स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव माहिती

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात दिनांक १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येणार आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे.

१२ मार्च २०२१ पासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांच्या आयोजनास सुरुवात झालेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ११ ऑगस्ट २०२१ रोजी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 'आजादी का अमृत महोत्सव' म्हणजेच 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या उपक्रमाच्या आयोजनाबाबत विविध मंत्रालयीन मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव यांच्यासमवेत बैठक संपन्न झालेली आहे. या बैठकीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या उपक्रमांचे आयोजन देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त केंद्र शासनाने सुचित केल्यानुसार १५ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर जनसामान्यांना सामावून घेऊन करण्याबाबत सूचना करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने संस्कृति मंत्रालय, भारत सरकार यांनी आजादी का अमृत महोत्सव याच्या प्रयोजनार्थ गठीत केलेल्या समितीच्या धर्तीवर राज्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी विविध क्षेत्रातील समितीला गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासनाने आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांसाठी खालील शासन निर्णय दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी बैठकीत घेतलेला आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव महाराष्ट्र राज्य शासन निर्णय

आजादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांसाठी वेगवेगळ्या समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या समित्या तयार करण्यासाठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ रोजी च्या बैठकीत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समित्या आणि मान्यवर

या समित्यांमध्ये मान्यवर खालील प्रमाणे असतील

कोअर समिती

विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तिंचा समावेश या समित्यांमध्ये समावेश असणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समित्या आणि उद्दिष्ट्ये

विविध क्षेत्रामध्ये आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राबविण्यात येणार्यास उपक्रमांसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.

  • धोरण समितीचे उद्दिष्ट्य

    या धोरण समितीचे उद्दिष्ट समिती तयार करून सन २०२३ पर्यंत कार्यक्रमांमध्ये सामाविष्ट करायचे विषय सुचवणे, कार्यक्रमाची रूपरेषा ठरवणे व त्या अंतिम करणे असे असणार आहे.

  • कोअर समितीचे उद्दिष्ट

    आजादी का अमृत महोत्सव या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे राज्यस्तरावर आयोजन होणार असल्याने धोरण समितीने शिफारस केलेल्या कार्यक्रमांच्या आयोजनाची रूपरेषा ठरवणे तसेच निधीबाबतच्या नियोजनाची कार्यवाही करणे याबाबत शिफारस करणे हे कोअर समितीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

  • अंमलबजावणी समितीचे उद्दिष्ट

    कोअर समितीने निश्चित केलेले कार्यक्रम त्यात्या विभागाने ठरवलेल्या कालावधीमध्ये आयोजन करणे, याबाबतची देखरेख आणि आढावा घेणे हे अंमलबजावणी समितीचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

  • जिल्हास्तरीय समिती

    जिल्हा समितीचे अध्यक्ष हे माननीय पालकमंत्री असणार आहेत. जिल्हास्तरीय समिती मध्ये जिल्ह्यातील सर्व विधिमंडळ व संसद सदस्य, जिल्हाधिकारी कार्यालय अध्यक्ष, जिल्ह्यातील महानगरपालिकेचे महापौर, नगरपालिका किंवा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय व्यक्तिंचा समावेश असेल. तर समित्यांमध्ये संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सदस्य सचिव राहतील. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय समितीच्या धर्तीवर महानगरपालिका किंवा महानगरपालिकास्तरीय, जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय समित्या तयार करण्यात येतील.या समित्यांचा कालावधी ऑगस्ट २०२३ आजादी का अमृत महोत्सवाचे शेवटचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर समाप्त होईल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो

'आजादी का अमृत महोत्सव' म्हणजेच 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'या योजनेअंतर्गत शासनाच्या सर्व शासकीय पत्रव्यवहार तसेच इतर ठिकाणी किंवा विविध माध्यमांवर परिशिष्ट अ मध्ये सुनिश्चित केलेल्या लोगोचा वापर करण्यात येणार आहे.

सदर चिन्हांचा लोगो शासकीय पत्र व्यवहारासाठी वापर करण्याचे कटाक्षाने पालन करावे. तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये प्रदर्शित करण्यात यावेत. सर्व प्रशासकीय विभागांनी किंवा मंत्रालयीन विभागांनी त्यांच्या अंतर्गत क्षेत्रीय कार्यालयांना ही बाब निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत योग्य त्या सूचना प्रसारित कराव्यात. असा महाराष्ट्र शासनाचा ३० सप्टेंबर २०२१ रोजी चा शासन निर्णय GR.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कधीपासून साजरा केला जातो?

आझादीचा अमृत महोत्सव महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमापासून १२ मार्च २०२१ पासून ७५ आठवड्यांसाठी सुरू झाला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अर्थ काय?

भारताच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा होणाऱ्या 'आजादी का अमृत महोत्सवात' लोकांचा जास्तीत जास्त सहभाग आणि जागरुकता सुनिश्चित करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत सुरु केलेला आहे. यामध्ये अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमांची मालिका तयार केली आहे. हा अमृत महोत्सव 'जन भागीदारी' आणि 'जनआंदोलन' च्या भावनेने साजरा केला पाहिजे.

अमृत महोत्सव म्हणजे काय?

७५ आठवडे पूर्ण झाल्यानंतरही देशात कुठेही अमृत महोत्सव साजरा झाला नाही. पण यावेळी भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वी जयंती अमृत महोत्सव म्हणून साजरी केली जात आहे. जरी स्वातंत्र्याची ७५ वी जयंती २०२२ मध्ये असेल, परंतु त्याचे कार्यक्रम २०२३ पर्यंत चालतील. अर्थात पुढील दोन वर्षे देश अमृत महोत्सव साजरा करत राहील.

अमृत महोत्सव कधी साजरा केला जातो?

स्वाभिमान आणि स्वातंत्र्यानंतर आता देश सातत्याने स्वावलंबनाच्या मार्गावर पुढे जात आहे. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू झालेला 'आझादी का अमृत महोत्सव' हे स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे, जे भारत सरकारने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे.