• बालसंगोपन योजनेचा ९६८ बालकांना १ कोटी २५ लक्ष रुपयांचा लाभ वितरित नविन १०५० प्रस्तावाना मंजुरी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अनाथ, निराश्रीत, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने शासन बालसंगोपन योजना राबविते. जिल्ह्यात मार्च २०२३पर्यंत ९६८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला असून १ कोटी २५ लक्ष २४ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये बाल संगोपन योजनेसाठी २९४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागातील ६६५ तर ग्रामीण भागातील २२८१ प्रस्तावाचा समावेश आहे. यापैकी १२३३ प्रस्तावांची गृह चौकशी पूर्ण झाली असून १०५० प्रकरणात सी डब्ल्यू सी ने बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश केलेले आहेत अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी बैठकित दिली. यावेळी उर्वरित १७१३ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी गृह चौकशी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश द्यावेत, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शाळा बाह्य मुले, रस्त्यावरची मुले, आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बालसंगोपन योजना आढावा बैठकित बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे, बालकल्याण समिती सदस्य ॲड प्राची निलावार, वनिता शिरफुले, ॲड लीना ओक, फाल्गुन पालकर, माधुरी पावडे, देवेंद्र राजुरकर स्वप्नील शेटे उपस्थित होते.


  • घाटंजी येथे २३ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी यांचे संयुक्त विद्यमाने २३ मे सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण ९०५ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रीज, पुसद, आरोही इन्फो एफ आय मॅनेजमेंट लि. अकोला संभाजी नगर, वैभव एन्टर प्रायजेस, नागपूर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर, अमरावती, धुत ट्रान्समिशन, औरगाबाद, परमस्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/ पूणे, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, मेगाफिड बायोटेक, नागपूर यांच्याकडुन उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १०वी, १२ वी, आय.टि.आय पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा , असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.


  • सावरगाव येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा २० मे ला* अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या संकल्पनेतून २० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सावरगाव ता.कळंब येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात हवामान तज्ञ पंजाब डख शेतक-याना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरश:धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल? पिकांची देखभाल कशी करावी? पेरणी कधी करावी? या विषयाचे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे याकरिता प्रसिध्द हवामान तज्ञ तथा हवामान अभ्यासक पंजाबराव डख,सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अन्नासाहेब पारवेकर तथा आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. अशोक उईके यांनी केले आहे.


  • *जत्रा शासकीय योजनांची* अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    पंचायत समिती बाभुळगाव ग्राम panchyat. वेणी यांच्याकडून *जत्रा शासकीय योजनांची* या अभियानात एकूण 20 दिवयांग लाभार्थी यांना चेक स्वरूपात अनुदान वाटप करण्यात आले त्या प्रसंगी गट विकास अधिकारी श्री पवार,सरपंच,उपसरपंच,विस्तार अधिकारी सा v लाभार्थी उपस्थित होते


  • पाणी टंचाई बाबत विहिरीची पाहणी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    मौजा मादनी येथील पाणी टंचाई बाबत विहिरीची पाहणी करताना 15 वा वित्त आयोग 10 टक्के पंचायत समिती स्तर अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर सोलर पंप सौर ऊर्जा panel बसविण्यात आले त्यामुळे विजेची बचत फार मोठ्या प्रमाणात होते


  • स्व-संरक्षणाकरीता महिलांसाठी शार्यै शिबिर अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्था वडी.एम.एम.आयुर्वेद कॉलेज, यवतमाळ यांच्यासंयुक्त विदमयाने दिनांक २७ व २८ मे रोजीसामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे महिलांसाठी शौर्य शिबिराचे आयोजन करण्यात येतआहे.या शिबिरामध्ये भारतीय पारंपारीक खेळ लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, मुद्ग, नॉनचॉक आदि शौर्य व क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपल्या देशात स्त्रीला देवी मानून पूजन केले जाते. मात्र लहान मुलींनाही आज शाळांमध्ये गुडटच, बॅडटच शिकवावे लागते.त्यामुळे स्त्रीला स्वसंरक्षणासाठी उभे रहावेच लागेल. त्यासाठी शक्ती वाहीनीची स्थापना करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मुख्यत: यवमताळ दामीनी पथकाच्या प्रमुख मा.सौ.विजया पंधेरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे व तसेच योगासन, प्राणायाम वयांचे मार्गदर्शन मिळणार आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त महिला, मुली (वयोगट १५ ते ४०) यांनी भाग घ्यावा असे संस्थेचे सचिव सौ.चंदा राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आवाहन केले आहे.


  • शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिलेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदार समाधान गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए या महामार्गाच्या दिग्रस शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकित दिले. या महामार्गांमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात यावे. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू करण्यासही त्यांनी सांगितले. दिग्रस शहरातील टाऊन हॉलचे बांधकामाचा आढावा घेताना टाऊन हॉलचे डिझाईन करून घेण्यात आले तसेच इतर अतिरिक्त बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन वास्तूविशारद यांच्याकडे पाठपुरावा करावा. मंजुरी प्राप्त दोन्ही बाबींचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कांत्राटदार आणि बांधकाम विभागाला दिल्या. दिग्रस शहरातील हिंदू स्मशानभूमी, भाजी मार्केटच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला दोन्ही बाबीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी तात्काळ निविदा बोलविण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले. दिग्रस शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झाले तरी काम सुरु केलेले नाही याबाबत पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तालुका क्रिडा संकुलचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून वॉल कंपाऊंड, लॉन टेनिस कोर्ट, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, तसेच इतर खेळांची मैदाने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. या बैठकिला तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


  • युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावे हे ठरवितांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    इयत्ता दहावी ,बारावी हा विद्यार्थ्यांसाठी टर्निग पॉईंट असतो. इथुन पुढे त्यांच्या करियरला सुरुवात होते. आज शिक्षणाचे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावे हे ठरवितांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आजच्या करियर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मिळाली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे आज छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करियर शिबिराचा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यवतमाळचे प्राचार्य विनोद नागोरे, प्राचार्य औ.प्र.सं दारव्हा आर.यु.राठोड, प्राचार्य औ.प्र.सं.आर्णी सुधीर पाटबाने, प्रकल्प अधिकारी,आश्रम शाळा अंतरगाव उषा त्रिपाठी, तसेच प्राचार्य ओ.प्र.सं.लोणार जि.बुलढाणा प्रतिक गुल्हाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे. त्यासाठी विविध रोजगार मेळाव्याचे आयोजन नियमित करण्यात येत असते. पण विद्यार्थ्यांनी सुद्धा केवळ इंजिनियरिंग आणि मेडिकलचा करियरचे क्षेत्र न निवडता इतर अनेक क्षेत्रातील चांगल्या करियरच्या संधी घ्याव्यात. त्याचबरोबर शिक्षण घेतानाच इतर कौशल्ये सुद्धा आत्मसात करावित विचार मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी यावेळी विविध दालनांना भेटी देवून प्रदर्शन दालनाचे फीत कापून उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थित युवक युवतींशी पालकमंत्री संजय राठोड यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना युवा करिअर या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, इयत्ता 10 वी, 12 वी.नंतर काय?विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडावे त्यासाठीच हे शिबिरे असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे,आणि विद्यार्थ्यांनी शिबिराचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा व आपला व्यक्तीमत्व विकास साधावा, असे आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.


  • जिल्हा पोलीस दलाच्या पहिल्याच रक्तदान मोहिमेत ९०० बॉटल्सचे संकलन पोलीस अधीक्षकांनी केले रक्तदान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    सिकलसेलसारख्या आजारावर मात करण्यासोबत विविध शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. प्रत्येकाला वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्त संकलन आवश्यक आहे. जिल्ह्यात रक्त तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान मोहिम गरजेची आहे. यामुळे जनसामान्य नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले. स्थानिक दर्डा सभागृहात पोलिस दलाच्या वतीने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, रेड क्रॉसचे सचिव किशोर दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री मार्गदर्शन करीत होते. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या रक्ताच्या तुटवडयावर मात करण्यासाठी जिल्हा पाेलीस दलाने शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पोलीस दलाच्या इतिहासातील हे पहिलेच रक्तदान होते. पहिल्याच रक्तदान मोहिमेत एक हजार रक्त बॉटल्सचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांनी रक्तदान करून रक्तदान मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी पोलीस दलासह स्वयंसेवी संस्था आणि नागरिकही रक्तदानासाठी उत्फुर्तपने पुढे आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस दलाच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. रक्त संकलनामुळे सरकारी रूग्णालयात गरजवंताना सहज रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि वेळेवर उपचार करणे शक्य असल्याचे मत त्यांनी नोंदविले. किशोर दर्डा यांनी रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळते. दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदवित रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पहिल्या रक्तदान शिबीराचे संयोजक म्हणून वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी केले होते. यावेळी एसडीपीओ संपतराव भोसले, परिविक्षाधीन डिवायएसपी विनायक कोते, दिनेश बैसाने,अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, एलसीबी पीआय प्रदीप परदेसी, ठाणेदार रवींद्र जेधे (बाभूळगाव), दीपमाला भेंडे (लोहारा), उमेश बेसरकर (कळंब) , प्रकाश तुनकलवार (यवतमाळ ग्रामीण), संजय खंडारे (वडगाव जनगल), अजित राठोड (जिल्हा विशेष शाखा), शासकीय रक्तपेढीचे प्राध्यापक विशाल नरोटे, एकनिल ब्लड बँकेचे सागर तोडकर, डॉ. प्रकाश नंदुरकर, अविनाश लोखंडे, अनंत कौलगिकर, गोपाल शर्मा, संकल्प फाउंडेशन, दिनदयाल प्रबोधनी, दि अर्बन बँक आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.


  • ज्वारी, मका खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता २० मे पर्यंत मुदतवाढ अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता आता २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे. या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही.शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असुन लाईव्ह फोटो देखील मोबाईल ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे. त्यामुळे शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. भरडधान्य ज्वारी, मका खरेदी करिता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिनांक ४ मे ते २० मे २०२३ पर्यंत करण्यात येणार असुन प्रत्यक्षात खरेदी दिनांक ४ मे ते ३० जून २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांना ज्वारी, मका नोंदणीसाठी व खरेदीकरिता जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी आवाहन केले आहे.


  • शासन आपल्या दारी’ अभियानाचा आज शुभारंभ अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या दि.१३ मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘ शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला आहे. अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


  • अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे शनिवार दिनांक १३ मे रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता औद्योगीक प्रशिक्षण संस्था,येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर कार्यक्रमास उपस्थिती व सकाळी ११ वाजता घाटंजीकडे प्रयाण दुपारी १२ वाजता दारव्हा कडे प्रयाण दुपारी १वाजून ४५ मिनिंटानी स्वागत समारोह कार्यक्रामास उपस्थिती.दुपारी २ वाजून १५ मिनिंटानी शासकीय विश्रामगृह दारव्हा येथे आगमन व राखीव दुपारी ३ वाजता दारव्हा येथील विविध विकास कामाचे भुमीपुजन संदर्भात चर्चा.दुपारी ३ वाजून ३० मिनिंटानी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळकडे प्रयाण तर दुपारी ४ वाजून ३० मिनिंटानी खरीप हंगाम आढावा २०२३ बैठक तसेच सायंकाळी ५ वाजून ३० मिनिंटानी जिल्हा खनिज प्रतिष्ठाण च्या नियामक परिषद जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती.तसेच ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नविन नियोजन भवन इमारतीचे भूमीपुजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.व सायंकाळी ६ वाजून १५ मिनिंटानी निवास्थानकडे प्रयाण आगमन व राखीव.


  • शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिलेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदार समाधान गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए या महामार्गाच्या दिग्रस शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकित दिले. या महामार्गांमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात यावे. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू करण्यासही त्यांनी सांगितले. दिग्रस शहरातील टाऊन हॉलचे बांधकामाचा आढावा घेताना टाऊन हॉलचे डिझाईन करून घेण्यात आले तसेच इतर अतिरिक्त बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन वास्तूविशारद यांच्याकडे पाठपुरावा करावा. मंजुरी प्राप्त दोन्ही बाबींचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कांत्राटदार आणि बांधकाम विभागाला दिल्या. दिग्रस शहरातील हिंदू स्मशानभूमी, भाजी मार्केटच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला दोन्ही बाबीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी तात्काळ निविदा बोलविण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले. दिग्रस शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झाले तरी काम सुरु केलेले नाही याबाबत पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तालुका क्रिडा संकुलचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून वॉल कंपाऊंड, लॉन टेनिस कोर्ट, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, तसेच इतर खेळांची मैदाने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. या बैठकिला तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.


  • *यवतमाळात बिंदुमाधव जोशी स्मृतिदिन साजरा* *ग्राहक चळवळ बळकट करा*-- *डॉ.नारायण मेहरे* अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    ग्राहक शोषण मुक्तीसाठी स्वयंसिद्ध ग्राहक चळवळ निर्माण करणे हीच ग्राहक चळवळीचे प्रणेते स्व. बिंदुमाधव जोशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ.नारायण मेहरे यांनी येथे केले.ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अँड राजेश पोहरे, ज्येष्ठ कार्यकर्ते राधामल जाधवांनी यावेळी मंचावर उपस्थित होते. डॉ. नारायण मेहरे पुढे म्हणाले ग्राहकांचे शोषण थांबविण्यासाठी स्व. बिंदुमाधव जोशी यांनी अथक परिश्रम घेऊन ऐतिहासिक ग्राहक संरक्षण कायदा तयार केला. त्याअंतर्गत सर्व व्यवस्था ग्राहकाभिमुख कशा राहतील अशीच कायद्याची रचना केली. परंतु अजूनही हा कायदा सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचला नाही,असे सांगून ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी शेवटच्या ग्राहकांना या कायद्याचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ग्राहक चळवळ बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अभ्यास करून अधिक वेळ देण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून केले. श्री जाधवानी यांनी आपल्या भाषणात स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.सद्यस्थितीत ग्राहकांची कशी लूट होत आहे हेसुद्धा त्यांनी आपल्या भाषणात अनेक उदाहरणे देऊन सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे दैवत स्वामी विवेकानंद आणि स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अ‍ॅड.राजेश पोहरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गोळे यांनी केले तर शहर सचिव डॉ शेखर बंड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सिव्हिल लाईन्स येथील किराणा असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा संघटक हितेश सेठ, अनंत भिसे, मोहन कुलकर्णी, चंद्रकांत गड्डमवार, प्रकाश चणेवार,प्रकाश रेगुंडावार, संतोष डोमाळे ,शिवदासजी मानकर, विक्रमभाई शहा,वंदना बोरीकर ,वंदना बोरुंदीया या कार्यकर्त्यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


  • बॅंकर्स जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकित सूचना अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. यावर्षी सर्व बँकांना मिळून दोन हजार कोटी रुपयांचा लक्षांक असून आजपर्यंत केवळ एकवीस टक्के कर्ज वाटप झाले आहे. ही रक्कम मागिल वर्षाच्या तुलनेत कमी असून सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या ५० टक्के कर्ज वाटप मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आज बॅंकर्सची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सदर सूचना दिल्यात. या बैठकिला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, लिड बँक मॅनेजर अमर गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, आत्म्याचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एस बी आय चे श्रिकांत कोहळे, बॅंक ऑफ बरोदा आर एम सोमकुवर, बॅंक ऑफ ईंडियाचे सचिनचंद्र पाटिदार, वायडीसीसी चे श्री सिद्दिकी तसेच इतर बँकांचे जिल्हा समन्वयक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज, पी एम किसान योजनेसाठी आधार सिडिंग महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच शासकीय अनुदानित योजनाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यासच ते उपयुक्त ठरते. त्यांना बियाणे, खते आणि लागवडीची तयारी करण्यासाठी कर्जाची रक्कम कामी येते. त्यामुळे जुन अखेरपर्यंत पिक कर्जाचा १०० टक्के लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न बॅंकांनी करावा. यावर्षी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारसुद्धा पी एम किसान योजनेसारखी योजना राबवित आहे. त्यामुळे शेतक-यांचे ई- केवायसी आणि आधार सिडिंग करणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात अद्याप ३६ हजार ८०६ पात्र शेतक-यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग शिल्लक आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे सर्वाधिक २५ हजार २८० शेतकऱ्यांचे आधार ई -केवायसी व सीडिंगचे काम शिल्लक आहे. यांनी यासाठी विशेष व्यव्स्था करुन २५ मे पर्यंत सर्व बॅंकांनी आधार सीडिंग पूर्ण करावे. त्यासाठी ग्रामस्तरावर सुचना देऊन शेतक-यांची यादी आणि बॅंकेचे नाव कळवावे. तसेच यातील मयत अपात्र वगळण्याचे कामही पूर्ण करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात. बैठकिला येतांना बॅंक प्रमुखांनी परिपूर्ण माहिती घेऊन उपस्थित रहावे असेही त्यांनी सांगितले.


  • निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळा मान्सुन पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    मान्सून कालावधीत वीज पडणे, नदी-नाल्यांना पूर येणे, साथीचे आजार, धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग अशा बाबी हातळण्यातील निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांमध्ये योग्य माहिती देवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मान्सुन पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तन्वीर शेख, मुख्याधिकारी डोल्हारकर तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सिंचन मंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांचे ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे, नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाचे बळकटीकरण व डागडूजी आदि कामे मे महिन्यापुर्वी करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यातील सर्व धरणे १०० टक्‍के सुरक्षीत असल्‍याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे, धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देणे इत्‍यादी बाबत कृती आराखडा तयार ठेवण्यास सांगितले. पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटणा-या अतिसंवेदनशील गावांची यादी करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. बचाव पथकासाठी उपलब्ध असलेले जेसीबी, क्रेन, गाडी, ट्रक, व्हॅन, मॅन पावर इत्यादी साहित्य सामुग्री अद्यावत करण्‍यात यावी. नगर परिषद क्षेत्रातील नाले सफाई करणे. नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवणे, आपत्ती पूर्व सूचना देणारे संबंधित संस्थाचे दूरध्वनी ‌क्रमांकाची यादी अद्ययावत करणे व त्याची वेळोवेळी पडताळणी करणे, आपत्ती विषयक पूर्वसूचनांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पुलावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा ठिकाणी कोणीही पुराच्या पाण्यात जाणार नाही याबाबत स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करावे व संबंधीतांना आवश्यक पूर्वसूचना द्याव्या. तसेच नदी पातळी वाढल्यावर तेथे कोणी पोहायला जाणार नाही, याबाबत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यास सांगितले. मान्सून कालावधीत विज पडून मोठ्या प्रमाणात जिवित हानी होत असते. हे टाळण्यासाठी भारतीय मौसम विभागाने तयार केलेले ‘दामिनी’ ॲपचा वापर सर्वांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. दामिनी ॲप मध्ये जेथे वीज पडणार आहे त्या भागाची स्थलदर्शक माहिती विज पडण्याच्या 15 मिनिटापुर्वी दर्शविण्यात येते. त्यामुळे त्या भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पूर्वसुचना देवून खबरदारी घेण्याचा मेसेज करून जीवीत हाणी टाळता येईल. विद्युत पुरवठा, दूरध्वनी, रस्ते व पुल आपत्तीच्या वेळीसुध्दा सुरळीत चालू राहतील याची खबरदारी घ्यावी. अत्यावश्यक वस्तूंचा साठा , पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्गव्यांचे पूर्व नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्गासाठी लागणार्‍या औषधांचा साठा सुनिश्चित करून, साथ रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवण्यात यावा. जनावरांचे औषधांचा मुबलक साठा तसेच जनावरांसाठी पुरेसा चाऱ्याचा साठा ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीतही शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांचेही नियोजन करण्‍याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. बांधकाम सुरू असलेले वाहतुकीचे महत्वाचे मार्ग पावसाळ्यापुर्वी पूर्ण करणे व ते विहित कालावधीत पुर्ण होणे शक्य नसल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी बैठकीत पीपीटीद्वारे माहितीचे सादरीकरण केले.बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.


  • प्रदूषणविरहित एस टी बसचे पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नविन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदुषण विरहीत १० साध्या बसेसचे लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी फीत कापून व पूजा करून बसेसचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बसची पहाणी केली व बस चालवण्याचा आनंदही घेतला. उपस्थित अधिका-याकडून त्यांनी अद्यावत यंत्रणा असलेल्या बसची इत्यंभुत माहिती जाणुन घेतली. अशा आणखी नविन ४० बसेस विभागास प्राप्त करून देण्याकरिता पाठपुरावा करून बसेस मिळवून देण्याचे आश्वाशीत केले. बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत व बस स्थानकातील रोड दुरूस्ती करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यानी दिल्या. उपस्थित चालक,वाहक यांच्याशी त्यांनी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी उपमहाव्यस्थापक श्रीकांत गभणे, यवतमाळ आगर प्रमुख दिप्ती वड्डे, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभाग वाहतूक अधिकारी उमेश इंगळे, कामगार अधिकारी सुनिल मडावी, विभागीय लेखा अधिकारी गणेश शिंदे,वाहतूक निरिक्षक हरीष थोरात तसेच बस स्थानकातील प्रवासी उपस्थित होते.


  • जिल्ह्यात फोर्टिफाईड तांदळाचे वितरण सुरू फोर्टिफाईड तांदूळ पोषणयुक्त व गुणसंवर्धित अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    पोषणतत्व व गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करण्यास केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही प्रधानमंत्री यांची महत्वाकांक्षी योजना असून त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात सदर फोर्टिफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झालेली आहे. फोर्टिफाईड तांदुळ थॅलेसिमिया व सिकलसेल, ॲनेमिया रोखण्यासाठी उपयुक्त आहे. फोर्टिफाईड तांदुळामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, विटामिन बी 12 सुक्ष्म अन्नद्रव्ये असून लाभार्थ्यांच्या आरोग्याचे दृष्टीने शासनाने जाणीवपुर्वक वितरण सुरु केले आहे. तसेच सदरचा फोर्टिफाईड तांदूळ सकृतदर्शनी तांदळात भेसळ असल्यासारखा वाटू शकतो. हा तांदुळ पाण्यावर तरंगू शकतो. पण तो सामान्य तांदळा प्रमाणे सेवनासाठी वापराला जातो. फोर्टीफाईड तांदुळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका/अडचणी असल्यास संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07235- 242246 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.


  • समाजातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चा जिल्हा युनिट यवतमाळ यांच्या विद्यमाने दि. ७/५/२०२३ ला सहकार भवन, आर्णी रोड, यवतमाळ येथील एक दिवशीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद््घाटन प्रदीप वादाफळे (प्रदेशाध्यक्ष, ओ.बी.सी. आरक्षण समर्थक परिषद) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर मुख्य मार्गदर्शक डी.आर. ओहोळ राष्ट्रीय प्रधान महासचिव बामसेफ, नईदिल्ली यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश मडावी, अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी यवतमाळ, अनिल तोडे कार्यकारी अभियंता, मनोहर सहारे, सेवानिवृत्त अभियंता, संजय मानकर सेवानिवृत्त अभियंता, राजुभाऊ मडावी, प्रोटानचे गजानन उल्हे, जिल्हाध्यक्ष किशोर राठोड,कनाके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी थोर समाज से वकांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून प्रशिक्षणात सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी प्रास्ताविक विजय सोनुले यांनी केले. त्यानंतर मुख्यमार्गदर्शक डी. आर.ओहोळ यांनी शिक्षणातून समाजातील अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे व विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, जीवनात वेळ ही मौल्यवान आहे त्यामुळे जीवनात वेळेला अतिशय महत्त्व आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी वेळेला महत्त्व द्यावे प्रशिक्षण हे शत्रुसाठी जहर असून आपल्यासाठी अमृत आहे. असे ते म्हणाले. कोणत्याही विचारधारेला तर्क लावून विचार करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे. शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खरं आणि खोटं यामध्ये ओळखण्याचे कौशल्य म्हणजे शिक्षण. शिक्षणातून खर्‍याचे समर्थन व खोट्याचा विरोध करता आला पाहिजे. शिक्षणातून समजदार समाज निर्माण झाला पाहिजे. असे महत्वपूर्ण विचार उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना दिले. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन प्रदीप जाधव यांनी केले. या प्रसंग जिल्हातील विविध संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. असे राजहंस मेंढे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.


  • शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 13 मे रोजी सकाळी १० वाजता युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराकरिता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड उद्घाटक म्हणून तर आमदार मदन येरावार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शिबिरामध्ये इयत्ता १०वी, १२वी नंतर काय ? भविष्यातील रोजगाराच्या संधी,व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्य संधी ई.बाबत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. तरी या करिअर शिबिराकरिता जिल्ह्यातील सर्व १०वी./१२वी.परीक्षा दिलेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आव्हान संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे.


  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    महिला व बाल विकास विभागाकडून दरवर्षी महिला व बालकांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविकांना व संस्थांना त्यांच्या कामाची दखल घेऊन प्रोत्साहित करण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१३-१४ ते २०१९-२० या आर्थिक वर्षात यवतमाळ जिल्ह्यामधुन एकुण ६ जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार शासनामार्फत जाहिर करण्यात आले होते, त्याचे वितरण पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते करण्यात आले . महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सदर सन्मान मूर्तीना सदर पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सन २०१३-१४ मध्ये श्रीमती प्रिती श्रीकांत धामणकर, २०१४-१५ मध्ये श्रीमती मिनादेवी कमलनयन किलावत, सन २०१५-१६ मध्ये श्रीमती डॉ.तक्षशील हरगोद मोटघरे,२०१६-१७ मध्ये श्रीमती पुष्पा विठ्ठल मनवर, सन २०१७-१८ मध्ये श्रीमती अपुर्वा अरुण सोनार, सन २०१९-२० मध्ये श्रीमती संध्यादेवी साबू यांना जाहिर झालेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार विजेत्या सहा समाजसेविकांना स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र, शाल,श्रीफळ व दहा हजार एक रुपयेचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.


  • तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन देई कर्करोगाला आमंत्रण वर्षभरात आढळले ११८ मौखिक कर्करोगरुग्ण अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    प्रौढांपासुन किशोरवयीन मुलांपर्यंत आजकाल तंबाखू व सिगारेटचे सेवन करणारे आढळुन येतात. मात्र, तंबाखू व सिगारेटचे व्यसन जीवघेणे ठरत आहे. जिल्ह्यात वर्षभरात ११८ मौखिक कर्करोगरुग्ण आढळुन आले आहेत. त्यासाठीच जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्य १ ते ३१ मे या कालावधीत तंबाखूविरोधी जगजागृती केली जात आहे. सातत्याने वाढणारे कॅन्सरचे रुग्ण पाहता तंबाखूला दूर ठेवण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. आजघडीला शालेय मुलांनाही तंबाखू, सिगारेटचे व्यसन जडले आहे. तंबाखूजन्य पदार्थांमध्ये ४०० प्रकारची विषारी द्रवे असतात. सातत्याने या तंबाखूजन्य पदार्थ्यांचे सेवन केले तर कर्करोग होण्याचा धोका असतो. आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तपासणी मोहिमेतही मौखिक कर्करोगाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत.तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने कर्करोग होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. गत काही वर्षात मौखिक कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत समोर आले आहे. महिनाभर तंबाखूविरोधी जागृती - शासनाच्या वतीने जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्य १ ते ३१ मे हा संपुर्ण महिना तंबाखूविरोधी विशेष जगजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत मौखिक तपासणी होणार आहे. मौखिक आरोग्य तपासणी मोहीम- सुपारी, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्याने मौखिक कर्करोग होतो. या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करुन कर्करोगापासून सुटका करुन घेता येते. यासाठी तपासणी मोहीम राबविली जात आहे.


  • सामका आयुर्वेद येथे टेलीमेडीसन सेवेचा शुभारंभ अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्था द्वारा संचालित सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या मार्फत आयुर्वेदिय उपचाराकरीता टेलीमेडीसन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील रुग्णांना आयुर्वेद उपचार, मार्गदर्शन मिळण्याकरीता याचा उपयोग होईल.टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून त्यंना विशेष सेवा दिली जाईल. एखाद्या रुग्णावर उपचार करत असतांना तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला हरा असल्यास त्या रुग्णाला सामका आयुर्वेद येथील टेलीमेडीसन सेंटरमध्येयवतमाळ जिल्ह्यातील सर्व रुग्ण पाठविण्यात येईल. व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे डॉक्टरांशी थेट संवाद साधला जाईल व त्यानुसार त्या रुग्णावर पुढील उपचार केले जातात. काही वेळेला ऑफलाईन पद्धतीचा उपयोग केला जातो. रग्णाचे पेपर स्कॅन करून ती संबंधीत डॉक्टरांना पाठविम्यात येते. त्यानंतर डॉक्टर रिपोर्टस पाहून पुढील उपचार करण्यात येतात. टेलिमेडीसन सेंटरचा फायदा ग्रामीण भागातील रुग्णांना मुख्यत्वे करून त्वचा विकार, सोयरासिस, थॉयराइड, मणक्याचे आजाराने त्रस्त रुग्णांना विशेष लाभ होईल.तरी ग्रामीण भागातील रुग्णांनी टेलिमेडीसनचा लाभ घ्यावा असे आवाहन देवी सामकामहिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार (एम.डी.) यांनी केले आहे.


  • रेडक्रॉस दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शिबिरात 231 रक्तदात्यांचे रक्तदान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    ड क्रॉस संस्था ही जगभरात आपत्तीग्रस्त लोकांसाठी कार्य करणारी संस्था असून १५० वर्षापेक्षा जास्त काळापासून मानव सेवेसाठी कार्य करणारी संस्था म्हणून या सोसायटीचा गौरव केला जातो. ८ मे हा जागतिक रेडक्रॉस दिन असून रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक ‘हेनरी ड्यूनेट’ यांची जयंती आज रक्तदान करुन साजरा करीत आहोत. उन्हाळ्यामध्ये भासणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी आज केलेले रक्तदान हे ख-या अर्थाने या संस्थेचा मानवी सेवा कार्याचा उद्देश साध्य करणारे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा प्रशासन व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेड क्रॉस दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बचत भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी जिल्हाधिकारी यांनी रेड क्रॉस भवन येथे ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी रक्तदान करुन उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी यांनी जागतिक रेड क्रॉस दिनाच्या शुभेच्छा देत मागील वर्षी सुद्धा याच दिवशी रक्तदान शिबिर घेतल्याची आठवण सांगितली. या सोसायटीच्या कार्याचा मानवतेसाठी व आरोग्यासाठी काय उद्देश आहे, हे समजून घेतले पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यात या सोसायटीचे मोठ्या प्रमाणात काम झाले पाहिजे अशी आशा व्यक्त केली. शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमासाठी मागच्या आठवड्यापासून परिश्रम घेत असलेल्या स्वयंसेवीचेही आभार मानले. २३१ रक्तदात्यांनी केले रक्तदान या रक्तदान शिबिरात २३१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात जिल्हाधिकारी अमोल येडगे,उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, प्रा. घनश्याम दरणे, 112 वेळा रक्तदान करणारे संदीप बेलखोडे, सौ किरण राठी, प्रकल्प अधिकारी डॉ अजय लाड, प्रविण राखुंडे, फिरोज पठाण, तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य, संकल्प फाउंडेशन, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय, निमा फाउंडेशन, सारा सिंटेक्स वर्कर्स, फार्मसी महाविद्यालय नगरपरिषद यवतमाळ, हिमालय कार्स आणि सेतू केंद्राची कर्मचारी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य, रेमंड,रविराज इंडस्ट्री, इत्यादी संस्थांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सविता चौधर, तहसिलदार डॉ योगेश देशमुख, मुख्याधिकारी श्री डोल्हारकर, रेड क्रॉस संस्थेचे श्री गिलानी, किशोर दर्डा, टी.सी राठोड, देविदास गोपालानी, डॉ बी सी अग्रवाल, डॉ. विजय अग्रवाल,डॉ भोंगाडे, डॉ. हातगावकर, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री गिलानी, सुत्र संचालन घनश्याम दरणे, तर आभार अजय लाड यांनी मानले. यावेळी मेडीकल कॉलेजचे कर्मचारी तसेच रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


  • *दारव्हा विभागीय कार्यालयाच्या निर्मितीमुळे विभागातील वीज ग्राहकांना मिळतील दर्जेदार सेवा* अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    परिसरातील शेतकरी,घरगुती,वाणिज्यिक,औद्योगिक अशा सर्वच ग्राहकांच्या सोयीसाठी दारव्हा येथे महावितरणच्या नविन विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.स्वतंत्र फिल्टर युनिट,कार्यकारी अभियंतासहीत ३६ नविन अधिकारी, कर्मचारी दारव्हा विभागाला अतीरिक्त मिळाल्याने ग्राहकांना अधिक चांगली वीज सेवा मिळेल असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. गोदावरी नगर,दारव्हा येथे पार पडलेल्या महावितरणच्या नवनिर्मिती विभागीय कार्यालयाच्या उद्धाटनाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी,अधिक्षक अभियंते सुरेश मडावी,दिपक देवहाते,गटविकास अधिकारी राजीव शिंदे, प्रा.अजय दुबे, राजीव पाटील, वैशाली मसाळ, बबनराव इर्वे, विनोद जाधव,मनोज सिंगी,संतोष चव्हाण,काजी आणि यशवंत पवार उपस्थित होते. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, दारव्हा,नेर,दिग्रस व आर्णी मिळून नविन विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे.नविन विभागाची निर्मिती झाल्याने विभागाला स्वतंत्र फिल्टर युनिट मिळाले आहे. त्यामुळे ग्राहकांची विशेषता शेतकऱ्यांना नादुरूस्त रोहित्र तत्काळ दुरूस्त करून मिळणार आहे.यापूर्वी ग्राहकांना तक्रारीसाठी किंवा महावितरणच्या विविध कामासाठी पुसद येथील कार्यकारी अभियंता कार्यालयात जावे लागत होते. परंतु, आता विभागीय कार्यालयाच्या निर्मितीमुळे याचा फायदा विभागातील ३४ हजार शेतकरी व इतर १ लाख ३५ हजार ग्राहकांना होणार आहे. ३३/११ केव्हीची विभागात २४ उपकेंद्रे कार्यरत असुन महावितरणच्या आर.डी.डी.एस. योजनेत आणखी ६ उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच ७ उपकेंद्राची ५ एम व्ही ए ने क्षमता वाढ करण्यासोबतच पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढ करण्यात येणार असल्याचेही यावेळी पालकमंत्री यांनी सांगीतले. दर्जेदार सेवा देण्याची महावितरणची जबाबदारी आहे,परंतु त्याला प्रतिसाद म्हणून ग्राहकांनीही आपले वीज बिल वेळेत आणि नियमित भरण्याचे त्यांनी आवाहन केले. वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे त्याचा वापर जपून करावा. तसेच प्रत्येक गावातील सरपंचानी पुढाकार घेत वीज चोरीवर आळा घालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असुन या योजनेत सौर प्रकल्प उभारून २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना दिवसाला वीज पुरवठा देण्याचा शासनाचा मानस आहे. त्यासाठी महावितरणच्या उपकेंद्रापासून सरकारी जमीन १० किमी परिघात,आणि खाजगी जमिन असेल तर ५ किमी परिघातील जमिन उपलब्ध करून देण्याचे आवाहन नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक सुहास रंगारी यांनी केले.जमीनीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना ५० हजार प्रती एकर आणि प्रती वर्ष त्यात ३ टक्के याप्रमाणे वाढ देण्यात येणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले,तर ग्राहकाभिमूक सेवा देण्यावर महावितरणचा भर राहणार असल्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी म्हणाले. यावेळी प्राध्यापक अजय दुबे यांनी पैसे भरून प्रलंबीत असलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याचे,तसेच ग्राहकांनी वीज चोरीसारखे अनिष्ठ प्रकार थांबविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. सुत्रसंचालन सहाय्यक अभियंता प्रकाश कोळसे यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता योगेश तायडे यांनी मानले.


  • चोरांबा येथे राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी - ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद शाळेचे संयुक्त आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    घाटंजी : तालुक्यातील चोरांबा येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील आणि अंगणवाडीतील मुलांना ग्रामपंचायत चोरांचा यांच्याकडून डिजिटल बुकाचे वाटप करण्यात आले. यात जिल्हा परिषद शाळेतील ५० विद्यार्थी, अंगणवाडीतील ३६ विद्यार्थी असे ८६ विद्यार्थी उपस्थित होते. या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल बुकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडीसेविका, पालकांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि महाराजांनी शिक्षणासाठी केलेल्या कामाची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वाल्मिक उरकुडे विजय रदंये विलास नागपूरेंसह समस्त नागरिक उपस्थित होते.


  • टॅक्स प्रॅक्टिशनेर असोसिएशन व विदर्भ टॅक्स प्रॅक्टीशनेर असोसिएशन तर्फे जी एस टी व इन्कम टॅक्स सेमिनार चे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    टॅक्स प्रॅक्टिशनेर असोसिएशन व विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनेर असोसिएशन नागपूर यांच्या सोबत हॉटेल राधा मंगल येथे आयकर व वस्तू व सेवा कर कायदा या वर एक दिवसाचे सेमिनार आयोजित करण्यात आले. आधुनिक युगात टेक्नॉलॉजी फार पुढे गेली आहे. या मुळे काम करताना आपला वेळ कमी होते. या तांत्रीकते कडे लक्ष देऊनच आपल्या कार्याची कार्य पद्धती ठरवावी. विविध कायदा अंतर्गत वेग वेगळ्या नोटीस ची पूर्तता वेळे वर करणे व ईमेल अड्रेस व्यापाराचे टाकावे असे मौलिक विचार ऑल इंडियन चार्टर्ड अकाउंटेंट चे माजी अध्यक्ष व प्रमुख अतिथी अशोक चांडक यांनी मांडले. तसेच ऑल इंडिया अध्यक्ष जयदीप शाह यांनी आपले विचार व्यक्त करीत सर्व सी ए, आयकर सल्लागार, वकील यांना काम काज बाबत अभ्यास पूर्ण असे विवेचन करून मार्गदर्शन केले. यवतमाळ शहरात पहिल्यांदाच टॅक्स कॉम 2023 सेमिनार चे मोठ्या प्रमाणात करण्यात आले. या साठी संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने सी ए, वकील, कर सल्लागार यांची उपस्थिती होती. नागपूर,अमरावती,अकोला, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यातील सी ए, वकील, कर सल्लागार यांनी सहभाग घेऊन मान्यवरांचे विचार ऐकून घेतले. या सेमिनार मध्ये जी एस टी या विषयावर सी ए आदित्य,सीमा,प्रदीप यांनी मार्गदर्शन केले. तसेच आय टी सी टॅक्साशन ऑफ जी टी ए आणी आर सी एम अंडर जी एस टी यावर अॅड. वोकेट दिनेश तांबडे मुंबई यांनी मार्गदर्शन केले. कर विभागातील अभय योजना यावर नागपूर येथील सी ए शैलेंद्र जैन यांनी तसेच नरेश जाकुटिया नागपूर यांनी आयकर कायदा अंतर्गत पूर्णनिर्धारण या ज्वालित प्रश्नावर मार्गदर्शन केले. अमरावती येथील सी ए ललित तांबी यांनी चॅरिटेबल ट्रस्ट आयकर या संदर्भात मार्गदर्शन केले. या सेमिनार मध्ये टी पी ए चे अध्यक्ष ॲड. अशोक भंडारी, व्ही टी पी एच चे अध्यक्ष जगदीश शर्मा, सी ए आशिष कलंत्री , सी ए प्रकाश चोपड़ा, सी ए जितेंद्र धामेचा, सी ए मनीष केडिया, सी ए विशाखा खेतान, सी ए जीवन लाभशेट्टवार , सी ए सचिन कोठारी, एड अनिल अटल, अॅड. दीपक हिंडोचा, सी ए अमित अग्रवाल, अॅड. अतुल तलरेजा, एड दीपक कटारिया, अॅड. गुप्ता, एड पियूष भंडारी, ॲड. सुभाष अग्रवाल, ॲड. अजय सावला, ॲड. चरणजीतसिंग, अॅड. संजय बोरा, ॲड. चेतन राजा यांचे मोठे प्रमाणात योगदान लाभले. संपूर्ण विदर्भातून कर सल्लागार आणि सी ए सेमिनार ला आल्याने त्यांच्या मध्ये कायद्या संदर्भात न्यायलीन निवाळे उच्च न्यायालयाचे निर्णय व केंद्र सरकार चे कर संदर्भात बदलणारी परिस्थिती या वर चे विचार ऐकल्या मिळाल्याने उपस्थीत मुळे नवचैतन्य निर्माण झाले. तसेच कार्यक्रमाचे संचालन रुपेश मुनोत विशाखा खेतान यांनी केले. आभार दीपक हींडोचा यांनी मानले. तसेच ऑल इंडियन अध्यक्ष अशोक चांडक व जयदीप शाह यांनी सुंदर आयोजन बद्दल सगळ्यांचे आभार मानले. या वेळेच विदर्भ टॅक्स प्रॅक्टिशनेर यांची एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर ची मीटिंग सुद्धा झाली. ही सर्व माहिती टी पी ए चे अध्यक्ष ॲड. अशोक भंडारी यांनी दिली.


  • असंघटीत क्षेत्रातील कामगारांनी ई श्रम पोर्टलवर नोंदणी करावी - सरकारी कामगार अधिकारी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    केंद्र शासनाची ई श्रम कार्ड योजना कामगाराच्या कल्याणासाठी राबविण्यात येणार असून सदर योजनेमार्फत कामगारांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा देण्याच्या शासनाचा प्रयत्न आहे. सदर योजनेमार्फत सद्यस्थितीत कामगारांना दरमहा आर्थिक मदत अदा केली जात नसून या योजनेद्वारे शासन कामगारांचा २ लाख रुपये पर्यंतचा विमा उतरविणार आहे.कामगारांचा अपघातात,मृत्यू तसेच कायमचे अपंगत्व आल्यास २ लाख रुपये किंवा अंशत:अपंगतत्व आल्यास १ लाख रुपयांची आर्थिक मदत केंद्र शासनामार्फत कामगारांना सदर योजनेमार्फत मिळणार आहे. या अनुषंगाने विविध व्यवसाय करणारे जसे, बिडी कामगार, मच्छीमार, सुतार सेरीकल्वर, भाजी आणि फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, यंत्रमाग कामगार यांच्यासारख्या विविध ३०० व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सुरक्षा,आरोग्य व सेवा पुरविण्याच्या उद्देशाने असंघटित कामगारांचा राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यात येत आहे. असंघटित कामगारांच्या राष्ट्रीय डेटाबेसच्या आधारावर असंघटित कामगारांकरीता सामाजिक सुरक्षा योजना अंमलात आणल्या जातील. असंघटीत कामगार ज्यांचे वय १६ ते ५९ दरम्यान आहे, कामगार हा आयकर भरत नसेल व कामगार हा भविष्य निर्वाह निधी, राज्य कर्मचारी विमा योजनेचा सभासद नाही, अश्या कामगारांनी आपले आधार कार्ड, राष्ट्रियकृत बँकचे पासबुक व आपला सक्रिय असलेला मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी. सदर नोंदणी मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असलेल्या कामगारांनी स्व:त नागरी सुविधा केंद्र किंवा कामगार सुविधा केंद्र येथे अथवा eshram.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी करावी. १ एप्रिल ते ३१ मे २०२३ या कालावधीत ई-श्रम पोर्टलवर व अधिक माहिती साठी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर-१४४३४ किंवा १८००१३७४१५० या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी बाबत माहिती घेवून असंघटीत क्षेत्रात काम करण्याऱ्या कामगारांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा,असे सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी कळविले आहे.


  • शिष्यवृतीचे अर्ज महाविद्यालयास सादर करावे अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती,इतर मागास वर्ग,विजाभज व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थांना महाविद्यालयामार्फत मँट्रीकोत्तर शिष्यवृती, फ्रिशिप,विद्यावेतन शिष्यवृतीचा लाभ देण्यात येतो. या सर्व योजनांचे स्टेट डिबीटी च्या http://mahadbt.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करून सन २०२२-२३ चे अर्ज दिनांक ३१ मे, २०२३ पूर्वी भरण्यात यावेत. तसेच परीपूर्ण भरलेले अर्ज मूळ टिसीसह दि.३१ मे,२०२३ पुर्वी सादर करावे.तसेच सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील नूतनीकरण शिष्यवृतीचे अर्ज दि.३१ मे,२०२३ पुर्वी ऑनलाईन पध्दतीने या कार्यायास सादर करावे. विद्यार्थी सदर लाभापासून वंचित राहील्यास सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील.तसेच पात्र विद्यार्थ्याकडून कोणतेही शुल्क घेण्यात येवू नये.व संबंधीत विद्यार्थ्यांनी सुध्दा अर्जाची नोंदणी करून अर्ज महाविद्यालयास सादर करावे,असे आवाहन सहायक आयुक्त,समाज कल्याण यांनी केले आहे.


  • मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्र दुरुस्तीसाठी ९ मे पर्यंत छायाचित्र जमा करावे अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    मतदार यादीतील अस्पष्ट छायाचित्र दुरूस्ती करण्याकरीता संबंधीत मतदारांनी आपल्या क्षेत्रातील बीएलओ किंवा संबधीत तहसिल कार्यालयामध्ये रंगीत फोटो ९ मे २०२३ पर्यंत जमा करण्याबाबत करावा. यामुळे मतदार यादीमधील सर्व अस्पष्ट फोटोत योग्य ती दूरुस्ती करणे सोईचे जाईल. भारत निवडणूकआयोगाकडून जाहिर करण्यात आलेल्या १ मे २०२३ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी प्रमाणीकरण व शुध्दीकरण मोहीम राबविण्यात येते. परंतु अद्यापपावेतो बरेच मतदारांचे मतदार यादीमध्ये अस्पष्ट फोटो असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदार यादीमधील अस्पष्ट छायाचित्राची प्रलंबितता लक्षात घेता मतदार संघ निहाय काढण्यात आलेले अस्पष्ट छायाचित्राची संख्या पाहता संकलीत करून अपलोड करण्यात आलेल्या छायाचित्राची संख्या अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास येत आहे. मतदारांचा तपशिल इआरओनेट २.० या प्रणालीमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी इआरओनेट १.० या प्रणालीतील कार्यवाही दिनांक १० मे २०२३ रोजी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी त्यांचे छायाचित्र संबंधित बीएलओ कडे जमा करावे.


  • दारव्हा येथील नवनिर्मित वीज वितरण कार्यालयाचे लोकार्पण ६ मे ला अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दारव्हा येथील नवनिर्मित विभागीय कार्यालयाचे उद्घाटन ६ मे रोजी सकाळी १० वाजता अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते होणार असून आमदार डॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झा यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या उद्घाटन सोहळा कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार श्रीमती भावना गवळी, खासदार बाळु उर्फ सूरेश धानोरकर, खासदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री ॲड.निलय नाईक, किरण सरर्नाईक, धिरज लिंगाडे, आमदार डॉ.अशोक उईके, मदन येरावार, संजीव रेड्डी बोदकुरवार, डॉ.संदीप धुर्वे, नामदेवराव ससाने, इंद्रनिल नाईक,तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक डॉ.पवन बनसोड व प्रादेशिक संचालक महावितरण नागपूर,परिक्षेत्राचे सुहास रंगारी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे. सदर सोहळ्यास नागरिकांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले आहे.


  • मधमाशी मित्र पुरस्कार साठी अर्ज आमंत्रित अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा मार्फत सन २०२३-२४ पासून राज्यातील मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी ‘मधमाशी मित्र पुरस्कार’ वितरीत केला जाणार आहे. मध उद्योगात कार्य करणाऱ्या मधपाळ,प्रगतिशील मधपाळ, ब्रांड धारक मधपाळ शेतकरी,सातेरी,मेलीफेरा, आग्या मधमाशापालन,मधसंकलन ई.मध्ये कार्यरत असणाऱ्या घटकांची निवड करून ‘मधमाशी मित्र पुरस्कार’ दिला जाणार आहे. मध व्यवसाय,मधमाशा पालन करणाऱ्या इच्छुकांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, उद्योग भवन तिसरा माळा,यवतमाळ या कार्यालयात नमुना अर्ज भरून ८ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत जमा करावे. तसेच अधिक माहितीसाठी ०७२३२-२४४७९१ व ७९७२५८०९३५ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा मधुक्षेत्रिक राजु लक्ष्मण तायडे यांना भेटावे,असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी,यवतमाळ यांनी केले आहे.


  • दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र मिळणे करिता ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (यु.डी.आय.डी.)प्राप्त करून देण्यासाठी जिल्ह्यात 30 जून 2023 पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ज्या दिव्यांग व्यक्तीकडे ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विकओळखपत्र (यु.डी.आय.डी.) अद्यापपर्यंत उपलब्ध नाही, त्यांनी वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय येथे सोमवार ते मंगळवार (शासकीय अवकाश वगळून) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत वैश्विक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे. तसेच बुधवार ते शुक्रवार (शासकीय अवकाश वगळून) सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यवतमाळ यांनी केले आहे.


  • दिव्यांग व्यक्तीचे मोफत तपासणी शिबीराचे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    दिव्यांग सशक्तीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीप योजने अंतर्गत यवतमाळ – वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव व साहित्य वितरण करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी केले आहे. सदर शिबिराचा लाभ घेणेकरिता आधार कार्ड, ४० टक्के किंवा त्यापेक्षा वरील दिव्यांगत्व प्रमाणपत्र (अंधव्यक्तींकरिता १०० टक्के दिव्यांगत्व असणे अनिवार्य), २२ हजार ५०० रुपये पर्यंतचे मासिक उत्पन्न प्रमाणपत्र (प्राधिकृत अधिकारी/ तलाठी), दोन पासपोर्टं साईज फोटो इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तींनी योजनेंतर्गत मागील तीन वर्षामध्ये लाभ घेतलेला नसावा, सदर शिबीर सर्व ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत होणार आहे. वेळापत्रक व स्थळ असे आहे. पुसद व महागाव तालुक्यात जिजामाता कन्या हायस्कुल पुसद येथे दिनांक ६ व ७ मे दिग्रस तालुक्यात नगर परिषद कन्या शाळा दिग्रस येथे दिनांक ८ मे रोजी, दारव्हा तालुक्यात नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा क्रमांक २ दारव्हा येथे दिनांक ९ मे , नेर तालुक्यात नगरपरिषद शाळा क्रमांक १ नेर येथे १० मे , यवतमाळ तालुक्यात नगरपरिषद शाळा क्रमांक १, जाजु चौक तहसिल कार्यालयाचे मागे यवतमाळ येथे ११ मे व १२ मे, कळंब व बाभुळगाव तालुक्यात जिल्हा परिषद उच्च बेसिक शाळा कळंब येथे दिनांक १३ मे, राळेगाव व पांढरकवडा तालुक्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मुलांची शाळा राळेगाव येथे दिनांक १४ मे होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत दिव्यांग व्यक्तीनी सदर शिबीराचा लाभ घ्यावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी पीयूष चव्हाण यांनी कळविले आहे.


  • गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा ४४ शेतक-यांना लाभ अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    "शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा" हा उपक्रम १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अनुशंगाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत अपघात ग्रस्त होऊन मृत्यू झालेल्या ४ शेतकऱ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते देऊन विमा योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. शासकीय योजनांची जत्रा-सर्वसामान्यांच्या विकासाची यात्रा या उपक्रमाच्या कालावधीत नागरिकांना विविध विभागाच्या योजनाची माहिती पोहोचविणे, प्रस्थापित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरून घेण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे उद्दिष्ट या उपक्रमा अंतर्गत ठरविण्यात आलेले आहे. कृषी विभागामार्फत विविध योजना अंतर्गत १३ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत १०४ लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झालेले असून त्यापैकी ६५ प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहेत. मंजूर प्रस्तावापैकी ४४ अपघात ग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसदारांच्या खात्यावर प्रत्येकी २ लाख रुपये प्रमाणे लाभ देण्यात आलेला आहे. १५ एप्रिल ते १५ जून २०२३ या कालावधीमध्ये जत्रा शासकीय योजनांची अभियानांतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे,आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले आहे.


  • आदिवासींना विविध व्यवसायासाठी अनुदान लाभार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या आदिम जमातींचे कोलाम लाभार्थ्यांसाठी न्युक्लिअस बजेट अंतर्गत विविध योजनेसाठी लाभार्थ्याकडून अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. कुकुटपालन व्यवसाय : आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के, सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान लक्षांक ५०. व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य : आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान लक्षांक ५० तसेच सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान, लक्षांक १५. शिलाई मशिनसाठी अर्थसहाय: आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान, लक्षांक ५०. अदिवासी महिलांना ८५ टक्के अनुदान, लक्षांक ५० आहे. शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक मोटरपंप,पाईप व अनुषंगिक साहित्य: आदिम जमाती (कोलाम) १०० टक्के अनुदान लक्षांक ३० तसेच सर्वसाधारण ८५ टक्के अनुदान लक्षांक ३० आहे. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत असलेल्या आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह, यवतमाळ,घाटंजी,मारेगांव,राळेगांव,झरी, कळंब व वणी याठिकाणी आहे. वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी अर्ज उपलब्ध आहे यासाठी ३२५ लक्षांक आहे. २० मे पर्यंत लाभार्थ्याकडील भरलेले अर्ज स्विकारले जाणार आहेत. इच्छुक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे,असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी याशनी नागराजन,यांनी केले आहे.


  • नगरपरिषद, नगरपंचायतमधील अनुकंपा उमेदवारांची प्रतीक्षासूची जाहीर हरकती घेण्यास ८ मे पर्यंत मुदत अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद , नगरपंचायत मधील गट क व गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची १ जानेवारी २०२३ या दिनांकावर आधारित सन २०२२ या वर्षातील पात्र उमेदवारांची सामाईक प्रारूप प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे कार्यालयातील सूचना फलकावर, yavatmal.nic.in या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद /नगरपंचायत कार्यालयाचे सूचना फलकावर आज ३ मे रोजी प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. सदर गट-क व गट-ड संवर्गातील १ जानेवारी २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीमधील पात्र अनुकंपा उमेदवारांच्या सामाईक प्रारूप प्रतीक्षा सूचीवर ज्या अनुकंपा धारकांना काही हरकती व सूचना दाखल करावयाच्या असतील, त्यांनी संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच संबंधित नगरपरिषद / नगरपंचायत कार्यालय येथे दिनांक ३ मे (बुधवार) ते दिनांक ८ मे २०२३ (सोमवार) रोजीपर्यंत कार्यालयीन वेळेत पुराव्यासहीत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यानंतर येणाऱ्या हरकती व सूचना विचारात घेण्यात येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे लेखी हरकती व सूचना संबंधित नगरपरिषद /नगरपंचायत यांच्या मुख्याधिकारी यांचेकडेच नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालय येथे प्राप्त होतील, त्यावर ९ मे २०२३ (बुधवार) रोजी सकाळी ११ वाजता पासून जिल्हा सह आयुक्त, नगरपरिषद प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ हे सुनावणी देतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी.


  • जिल्ह्यात हिंदू ह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना १२ ठिकाणी सुरु मोफत उपचार व मोफत तपासणी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    गरीब, कामगार, मध्यमवर्गीय जनता सकाळीच कामाला निघून जातात. त्यामुळे अशा लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबुन रहावे लागते. हिंदू ह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अशाच नागरिकांसाठी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सुरु राहाणार असुन कामगार, मजुर अशांसाठी हा दवाखाना अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे काल कामगार दिनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चे जिल्हास्तरीय उद्घाटन भोसा येथे करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री श्री राठोड बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड, उपवनसंरक्षक श्री धनंजय , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर डी राठोड उपस्थित होते. मुंबईत मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. त्यांची कामावर जाण्याची वेळ सकाळची असल्यामुळे या लोकांना आरोग्य सेवेसाठी खाजगी दवाखान्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन मुंबईत आपला दवाखान्याचा प्रयोग करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले. त्याचवेळी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आपला दवाखाना सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यानंतर आज आपला दवाखाना जिल्ह्यात सुरू झालेला आहे. आज त्याचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद झाल्याचे संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यात एकुण ३७ दवाखाने उघडणार असून पैकी बारा आज सुरू झालेत. आपला दवाखान्याच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सेवा सुविधा आणि औषधे मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना आरोग्य विभागाने प्रत्यक्षात पुढे न्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, गरीब लोकांना साध्या बाह्य रुग्ण सेवेसाठी खाजगी दवाखान्यात जावे लागते. तिथे तज्ञ डॉक्टरांची व्यवस्था नसते तरीही त्याचा आर्थिक भार शहरी भागातील गरीब लोकांना बसतो. आपला दावाखान्याच्या माध्यमातुन ही व्यवस्था आता बदलता येईल. लोकवस्ती जास्त असणाऱ्या ठिकाणीच आपला दवाखाना सुरू होणार आहे. त्यामुळे गरीब लोकांचा दवाखाना आणि प्राथमिक आरोग्यासाठी होणारा खर्च आपल्याला आपल्या उत्तम आणि चांगले सेवेच्या माध्यमातून टाळता येईल. आपली सेवा चांगली राहील याचा आपण कसोशीने प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. सुरुवातीलाच योग्य निदान व उपचार मिळाल्यास अनेक आजार गंभीर स्वरूप धारण करण्यापासून वाचू शकतात. आपल्याकडे आरोग्य क्षेत्रातील या मिसिंग लिंक आपला दवाखानाच्या माध्यमातून दूर होतील अशी आशा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केली. महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण आपल्या देशात मोठे आहे आणि यामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. जर ह्या कर्करोगाचे प्रारंभीच योग्य निदान होऊन उपचार मिळाले तर कर्करोग गंभीर स्वरूप घेण्यापासून टाळता येऊ शकतो. त्यामुळे ह्या मिसिंग लिंक या दवाखान्यामुळे पूर्ण होतील. तसेच कामगारांना आपला दवाखाना उपयुक्त राहील. सर्व सेवा सुविधा या दवाखान्यात नि:शुल्क आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांनी याच लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. प्रल्हाद चव्हाण यांनी. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.तन्वीर शेख, डॉ. प्रीति दुधे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. क्रांतिकुमार नावंदीकर,डॉ. संजना लाल वैद्यकीय अधिकारी, डॉ.नाझिया काझी वैद्यकीय अधिकारी, लव जेठवा, डॉ. प्रमोद लोणारे, व नागरी आरोग्य केंद्र 1,2,3, येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत पांटील यांनी केले काय असणार आपला दवाखान्यात बाह्य रुग्ण सेवा, मोफत उपचार, मोफत तपासणी, टेली कन्सल्टेशन, महिन्यातून निश्चसािवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण इत्यादी. गरजेनुसार ७ तज्ञ सेवा फिजिशियन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोग तज्ञ , मानसोपचार तज्ञ, कान नाक घसा तज्ञ. उपलब्ध अधिकारी/ कर्मचारी वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स बहुउद्देशीय कर्मचारी आणि मदतनीस एवढे केंद्रात सेवा देण्यासाठी नियुक्त राहतील.


  • “शेतकरी शास्त्रज्ञ मंच” ची तिसरी शेतकरी सभा रिधोरा येथे संपन्न” अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळच्या अंतर्गत स्थापन केलेल्या “शेतकरी शास्त्रज्ञ मंच” च्या तिसऱ्या सभेचे आयोजन प्रगतिशील शेतकरी हरिभाऊ काळे रिधोरा,यांच्या प्रक्षेत्रावर संपन्न झाले. याप्रसंगी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त जगदीश चव्हाण गाझीपूर, शेतकरी शास्त्रज्ञ मंचचे उपाध्यक्ष सुरेश नेमाडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा केंद्रप्रमुख कृषी विज्ञान केंद्र,यवतमाळ अमोल जोशी, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश गहूकर, रिधोराचे सरपंच नरेंद्र कवटे, तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राहुल चव्हाण,कृषी अभियांत्रिकी शास्त्रज्ञ प्रमोद मगर व कीटक शास्त्रज्ञ गणेश काळुसे प्रामुख्याने उपस्थित होते. जगदीश चव्हाण यांनी विद्यापीठाचे विकसित व कमी खर्चिक तंत्रज्ञान आपल्या शेतावर कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात राहून राबवावे,असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजक प्रगतीशील शेतकरी हरिभाऊ काळे यांनी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांचे स्वागत करून शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल तसेच शेतकरी घेत असलेले उत्पादन व उत्पन्न या विषयावर मनोगत व्यक्त केले. तालुक्यातील प्रगतिशील व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असलेल्या शेतकऱ्यांचा परिचय करून देण्यात आला. तांत्रिक सत्रामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश नेमाडे यांनी पारंपारिक पीक पद्धतीमध्ये पिकाची फेरपालटणीचे महत्त्व तसेच फळबाग व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व तज्ञ यांच्याकडून फळबागेतील कीड व रोग, आधुनिक कृषी अवजारे, शेळीपालन व कुक्कुटपालन या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर ढोले तर सूत्रसंचालन उद्योजक शेतकरी गजू आत्राम यांनी केले व आभार हरिभाऊ काळे यांनी व्यक्त केले.


  • आय एस ओ मानांकन प्राप्त शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी करिता प्रवेश प्रक्रिया सुरु अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अनुसुचित जाती मुलांची शासकिय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वी वर्गाच्या विद्यार्थांना रिक्त जागेनुसार प्रवेश देण्यात येईल सदर शाळा आय.एस.ओ. मानांकन प्राप्त असुन १ मे ते १० जुन २०२३ पर्यत प्रवेश अर्ज वाटप करण्यात येऊन १२ जुन पर्यंत स्विकारण्यात येईल. पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश निश्चीत करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे. या शाळेची वैशिष्टे अशी आहेत. मोफत भोजन व निवास व्यवस्था,मोफत शैक्षणिक साहित्य, सुसज्ज,स्वच्छ व निसर्गरम्य वातावरण, सर्व प्रकारचे क्रिडा साहित्य, खेळण्यासाठी स्वतंत्र क्रिडांगण, अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक व कर्मचारी वर्ग, अद्यावत व आधुनिक साहित्यासह स्वतंत्र प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, इयत्ता १० वी ची १०० टक्के निकालाची परंपरा, २०२१-२२ मध्ये ईन्सपायर्ड अवार्ड करिता राज्यस्तरावर निवड, डिजिटल बोर्ड व लेक्टर्ण च्या माध्यमातुन अध्ययन व अध्यापन, स्वतंत्र व भव्य संगणक कक्ष, २४ तास विज व पाण्याची सुविधा, प्रत्येक विद्यार्थांकडे स्वतंत्र व वैयक्तीक लक्ष, इंग्रजी विषयाकरिता सीएलआर उपक्रम, शिष्यवृत्ती परिक्षेची विशेष तयारी करून घेण्यात येते. आरक्षण असे राहील. अनुसूचित जाती ८० टक्के, अनुसुचित जमाती १० टक्के, दिव्यांग ३ टक्के, विभक्त जाती भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के ,तसेच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी असे समाजकल्याण कार्यलयाने कळविले आहे.


  • लोकशाही दिनात ६७ तक्रारी लोकशाही दिनातील तक्रारी वेळेत निकाली काढा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    विभाग प्रमुखांनी लोकशाही दिनातील सर्व तक्रारी गाऱ्हानी लवकरात लवकर निकाली काढावीत अशा सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिल्यात. बळीराजा चेतना भवन,येथे आज जिल्हा लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते.सदर लोकशाही दिनात जिल्हाधिकारी अमोल येडगे,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सविता चौधर,तसेच इतर सर्व विभाग प्रमुख/अधिकारी बैठकीस हजर होते. लोकशाही दिनी एकुण -६७ तक्रारी आल्या असून (स्वीकृत १ व अस्वीकृत-६६) सामान्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.सदर लोकशाही दिनातील सर्व प्रकरणाचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घेतला व सर्व विभाग प्रमुखांनी संबधित प्रकरणे वेळेत निकाली काढावी अश्या सुचना जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आल्यात.


  • महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांची सुरूवात अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    उमरखेड तालुक्यात १९१६साली पैनगंगेच्या पुरामुळे पळशी गावातुन नागापूर गांव स्थापन झाले.१९९५ला नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली.मागच्या २५ वर्षात लोकसहभागामुळे, अनेक कामांच्या सातत्याने विभागीयस्तर द्वितीय,जिल्हास्तरीय दोनदा प्रथम,तालुकास्तरीय प्रथम,गटस्तरीय प्रथम संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्कार प्राप्त झालेत.स्मार्ट ग्राम पुरस्कार, पर्यावरण ग्राम समृद्धी पुरस्कार, साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार, आय .एस. ओ. मानांकन प्राप्त, लोकनेते भाऊसाहेब माने समृद्धी स्मशानभूमी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.गावातील टेकडीवर रोजगार हमी योजना व इतर योजनेतून 58 लाख रुपयाचे राजीव गांधी भवन बांधण्यात आले. राजीव गांधी भवन ला लागणारे साहित्य 85 पायऱ्या चढून "एक तास माझा माझ्या गावासाठी" या संकल्पनेतून श्रमदान करून टेकडीवर चढविण्यात आले. रोजगार हमी योजनेच्या "बिहार पॅटर्न" मधून 1000 झाडांची वृक्ष लागवड रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आली. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायतला सोलर हीटर, सोलर पंप, सोलर एनर्जी असे पर्यावरण पूरक काम करण्यात आले. मागील दहा वर्षापासून संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी पासून गावामध्ये "संकल्प ग्राम विकास अभियान सप्ताह" राबविण्यात येतो त्यामध्ये लोकांना पुरक अशी कामे केल्या जातात. यशदा प्रबोधिनी पुणे मार्फत नागापूर येथील राजीव गांधी भवन येथे" पंचायत लर्निंग सेंटर " मिळाले आहे त्यामध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षणे देण्यात येणार आहे त्यासाठी यशदा प्रबोधिनी पुणे मार्फत सात लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत 97 लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे त्यामध्ये विहीर, पाण्याचे टाके व व पाण्याची वितरण व्यवस्था करण्यात आलेली आहे. गावाला अनेक पुरस्कार मिळाल्यामुळे गावाला यशवंत ग्राम पंचायत दर्जा सुद्धा मिळाला आहे. पुरस्कार प्राप्त गाव जिल्ह्यापासून 120 किलोमीटरवर व उमरखेड पंचायत समिती पासून 12 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे गाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असणाऱ्या पैनगंगा नदीच्या काठावरून एक किलोमीटर अंतरावर आहे.


  • गट ग्राम पंचायत बोथिया पालोरा येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला नवे संकल्प

    गटविकास अधिकारी रामटेक रामटेक


    गट ग्राम पंचायत बोथिया पालोरा येथे महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला




  • प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे संचालित अनु.जाती.मुलींची शासकीय निवासी शाळा आसारपेंड, ता. पुसद जि. यवतमाळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळा संपन्न झाली. सदर कार्यशाळेची सुरवात शाहू,फुले,आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.कार्यशाळेचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ. घरजारे मॅडम यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून मा.सौ.मुन मॅडम,संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ ,मा.सौ.मोटघरे मॅडम स.क.नि यवतमाळ,मा.श्री.गावंडे सर,व वसतिगृह अधीक्षका बोनतावार मॅडम उपस्थित होत्या.सदर कार्यशाळेमध्ये मा.मून मॅडम यांनी जात वैधता प्रमाणपत्राचे महत्व,स्वरूप व जात वैधता प्रमाणपत्रासाठी लागणारे अभिलेखे याविषयी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व श्री.गावंडे सर यांनी जात वैधता प्रमाणपत्राची कार्यपद्धती व गरज याविषयी माहिती दिली तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. घरजारे मॅडम यांनी देखील जात वैधता प्रमाणपत्राचे महत्व स्पष्ट केले व श्री.पी.पी.नाईक सर यांनी आपल्या प्रस्ताविकेच्या माध्यमातून सामाजिक न्याय पर्वा अंतर्गत राबविलेले विविध उपक्रम याविषयी उपस्थित पालकांना माहिती दिली तसेच मा. सौ.मून मॅडम,संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यवतमाळ व श्री.गावंडे सर यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावाची प्रत्यक्ष तपासणी करून पालकांच्या समस्यांचे निराकरण केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पवार सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री.चव्हाण सर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, ब्रिक्स बिव्हीजी कर्मचारी यांनी सहकार्य केले.


  • घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    ग्रा. पं.सावर येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करतांना मा. गटविकास अधिकारी साहेब व विस्तार अधिकारी (आरोग्य) कोडापे साहेब....


  • गावातील सांडपाण्याचा कुवा(छोटी विहीर) वापर घनकचरा व्यवस्थापन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    ग्रा. पं. सावर येथे गावातील सांडपाण्याचा कुवा(छोटी विहीर) वापर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी करण्यात आला ... पाहणी करतांना मा. गटविकास अधिकारी साहेब व विस्तार अधिकारी (आरोग्य) कोडापे साहेब....सचिव श्री शेख सर....


  • बाल स्नेही संकल्पनेमध्ये राज्यात प्रथम अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड 2023 मध्ये कळसा चिंचोली गाव बाल स्नेही संकल्पनेमध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल पंचायत समिती दिग्रस च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन


  • व्हाईस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे कार्य अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    ईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांचा आवाज बुलंद करण्याचे काम करीत आहे. दिड वर्षापूर्वी स्थापन केलेल्या संघटनेची संपूर्ण देशात संघटनात्मक बांधणी झाली आहे. जे काम दहा वर्षात करु असा उद्देश डोळ्यासमोरुन ठेवुन होतो. परंतु फक्त दिड वर्षातच २८ हजारावर पत्रकार संघटनेत जुळले आहे. पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पंचसूत्रीवर काम करीत असल्याचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. व्हाईस ऑफ मिडीया यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने सहकार भवन येथे आयोजित पत्रकार पॉलिसी वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, विदर्भ प्रदेशाध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे, सामाजिक कार्यकर्ते भाई अमन, माजी पंचायत समिती सभापती सागर पुरी, अशोक पुरी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दिव्या भोसले म्हणाल्या की, व्हाईस ऑफ मिडीया ही संघटना नसून पत्रकाराची चळवळ आहे. पत्रकारांचे महामंडळ स्थापन व्हावे. पत्रकारांना सर्वदृष्टीने सक्षम करण्यासाठी काम करायचे आहे असे त्या म्हणाल्या. व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रास्तविकाच्या माध्यमातून संघटनेचे कार्याची भूमिका मांडली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर जुनुनकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दैनिक लोकसत्ताचे जिल्हा वार्ताहर नितीन पखाले यांची राज्य संघटक म्हणून तर दैनिक पब्लिक पोस्टचे संपादक प्रा. अंकुश वाकडे यांची राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्या निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते नितीन पखाले, प्रा. अंकुश वाकडे यांचा रोपटे देवून सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, दैनिक सकाळचे जिल्हा बातमिदार राजकुमार भितकर, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांचाही सत्कार करण्यात आला. पॉलिसी काढण्यासाठी भारतीय डाक विभगाचे अधिक्षक गजेंद्र जाधव व त्यांची चमु उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन कैलास राउत यांनी केले. तर आभार सुकांत वंजारी यांनी केले. या कार्यक्रमाला व्हाईस ऑफ मिडीयाचे पदाधिकारी जय राठोड, नितीन भुसरेड्डी, सूरज पाटील, रवी राउत, राहुल वासनिक, विवेक वानखेडे, विजय मालखेडे, पवन लताड, संजय राठोड, गौतम गायकवाड, भिमराव गणविर, रोशन सावंत, धनंजय उपगनलावार, रविश वाघ, सैयद्द मतीन, मकसुद अली, शाकीर अहेमद, किरण कोरडे उपस्थित होते.


1 2