• राज्य संरक्षित स्मारकांचे जतन-दुरुस्ती कामांचे छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. नवे संकल्प

    संचालक पुरातत्त्व विभाग


    जागतिक वारसा सप्ताह १९ ते २५ नोव्हेंबर २०२३ अंतर्गत सोनेरी महल सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग छत्रपती संभाजीनगर येथे मागील पाच वर्षात छत्रपती संभाजीनगर व नांदेड विभागा मार्फत झालेले जतन – दुरुस्ती कामंचे छायाचित्र प्रदर्शन दि. २२ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भरवीण्यता आले. व प्रदर्शनस निशुल्क प्रवेश ठेण्यात आले तसेच सदर कार्यक्रमाची उद्दघाटक- डॉ. तेजस गर्गे मा.संचालक पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय,मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले. व मुकुंद भोगले इंटॉक्ट औरंगाबाद चॅप्टर उपस्थिती होते मा. संचालक साहेबांनी कार्यालयाती अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मनोग्त व्यक्त केले व विभागाचे कार्यपद्धती बदलती आहे याबाबत प्रशंसाही केले.


  • आयटीआय उमरखेड येथे प्रधानमंत्री दौड मॅरेथॉन स्पर्धा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून उमरखेड येथे पीएम स्किल रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ गो. सी. गावंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ. कदम, श्री समर्थ फॅब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल उमरखेडचे रामेश्वर बिच्चेवार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश शिंदे उमरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले विजेत्या व सहभागी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ नितीन भुतडा व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला व पुरुष गट यामध्ये एकूण 220 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये पुरुष गटात राम विलास राठोड याने प्रथम क्रमांक ब्रम्हा भिकु आडे याने द्वितीय क्रमांक व चेतन शंकर बाभुळकर याने तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटामध्ये काचंन गजानन जाधव हिने प्रथम, भक्ती दिनेश हातगांवकर हिने द्वितीय तर पूजा गजानन राठोड हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ढाणकी, श्रीराम प्लायवूड अँड हार्डवेअर पुसद, माहेश्वरी एजन्सी उमरखेड, गोदावरी अर्बन बँक उमरखेड यांच्यावतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. तसेच नितीन भुतडा यांच्यावतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना नास्ता व चहा तसेच रामेश्वर बिच्चेवार यांच्यावतीने पाणी व्यवस्था करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य डी.पी.पवार व संपूर्ण आयटीआयची टीम तसेच आरोग्य पथक, वाहतूक पोलीस यांनी सक्रिय सहभाग घेऊन पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.


  • *इंदिरा महाविद्यालय कळंब येथे रसायनशास्त्र अभ्यासमंडळाची स्थापना* अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    स्थानिक इंदिरा महाविद्यालय कळंब येथील रसायनशास्त्र विभागातर्फे केमिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत जवादे , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. सरोज लखदिवे, इंदिरा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय , राळेगाव येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सतीश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रशांत जवादे सरांनी अभ्यासमंडळाचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दशरथ चव्हाण यांनी यावर्षी विभागातर्फे होणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली व रसायनशास्त्र अभ्यासमंडळ मधील नवनियुक्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. रसायनशास्त्र अभ्यासमंडळात अध्यक्ष क्रांतीकुमार अलोणे, उपाध्यक्ष युसरा काझी , कोषाध्यक्ष कु. काजल इंझाळकर, सचिव अजिंक्य धोबे ,सदस्य म्हणून विश्वजीत भुजाडे ,कु. पायल चांदोरे, तुबा काझी व कु. शिवानी डोडेवार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. निळकंठ नरुले यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्सा काझी तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल खांडेकर यांनी केले .या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्राची बोंडे ,डॉ. सुरज देशमुख , श्री नरेश कोकांडे व रसायनशास्त्र पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रम प्रसंगी डॉ. पांडुरंग इंगळे, प्रा. शितल राऊत ,डॉ. शरयू बोंडे ,प्रा. राहुल सिन्हा , प्रा. सखाराम सांगळे तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.


  • इट राईट मिलेट मेळाव्याचे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    शहरात अन्न व औषध प्रशासन विभाग व माहेश्वरी मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारात समावेश करण्याबाबत जनजागृतीसाठी महेश भवन, यवतमाळ येथे इट राईट मिलेट मेळावा नुकताच संपन्न झाला. नागरिकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मिलेट्स रेसीपी व इतर पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या मेळाव्याचे उद्घाटन श्यामसुंदर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ जयश्री उघाडे, माहेश्वरी मंडळाचे चंद्रकांत बागडी, विजय लाहोटी, शोभा मुंधळा उपस्थित होत्या. यावेळी डॉ जयश्री उघाडे यांनी जंक फूडचे दुष्परिणाम, मिलेट्सचा आहारातील महत्त्व सांगितले व विविध शंकांचे निरसन केले. सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासह सकस व पोषण मुल्यांनी युक्त असे आहार घेणे आवश्यक आहे. भरड धान्य हे भारतीय अन्न संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेवून दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर करणे आजच्या फास्टफुडच्या काळात गरजेचे बनले आहे. भगर, नाचणी, राजगिरा, कुट्टु, बाजरी, ज्वारी, कोदो, कुटकी, कांगनी, सावा इत्यादी भरडधान्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे शरीरातल्या शुगर, कोलेस्टेरॉलच्या समस्या दुर होतात व ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मधुमेहच्या रुग्णांनी आहारात मिलेट्सचा समावेश केल्यास शुगर नियंत्रणात राहते. भरड धान्य हे कॅल्श‍ियम, आयर्न, फायबर व विटॅमीन्सने समृध्द असतात. कॅल्श‍ियममुळे हाडे मजबुत होतात, फायबरमुळे पाचन होण्यास मदत होते, आयर्नची भरपुर मात्रा असल्याने रक्त शुध्द होते व ते महिलांसाठी सुपर फुड म्हणून काम करते, असे मत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यांनी प्रास्ताविकात मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी घनश्याम दंदे, अमित उपलप व माहेश्वरी मंडळाचे महेश मुंदडा, अॅड वरुण भुतडा यांनी प्रयत्न केले.


  • डाक योजनांच्या जनजागृतीसाठी डाक सप्ताहाचे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    भारतीय डाक विभागाच्यावतीने संपूर्ण देशभरात डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ डाक विभागाच्यावतीने दि. 9 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. हा डाक सप्ताह 13 ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या विविध योजना तसेच डाक खात्याच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेला देवून जनजागृती करणे हा या मागचा उद्देश आहे. राष्ट्रीय डाक सप्ताहाचे निमित्ताने दि. 11 ऑक्टोबर रोजी डाक विभाग, यवतमाळ व डाक तिकीट संग्रह संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ अशा डाक तिकीटांचे भव्य प्रदर्शन महिला विद्यालय, महादेव मंदिर रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे. डाक तिकीट संग्रह करणे व त्यामधून आपल्या देशातील थोर क्रांतिकारी पुरुषांची, समाजसेवकांची माहिती तसेच कला, संस्कृती याची माहिती व्हावी हा या प्रदर्शनी मागचा मुख्य हेतू आहे. या प्रदर्शनीमध्ये निशुल्क प्रवेश आहे. या प्रदर्शनीला जनतेने तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यवतमाळ विभागाचे डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव, डाक तिकीट संग्रह संघाचे समन्वयक डॉ. योगेंद्र मारू यांनी केले आहे.


  • मियावाकी प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धनाची प्रेरणा देणारा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    दिग्रसच्या पर्यटन वैभवात भर घालणारा अटल आनंदवन घनवन (मियावाकी) प्रकल्प दिग्रसवासियांसह सर्वांच्या पर्यटनासाठी उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धन व संरक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पुसद वन विभागाने दिग्रस शहराजवळील भवानी टेकडी परिसरामध्ये उभारलेल्या अटल आनंदवन घनवन या मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले, पुसद वन विभागाचे उपवनसंरक्षक डॅा. बी.एन.स्वामी, सहायक वनसंरक्षक साईनाथ नरोड, तहसिलदार सुधाकर राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, सुधीर देशमुख, रविंद्र अरगडे, ॲड. विवेक बनगिनवार, प्रणित मोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन म्हणाले की, वन विभागाने उजाड जमिनीवर विविध झाडे लावून परिसराचा कायापालट केला आहे. ही कौतुकाची बाब आहे. आज आपण एका संक्रमण परिस्थितीला सामोरे जात आहोत. ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक भागात मानव-वन्यप्राण्यांत संघर्षाच्या तक्रारी होत आहेत. आपण वन्यजीवांच्या हद्दीत चाललो का, हा देखील विचार करण्याची गरज आहे. ऋतुचक्र बदलल्याचे अनुभव येत आहे. पूर्वीच्या ऋतुचक्रासाठी वनसंरक्षण केले पाहिजे. जैवविविधतेचे चक्र पाळले पाहिजे. लोकांमध्ये वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याची भावना रुजवण्याची गरज आहे. वन संरक्षण केल्यास निसर्ग टिकून राहील. वन विभागही त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत आहे. नव्या पिढीला वने, पशुपक्षी, वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोणातून या भवानी टेकडी उद्यानात सुविधा निर्माण करावी. राज्याचा वन मंत्री असतांना लोकांच्या मागणीनंतर वन विभागाच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून दिग्रसवासियांसह शाळकरी विद्यार्थी, पर्यटनप्रेमींसाठी पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. येणाऱ्या काळात या भागाचा अजून विकास होणार आहे. वन विभागाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. या परिसरात पर्यटक, विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनसंवर्धनाविषयी माहिती होण्यासाठी सर्वस्तरावरचे गार्डन तयार झाले पाहिजे. वन विभाग हा जनहिताचे कार्य करणारा विभाग आहे, ही भावना नागरिकांनी बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. राठोड यांनी व्यक्त केली. यावेळी यवतमाळ वन वृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले यांनी प्रास्ताविकात मियावाकी प्रकल्पाची आणि वनविभागाच्या विविध योजनांची माहिती देवून वनसंवर्धनाचे आवाहन केले. मियावाकी प्रकल्प : मियावाकी ही जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी तयार केलेली पद्धत आहे. हे जंगल जलद वाढण्यास, घनदाट आणि नैसर्गिक होण्यास मदत करते. या पद्धतीमध्ये उजाड जमीनीवरही अनेक प्रकारची झाडे एकत्र लावता येतात, ज्यामुळे प्रजातींमध्ये संतुलित वातावरण निर्माण होते. परिणामी, झाडे दहापट वेगाने वाढतात आणि जंगले सामान्यापेक्षा ३० पट घनदाट होतात. या पद्धतीमध्ये केवळ स्थानिक देशी झाडे लावली जातात. याच पद्धतीने दिग्रसमधील भवानी टेकडी परिसरातील कोलुरा गावात वन विभागाने एक हेक्टर मुरबाड जमिनीचा पोत सुधारुन वनीकरणासाठी जागा तयार करुन या जागेवर तीस हजार रोपांची लागवड केली आहे. या अटल आनंदवन धनवन (मियावाकी) प्रकल्पात आवळा, आंबा, पेरु, फनस, वड, पिंपळ, बकुली, निम, कांचन, सिताफळ, चिकू, डाळींब अशी विविध रोपे लावण्यात आली आहे.


  • जिल्हाधिकाऱ्यांची स्त्री रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयास भेट व पाहणी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच रुग्णालयीन सेवा, सुविधेच्या उपलब्धतेबाबत त्यांनी आरोग्य प्रशासनास निर्देश दिले. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा.मनोज तगडपल्लेवार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॅा.रवी पाटील उपस्थित होते. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी प्रसुतीगृह, वार्ड, शस्त्रक्रीयागृहाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॅा.आनंद आशिया, मेडीसिन विभाग प्रमुख डॅा.बाबा येलके, बालरोग विभाग प्रमुख डॅा.अजय केशवाणी, स्त्रीरोग विभागाचे डॉ. वऱ्हाडे, डॅा.अजय कुसुंबिवाल यांच्यासह विविध विभागाचे डॅाक्टर्स उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी रुग्णसेवा व स्वच्छतेचा सविस्तर आढावा घेतला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील बालके व महिलांच्या वार्डांसह सर्वच वार्डांची त्यांनी पाहणी केली. वार्डातील स्वच्छता, रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधांची पाहणी केली तसेच रुग्णांशी संवाद देखील साधला. महाविद्यालयातील औषधीसाठा, अत्यावश्यक यंत्रसामुग्रीची देखील पाहणी केली व सुचना केल्या. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घ्या. रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्त्री रुग्णालयातील अडीअडचणी व समस्यांची देखील त्यांनी माहिती घेतली. अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, असे ते म्हणाले. बालमृत्यू दर पुर्वी 4.6 टक्के इतका होता आता तो 3.7 टक्के इतका खाली आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. औषधे खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयांना आवश्यक असलेल्या औषधे खरेदीसाठी निधी दिला जातो. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील औषधींसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक औषधे खरेदीसाठी महाविद्यालयाला निधी निधी दिला जातो. या तिनही संस्थांच्या औषधे खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी सांगितले. जिल्ह्यात कुठेही औषधांची कमतरता नसल्याचे ते म्हणाले.


  • गांधी जयंती निमित्य भव्य रॅलीचे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जागतीक लॉयन्स सेवा सप्ताहाची सुरुवात आज 2 ऑक्टोंबर पासून सुरु झाली. या दिवशी लॉयन्स क्लब, यवतमाळ व वेदधारीणी शाळा, पिंपळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता मिरवणुकीचे आयोजन सकाळी 9 वाजता वेदधारीणी शाळे जवळून करण्यात आले. या मिरवणुकीची सुरुवात एम. जे. एफ. मनोहर सहारे (झोन चेअर पर्सन) व शाळेचे संचालक डफले सर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. यासाठी 400 ते 500 विद्यार्थी व लॉयन्स क्लबचे 25 मेंबर उपस्थित होते. या मध्ये मुलांच्या घोषणांनी परिसर दणानुन गेला. कार्यक्रमाची रुपरेषा कार्यक्रम प्रमुख एम. जे. एफ. सुनिल जोशी तर अध्यक्ष मंगेश शिरभाते यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये मुलांकडून स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर एम. जे. एफ. मनोहर सहारे यांनी मुलांना उपदेशपर भाषण केले. याची सांगता व आभार प्रदर्शन सचिव संजय देशपांडे यांनी केले. लॉयन्स क्लब तर्फे सर्व मुलांना भेट वस्तुचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमला लॉयन्स क्लब तर्फे अभय गांधी, अशोक भंडारी, विजय खोरीया, विजय लाहोटी, मनोज अग्रवाल, शैलेश सिकची, निलीमा मंत्री, संजय मंत्री, राजकुमार अग्रवाल, रागीनी गावंडे, माधवर रुईकर, नारायण धुत, पंकज खवासे इत्याची उपस्थित होते. असे प्रसिध्दी प्रमुख शैलेश सिकची यांनी कळविले आहे.


  • दिग्रस तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    दिग्रस तालुक्यातील कलगाव, कांदळी येथील एकूण ६ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकोपयोगी विकासाची कामे अविरत सुरु राहतील, असे प्रतिपादन त्यांनी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. यावेळी कलगाव येथील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राची नवीन इमारत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून शासनाचे उपक्रम राबवून परिसरातील गोरगरिब, महिलांना आधार द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॅा. आशिष पवार, तहसिलदार सुधाकर राठोड, माहिती अधिकारी पवन राठोड, गटविकास अधिकारी खारोडे, विविध विभागाचे अधिकारी, कलगावच्या सरपंच आस्मीता मनवर, कांदळीच्या सरपंच शेवकाबाई राठोड, कलगावच्या उपसरपंच साजेपरवीन अलीमोद्दीन शेखआणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते व पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा यासह विविध विकासकामे केली जात आहेत. विकासाची ही कामे अविरत सुरु राहील. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. होतकरू तरुणांसाठी ग्रामपंचायत तिथे अभ्यासिका, रोजगार मेळावे, आरोग्य शिबीर, विविध योजनांमधून घरकुल, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी झटका मशीन, मागेल त्याला विहिर अशा विविध योजना, उपक्रम राबविल्या जात आहे. त्यातून लोकांची कामे केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कलगाव येथील तांदळी, आष्टा, कलगाव, वडगाव रत्यावरील पुलाचे बांधकाम, जल जीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम, आरोग्यवर्धीनी उपकेंद्र नवीन इमारतीचे बांधकाम, श्री महादेव मंदिरासमोर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम, पंचमाता मंदिरासमोर सभागृहाचे बांधकाम, संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरासमोर सभागृहांचे बांधकाम, नळ जोडणी, अंगणवाडी, सिमेंट रस्ते, नवीन विद्युत रोहित्र आणि स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम असे ४ कोटी ६३ लाख रुपये आणि कांदळी गावाजवळ पुलाचे बांधकाम, जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा, सिमेंट रस्ता, नळ जोडणी, नवीन रोहित्र उभारणी अशा २ कोटी एक लाख रुपये असे एकूण ६ कोटी ६४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट काही दिवसांपूर्वी कांदळी येथील शेतकरी गणेश प्रल्हाद चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांना शासनमार्फत योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वस्त केले.


  • लोकशाही दिनात ६० तक्रारी प्राप्त ; प्रकरणे निकाली काढा - जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण ६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि ३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या सामान्य नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरीक, व्यावसायिकांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेत त्यांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


  • सेंट अलॉयसिस इंग्लिश मिडियम स्कुल यवतमाळ येथे विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साध्य व्हावा यासाठी सेंट अलॉयसिस इंग्लिश मिडियम स्कुल धामणगांव रोड, यवतमाळ येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनीच्या अध्यक्षस्थानी सेंट अलॉयसिस स्कुलच्या प्राचार्या सिस्टर फातिमा फर्नाडिस यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी दिपीका गुल्हाने, साधन व्यक्ती शुभांगी भोयर उपस्थित होत्या. यावेळी `डायव्हर्स नेटवर्क ऑफ सायन्स’ या विषयावर आधारीत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विज्ञानातून विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व अंधश्रद्धा नाहीशी व्हावी या दृष्टिने हे विज्ञान प्रदर्शनी महत्वपूर्ण आहे. या विज्ञान प्रदर्शनीत इ. १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विषय निहाय वर्ग ५ ते १० चे २६२ प्रयोगाचे सादरीकरण केले. तसेच वर्ग १ ते ४ चे १०० विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले. असे एकूण ३६२ प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रयोगाचे परिक्षक म्हणून निलेश तिखीले, प्रशांत त्रिपाठी, अभय देशपांडे, श्रीमती रचना राऊत यांनी काम पाहिले. विज्ञान प्रदर्शनीत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनी यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, श्रीमती सुजन मँथू, श्रीमती वीटोरिया रेड्डी, श्रीमती डिना जेकप, श्रीमती मोहीनी चिकटे, श्रीमती वैशाली देशमुख, श्रीमती ज्योत्स्ना गुल्हाने, श्रीमती उषा सि.के., श्रीमती सिमा जोशी तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.


  • 2027 पर्यंत यवतमाळ जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणनुसार वर्ष २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग संसर्ग हे उदिष्ट लक्षात ठेवुन कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हयाचा धोरणात्मक कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्याचे बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा मुख्य वनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. गोपाळ पाटील हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले. जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, सहाय्यक संचालक डॉ. आडकेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. गोपाळ पाटील यांच्या नियोजनाखाली 2027 पर्यंत यवतमाळ जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येणार असून जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत प्रभावी आरोग्य शिक्षण देऊन कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे, सर्व स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. तसेच गावनिहाय कुष्ठरोगाबाबत प्रभावी घरोघर सर्वेक्षण करुन निघालेल्या सर्व संशयीत कुष्ठरुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, त्यांच्या सहवासीतांना कुष्ठरोग प्रतिबंधात्मक औषधोपचार देणे सुरु करणे, शोधलेल्या तसेच जिल्ह्यात जोखमी भागामध्ये कुष्ठरोगाबाबत विविध मोहीम घेण्यात येणार आहे.या मोहिमेत केंद्र सरकारच्या आयुष्मान भव उपक्रमाव्दारे सर्व शासकीय दवाखान्यात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या नागरीकांची कुष्ठरोग विचारात घेऊन पूर्ण तपासणी करणे याप्रकारच्या कृती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.


  • ‘वंदन’ सन्मान सोहळा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फॉउंडेशन यवतमाळच्या वतीने दिला जाणारा २०२३ यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'वंदन' सन्मान सोहळा यावर्षी अकोला येथील एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या सुचिता व श्रीकांत बनसोड या दाम्पत्यास जाहीर झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक महेश भवनमध्ये होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह व ५१ हजार असे वंदन पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा वंदन सन्मानाचे आठवे वर्ष आहे. बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान धारेवाडी ता. कऱ्हाड येथील सुप्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख हे उपस्थित राहतील.


  • अतिवृष्टी, पूरबाधितांच्या मदतीसाठी जिल्ह्याला 204 कोटींचा निधी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्ह्यात जून ते जुलै या कालावधीत अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतीपिक व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला 204 कोटी 87 लाख रुपयास शासनाने मंजुरी दिली आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून अमरावती विभागात जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे दोन हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्र 2 लाख 17 हजार 241.57 हेक्टर एवढे आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 63 हजार 609 आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 185 कोटी 10 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त 10,757.73 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 19 कोटी 76 लाख 63 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीबाधितांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 1 हजार 71 कोटी 77 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा जीआर महसूल व वन विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. अमरावती व औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी जून ते जुलै या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी डीबीटी प्रणाली मार्फत वितरित करावे. सर्व लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्यात यावी. महसूल व वन विभागाच्या दि.27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार दोन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी. शेतजमीनीच्या नुकसानीकरिता मदत अल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुज्ञेय असून शेतजमीनीचे नुकसान झाल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठीच्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री करावी. राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मि.मी.पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये 33 टक्क्यापेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील. मात्र, ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही, असे निधी मंजुरीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.


  • जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएस पोर्टलवरच करावी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जन्म-मृत्यू घटनेची नोंदणी ही नागरी नोंदणी पद्धती अर्थात सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) पोर्टलवरच करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी नागरिकांसह पंचायत समितीच्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत. नागरी नोंदणी पद्धतीअंतर्गत जन्म-मृत्यू नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या सभेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर राठोड, इंडियन मेडीकल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष डॅा. स्नेहा भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) डॉ. पी. सी. चव्हाण, सांख्यिकी अधिकारी सी. जी. जाधव, माहिती अधिकारी पवन राठोड, महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. देशभरात जानेवारी 2016 पासून जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी ही केंद्र शासनाच्या सीआरएस पोर्टलवर सुरु करण्यात आलेली आहे. परंतु शहरी भागातील नगरपरिषद, पंचायत व शासकीय आरोग्य संस्था वगळता, सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, जन्म-मृत्यू नोंदणी केंद्र, महसुली गावांमधून सीआरएस पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी यापुढे शंभर टक्के ग्रामपंचायत, महसुली गावातील जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रातून, जन्म-मृत्यू घटनेची नोंदणी, फक्त सीआरएस पोर्टलवरच करण्यात यावी. जेणेकरून मयत व्यक्तीच्या नावावरील विम्याचा दावा, बँक खात्यावरील रक्कम व शासकीय योजनेअंतर्गत देय असलेले लाभ मिळण्यास वारसांना अडचण येणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या. केंद्र शासनाचा जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र राज्य जन्म-मृत्यू नोंदणी नियम 2000 नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात जन्म-मृत्यूच्या घटनांची नोंदणी होत असते. जिल्ह्यात शहरी भागातील 17 नगरपरिषद व पंचायत, 16 शासकीय आरोग्य संस्था आणि ग्रामीण भागातील 1801 नोंदणी केंद्र, 69 शासकीय आरोग्य संस्था याप्रमाणे एकूण 1903 नोंदणी केंद्रामार्फत जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी करण्यात येते. जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी घटना घडल्यापासून विहीत मुदतीत म्हणजे 21 दिवसात आवश्यक माहिती प्राप्त झाल्यावर संबंधित निबंधक विनामूल्य करतात. परंतु विहित कालावधीत नोंदणी न केल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीतच घटनेची माहिती संबंधित निबंधकास देवून जन्म-मृत्यू, घटनेची नोंद वेळत करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून विनाकारण पैसे व वेळ दोन्हीही खर्च होणार नाहीत. या कायद्यानुसार घटना ज्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रात घडली. त्याच निबंधकाकडे नोंद होत करावी. जुन्या ज्या नोंदीत बाळाचे नाव न टाकता जन्म नोंदणी केलेली आहे. अशा नोंदणीबाबत आता बाळाचे नाव नोंदवून बाळाच्या नावानिशी प्रमाणपत्र देण्याची मुदत शासनाने दि. 27 एप्रिल 2026 पर्यंत वाढवून दिलेली आहे. ज्या नागरिकांनी पूर्वी बाळाचे नाव न टाकता जन्म नोंदणी करून बाळाचे जन्म प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यांनी लवकरात लवकर बाळाचे नाव टाकून प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आव्हान करण्यात आले आहे. तसेच मुदतीनंतर जुन्या नोंदीमध्ये बाळाचे नाव टाकून बाळाच्या नावानिशी प्रमाणपत्र देण्याची मुदत वाढवली जाणार नाही, असेही सूचना देखील देण्यात आल्या आहेत.


  • अमृत कलश जिल्हाधिकारी यांच्या स्वाधिन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ आभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यवतमाळ नगरपरिषदेने तयार केलेला अमृत कलश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सुपूर्द करण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्यासमवेत अधिकारी, कर्मचारी तथा नगरपरिषदेचे शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांनी या कलशाची शोभायात्रा काढली. यासंदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधतांना मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त न.प.प्रशासनाच्यावतीने राबविलेल्या विविध उपक्रमानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविले होते. त्यानुसार यवतमाळची पावनभुमी असलेल्या व स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणाऱ्या आझाद मैदान येथील मुठभर मातींसह शहरातल्या २८ प्रभागातील माती आणि तांदूळ गोळा करून तयार केलेला हा अमृत कलश आज ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांना स्वाधिन करण्यात आला. मुख्याधिकारी पुढे म्हणाले की, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून 'मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील वीर शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्ली येथे तयार होणाऱ्या अमृत वाटीकेकरीता देशभरातील माती एकत्रित करण्यात आली असून यवतमाळची ही माती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडलेल्या विशेष दुतासोबत हा अमृत कलश दिल्लीला पाठवला जाईल असेही त्यांनी सांगितले.


  • उमरी स्मारक येथे पंधरवड्याचा समारोप अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अमृत कलशाच्या माध्यमातून एक चिमूट माती गोळा झाली पाहिजे, म्हणजे एकात्मतेचे स्मरण होईल. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण केले जावे, असे प्रतिपादन आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी केले. उमरी स्मारक येथे सेवा पंधरवडा समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, पोलिस उपनिरीक्षक पराडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश होते. मानलवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रज्ञाताई भूमकाळे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, नगरपंचायतचे विरोधी पक्ष गटनेता अनिकेत पोहेकर, शहीद मधुकर घोटेकर यांच्या पत्नी संगीता घोटेकर आदी मंचावर विराजमान होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाला नितीन परडखे, संजय राठी विकी परडखे, गौतम लांडगे किशोर दामेधर, मिलिंद नवाडे, मुकुंद कासेशिट्टीवार, गणेश मैधने, अजमिरे, कोडापे, पवन मानलवार, बालू देशमुख, सोनाली चव्हाण, सोनू शर्मा प्रामुख्याने उपस्थित सकाळी गावामधून प्रभातफेरी काढण्यात आली. यात राष्ट्रपुरुषांच्या वेशात सजवलेल्या ट्रॅक्टरवर बसून असलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते संगीता मधुकर घोटेकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी केले. आभार ए. पी. पोपळकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उमरी येथील नागरिकांचेही सहकार्य लाभले आहे


  • गावकऱ्यांनी राबविले श्रमदान, गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    उमरखेड पंचायत समिती अंतर्गत केंद्र व राज्य सरकारणे उपक्रम हाती घेतला १ ऑकटोबर पासून एक तास श्रमदाण करून स्वच्छतेचा संदेश चालु आहे पोफाळी ग्राम पंचायत ने माझ्ये गाव सुंदर गाव स्वच्छ गाव ही संकल्पना राबून उपक्रम पोफाळी ग्राम पंचायतने राबविली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती निर्मीत स्वच्छता ही सेवा १ ऑकटोबर ला पोफाळीचे सरपंच रेखा क्षिरसागर व उपसरपंच पायघण, ग्रामविकास अधिकारी कोथळकर, तथा ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व ग्रामस्थ यांना ग्रामपंचायत परिसर तथा बस स्थानक परिसर स्वच्छताकेली एक तारीख एक तास स्वच्छता हीच सेवा या उपक्रमातर्गत सर्वानी सहभाग घेतला.


  • रक्तदान शिबिराचे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    इंदिरा महाविद्यालयात डॉ. यशवंत मोरेश्वर दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ०५/१०/२०२३ सकाळी ११:३० ते ३:३० वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. सदर रक्तदान शिबिर हे एकनील ब्लड बँक यवतमाळ, राष्ट्रीय सेवा योजना इंदिरा महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. तरी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व गावातील सर्व नागरिक यांना जाहीर आवाहन करण्यात येते


  • एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. या अभियानाअंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. योग्य मशागत पध्दतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधीचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी कारणांमुळे उत्पादकता कमी होत आहे. नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही जिल्ह्याची फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाब आहे. सन 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे. या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिकू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम 40 हजार रूपये प्रति हेक्टर ग्राह्य धरुन त्याच्या 50 टक्केप्रमाणे जास्तीत जास्त रक्कम 20 हजार रूपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय राहील. त्यानुसार आंबा फळपिकाचे कमीत कमी वय 20 वर्ष तर जास्तीत जास्त वय 50 वर्ष, चिकू कमीत कमी वय 25 वर्ष तर जास्तीत जास्त वय 50 वर्ष, संत्रा कमीत कमी वय 10 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष आणि मोसंबी फळपिकाचे कमीत कमी वय 8 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष राहील. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.


  • बाभुळगाव येथे अमृत कलश यात्रा व स्वच्छता ही सेवा कार्यक्रम अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत बाभुळगाव तालुकास्तरीय अमृत कलश यात्रा व स्वच्छता ही सेवा पंधरवाडा कार्यक्रम दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान उमरी स्मारक या ठिकाणी ग्रामपंचायत उमरी व पंचायत समिती बाभूळगाव यांचा संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. हा कार्यक्रम आमदार डॉ. प्रा.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनाखाली तसेच बाभुळगाव तहसीलदार मिराताई पागोरे व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी वीरपत्नी श्रीमती घोटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत उमरीच्या सरपंच सोनाली शेळके, पोलिस पाटील शुद्धोधन ढेपे, उपसरपंच मंदाताई गोटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी केले. सूत्रसंचलन स्मिता गोलर यांनी केले तर विस्तार अधिकारी अविनाश पोपळकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरिता बाभुळगाव गटशिक्षणाधिकारी गणेश मैघणे, कृषी अधिकारी अंबरकर, विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, कृषी विस्तार अधिकारी चंद्रशेखर हेडावू, व्ही.एम.कोडापे, केंद्रप्रमुख विलास काळे, प्यारेलाल वानखडे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सतिषणी मालनवार, नितीन परडखे, अनिकेत पोहकर, सचिव कुमरे, उमरी शाळेचे मुख्याध्यापक पारधी, माजी समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे तसेच स्वामी विवेकानंद हायस्कूल चिमनापूर व पीएनबी शाळा बाभुळगाव येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


  • जागतिक जेष्ठ नागरिक दिन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय आणि संत श्री दोला महाराज वृध्दाश्रम उमरी पठार ता. आर्णी यांच्यावतीने आयोजित आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५९ जेष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ८६ महिला व ७३ पुरुष सहभागी झाले होते. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष द. तु. नंदापुरे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते. या कार्यक्रमाला समाज कल्याण सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, गोपाल कोठारी, हरिओमबाबू भूत, मंजूदेवी भूत, अॅड चौधरी, अपर्णा नंदापुरे, रमेश कोष्टावार, राहुल पोडुटवार, मनिष गावंडे, शंकर मिर्झापूरे, सरपंच शंकर तलमले, सचिन पवार, पोलिस पाटील विलास मिर्झापूरे, संस्थेचे पदाधिकारी मधुकर रत्ने, दिवाकर ब्राम्हणक, सुरेश तलमले, वृध्दाश्रमाचे संस्थापक शेषराव डोंगरे, कर्मचारी राजू जयस्वाल तसेच ग्रामवासी व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त चव्हाण यांनी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याबाबत विचारपूस केली आणि त्यांना फळ व अल्पोपहाराचे वाटप केले. आरोग्य शिबीरामध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जेष्ठ नागरिकांना औषधोपचार उपलब्ध करुन दिले. याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी ता. आर्णी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश उके यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शेषराव डोंगरे यांनी शिबिराचे आयोजन व वृध्दाश्रमाविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन कराळे यांनी तर कनिष्ठ लिपीक श्याम लांडोळे यांनी आभार मानले. “जेष्ठ नागरिकांनी शासकीय योजनांचे लाभ घ्यावे. आरोग्य शिबिरामध्ये सर्व जेष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी करुन घ्यावी. तसेच वृध्दाश्रमास येणाऱ्या अडीअडचणींबाबत शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल”, असे मत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केले.


  • जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.


  • मनपूर जि.प. शाळेत शालेय साहित्याचे वाटप अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    यवतमाळ पं.स. अंतर्गत जि.प. उच्च प्राथमिक शाळा मनपूर येथे महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मातोश्री विमलबाई जनसेवा ट्रस्टच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये इ. १ ली ते ८ वी पर्यंत शिक्षण घेणार्‍या १७२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. यामध्ये विविध प्रकारचे ८५३ नोटबुक, रजिस्टर इ. शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. या प्रसंगी शैक्षणिक साहित्य वितरणाचे अध्यक्ष मातोश्री विमलबाई ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. सौ. कविता बोरकर यांची उपस्थिती होती. यावेळी नंदादिप फाऊंडेशनचे श्री. संदिप शिंदे, केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक दयाशंकर चितळकर यांची उपस्थिती होती. उपस्थितांनी महात्मा गांधी व लाल बहाद्दुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मनोगत व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अविनाश रोकडे, उपसरपंच जयेंद्र वंजारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव मानतुटे, दिपक मडसे, वनमाला फुपरे, टी.डब्ल्यु. जे. कंपनीचे काजल ढोले, समिक्षा नागापुरे, महेश गावंडे, सत्यम बोक्से, मुख्याध्यापक दयाशंकर चितळकर, अतुल बोदडे, प्रविण कंगाले, विद्या माळवे, विलास राठोड व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश जयसिंगकार यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष राठोड यांनी मानले. असे एका प्रसिद्धी पत्रकातून राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.


  • जि.प. मनपुर शाळेचे नवोदय परिक्षेत सुयश अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जि.प. उच्च प्राथमिक शाळा मनपूर शाळेने नवोदय परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. मनपुर शाळेची ऋतुजा श्रीकृष्ण उमाटे ही विद्यार्थिनी नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली आहे. मनपूर ही शाळा आदिवासी बहुल असलेली व घनदाट निसर्गरम्य वातावरणात वसलेली ही शाळा. ह्या शाळेत अत्यंत गरीब व आदिवासी मुले शिक्षण घेत आहे. गेल्या कित्येक वर्षानंतर ऋतुजा उमाटेची निवड नवोदय विद्यालयासाठी झाली असून ती पात्र ठरली आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनी या निवडीबद्दल ऋतुजा उमाटे हीचा सत्कार केला. व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. ऋतुजा उमाटे हिला विलास राठोड, संतोष राठोड, बोदडे सर, माळवे मॅडम, निलेश जयसिंगकार यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल हिवरी केंद्राचे केंद्रप्रमुख व मनपुर शाळेचे मुख्याध्यापक दयाशंकर चितळकर यांनी कौतुक केले आहे. त्याच प्रमाणे यवतमाळ पं.स. च्या गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य व राजहंस मेंढे यांनी तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकार्‍यांनी तिचे अभिनंदन केले आहे. असे एका प्रसिद्धी दिलेल्या पत्रकातून राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.


  • गोधणी येथे ग्रामस्वच्छता अभियान संपन्न अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    गोधणी ग्राम येथे महात्मा गांधी जयंती निमित्त देवि सामका महिला बहुउद्देशीय संस्थाद्वारा संचालित सामका आयुर्वेद येथील डॉ. पंकज पवार व त्यांची चमु द्वारे ग्रामस्वच्छता अभियान पार पडले. स्वच्छता पंधरवाडा पूर्ण देशभरात साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत स्वच्छता उपक्रम राबविम्यात आला. प्रथम गोधणी ग्रामपंचायतीचा संपूर्ण परिसर व महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या फोटोला हार अर्पन करून स्वच्छतेची सुरूवात करण्यात आली. त्याच प्रमाणे गोधणी गावातील बचत गटातील महिलांना स्वच्छतेची काळजी कशी घ्यावी व त्यामुळे आरोग्य कसे प्राप्त होईल याचे संपूर्ण मार्गदर्शन देवी सामका महिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.पंकज पवार (एम.डी.) यांनी केले. गावातील परिसर स्वच्छता करण्यामध्ये गोधणी येथील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश कुंभेकर, सरपंच श्री. राजुभाऊ डंभारे, माजी सरपंच तोडसाम व समस्त नागरिकांनी सहकार्य केले. असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून डॉ.पंकज पवार (एम.डी.) यांनी कळविले आहे.


  • विवेक पवार यांचे सायकल स्पर्धेत सुयश अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    अतिशय कठीन समजली जाणारी नागपूर ते पचमढी हे २५५ कि.मी. चे अंतर अवघ्या ११ तासामध्ये पार करून विवेक पवार याने पाचवा क्रमांक पटकावला. सातपुडा किंग ऑफ माऊंटन या स्पर्धेत एकूण चाळीस स्पर्धक होते. विवेक पवार याची सायकल छिंदवाडा येथे पंचर झाली व ती लवकर पंचर काढून परत स्पर्धेत भाग घेतला व तीस किलोमीटरचा पचमढीचा घाट पार करून स्पर्धेत पाचवा क्रमांक मिळवला. विवेक हा बुट्टीबोरी येथील भाऊसाहेब मुळुक आयुर्वेद कॉलेजचा प्रथम वर्षाचा विध्याथर्ई होय. यापूर्वी सुद्धा त्याने बंगलोर येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला या स्पर्धेत सहभाग घेऊन यशस्वी झाल्याबद्दल कॉलेजचे प्राचार्य गुप्ता सर व सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांनी विवेकचे अभिनंदन केले आहे.


  • स्वच्छता अभियानात मेंढला गाव एकवटले अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही अडथळ्याविना लाभ मिळावा, या हेतुने शासनातर्फे हाती घेण्यात आलेले 'शासन आपल्या दारी' व 'मेरी मिट्टी मेरा देश', हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मेरी माटी मेरा देश १७ सप्टेंबर ते दोन आक्टोबर पंधरवडा राबविण्यात येत असल्याने रविवारी (ता. एक) एक दिवस स्वच्छता अभियान राबवून गावात एक तास स्वच्छता हे अभियान मेंढला या गावात राबविण्यात आले. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गावकरी व शाळेच्या विद्यार्थ्यांनी या अभियानात सहभागी होऊन गावात स्वच्छता केली.


  • गांधी जयंती निमित्य सेवा सप्ताहाचे आयोजन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    2 ऑक्टोंबर 2023 ते 8 ऑक्टोंबर पर्यंत यवतमाळ लॉयन्स क्लब सेवा सप्ताहाचे आयोजन करत आहे. गांधी जयंती निमीत्य यवतमाळ लॉयन्स क्लब भरगच्च कार्यक्रम घेत आहेत. 2 ऑक्टोंबर रोजी गांधी जयंतीचे औचीत्य साधून शांतता रॅली सकाळी 9.00 वा. वेदधारणी विद्यालय येथे घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी महर्षी विद्या मंदिर, मोहा येथे दुपारी 12.00 वा. निबंध स्पर्धा घेण्यात येईल. दिनांक 3 ऑक्टोंबर 2023 मधुमेह तपासणी व रक्तदान शिबीर, शिवमंदीर परिसर सरुळ, ता. बाभुळगांव, जि. यवतमाळ येथे दुपारी 12.00 वा. घेण्यात येईल, दिनांक 4 ऑक्टोंबरला नेत्र तपासणी शिबीर सरुळ येथे घेण्यात येईल. तसेच दि. 5 ऑक्टोंबरला वृक्षरोपनाचा कार्यक्रम शिवमंदिर परिसर सरुळ येथे शिवमंदिर परिसरात दुपारी 12.00 वा. घेण्यात येईल. दिनांक 6 ऑक्टोंबर 2023 रोजी लहान मुलांचा कॅन्सर या विषयावर लॉ. डॉ. प्रमोद अग्रवाल यांचे मार्गदर्शन सकाळी 9.30 वा. वेदधारीणी विद्यालय, पिंपळगांव रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेले आहे. उपरोक्त कार्यक्रमाकरिता नागपूरवरून एम. जे. एफ. एटकुलवार, डिस्ट्रीक्ट सहस चेअर पर्सन उपस्थित राहतील. दिनांक 7 ऑक्टोंबर 2023 रोजी संजीवनी नसींग कॉलेज गोधनी रोड, यवतमाळ येथे एम्पॉवरमेंट जनरेशन ॲन्ड गोल सेटींग या विषयावर लॉ. संजय देशपांडे हे मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. हर्षलता गायनार ह्या उपस्थिती राहतील. हा कार्यक्रम सकाळी 11.00 वाजता होईल. त्यानंतर दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी "आम्ही सारे सावित्री" संस्था दारव्हा-आर्णी बायपास वडगांव येथे सकाळी 11.30 वाजता भुकेलेल्यांना अन्नदान करण्यात येईल. वरील कार्यक्रमाची माहिती लॉयन्स क्लब, यवतमाळ चे अध्यक्ष लॉ. मंगेश शिरभाते यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी म्हणुन एम. जे. एफ. सुनिल जोशी, लॉ. अभय गांधी, लॉ.डॉ.राजिव मुंदाने, लॉ.डॉ.प्रदिप गिरी, लॉ. विजय लाहोटी, लॉ. विनोद मनक्षे, लॉ. मनोज अग्रवाल, लॉ. राजकुमारजी अग्रवाल, सचिव लॉ.संजय देशपांडे, कोषाध्यक्ष लॉ. प्रदिपकुमार गिरी, अॅक्टव्हीटी चेअर पर्सन लॉ.विजय खोरीया व या पुर्ण प्रकल्पाचे प्रकल्पाधिकारी लॉ. सुभाष आचलीया हे आहेत. वरील कार्यक्रमास सर्व लॉयन सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन लॉयन्स क्लब यवतमाळ तर्फे करण्यात आले. असे प्रसिध्दी प्रमुख लॉ. शैलेश सिकची यांनी कळविले आहे.


  • गांधी जयंती निमित्त गोधणी येथे ग्रामस्वच्छता अभियान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    गांधी जयंती निमित्त गोधणी ग्रामपंचायत येथे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. उघड्यावर शौचास बसणे, घनकचरा व्यवस्थापन, शारीरिक आरोग्याची माहिती, सभोवतालचा परिसर स्वच्छ असला तर आरोग्य चांगले राहते यासाठी देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार (एम.डी) यांची चमु मार्गदर्शन करणार आहे. भारताला शुद्ध आणि स्वच्छ देश बनवण्याचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते. त्यांच्या स्वप्नातच्या संदर्भात गांधीजी म्हणाले की, स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता अधिक महत्वाची आहे. कारण स्वच्छता हा निरोगी आणि शांत जीवनाचा अथ्यावश्यक भाग आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हे त्यातून गोधणी ग्रामपंचायत येथे २ ऑक्टोंबर सोमवार रोजी स्वच्छता अभियानास सुरूवात करणार आहे. या प्रसंगी गोधणी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. राजुभाऊ डंभारे, उपसरपंच श्र. मारेकर,तसेच इतर सर्व सदस्य व बाळ गणेत्सोव मंडळाचे अध्यक्ष श्री. रमेश कुंभेकर व त्यांची चमु या अभियानामध्ये भाग घेणार आहे. असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून देवि सामका आयुर्वेद सेंटरचे अध्यक्ष डॉ. पंकज पवार (एम.डी) यांनी कळविले आहे.


  • जागतिक जेष्ठ नागरिक दिनी व्याख्यान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जागतिक जेष्ठ नागरिक दिनी यवतमाळ येथील प्रसिद्ध वैद्य तसेच देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार (एम.डी.) यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. बालाजी सोसायटी स्थित जेष्ठ नागरिक भवन येथे दुपारी ४ वाजता ``जेष्ठांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे '' या व्याख्यानाचा विषय आहे. सर्व प्रथम ८० वर्षाच्या वरील वृद्धांचा सत्कार करण्यात येईल. जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे रहाणीमान सुसह्यय व्हावे, आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, कुटुंबात मिळणार्‍या सोयी सुविधा, आयुर्वेद उपचार पद्धती, राहणीमान, सकस आहार, आरोग्याविषयक जागृती, शरीराबरोबर मनाचे आरोग्यासाठी अष्टांगयोग, प्राणायाम, मनाचे संतुलन ठेवण्यासाठी शिरोधारा, इ. विविध विषयाची आरोग्यविषयक माहिती या व्याख्यानातून सर्वांना मिळणार आहे. जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. बळवंत चिंतावार व सर्व जेष्ठ नागरिकांनी या व्याख्यानास उपस्थित राहावे असे आवाहन देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार (एम.डी.) यांनी केले आहे.


  • दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्ह्यामध्ये 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी' अभियानांतर्गत शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी लोहारा एमआयडीसीतील चिंतामणी या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे ‘दिव्यांग मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री संजय राठोड तर उद्घाटक म्हणून अभियानाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू उपस्थित राहणार आहे. सोबतच वक्फ बोर्डाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ.वजाहत मिर्झा, खा.भावना गवळी, खा.हेमंत पाटील, आ.ॲड निलय नाईक, आ.किरण सरनाईक, आ.धिरज लिंगाडे, आ.प्रा.डॅा.अशोक उईके, आ.मदन येरावार, आ.संजीवरेड्डी बोदकुरवार, आ.डॉ.संदिप सुर्वे, आ.नामदेव ससाणे, आ.इंद्रनिल नाईक, विभागीय आयुक्त डॉ.निधि पाण्डेय, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात सकाळी ९ वाजतापासून दिव्यांग नोंदणी आणि अर्ज भरले जाणार असून त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. या अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध कार्यालयाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. या अभियानामध्ये दिव्यांगांची आरोग्य तपासणी, समुपदेशन, सल्ला व मार्गदर्शन आणि विविध योजनांचे लाभ वाटप केले जाणार आहे. यात दिव्यांगांना युडीआयडी कार्ड नोंदणी, सेवायोजनाकरिता नोंदणी व कार्ड वाटप, राशनकार्ड पुरविणे, दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजना, महाशरद पोर्टल नोंदणी, विविध महामंडळाशी संबंधित व इतर दिव्यांगांच्या योजनांची माहिती, नोंदणी व लाभ देणे, दिव्यांगांना रोजगाराचे प्रशिक्षण, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, शिधावाटप पत्रिका, पॅनकार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले पुरविणे इत्यादी लाभ देण्यासाठी विभागनिहाय स्टॉल उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांनी https://forms.gle/WH3ZQjQxdBKfjiUE9 या लिंकवर भेट देवून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह उपस्थित राहून या अभियानाच्या माध्यमातून विविध योजना व आवश्यक प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


  • जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते १० लाखाच्या विमा रक्कमेचे वितरण अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी वित्तीय समावेशन योजनेंतर्गत भारतीय डाक विभाग आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यावतीने अपघात विमा योजना सुरु करण्यात आली आहे. केवळ ३९६ रुपयात १० लाखाचे सुरक्षा कवच योजनेने दिले आहे. या योजनेंतर्गत विमा घेतलेल्या आणि अपघाती निधन झालेल्या यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील चक्रधर मानकर यांच्या कुटुंबियास जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते १० लाखाचा धनादेश देण्यात आला. बजाज अलियांझ आणि टाटा एआयजीच्या सहकार्याने एक वर्षापूर्वी अपघात विमा योजना सुरु करण्यात आली. शहरी आणि ग्रामीण भागात विशेषतः असंघटीत क्षेत्रातील कामगार, शेतकरी, मजूर मोठ्या संख्येने योजनेत सहभाग घेत आहे. हा अपघात विमा अवघ्या ३९६ रुपयामध्ये सर्व पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विमाधारकाचा अपघातामुळे मृत्यू, पूर्ण अपंगत्व, अर्धांगवायू झाल्यास १० लाखापर्यंत क्लेम बहाल केला जातो. किरकोळ अपघातात दुखापत किंवा फ्रॅक्चर इत्यादी घटना घडल्यास ओपीडी तसेच आयपीडी उपचारासाठी देखील खर्च मिळतो. तसेच विमाधारकाच्या नातलगांना प्रवास खर्च, मुलांचा शिक्षण खर्च आणि मृत्यू पश्चात अंतिम संस्कारसाठी लागणारा खर्च देण्यात येतो. यवतमाळ तालुक्यातील बेलोरा येथील चक्रधर मानकर यांनी मागीलवर्षी हा विमा घेतलेला होता. विमा घेतल्यानंतर चालू वर्षात त्यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबातील वारसाला या अपघात विम्याचा १० लाखाचा क्लेम मंजूर करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते १० लाखाचा धनादेश श्री.मानकर यांची मुलगी दीक्षा मानकर यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, रिजर्व बँकेचे अग्रणी बँक प्रबंधक राजकुमार जयस्वाल, जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या यवतमाळ शाखेचे वरिष्ठ प्रबंधक चीत्रसेन बोदिले, प्रबंधक अमोल रंगारी, एक्झिक्युटिव्ह गजानन मालेकर उपस्थित होते.


  • केंद्रीय वस्त्रोद्योग अधिकाऱ्यांकडून अति सघन कापूस लागवड प्रकल्पांची पाहणी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    कापूस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी आयसीएआर, सीआयसीआर आणि केव्हीकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या अति सघन लागवड पद्धती प्रकल्पांतर्गत कळंब तालुक्यातील आमला आणि राळेगाव तालुक्यातील जळका, श्रीरामपूर येथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रक्षेत्र भेटी देवून पाहणी केली. कापसाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पीक उत्पादन वाढीसाठी अति सघन लागवड प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पामध्ये कमी क्षेत्रात झाडांची संख्या वाढून योग्यरित्या नियोजन करून पिकाच्या उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. हा प्रकल्प जिल्ह्यामध्ये यवतमाळ, राळेगाव, बाभूळगाव, कळंब आणि नेर तालुक्यामध्ये जवळपास ४६४ एकर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे. या भेटी दरम्यान केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव प्राजक्ता वर्मा, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, प्रमुख डॉ. ए. एस. तायडे, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे सीएमडी ललित कुमार गुप्ता, अकोला येथील भारतीय कापूस महामंडळाचे एजीएम नीरज कुमार, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. सुरेश यु. नेमाडे, शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण जी. आय, कळंब व राळेगाव तालुका कृषी अधिकारी सुहास भेंडे, अमोल जोशी, शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. पाटील, शास्त्रज्ञ राहुल चव्हाण, कावेरी सीड्स आणि रासी सीड्सचे प्रतिनिधी व कृषी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राळेगाव आणि कळंब समुहातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अति सघन कापूस लागवड पद्धत प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांना या प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली. अति सघन लागवड पद्धती भविष्याच्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे, असे मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केले.


  • कृषी सिंचन योजनेंतर्गत पाणलोट विकास घटक योजनेसाठी 143 कोटींचा निधी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र स्वयंसहाय्यता गटांना वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. मंत्री श्री.राठोड म्हणाले, राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेचे निधी प्रमाण केंद्र राज्य शासन अनुक्रमे 60 ल 40 टक्के असे असून, योजनेचे प्रकल्प मूल्य 1335.56 कोटी इतके आहे. हा प्रकल्प राज्यातील 30 जिल्ह्यांतील 102 तालुक्यातील 1603 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील एकूण 5,65,186 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेंतर्गत उपजीविका घटकांतर्गत प्रकल्प मूल्याच्या 15 टक्के निधीची तरतूद असून, उपजीविका हा घटक ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या यंत्रणेमार्फत त्यांच्या आर्थिक निकषानुसार राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून पात्र स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरणासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्याकडे 143 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. उपजीविका घटक अंतर्गत प्रत्येक पाणलोट प्रकल्पात फिरता निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना 30 हजार व प्रभाग संघामार्फत समुदाय गुंतवणूक निधी मिळण्यास पात्र स्वयं सहाय्यता गटांना 60 हजार याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रकल्प क्षेत्रात प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यामार्फत प्रभाग संघ व स्वयं सहाय्यता गटांना निधी वितरित करण्यात येणार असून पात्र स्वयं सहाय्यता गट व प्रभाग संघ यांना निधी पाणलोट समितीच्या शिफारशीने वितरित करण्यात येईल.


  • विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने कर्ज द्या - डॅा.पंकज आशिया अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्य लाभार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. या योजनेत शासन अनुदानासह बॅंकेच्या कर्जाचाही समावेश असतो. विभागांकडून लाभार्थ्यांचे प्रस्ताव बॅंकांना पाठविल्यानंतर बॅंकांनी ते प्रस्ताव मंजूर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिले. महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हास्तरीय बॅंकर्स समितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, रिजर्व बॅंकेचे अग्रणी बॅंक प्रबंधक राजकुमार जयस्वाल, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दिपक पेंदाम, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, सामाजिक न्यायचे सहाय्यक आयुक्त नानासाहेब चव्हाण, जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये, माविमचे जिल्हा समन्वयक रंजन वानखडे यांच्यासह विविध विभाग व बॅंकाचे जिल्हा समन्वयक अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पिककर्जासह विविध योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जांचा विभाग व बॅंकनिहाय आढावा घेतला. खरीप हंगामात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पिककर्जवाटपाचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 88 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 936 कोटी रुपयांच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ज्या बॅंकांचे कर्ज वाटपाचे प्रमाण अद्यापही कमी आहे, त्यांनी येत्या आठवड्यात वाटपाचे प्रमाण वाढविण्याने निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. केंद्र व राज्य शासनाच्यावतीने सर्वसामान्यांना उद्योग, व्यवसायासह स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या योजना विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येतात. या योजनांवर लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. पिककर्जासोबतच या योजनांच्या लाभार्थ्यांना प्राधान्याने कर्जवाटप करण्यात यावे. शासनाच्यावतीने विभागांना उद्दिष्ट दिले जाते. या उद्दिष्टांची पुर्तता केली जावी. यासाठी संबंधित विभागांनी देखील बॅंकांकडे पाठपुरावा करावा, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. केंद्र शासनाच्यावतीने विविध सुरक्षा विमा योजना सुरु करण्यात आल्या आहे. बॅंकांनी आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ दिला पाहिजे. यासाठी आवश्यक्ता भासल्यास बॅंकस्तरावर विशेष शिबिरे घेतले जावे. कर्ज प्रकरणात लाभार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींवर सात दिवसांच्या आत कारवाई करण्याचे निर्देश देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पिककर्ज, मुख्यमंत्री व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, माविम, कर्जमुक्ती योजना व व्याज सवलत योजना, मुद्रा योजनेसह विविध विभागांच्यावतीने लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्ज प्रकरणांचा आढावा घेतला. सुरुवातीस जिल्हा अग्रणी प्रबंधक अमर गजभिये यांनी बॅंकर्स समितीच्या कामकाजाची माहिती सादर केली.


  • सोयाबीन पिकाची शास्त्रज्ञ व कृषि विभागाकडून संयुक्त पाहणी शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन केले मार्गदर्शन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगांच्या प्रादुर्भावाची अमरावती येथील प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्राचे पथक आणि कृषी विभागाने सोमवारी संयुक्त पाहणी केली. यावेळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन निरीक्षण व मार्गदर्शन केले. या पथकात डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अधिनस्त प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावती येथील डॉ. वर्षा टापरे, डॉ.निचळ, डॉ. मुंजे, डॉ. घावडे, डॉ. दांडगे तसेच सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, डॉ.विपुल वाघ, डॉ.वसुले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांचा समावेश होता. यवतमाळ तालुक्यातील हिवरी व खरोला, आर्णी तालुक्यातील जवळा, महागाव तालुक्यातील दहीसावाळी व आंबोडा तसेच उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी व सुकळी येथील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतास भेट देऊन निरीक्षण केले. ऑगस्ट महिन्यात पावसात पडलेला खंड, वाढलेले तापमान, अन्नद्रव्याची कमतरता, त्यानंतर सततचा पाऊस अशा विविध कारणांमुळे सोयाबीन पिकावरील खोडमाशी, चक्रीभुंगा आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव, चारकोल रॉट व मुळकुज तसेच पिवळा मोझॅकचा उद्रेक याबाबत सखोल तांत्रिक निरीक्षणे नोंदविली व सध्याच्या परिस्थितीत ज्या शेतामध्ये शेंगा भरण्याचे अवस्थेत आहे, अशा ठिकाणच्या सोयाबीनवर ट्याबुकोनाझोल 10 टक्के अधिक सल्फर ६३ टक्के ३ ग्रॅम प्रती लिटर पाण्यात फवारणी करावी, असे उपाययोजनेबाबत मार्गदर्शन केले. तसेच सोयाबीन पिक काढणीनंतर रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांना हरभरा पिक घ्यायचे आहे, त्यांनी ट्रायकोडर्मा पावडर प्रती एकरी २ किलो प्रमाणे सेंद्रीय खतात मिसळून शेतामध्ये पसरवावे. त्यासोबतच प्रती किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.


  • यवतमाळ आयटीआयचे दोन प्रशिक्षणार्थी देशात पहिले अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रशिक्षणार्थीं साठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. या परीक्षेचे निकाल घोषित झाले असून वायरमन व्यवसायात यवतमाळ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भुमिका पडयाळ हिने मुलींमधून आणि अभिमन्यु उचाडे याने मुलांमधून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांनी दिली. डिजीटी नवी दिल्लीअंतर्गत एनसीव्हीटीद्वारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रशिक्षणार्थीसाठी देशात अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा जुलै महिन्यात घेण्यात आलेली होती. औद्योगिक प्रशिक्षण संस्था दरवर्षी नवीन विक्रम प्रस्थापित करीत आहे. या संस्थेची प्रवेश क्षमता ६८० असून यावर्षी शंभर टक्के प्रवेश पूर्ण झालेले आहे. जुलै महिन्यात झालेल्या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर १५ मेरीट मुलापैकी १० मेरीट या संस्थेतील आहेत. या यशामध्ये संस्थेतील शिल्प निदेशक आर आर डोमाळे, इतर सर्व कर्मचारी व प्राचार्य व्ही. जे. नागोरे यांचे विशेष योगदान लाभले असून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या या यशाबद्दल जिल्ह्यात सर्वत्र कौतूक होत आहे.


  • जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा संपन्न अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची आज जिल्हाधिकारी तथा परिषदेचे अध्यक्ष डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी मागील सभेतील ग्राहकांच्या तक्रारींचा आढावा घेतला व त्या लवकरात लवकर निकाली काढून त्याचा कार्यवाही अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या तसेच आज झालेल्या सभेतील तक्रारी प्राप्त झाल्यापासून सात दिवसात निकाली काढाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात ही बैठक झाली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे, जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, अन्न औषध प्रशासन, महावितरण, पाटबंधारे आदी विभागाचे अधिकारी तसेच समितीमधील अशासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे, ॲङ राजेश पोहरे, शेखर बंड, प्रमोदकुमार बाजोरीया, बिरेद्र चौबे, कैलासचंद्र वर्मा, संतोष डोमाळे, प्रकाश बुटले आदी उपस्थित होते. यावेळी, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवरील शासकीय सदस्य डॉ. नारायण मेहरे यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करुन मास विक्रीची दुकाने सुरु करण्यात आली. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुक प्रभावित होते व अनेकवेळा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. प्रा. केशव चटुले यांनी जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपावर हवा, प्रसाधनगृह आणि इतर सुविधा नाहीत, त्या उपलब्ध करुन द्याव्यात. पुसद येथील छत्रपती शिवाजी चौक ते श्रीरामपुर रोडवरील अतिक्रमणामुळे अपघात होत आहेत. त्याविषयी वाहतुक पोलीस व नगरपरिषद प्रशासनाने कार्यवाही करावी. ऐन सणासुदीच्या काळात मिठाई व खाद्य पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असून त्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. पुसद येथील मार्टमध्ये तळलेले खाद्य पदार्थ स्वत:चे लेबल लावून विकले जात असून त्यांची तपासणी करावी. जिल्ह्यातील ट्रक, ट्रॅक्टर आणि चारचाकी वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर लावण्याबाबत मोहिम राबवावी. महागाव तालुक्यातील सवना येथील विठ्ठल रुख्म‍िणी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनींना सवलतीने पास प्रवेश देणे व त्यासाठी पर्यायी बस उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सदस्य संतोष डोमाळे यांनी शहरातील दत्त चौक ते आठवडी बाजार परिसरात फळ व भाजी विक्रेत्यांच्या रस्त्यावरील दुतर्फा दुकांनामुळे वाहतूक अडथळा निर्माण होत आहे. त्यांना भाजी मार्केटमधील कायमस्वरुपी निश्चित ठिकाण देवून वाहतुकीचा अडथळा दुर करावा, असे सांगितले . सदस्य डॉ. के. एस. वर्मा यांनी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना अडतदारांकडून कापसाच्या धान्यांच्या खरेदीतील चुकाऱ्याची कच्ची पावती दिली जाते ती पक्की सुस्पष्ट संगणकीकृत पावती द्यावी. पन्नास हजारावरील नगदी चुकारे रोखून ते चेकद्वारे द्यावे. शेतकरी ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याबाबत कार्यवाही करावी. यवतमाळ ते दारव्हा रोडवरील बोरीअरब येथे अपघात होत असून या रस्त्यावर सौर ऊर्जेवरील पथदिवे बसवण्यात यावे. तसेच बोरीअरबमध्ये वारंवार विज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी असून येथील विद्युत पुरवठा तपोना उपकेंद्राला जोडल्यास सुरळीत विज पुरवठा होण्यास मदत होईल असे सांगितले. सदस्य प्रकाश बुटले यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेले नाही ते लवकरात लवकर व्हावे. ई पीक पोर्टलबाबत शेतकऱ्यांना अडचणी येत आहे त्या सोडवाव्यात. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबियांना तात्काळ मदत मिळावी. आर्णी तालुक्यातील कोसदणी घाटात दरड कोसळण्याच्या घटनेबाबत उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली. भूमी अभिलेख विभागाच्या ई मोजणी बाबत जनजागृती व्हावी. यवतमाळ शहरातील पाणी पुरवठ्याचे नियोजनाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून नागरिकांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सदस्यांच्या तक्रारींवर सविस्तर चर्चा केली. या तक्रारी प्राप्त झाल्यापासून सात दिवसात निकाली काढाव्यात आणि कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.


  • शरीर स्वच्छता अभियान अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    महात्मा गांधी जयंती निमित्त देवि सामका महिला बहुउद्देशिय द्वारा संचालित सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे शरीर स्वच्छता अभियान याची सुरूवात करण्यात येणार आहे. डिटॉक्स थेरपी द्वारे शरीरातील शुद्धी करण्यात येणार आहे. डिटॉक्स थेरपी मुळे रक्तातील साखरेचं प्रमण नियंत्रणात राहते, रक्तातील हिमोग्लोबीन योग्य प्रमाणात राहत, पोट नियमीत साफ होत, उत्तम झोप लागते, दिवसभर प्रसन्न व कार्यक्षम राहत. अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होते. आपल्या शरीरातील यकृत मूत्रपिंड आणि आतडे यांच डिटॉक्सीफिकेशनच काम आहे.पण काही कारणामुळे ते व्यवस्थीत होत नाही.परिणामी व्यक्ती आजारीपडतो व त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी डि़टॉक्स थेरपी अत्यंत आवश्यक असते. व सोबतच घरीच शरीरातील स्वच्छता करण्यासाठी योग्य मार्गदर्शनही या शिबिरातमिळणार आहे. जसे तुळस, पुजीना, आल, िंबू यांचा रोडच्या आहारात जरूर वापर करावा त्यांचा रस पाळीपिन शरीरासाठी उत्तम आहे. या घरातील नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन करणार्‍या पदार्थांमुळे पोटाचं संतुलन राखल जात. अशाअनेक बाबी या शिबिरामध्ये सांगण्यात येईल तरी या शिबिरामध्ये जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन देवि सामका महिला बहु उद्देशिय संस्थेचे अध्यक्ष वैद्य पंकज पवार (एम.डी.) यांनी केले आहे.


  • अमृत कलश यात्रा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    ग्रामपंचायत धनज,,,,उमरखेड अमृत कलश यात्रा


  • घारफळ येथे अमृत कलश यात्रा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमामध्ये २१ सप्टेंबर रोजी घारफळ ग्राम पंचायतीच्या वतीने अमृत कलश यात्रा काढण्यात आली. एक अमृत कलाश तयार करण्यात आला व ज्यांच्याकडे शेती आहे अश शेतकऱ्यांनी मुठभर माती व ज्यांच्याकडे शेती नाही अशांनी घरामध्ये असलेले चिमुटभर धान्य रुपात तांदुळ त्यामध्ये टाकले. यात्रा परिक्रमामध्ये प्रत्येक कुटूंबाकडून माती तांदुळ अमृत कलशामध्ये टाकण्यात आली. यात्रा परीक्रमाच्या वेळी मिट्टी गान व पंचप्राण प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर घारफळ ग्राम अमृत कलश गटविकास अधिकारी पंचायत समिती बाभुळगाव कार्यालयामध्ये जमा करण्यात आला. या अमृत कलश यात्रेकरीता सरपंच चित्रा नाखले, उपसरपंच हेमंत कडू, ग्रा. पं. सदस्य प्रशांत इंगळे, प्रशांत केळकर, सोनाली धुर्वे, पदमाकर लोखंडे, बेबीनंदा धार्मिक, संगिता वैद्य, ग्राविअ अतुल राठोड, राजेश बुरे, सुनील कोटजावरे, किशोर कोडे, मुख्याध्यापक शेख रमजान, मनोज येंडे, योगेश वानखडे, संजय जिचकार यांनी परिश्रम घेतले.


  • धुंदी येथे अमृत कलश यात्रा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    पुसद " पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धुंदी येथे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद केंद्र शाळा, विद्यालय, अंगणवाडी व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ' अमृत कलश' यात्रा कार्यक्रमाचे २२ सप्टेंबर रोजी संपन्न झाला या कार्यक्रमांतर्गत गावात स्वच्छता ही सेवा व पोषण आहार सप्ताह उपक्रम राबविण्यात Yavatmal आला. बॅण्ड पथकाच्या गजरात जिल्हा परिषद शाळा ते ग्रामपंचायत प्रांगणापर्यंत मागनि अमृत कलश यात्रा फेरी काढली. तसेच शेतकरी कुटुंबाकडून मातीचे संकलन करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी सोनटक्के, विस्तार अधिकारी पिपळे, विस्तार अधिकारी डाखोरे, विस्तार अधिकारी चव्हाण, पंचायत समितीचे कृषी अधिकारी शंकर राठोड धुंदी ग्रामपंचायत सचिव चव्हाण, यांच्यासह ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य मोठ्या संख्येने गावातील नागरिक महिला शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.


  • चिखलवर्धा ग्रा.पं.च्या पुढाकारात अमृत कलश यात्रा अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश या उपक्रमात घाटंजी तालुक्यातील | चिखलवधी ग्राम पंचायतीच्या पुढाकारात दिनांक २१ सप्टेंबर रोज गुरुवारला गावातील | शेतकरी, शाळेतील विद्याथी यांच्या रॅलीने मोठ्या | उत्साहात चिखलवधी गावाची कलश काढण्यासाठी | वाजत गाजत गावातून यात्रा काढण्यात आली. केंद्र सरकार स्तरावरून राबविण्यात येणाऱ्या उपकमाची अमलबजावणी करण्याच्या | दृष्टीकोनातून चिखलवधी ग्राम पंचायतचे सरपंच आकाश नडपेलवार यांच्या पुढाकारात स्थानिक जिल्हा परिषद शाळा, उर्दू शाळा व गावातील | शेतकरी, शिक्षक व मान्यवर मंडळी यांचा सहभाग | घेवून मेरी माटी मेरा देश हा उपक्रम राबविण्यात | आला गावाचा कलश बनविण्यासाठी चिमुटभर | याप्रमाणे मातीचे संकलन करण्यात आले. ज्यांचेकडे माती नाही अश्या कडून चिमुटभर तांदूळ घेवून मातीच्या कलशात जमा करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ग्राम पंचायत स्तरावरून एक कलश तयार करण्यात आले असून यातून उरलेल्या मातीचा उपयोग गावस्तरावर अमृतवाटिका करिता करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कलशासाठी लागणारे साहित्य गोळा करताना वाद्ये वाजवून उत्साहवर्धक वातावरण निर्माण करण्यात आले होते. त्यामुळे सर्वामध्ये आनंद संचारला होता... या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच आकाश नडपेलवार, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य जैतूजी मेश्राम, ग्रामसेवक प्रभुदास भगत, घाटंजी पं.स.चे शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर वांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती तर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आशिष पवार, पवन राठोड, ताराचंद लालानी, कल्पना केराम, उर्दू शाळेचे शमीम बानो, सितारा, फरोग खान, मोहसीन चव्हाण, आशाताई सेविका निताताई कनाके, जयश्री कनाके अंगणवाडी सेविका वर्षा कुडमथे, कल्पना कुलसंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे विलास नेवारे, अबरार पटेल, विठ्ठल केलझरकर रोजगार सेवक रमेश कुमरे यांनी उपस्थिती दर्शवून अथक परिश्रम घेतले. असे एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे सरपंच आकाश नडपेलवार यांनी कळविले आहे.


  • जिल्ह्यातील 2 लाख घरातून झाले माती, तांदुळचे संकलन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    जिल्ह्यात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानाचा दुसरा टप्पा मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रत्येक गावात ‘अमृत कलश यात्रा’ काढली जात आहे. या यात्रेदरम्यान माती व जमीन नसलेल्या कुटुंबांकडून तांदुळचे संकलन केले जात आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 5 हजार कुटुंबांकडून माती, तांदुळचे संकलन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी आयोजित या यात्रेत तब्बल 1 लाख 17 हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यात दि.30 सप्टेंबर पर्यंत प्रत्येक गावात ग्रामपंचायतींच्यावतीने अमृत कलश यात्रा काढण्यात येत आहे. वाजतगाजत काढण्यात येत असलेल्या या यात्रेत स्थानिक लोकप्रतिनिधींसह गावकरी, विद्यार्थी, महिला, बचतगट, आशाताई, अंगणवाडी सेविका यांच्यासह स्थानिक भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक गावात अमृत कलश यात्रा काढून कलशात मातीचे संकलन करावयाचे आहे. ज्या कुटुंबाकडे जमीन नाही अशा कुटुंबाकडून मातीच्या कलशात चिमुटभर तांदुळ घेतले जात आहे. ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आयोजित या यात्रा आतापर्यंत जिल्ह्यातील 923 गावांमध्ये काढण्यात आल्या आहे. या यात्रेमध्ये जिल्हाभर ठिकठिकाणी 1 लाख 17 हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. जिल्ह्यात 4 लाख 27 हजार कुटुंब संख्या आहे. ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या 923 यात्रेमध्ये एकून कुटुंबांपैकी 2 लाख 5 हजार 283 कुटुंबातून माती किंवा तांदुळचे संकलन करण्यात आले आहे. त्यात आर्णी तालुक्यातील 53 गावांमधून 14 हजार 650 कुटुंब, बाभुळगाव तालुका 62 गावातील 7 हजार 890 कुटुंब, दारव्हा 58 गावे 5 हजार 890 कुटुंब, दिग्रस 42 गावे 11 हजार 510 कुटुंब, घाटंजी 47 गावे 14 हजार 380 कुटुंब, कळंब 102 गावे 13 हजार 973 कुटुंब, केळापूर 51 गावे 15 हजार 670 कुटुंबांचा समावेश आहे. महागाव तालुक्यातील 66 गावांमधून 14 हजार 460 कुटुंबांकडून संकलन करण्यात आले. मारेगाव तालुका 32 गावे 10 हजार 230 कुटुंब, नेर 76 गावे 15 हजार 460 कुटुंब, पुसद 72 गावे 25 हजार 780 कुटुंब, राळेगाव 63 गावे 13 हजार 768 कुटुंब, उमरखेड 58 गावे 15 हजार 450 कुटुंब, वणी 35 गावे 13 हजार 155 कुटुंब, यवतमाळ 71 गावे 9 हजार 567 कुटुंब तर झरी जामणी तालुक्यातील 35 गावांमधून 3 हजार 450 कुटुंबांकडून माती, तांदुळचे कलशामध्ये संकलन करण्यात आले आहे. उर्वरीत गावांमध्ये दि.30 सप्टेंबरच्या आत कलश यात्रा पुर्ण करून मातीचे संकलन केले जाणार आहे. गावातून जमा झालेल्या मातीचा कलश तालुकास्तरावर जमा केले जाणार आहे. तालुक्यातील कलश जिल्हास्तरावर पोहोचविले जाणार असून त्यानंतर हे कलश मुंबई व तेथून दिल्लीला जाणार आहे. प्रत्येक तालुक्यातून दोन स्वयंसेवकांची यासाठी निवड करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक कलश मुंबईला घेऊन जाणार आहे. दिल्ली येथे साकारल्या जाणाऱ्या अमृत कलशासाठी ही माती वापरली जाणार आहे. गावांमध्ये काढल्या जाणाऱ्या या अमृत कलश यात्रेत गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


  • कृषी विद्यापीठाद्वारे तीन दिवसीय शिवार फेरी अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापन दिनाचे औचित्य साधून अकोल्यातील मुख्यालय येथे यावर्षी दि. २९ ते १ ऑक्टोबर २०२३ या तीन दिवसीय कालावधीत विद्यापीठ शिवार फेरी आयोजित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विद्यापीठाद्वारे या शिवार फेरी आणि थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी शिवार फेरीचे जिल्हानिहाय कार्यक्रम ठरविण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवार दि. २९ सप्टेंबर रोजी अकोला, वाशीम, बुलढाणा व अमरावती शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर शनिवार दि ३० सप्टेंबर रोजी वर्धा, यवतमाळ, गडचिरोली व गडचिरोली, रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये ही शिवार फेरी होणार आहे. या शिवार फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची दि. २९, ३० सप्टेंबर व दि. १ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत अकोला येथील विद्यापीठ क्रीडांगणासमोरील शेतकरी सदन येथे प्रत्येकी २० रुपये शुल्क भरून नोंदणी करण्यात येईल. या शेतकरी, संशोधन, धोरणकर्ते आणि उद्योग भागधारकांना ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी अत्याधुनिक कृषी पद्धतींबद्दल जाणून घेणे आणि शाश्वत व पर्यावरणास अनुकूल पद्धतींची खात्री करून पिक उत्पादकता वाढवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या शिवार फेरी तसेच थेट पिक प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या तीन दिवसीय शिवार फेरीमध्ये वैशिष्ट्य पूर्ण बाबींचा समावेश असणार आहे. यामध्ये कडधान्य, कापूस, सोयाबीन, भाजीपाला, फळपिके, फुलपिके, चार पिके, धान पिके आणि त्यांचे तंत्रज्ञान इत्यादी अशा २२० प्रगत खरीप पिक उत्पादन तंत्रांचे २० एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी थेट प्रात्यक्षिके होणार आहेत. १६ खाजगी कृषी निविष्ठा कंपन्यांची थेट प्रात्यक्षिके होणार आहेत. विद्यापिठाच्या विविध संशोधन विभागांचे ११०० हेक्टर क्षेत्र, शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तीन दिवसामध्ये राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित आहे. प्रदेशातील कृषी क्षेत्रा समोरील आव्हाने आणि संधी यावर चर्चासत्र होईल. शेतकऱ्यांनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होवून लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक, विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी केले आहे. तसेच दि. ३० सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या शिवार फेरीमध्ये सहभागी होवून शिवार फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. सुरेश ऊ. नेमाडे यांनी केली आहे.


  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे विश्वकर्मा जयंतीदिनी संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वाटपाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डी.पी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड येथील गावंडे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. एस. आर. वद्राबाद, समर्थ फैब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल रामेश्वर बिच्चेदार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश जी. शिंदे, पालक प्रतिनिधी संजय शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिक आणि फिटर या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तसेच वेल्डर, डिझेल मेकॅनिक, पत्रे कारागीर, ड्रेस मेकिंग व बेसिक कॉस्मेटोलॉजी या एक वर्षीय व्यवसायामधील जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व प्रथम, द्वित्तीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बोर्ड प्रमाणपत्राचे वितरण हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार यांनी मार्गदर्शन करतांना आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले. रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यानी आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाज आणि देशाच्या विकासाचे मुख्य आधारस्तंभ बनून भविष्य उज्वल बनवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेतील उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले


  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव* अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे विश्वकर्मा जयंतीदिनी संस्थेमधून प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव व प्रमाणपत्र वाटपाचा दीक्षांत समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डी.पी. पवार यांच्या अध्यक्षतेखाली उमरखेड येथील गावंडे कॉलेजचे प्राध्यापक डॉ. एस. आर. वद्राबाद, समर्थ फैब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल रामेश्वर बिच्चेदार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश जी. शिंदे, पालक प्रतिनिधी संजय शिरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील इलेक्ट्रिशियन, वायरमन, मोटर मेकॅनिक आणि फिटर या दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तसेच वेल्डर, डिझेल मेकॅनिक, पत्रे कारागीर, ड्रेस मेकिंग व बेसिक कॉस्मेटोलॉजी या एक वर्षीय व्यवसायामधील जुलै 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या व प्रथम, द्वित्तीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व बोर्ड प्रमाणपत्राचे वितरण हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संस्थेचे प्राचार्य डी. पी. पवार यांनी मार्गदर्शन करतांना आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमाचे महत्त्व सांगितले. रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या विविध संधीच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यानी आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या, कुटुंबाच्या व समाज आणि देशाच्या विकासाचे मुख्य आधारस्तंभ बनून भविष्य उज्वल बनवण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कुमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यवंशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेतील उत्तीर्ण सर्व प्रशिक्षणार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


  • एकरी शंभर टन उस उत्पादनासाठी पंचसुत्रीचा अवलंब करा - कृषिरत्न डॉ.संजिवदादा माने अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    एकरी शंभर टन उसाचे उत्पादन या विषयावर मार्गदर्शन करतांना कृषिरत्न डॅा. संजिवदादा माने यांनी सांगितले की, एकरी शंभर टन उसाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पंचसुत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे. यामध्ये सुरुवातीला जमीन सुपिक करणे, उस लागवणीची योग्य पद्धत वापरणे, रासायनिक खतांचा योग्य मात्रेत वापर करणे, पाण्याचे व्यवस्थापन करणे आणि रोगराई, किडींपासून पीकांचे संरक्षण करणे या पाच मुद्द्याच्या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास नक्कीच उसाच्या उत्पादन वाढ होईल, असे डॅा. माने यांनी यावेळी सांगितले. यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विविध योजनेतील लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय कृषि सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले तर आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे यांनी आभार मानले. कार्यक्रमात कारखानाविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यानुसार : >जय किसान साखर कारखाना नाव कायम राहणार आहे. > पारंपरिक पिकासोबत नगदी पीक घेण्यास प्रोत्साहन मिळणार > उसाला चांगला भाव मिळण्यास मदत होणार > नवीन तंत्रज्ञानाचा वापर होणार > साखरेसह इथेनॅाल आणि वीज निर्मितीस चालना > उस लागवडीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार > सुरुवातीला बियाणे, खते एसएस इंजिनिअर्स, पुणे ही कंपनी देणार > पाच हजार टन उसावर प्रक्रिया होणार > विज, पाणी उपलब्धतेसाठी शासन सहकार्य करणार


  • दिव्यांगांनी अभियानाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन अंमलबजावणी

    जिल्हा परिषद यवतमाळ


    दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत दि.29 सप्टेंबर रोजी चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती या एमआयडीसी लोहारा येथील खाजगी बाजार समितीमध्ये भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी ऑनलाईन नोंदणी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरात दिव्यांगांना विविध कार्यालयाकडील योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. सदर अभियानामध्ये दिव्यांगांना युडीआयडी कार्ड नोंदणी, सेवायोजन करिता नोंदणी व कार्ड वाटप. राशनकार्ड पुरविणे, दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, वैयक्तीक थेट कर्ज योजना, महाशरद पोर्टल नोंदणी व इतर दिव्यांगांच्या योजनांची माहिती तसेच लाभ देण्यात येणार आहे. विविध महामंडळाशी संबंधित योजनांची माहिती, लाभार्थी नोंदणी व लाभ देणे, दिव्यांगांना रोजगाराचे अनुषंगाने प्रशिक्षण देणे, मतदार नोंदणी, संजय गांधी निराधार योजना, आधार कार्ड, जाती प्रमाणपत्र, शिधावाटप पत्रिका, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र व इतर दाखले पुरविणे इत्यादी लाभ देण्याकरीता विभागनिहाय स्टॉल उभारण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना यासाठी https://forms.gle/WH3ZQjQxdBKfjiUE9 या लिंकवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी आवश्यक मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहून सदर अभियानाच्या अनुषंगाने विविध योजना तसेच आवश्यक प्रमाणपत्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.


1 2