपन योजना राबविते. जिल्ह्यात मार्च २०२३पर्यंत ९६८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला असून १ कोटी २५ लक्ष २४ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये बाल संगोपन योजनेसाठी २९४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागातील ६६५ तर ग्रामीण भागातील २२८१ प्रस्तावाचा समावेश आहे. यापैकी १२३३ प्रस्तावांची गृह चौकशी पूर्ण झाली असून १०५० प्रकरणात सी डब्ल्यू सी ने बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश केलेले आहेत अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी बैठकित दिली. यावेळी उर्वरित १७१३ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी गृह चौकशी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश द्यावेत, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शाळा बाह्य मुले, रस्त्यावरची मुले, आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बालसंगोपन योजना आढावा बैठकित बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे, बालकल्याण समिती सदस्य ॲड प्राची निलावार, वनिता शिरफुले, ॲड लीना ओक, फाल्गुन पालकर, माधुरी पावडे, देवेंद्र राजुरकर स्वप्नील शेटे उपस्थित होते.

अधिक माहिती...
16
May 23
घाटंजी येथे २३ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी यांचे संयुक्त विद्यमाने २३ मे सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण ९०५ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रीज, पुसद, आरोही इन्फो एफ आय मॅनेजमेंट लि. अकोला संभाजी नगर, वैभव एन्टर प्रायजेस, नागपूर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर, अमरावती, धुत ट्रान्समिशन, औरगाबाद, परमस्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/ पूणे, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, मेगाफिड बायोटेक, नागपूर यांच्याकडुन उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १०वी, १२ वी, आय.टि.आय पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा , असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.

अधिक माहिती...
16
May 23
सावरगाव येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा २० मे ला*

आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या संकल्पनेतून २० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सावरगाव ता.कळंब येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात हवामान तज्ञ पंजाब डख शेतक-याना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरश:धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल? पिकांची देखभाल कशी करावी? पेरणी कधी करावी? या विषयाचे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे याकरिता प्रसिध्द हवामान तज्ञ तथा हवामान अभ्यासक पंजाबराव डख,सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अन्नासाहेब पारवेकर तथा आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. अशोक उईके यांनी केले आहे.

अधिक माहिती...
16
May 23
*जत्रा शासकीय योजनांची*

पंचायत समिती बाभुळगाव ग्राम panchyat. वेणी यांच्याकडून *जत्रा शासकीय योजनांची* या अभियानात एकूण 20 दिवयांग लाभार्थी यांना चेक स्वरूपात अनुदान वाटप करण्यात आले त्या प्रसंगी गट विकास अधिकारी श्री पवार,सरपंच,उपसरपंच,विस्तार अधिकारी सा v लाभार्थी उपस्थित होते

अधिक माहिती...
15
May 23
स्व-संरक्षणाकरीता महिलांसाठी शार्यै शिबिर

देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्था वडी.एम.एम.आयुर्वेद कॉलेज, यवतमाळ यांच्यासंयुक्त विदमयाने दिनांक २७ व २८ मे रोजीसामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे महिलांसाठी शौर्य शिबिराचे आयोजन करण्यात येतआहे.या शिबिरामध्ये भारतीय पारंपारीक खेळ लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, मुद्ग, नॉनचॉक आदि शौर्य व क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपल्या देशात स्त्रीला देवी मानून पूजन केले जाते. मात्र लहान मुलींनाही आज शाळांमध्ये गुडटच, बॅडटच शिकवावे लागते.त्यामुळे स्त्रीला स्वसंरक्षणासाठी उभे रहावेच लागेल. त्यासाठी शक्ती वाहीनीची स्थापना करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मुख्यत: यवमताळ दामीनी पथकाच्या प्रमुख मा.सौ.विजया पंधेरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे व तसेच योगासन, प्राणायाम वयांचे मार्गदर्शन मिळणार आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त महिला, मुली (वयोगट १५ ते ४०) यांनी भाग घ्यावा असे संस्थेचे सचिव सौ.चंदा राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आवाहन केले आहे.

अधिक माहिती...
15
May 23
पाणी टंचाई बाबत विहिरीची पाहणी

मौजा मादनी येथील पाणी टंचाई बाबत विहिरीची पाहणी करताना 15 वा वित्त आयोग 10 टक्के पंचायत समिती स्तर अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर सोलर पंप सौर ऊर्जा panel बसविण्यात आले त्यामुळे विजेची बचत फार मोठ्या प्रमाणात होते

अधिक माहिती...
अनामवीरांची माहिती (Unsung Hero's)
  • लुईस फर्नांडिस

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मी थेरे

     यांचा जन्म १९२५ मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां- विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला१४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने रणगाड्यांमधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण

      यांचा जन्म १८९० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यावेळी निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यांमधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झोरवान सिंग

    हे मुंबई येथील रहिवासी, १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना हत्यारांची मदत केली आणि इतरांनासुद्धा या लढ्यात सामील व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहीत केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची क्रांतिकारकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. सप्टेंबर, १८५७ मध्ये त्यांना १० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८५८ मध्ये अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना जानेवारी १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झाकीउद्दिन सुलेमानजी

    हे मुंबईचे रहिवासी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळाबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान