स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

श्री. एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
श्री. देवेंद्र फडणवीस
मा. उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
श्री. अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य
आचंद्र सूर्य नांदो, स्‍वातंत्र्य भारताचे

"स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करतांना भारताची संपन्‍न सांस्कृतिक परंपरा जपणे हे आपले आद्यकर्तव्‍य आहे. हे कर्तव्‍य आपण सांस्कृतिक कार्य विभागाच्‍या माध्‍यमातुन प्रभावीपणे पार पाडु. भारतीय स्‍वातंत्र्याच्‍या अमृत महोत्‍सवानिमीत्‍त सर्वांना मनपुर्वक शुभेच्‍छा !!"

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सत्रात "मेरी माटी, मेरा देश" अर्थात "माझी माती, माझा देश" हे अभियान राज्यात मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येत आहे. आपण सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मी आपणास करीत आहे.

श्री. सुधीर मुनगंटीवार
मा. सांस्कृतिक कार्य मंत्री,
महाराष्ट्र राज्य
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव

"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सत्रात आपण "मेरी माटी, मेरा देश" अर्थात "माझी माती, माझा देश" व "हर घर तिरंगा" हे अभियान राज्यात साजरे करत आहोत. आपणा सर्वांना आवाहन आहे की, आपण आपल्या घरावर, आपला तिरंगा १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान फडकवावा."

श्री. विकास खारगे (भा.प्र.से.)
मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
तथा प्रधान सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग.

संपन्न झालेले उपक्रम

16
Sep 23
अमृत कलश यात्रा काढतांना लोकसहभागावर भर द्या - डॅा.पंकज आशिया

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढली जात आहे. या यात्रेद्वारे घराघरातून मातीचे संकलन केले जात आहे. यात्रेत गावातील नागरिकांचा जास्तीत जास्त लोकसहभाग घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. जिल्ह्यात दि. 30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलेश यात्रेचे आयोजन करून मातीचे संकलन करण्यात येत आहे. या यात्रेचे आतापर्यंत झालेले काम व पुढील तयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त विठ्ठल केदारे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा परिषद पंचायत विभागाचे सहाय्यक गटविकास अधिकारी रामदास चंदनकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात विविध कार्यक्रम राबविण्यात आले. आता दि.30 सप्टेंबरपर्यंत प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने काढल्या जाणाऱ्या या यात्रेत प्रत्येक घरातून मुठभर मातीचे संकलन केले जातील. यात शेतकऱ्यांचा सहभाग घेतला जाणार आहे. ज्या कुटुंबांकडे शेती नाही, अशा कुटुंबांकडून चिमूटभर तांदुळ मातीच्या कलशामध्ये जमा केले जाणार आहे. प्रत्येक गावातून एक कलश तयार केला जातील. गटग्रामपंचायत असल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील प्रत्येक गावातून स्वतंत्र कलश तयार केला जातील. प्रत्येक गावातून एक कलश तयार केल्यानंतर उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर तयार केलेल्या अमृत वाटीकेकरीता करण्यात येणार आहे. गावातून कलश यात्रा काढतांना वाद्य वाजवत उत्साहवर्धक वातावरणात काढण्यात यावी. माती व तांदुळाचे संकलन करतांना पंचप्रण शपथ घेण्यात यावी, असे निर्देश बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. जिल्ह्यात दि.1 ते 13 ऑक्टोंबर या कालावधीत गावस्तरावरील प्रत्येकी एक याप्रमाणे गटविकास अधिकारी यांच्याकडे कलश जमा करून घेतले जातील. प्रत्येक गावातून आलेली माती एकत्र करून त्यातून एक कलश तयार केला जातील. उरलेली माती तालुकास्तरावर तयार केलेल्या अमृत वाटिकेसाठी उपयोगात आणली जातील. यादरम्यान तालुकाठिकाणी देखील अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे. या यात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधी, सैन्यातील विरांच्या कुटुंबियांना सहभागी करून घेतले जातील. तालुक्यातील अमृत कलश जिल्हास्तरावर पोहोचविला जातील. सर्व तालुक्यातून जिल्हास्तरावर जमा झालेले कलश दोन स्वयंसेवकांद्वारे मुंबई येथे दि.22 के 27 ऑक्टोंबर या कालावधीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी नेले जाणार आहे. मुंबई येथून हे कलश दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी पाठविले जातील. गाव व तालुकास्तरावर राबवावयाच्या या सर्व कार्यक्रमाचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले.

अधिक माहिती...
14
Sep 23
यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने बैलपोळाचे आयोजन

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी आत्महत्या करु नये. शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी आझाद मैदान येथे आयोजित बैलपोळा उत्सवात केले. नगरपरिषदच्यावतीने आयोजित बैलपोळा उत्सव समारंभात पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते उत्कृष्ट बैलजोडीधारकांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. आझाद मैदान येथे दरवर्षी प्रमाणे पारंपरिक बैलपोळा उत्सव भरविण्यात येतो. यंदाच्या वर्षी या उत्सवात 38 बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. यातील परिक्षण मंडळाने निवडलेल्या पाच सर्वोत्कृष्ट बैलजोडी धारकांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले. यात प्रथम क्रमांक सरदार चौधरी, द्वितीय क्रमांक शंकर कासार, तृतीय क्रमांक दिनेश तिवाडे, चौथा क्रमांक दिपक सुलभेवार आणि पाचवा क्रमांक भोला देवकर यांनी पटकावला. या विजेत्यांना पालकमंत्री श्री. राठोड यांच्याहस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, राजेंद्र डांगे, माजी सभापती गजानन इंगोले, रमेश अग्रवाल आणि शेतकरी व स्पर्धक मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड संबोधित करतांना म्हणाले, पोळा सण भावी पिढीला समजला पाहिजे. सणाविषयी त्यांना शिकवण देणे गरजेचे आहे. आगामी काळात सण उत्सव उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न होईल, यासाठी नियोजन करण्यात येईल. राज्य शासनाने शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून त्यांचे आत्मबल व मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न राज्य शासनाने केला आहे. शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य, सन्मान निधी यासारख्या विविध योजनांतून लाभ दिला. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका राज्य शासनाची आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिर्घकालीन व अल्पकालीन उपाययोजना राज्य सरकार करत आहे. शेतकऱ्यांना चांगले बियाणे, 24 तास वीजपूरवठा, पाणी आदी सूविधा देवून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम राज्य शासन करणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये. शेतकऱ्यांना चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

अधिक माहिती...
14
Sep 23
सण उत्सव एकोपा व शांततेत साजरे करावेत - डॉ. पंकज आशिया

आगामी काळातील पारंपरिक सण, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे सण, उत्सव सर्वांनी एकोप्याने व शांततेत साजरे करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले. पोलिस प्रशासनामार्फत उमरखेड येथील नगरपरिषद सभागृह येथे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात झाली. यावेळी आ.नामदेव ससाणे, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजयराव खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार डॉ.आनंद देऊळगांवकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश जामनोर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद हे आपले पारंपरिक उत्सव आहे. हे उत्सव साजरे करतांना सलोखा बाळगणे फार महत्त्वपूर्ण आहे. या उत्सवादरम्यान अनूचित प्रकार घडू नये. आपसात तेढ निर्माण होणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. हे सर्व सण एकोप्याने साजरे करावे. रस्त्यावरील खड्डयांचे काम सणांच्या अगोदर पूर्ण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी बांधकाम विभाग व नगरपरिषदेला केल्या. बैठकीत पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड यांनी सण, उत्सवात कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पोलिस प्रशासनाने सर्तक राहावे. वीजपुरवठा खंडीत होऊ नये यासाठी वीज मंडळाने सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध धर्माचे पदाधिकारी, मंडळ, उत्सव समितीचे सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक माहिती...
14
Sep 23
गणेशोत्सव स्पर्धेत मंडळांनी सहभागी होण्याचे आवाहन

शासनाने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी राज्यातील उत्कृष्ट 44 गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. या मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख, द्वितीय क्रमांकाच्या मंडळास अडीच लाख तर तृतीय क्रमांकाच्या उत्कृष्ट मंडळास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. राज्यातील उर्वरित 41 गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येईल. mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर गणेश मंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमीतर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला 16 सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. 19 ते 28 सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस दि.1 ऑक्टोबरपर्यंत करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट 3 गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व 12 ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल. राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
14
Sep 23
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व्यवसाय कर्जावर 12 टक्के व्याज किंवा 15 लाखापर्यंत सवलत

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने प्रामुख्याने मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही, अशा प्रवर्गाकरीता विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्यातील गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत उद्योग, व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. या कर्जावर महामंडळाच्यावतीने 12 टक्के व्याज किंवा 15 लाखापर्यंत सवलत दिली जाते. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभासाठी किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन उद्योग, व्यवसाय स्थापन करणे आवश्यक आहे. दोन व्यक्तींनी व्यवसाय सुरु केल्यास 25 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. तीन व्यक्तींच्या व्यवसायासाठी 35 लाख, चार व्यक्तींच्या व्यवसायासाठी 45 लाख तर पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसाय स्थापन केल्यास 50 लाखापर्यंत योजनेंतर्गत बॅंकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. उद्योग, व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने 12 टक्के दराने व्याज सवलत दिली जाते. ही सवलत 12 टक्के किंवा जास्तीत जास्त 15 लाखाच्या मर्यादेपर्यंत मंजूर केली जाते. त्यासाठी गटाने वेळेत कर्जाचा हप्ता भरणे आवश्यक आहे. वेळेत हप्ता भरल्यानंतर व्याज परताव्याची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा देखील नियमानुसार महामंडळाच्यावतीने दिला जातो. ही योजना प्रामुख्याने मराठा प्रवर्गाकरीता तथा ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही, अशांकरीता राबविली जाते. कौटूंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. लाभार्थ्याने स्थायिक, कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य आहे. दिव्यांग व्यक्तीला योजनेंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. योजनेंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एलएलपी, कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट, संस्था लाभास पात्र आहे. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय, उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावर व्याज परतावा करण्यात येतो. कर्ज प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्र योजनेच्या लाभासाठी मोबाईल क्रमांक व स्वत: ई-मेल आयडी जोडलेले आधारकार्ड, रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी दाखला, लाईट बील, रेशनकार्ड, गॅस बिल, बॅंक पासबुक, उत्पन्नाचा पुरावा म्हणून उत्पन्न दाखला, आयटी रिटर्न तसेच जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, एक पानी प्रकल्प अहवाल आदी कागदपत्र आवश्यक आहे. योजनेची सविस्तर माहिती www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे.

अधिक माहिती...
13
Sep 23
शासन आपल्या दारी अभियान ६६ हजार शेतकऱ्यांना २५३ कोटींचे प्रोत्साहन अनुदान

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरु केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान या योजनेंतर्गत दिले जाते. या योजनेतून जिल्ह्यातील ६६ हजार ८०६ शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर लाभाचे वितरण ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमादरम्यान करण्यात आले आहे. या योजनेचा शुभारंभ ऑक्टोबर २०२२ मध्ये करण्यात आला होता. शेती व शेतीशी निगडीत कामांकरिता शेतकरी व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृश परिस्थती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. काही भागात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तींमुळे शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नव्हती. परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे शेती कामासाठी नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. शेतकऱ्यांची परिस्थिती विचारात घेऊन ही योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. पिककर्जाची उचल करुन नियमितपणे मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा व प्रोत्साहन मिळावे यासाठी अशा पात्र शेतकऱ्यांना ५० हजाराचे अनुदान कर्जमुक्ती योजनेतून दिले जात आहे. या प्रोत्साहनपर योजनेंतर्गत आर्णी तालुक्यातील ५ हजार ८७५ शेतकऱ्यांना २१ कोटी ६५ लाख, बाभूळगाव तालुक्यातील २ हजार ५७३ शेतकऱ्यांना १० कोटी २० लाख, दारव्हा २ हजार २७६ शेतकऱ्यांनी ९ कोटी ४४ लाख, दिग्रस ४ हजार ९१६ शेतकऱ्यांना १७ कोटी ५० लाख, घाटंजी ३ हजार ६३१ शेतकऱ्यांना १४ कोटी ७२ लाख, कळंब १ हजार ९४३ शेतकऱ्यांना ८ कोटी ४४ लाख, केळापूर २ हजार ५५५ शेतकऱ्यांना ११ कोटी ४६ लाख, महागाव ३ हजार ७१० शेतकऱ्यांना १२ कोटी ६९ लाखाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले आहे. मारेगाव तालुक्यातील ३ हजार ८५१ शेतकऱ्यांना १६ कोटी २५ लाख, नेर २ हजार २२३ शेतकऱ्यांना८ कोटी २७ लाख, पुसद ९ हजार १८६ शेतकऱ्यांना २७ कोटी ९३ लाख, राळेगाव ४ हजार ३०९ शेतकऱ्यांना १७ कोटी २१ लाख, उमरखेड ७ हजार ७६२ शेतकऱ्यांना २६ कोटी ८०, वणी ७ हजार १४९ शेतकऱ्यांना ३१ कोटी ८१ लाख, यवतमाळ २ हजार ९४ शेतकऱ्यांना ८ कोटी १७ लाख आणि झरी जामणी तालुक्यातील २ हजार ७५३ शेतकऱ्यांना ११ कोटी १२ लाख असे एकूण ६६ हजार ८०६ नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५३ कोटी ७२ लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आले आहे. नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०१७-१८, सन २०१८-१९ आणि सन २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यास राज्य शासनाने मान्यता दिली. या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. सन २०१९ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेस पात्र होते. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारससुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र ठरविण्यात आले.

अधिक माहिती...
अनामवीरांची माहिती (Unsung Hero's)
  • लुईस फर्नांडिस

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मी थेरे

     यांचा जन्म १९२५ मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां- विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला१४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने रणगाड्यांमधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण

      यांचा जन्म १८९० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यावेळी निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यांमधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झोरवान सिंग

    हे मुंबई येथील रहिवासी, १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना हत्यारांची मदत केली आणि इतरांनासुद्धा या लढ्यात सामील व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहीत केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची क्रांतिकारकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. सप्टेंबर, १८५७ मध्ये त्यांना १० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८५८ मध्ये अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना जानेवारी १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झाकीउद्दिन सुलेमानजी

    हे मुंबईचे रहिवासी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळाबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान