या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- चळवळी व लढे स्वातंत्र्यचळवळ
- मैलाचे टप्पे - स्वातंत्र्यलढ्यातील महत्वपूर्ण टप्पे
- अज्ञात नायक स्वातंत्र्यलढ्यातील अज्ञात वीरांची गाथा
- कल्पना - स्वातंत्र्य चळवळीमागील प्रेरणा

भारताचा स्वातंत्र्यसंग्राम या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

21
Aug 23
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर - सायकल रॅली

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या वतीने आज "मेरी माटी मेरा देश" अभियाना अंतर्गत पोलीस आयुक्तालय हद्दीत शहरातून सायकल रॅली काढण्यात आली.

अधिक माहिती...
15
Aug 23
दिनांक 15 ऑगस्ट रोजी, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला

दिनांक 15 ऑगस्ट रोजी, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला

अधिक माहिती...
15
Aug 23
पथ संचलन (रुट मार्च )

पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांच्या वतीने आज "मेरी माटी मेरा देश" अभियाना अंतर्गत पोलीस आयुक्तालय हद्दीत पथ संचलन (रुट मार्च ) करण्यात आला.

अधिक माहिती...
15
Aug 23
ध्वजारोहणाचा कार्यक्रम

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मा.डॉ.श्री. राजेंद्र माने सो यांच्या हस्ते व वरिष्ठ पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालयीन कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

अधिक माहिती...
13
Aug 23
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे "आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान तर्फे सायकल रॅली चे आयोजन

दिनांक 13/08/2023 रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे "आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला व बाल सुरक्षा अभियान, सायबर सुरक्षा जनजागृती अभियान, अमली पदार्थ विरोधी अभियान, जातीय सलोखा राखण्यासंबंधीचे संदेश अशा विविध उपक्रमांचे सालोख्य राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय अमरावती शहर तर्फे अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सहकार्याने काढण्यात आलेल्या सदभावना सायकल रॅलीला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद. सदर आयोजित कार्यक्रमांमध्ये मा. श्री. अनिल बोंडे, राज्यसभा, खासदार, मा.श्रीमती सुलभा खोडके, आमदार, अमरावती, मा. श्रीमती निधी पांडेय, विभागीय आयुक्त,अमरावती, मा. श्री. जयंत नाईकनवरे, पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र, मा.श्री नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त, अमरावती, मा.श्री. सौरभ कटियार, जिल्हाधिकारी,अमरावती, मा. श्री. राकेश कलासागर, रा.रा.पो.गट क्र. 9, समादेशक अमरावती, मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, अमरावती, पोलीस उपायुक्त मा. श्री. सागर पाटील, पोलीस उपायुक्त मा. श्री. विक्रम साळी, तसेच पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

अधिक माहिती...
13
Aug 23
अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे "आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान व सायकल रॅलीला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिनांक 13/08/2023 रोजी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातर्फे "आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी माटी मेरा देश अभियान व अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महिला व बाल सुरक्षा अभियान, सायबर सुरक्षा जनजागृती अभियान, अमली पदार्थ विरोधी अभियान, जातीय सलोखा राखण्यासंबंधीचे संदेश अशा विविध उपक्रमांचे सालोख्य राखण्यासाठी पोलीस आयुक्तालय अमरावती शहर तर्फे अमरावती सायकलिंग असोसिएशनचे सहकार्याने काढण्यात आलेल्या सदभावना सायकल रॅलीला नागरिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

अधिक माहिती...
11
Aug 23
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यशाळेचे आयोजन.

मा. श्री. नवीनचंद्र रेड्डी, पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यशाळेचे आयोजन केले.

अधिक माहिती...
9
Aug 23
पंचप्राण शपथग्रहण

आज रोजी पोलीस ठाणे बेंबळी ता जि उस्मानाबाद येथे भारत सरकारचे उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ पोलीस ठाणे येथे दि.09/08/2023 रोजी सकाळी 10.00 वा पोलीस ठाणेचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी शपथ घेतली आहे.

अधिक माहिती...
9
Aug 23
"मेरी माटी, मेरा देश" या उपक्रमाचे अनुषंगाने शपथविधी

मा. पोलीस आयुक्त श्री. नवीनचंद्र रेड्डी यांचे प्रमुख उपस्थितीत पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर येथे आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत येणाऱ्या "मेरी माटी, मेरा देश" या उपक्रमाचे अनुषंगाने शपथविधी संपन्न.

अधिक माहिती...
1
May 23
1 मे महाराष्ट्र स्थापना दिवस

महाराष्ट्र स्थापना दिवस

अधिक माहिती...
21
Dec 22
स्वराज्य महोत्सव’: उत्साहात करा साजरा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सव’ राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून त्यात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व ‘स्वराज्य महोत्सव’ उत्साहात साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. भारतीय स्वतंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात राहावी त्यांचे स्मरण व्हावे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव निमित्त जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा घेवून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण करणे, अनामवीर स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांची दुर्मिळ छायाचित्रे व त्यांच्या कार्याची माहिती गावात देणे, स्वातंत्र्यकालीन माहिती, ऐतिहासिक ठिकाणांची माहिती संकलित करणे याशिवाय स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांचे प्रभात फेरी तसेच शालेय महाविद्यालय स्तरावर निबंध वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा घेण्यात येतील. जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणी पदयात्रा काढण्यात येईल. याच महोत्सवाचा एक भाग म्हणून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येईल तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. जिल्ह्यातील पुरातत्त्वदृष्ट्या महत्त्वाच्या वारसा स्थळांच्या स्वच्छतेसाठी मोहीम राबविण्यात येईल. जिल्ह्याच्या मुख्यालयात उंच राष्ट्रध्वज उभारणे, संविधान स्तंभाची उभारणी, शासनमान्य लामन दिवा लावणे आदी उपक्रम राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली विविध उपक्रम राबविण्यात येतील त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेष सभा शासकीय कार्यालयामध्ये वृक्षारोपण मिळून विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम होतील, यासंदर्भात नुकतेच निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सर्व कार्यालय प्रमुखांना निर्देशीत करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
25
Nov 22
ड्राॅइंग कोलाज मेकिंग स्पर्धा

जागतिक वारसा सप्ताह व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त संग्रहालाय, नागपुर व अभिरुचि फाऊंडेशन यांच्या सयुक्त विध्यमाने ड्राॅइंग कोलाज मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.

अधिक माहिती...
22
Nov 22
प्रागैतिहासिक कालीन दगडी हत्यारे बनविण्याचे प्रात्यक्षिक

जागतिक वारसा सप्ताह व स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त प्रागैतिहासिक कालीन दगडी हत्यारे बनविण्याचे प्रात्यक्षिक श्री. आशुतोष बनसोडे यांचाद्वारे सादर करण्यात आले.

अधिक माहिती...
8
Oct 22
azadi ka amrit mohotsav gramapanchay waluj

azadi ka amrit mohotsav gramapanchay waluj

अधिक माहिती...
29
Sep 22
सैनिकांच्या कार्यातून प्रेरणा घेत देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प करा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे युवकांना आवाहन सर्जीकल स्ट्राईक वर्धापन दिन व माजी सैनिक मेळावा संपन्न

देशाचे सैनिक हे कठीन भौगोलीक क्षेत्रात व विपरीत परिस्थितीत देखील आपल्या शिस्तीच्या बळावर व देशासाठी त्यागाच्या भावनेतून आपले रक्षण करत असतात, त्यामुळे आपण आपले काम शांततेने करत असतो. त्यांच्यामुळे देशाला लाभलेल्या शांतता व सुरक्षेच्या वातावरणात देश विकासाकडे अग्रेसर आहे. आज शौर्य दिनानिमित्त सैनिकांचे देशाच्या विकासात असलेल्या योगदानाबाबत कृतज्ञता व्यक्त करून व त्याचेपासून प्रेरणा व स्फुर्ती घेवून देशाला महासत्ता बनविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा वर्धापन दिन शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शौर्य दिन व माजी सैनिक मेळाव्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज शासकीय तंत्रनिकेतनच्या श्रोतृगृहात घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कवाली, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, कॅप्टन दिनेश तत्ववादी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. सैनिकांच्या कल्याणाकरिता त्यांचे परिवारासाठी घरकुल योजना, जमीन वाटप, प्रवास सवलत, रोजगार, पाल्याचे शिक्षण आदि बाबीमध्ये विविध शासकीय निधीतून मदत करण्यात व सैनिकांना सहकार्य करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्ह्यात सुजान समाज घडावा व तरूणांमध्ये शिस्त राहावी यासाठी सैनिकांच्या प्रेरणादायी शौर्यगाथा विद्यार्थ्यांपुढे ठेवण्याचे काम प्रशासनातर्फे करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ज्या देशाच्या सीमा सुरक्षीत असतात तेच देश प्रगती करतात असे सांगून देशाची सुरक्षा सांभाळणाऱ्या सैनिकांसोबत आय.ए.एस. प्रशिक्षणादरम्यान सिमेवर व्यतीत केलेल्या आठवणी सांगितल्या. युवा विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या पराक्रमाच्या गोष्टींचे वाचन करावे व त्यातून प्रेरणा घेत देशाच्या प्रगतीत सहभाग नोंदविण्याचे सांगितले. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ललीलकुमार वऱ्हाडे यांनी जम्मू काश्मिरच्या उरी भागात भारतीय सैन्यावरील भ्याड हल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये 29 सप्टेंबर या दिवशीच सर्जिकल स्ट्रॉईक करून वचपा घेतला, त्याचा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असल्याचे सांगितले. सर्जीकल स्ट्राईक हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. देश घडविण्यासाठी आपण आपले काम प्रामाणिकपणे करण्याचा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांनी तर कार्यक्रमाचे संचालन यशवंत देशमुख यांनी केले. याप्रसंगी राणी लक्ष्मीबाई शाळेच्या चमूने स्वागत गीत सादर करून अतिथींचे स्वागत केले. कार्यक्रमात उपस्थित वीर माता व वीर पत्नी अंजनाबाई तायडे, राधाबाई बोरीकर, अनकनंदा सरोदे, सत्वशिला काळे, मंगला सोनोने, नंदाबाई पूराम, सुनिता विहीरे, स्नेहा कुळमेथे, लक्ष्मीबाई थोरात यांचा जिल्हाधिकारी व मान्यरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक मेळाव्यामध्ये सैनिकांच्या नवीन स्पर्श प्रणाली पेन्शन योजना, पाल्याच्या शिक्षणासाठी शिष्यवृती व इतर अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाला वीर माता, वीर पत्नी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक व त्याचे परिवार तसेच एन.सी.सी. व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

अधिक माहिती...
17
Sep 22
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

आज दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रा. पं. कार्यालय पळाशी येथे ध्वजारोहण करण्यात आले. ग्रा. पं. सदस्या सौ. निताबाई दिलीप राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, गावातील नागरिक, ग्रा. पं. कर्मचारी, संगणक परिचालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, जि. प. शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वृंद, ई. उपस्थित होते.

अधिक माहिती...
14
Sep 22
स्वातंत्राचा अमृत महोत्सव

ग्रामपंचायत टेंभ्ये – हातिस ता. जि. रत्नागिरी मध्ये स्वातंत्राचा अमृत महोत्सव निमित्त दिनांक १4/०८/२०२२ रोजी ध्वजारोहण करण्यात आले.

अधिक माहिती...
13
Sep 22
सहाय्यक सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, नांदेड अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर, होट्टल राज्य संरक्षित स्मारकास तिरंगा व रंगीत विद्युत रोषणाई केल्याबबत केल्या बाबत.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सहाय्यक सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, नांदेड अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर, होट्टल,ता. देगलूर जि.नांदेड या राज्य संरक्षित स्मारकास दिंनाक: १३ ऑगस्ट ते दिं १५ ऑगस्ट २०२२ तिरंगा रंगीत विद्युत रोषणाई करण्यात आली होट्टल ग्रामपंचायत व ग्रामस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने

अधिक माहिती...
11
Sep 22
मौजे अंतरवली सराटी येथे शाळा मध्ये फेरीचे आयोजन आणि अंगणवाडी येथे ध्वज वाटप करताना

मौजे अंतरवली सराटी येथे शाळा मध्ये फेरीचे आयोजन आणि अंगणवाडी येथे ध्वज वाटप करताना

अधिक माहिती...
4
Sep 22
आझादी का अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत वृक्षरोपण

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संलग्नित भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी वृक्षारोपण" करण्यात आले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे सर हे होते. तसेच रा. से. यो. चे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर सर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. एन. महिरे सर व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ममताबेन पाटील मॅम हे देखील उपस्थित होते. आपल्या महाविद्यालयाच्या गार्डन मध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच.बऱ्हाटे सर यांनी बदामाचे वृक्षरोपण केले. तसेच रा. से. यो.चे प्रमुख कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर. एस. नाडेकर सर यांनी कडूनिंबाचे वृक्षरोपण केले. व महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. ममताबेन पाटील मॅम यांनी ही कडूनिंबाचे वृक्षरोपण केले. कार्यक्रमाला रासेयोचे विविध स्वयंसेवक उपस्थित होते. कु. तारकेश्वरी सोनवणे, सागर सोनवणे, आकाश बावस्कर, हर्षल चव्हाण, आदित्य हिवरे, गायत्री बजाज, नेहा पाटील, चेतना पाटील, कांचन पाटील, आश्विनी झोपे, गौरी ढाके, गंगा ढाके, प्रिती चौधरी, हर्षाली कोलते, ममता लक्षवाणी, आदित्य तायडे, अंकुश मगरे, अली शेख, पवन खैरे, गायत्री सनानसे, नयना पाटील इत्यादी. यांसारखे विविध विद्यार्थी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.सौ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्हि.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी, उपप्राचार्य प्रा.डॉ.एन.इ.भंगाळे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

अधिक माहिती...