या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या संकल्पना व आदर्श
- वसुधैव कुटुंबकम
- एकता आणि शांततामय वातावरण
- नाविन्यपूर्ण शोध
- नवभारत कल्पना
- सर्वांगीण विकास
- चिरंतन विकास
- राष्ट्रीय सुरक्षा
- न्याय

नावीन्यपूर्ण कल्पना या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

1
May 23
Maharashtra Sthapna Divas

Maharashtra Sthapna Divas karyakram

अधिक माहिती...
31
Mar 23
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिध्दी आणि प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ तयार करण्यात आलाय. आज यवतमाळ येथे या चित्ररथाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्यात आलाय. हा चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करून घेत लाभ घ्यावा असे आवाहन मा. संजय भाऊ राठोड यांनी केले.

अधिक माहिती...
31
Mar 23
'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिध्दी आणि प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ तयार करण्यात आलाय. आज यवतमाळ येथे या चित्ररथाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्यात आलाय. हा चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करून घेत लाभ घ्यावा असे आवाहन मा. संजय भाऊ राठोड यांनी केले.

अधिक माहिती...
15
Mar 23
*महादीप परीक्षा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारा. - मा. ना. संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ

शैक्षणिक सत्र 2022-23 मधील महादीप सामान्यज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त जिल्हा परिषद शाळांमधील 56 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना वरिल उद् गार मंत्री महोदयांनी काढले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हा उक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जि. प. शाळामधून राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला त्याचप्रमाणे,जिल्हास्तर अंतिम परीक्षेपर्यंत आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना यवतमाळ ते सेवाग्राम अशी हेलीकॉप्टर वारी करण्याची घोषणा ,मंत्रीमहोदयानी केली. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक हे सुद्धा कौतकास पात्र आहे.त्यांची ही दखल शासनस्तरावर घेण्यात येईल. असे प्रशंसोद्गार काढून मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले. यासमयी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, त्रॅकसुट, व सायकल भेट देऊन जिल्हा परिषद सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विनय ठमके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ज्योती भोंडे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, प्रशांत गावंडे अधिव्याख्याता डाएट यवतमाळ उपस्थित होते.

अधिक माहिती...
6
Mar 23
पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

स्व. आप्पासाहेब अत्रे आश्रम शाळा फुलवाडी या. पुसद येथे पर्यावरण पूरक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा प्लास्टिक यासारख्या टाकाऊ वस्तु पासून होळी बनवून पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वस्तूंचा नाश हो व सर्व पृथ्वीचे पर्यावरण प्रदूषण मुक्त हो हीच होलिकामायला मागणी केली.

अधिक माहिती...
5
Mar 23
Healthy Women, Healthy India

जागतीक महीला दीन8 मार्च निमित्य आज आरोग्य विभाग यवतमाळ व क्रीडा भारती ग्रुप तर्फे सायकल रॅली काढून या वर्षीची थीम healthy women, healthy India या विषयी जनजागृती करण्यात आली.

अधिक माहिती...
4
Mar 23
क्रिडासामन्यांच आयोजन व बक्षीसे

जि. प. विद्यार्थ्यांच्या क्रिडा सामन्यात सर्व विजयी खेळाडूंना पारितोषिक म्हणून सायकलभेट दिल्या. ग्रामीण भागात हर्षोल्हासात सायकली सह विजयी खेळाडूंची ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ईतिहासात पहिल्यांदा च एवढ्या भव्य प्रमाणात क्रिडासामन्यांच आयोजन व बक्षीसे देण्यात आली. आदरणीय डॉ. श्रीकृष्ण पांचाळ साहेब. मुकाअ यांचे मार्गदर्शनामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता आले.

अधिक माहिती...
13
Feb 23
जलयुक्त 2.0 अंतर्गत शिवार फेरी

आजरा तालुकेतील जलयुक्त 2.0 अंतर्गत निवडलेल्या गावामध्ये शिवार फेरी आयोजन शनिवार , रविवार, सोमवार या तीन दिवसात करण्यात आले होते या वेळी मा.तहसीलदार सो आजरा,मा उप अभियंता जलसंपदा , पाटबंधारे, RFO, मा.गटविकास अधिकारी,मा.तालुका कृषी अधिकारी , सरपंच ग्रासमिती सदस्य गावकरी व इतर कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते

अधिक माहिती...
26
Jan 23
प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक लहू आप्पाण्णा कांबळे वय90 वर्षे .राशिवडे यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक लहू आप्पाण्णा कांबळे वय90 वर्षे .राशिवडे यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

अधिक माहिती...
13
Jan 23
आरटीओ विभागामार्फत महामार्गावर चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी

फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताह दरम्यान नव्हे तर महामार्गावर वाहन चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उप प्रादेशिक विभागामार्फत कार्यरत रहावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूरमधून याचा प्रारंभ व्हावा ,अशी अपेक्षा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी व्यक्त केली .निमित्त होते रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेचे ... कागल आरटीओ चेकपोस्ट येथे वाहन चालक - कार्यालयीन कर्मचारी - स्थानिक ग्रामस्थांचे डोळे तपासणी शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय माहिती कार्यालयाचे उप संचालक डॉ. संभाजी खराट होते . या प्रसंगी श्री. काटकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय ( कोल्हापूर ) तर्फे या सप्ताह निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तर डॉ. खराट म्हणाले, वाहन चालवणे ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे. याकरिता व्यापक प्रबोधन व्हावे, यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावे, असे आवाहन करुन कोल्हापूर आर टी ओ ने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले . यावेळी बोलताना संतोष कुलकर्णी यांनी समाजातील विविध घटकांसह प्रशासकीय विविध जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांच्या आरोग्य तपासणी आणि इतर उपचारासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून वालावलकर हॉस्पिटल सदैव कार्यरत राहील, असे सांगितले . प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विजयसिंह भोसले यांनी केले. यावेळी सहाय्यक संचालक (मा.) फारुक बागवान, विशाल बागडे, रोहन पांडकर, राहुल नलवडे, उदय केंबळे, वैभव तोरणे यांच्यासह इतर मोटर वाहन निरीक्षक तसेच डॉ. विरेंद्र वणकुद्रे, श्री पंत वालावलकर हॉस्पीटल, ( शिवाजी उधमनगर कोल्हापूर ) आरोग्य मित्र - शिबीर समन्वयक राजेंद्र मकोटे, अशोक माने, मनिषा रोटे, राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते .

अधिक माहिती...
29
Dec 22
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज,निवेदने याबाबत त्वरीत कार्यवाही होणे आवश्यक असते. सदर कार्यवाहीत अधिकाधिक प्रभावीपणा, लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन तर नायब तहसिलदार शिल्पा नगराळे, आणि अव्वल कारकुन वैशाली कावलकर यांची नेमणुक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने यांचेवर उचित कार्यवाही करण्यात येईल.

अधिक माहिती...
22
Dec 22
तरुण उद्योजक आकाश गड्डमवार यांच्या कंपनीने पटकविले 10 लाखाचे प्रथम पुरस्कार

भारत सरकार अंतर्गत गुजरात सरकारने नविन इलेक्ट्री मोटर दोन, तीन व चार चाकी वाहन इलेक्ट्री मोटर्सने चालविण्याकरिता सुधारित, नविन तांत्रिक दृष्ट्या मोटर बनविण्याकरीता नविन उद्योजकाकडून इलेक्ट्रीक व्हेईकल इन्होवेशन चॅलेंज कॅम्प्स, देव ढोलेरा अहमदाबाद येथे आवेदन पत्र प्रकल्पासहीत मागवून 23 राज्यामधून 114 शहरामधून प्रकल्पाकरीता 1160 कंपनीचे आवेदन पत्र प्राप्त झाले. या आवेदनपत्रातून प्राप्त झालेल्या प्रकल्पाचे तांत्रिक समितीकडून छाननी करुन दिनांक 27/11/2022 ते 20/11/2022 पर्यंत पहिल्या राउंडमध्ये जवळपास 800 कंपनीतून 100 कंपनीची प्रकल्पाची निवड दुसर्‍या राउंडमध्ये करण्यात आली. या कंपनी दि. 17/12/2022 ते 20/11/2022 पर्यंत प्रकल्पाची छाननी करुन अंतिम फेरीमध्ये 18 कंपन्याची निवड करण्यात आली. या 18 कंपनी मधून पहिले पारितोषिक रु. 10 लाख गॅरोड्राईव्ह मशिनरी प्रा. लि. यवतमाळ (पुणे) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर कंपनी ही यवतमाळ, महाराष्ट्र राज्य, स्टार्टपमध्ये कंपनीची स्थापना करुन, या कंपनीचे डायरेक्टर आकाश सुर्यकांत गड्डमवार व ईशान धर हे आहेत. आकाश गड्डमवार व ईशान धर हे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स बंगलौर येथे दोन वर्ष रिर्सचर म्हणून काम केले. तद्नंतर वरील प्रमाणे स्वतःची कंपनी सुरु केली. सद्य परिस्थितीत इलेक्ट्रीक व्हेईकल मध्ये लागणारे साहित्य व पार्ट मॅगनेट सहित चायना देशावर अवलंबून रहावे लागतात तसेच चायना मोटर संबंधी दोन किलो मॅगनेटचे उत्पादन करतांना 96 किलो प्रदुषण वातावरणामध्ये वाढ करीत असते. सदर मोटार जास्त गरम झाली तर मोटारची कार्यशक्ती/परफार्मन्स कमी होतो. या दोन्ही वरील गोष्टीवर मात करुन आमच्या कंपनीने मॅगनेट फ्रि एनर्जीमुळे वरील दोषविरहित मोटार निर्माण करुन मोटारची क्षमता, खुपच मोठ्या प्रमाणात राहून मोटार सुस्थितीत चांगल्या प्रकारे सुरळीत चालते. त्यामुळे इलेक्ट्री मोटरच्या उत्पादनाबाबत जगभरातून प्रशंसा होत असून या मोटर्सची दखल घेण्यात आली आहे. यामुळे यवतमाळातील आकाश गड्डमवार व ईशान धर यांचे कौतुकाचे वर्षाव होत आहे.

अधिक माहिती...
22
Dec 22
तरुण उद्योजक आकाश गड्डमवार यांच्या कंपनीने पटकविले 10 लाखाचे प्रथम पुरस्कार

भारत सरकार अंतर्गत गुजरात सरकारने नविन इलेक्ट्री मोटर दोन, तीन व चार चाकी वाहन इलेक्ट्री मोटर्सने चालविण्याकरिता सुधारित, नविन तांत्रिक दृष्ट्या मोटर बनविण्याकरीता नविन उद्योजकाकडून इलेक्ट्रीक व्हेईकल इन्होवेशन चॅलेंज कॅम्प्स, देव ढोलेरा अहमदाबाद येथे आवेदन पत्र प्रकल्पासहीत मागवून 23 राज्यामधून 114 शहरामधून प्रकल्पाकरीता 1160 कंपनीचे आवेदन पत्र प्राप्त झाले. या आवेदनपत्रातून प्राप्त झालेल्या प्रकल्पाचे तांत्रिक समितीकडून छाननी करुन दिनांक 27/11/2022 ते 20/11/2022 पर्यंत पहिल्या राउंडमध्ये जवळपास 800 कंपनीतून 100 कंपनीची प्रकल्पाची निवड दुसर्‍या राउंडमध्ये करण्यात आली. या कंपनी दि. 17/12/2022 ते 20/11/2022 पर्यंत प्रकल्पाची छाननी करुन अंतिम फेरीमध्ये 18 कंपन्याची निवड करण्यात आली. या 18 कंपनी मधून पहिले पारितोषिक रु. 10 लाख गॅरोड्राईव्ह मशिनरी प्रा. लि. यवतमाळ (पुणे) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर कंपनी ही यवतमाळ, महाराष्ट्र राज्य, स्टार्टपमध्ये कंपनीची स्थापना करुन, या कंपनीचे डायरेक्टर आकाश सुर्यकांत गड्डमवार व ईशान धर हे आहेत. आकाश गड्डमवार व ईशान धर हे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स बंगलौर येथे दोन वर्ष रिर्सचर म्हणून काम केले. तद्नंतर वरील प्रमाणे स्वतःची कंपनी सुरु केली. सद्य परिस्थितीत इलेक्ट्रीक व्हेईकल मध्ये लागणारे साहित्य व पार्ट मॅगनेट सहित चायना देशावर अवलंबून रहावे लागतात तसेच चायना मोटर संबंधी दोन किलो मॅगनेटचे उत्पादन करतांना 96 किलो प्रदुषण वातावरणामध्ये वाढ करीत असते. सदर मोटार जास्त गरम झाली तर मोटारची कार्यशक्ती/परफार्मन्स कमी होतो. या दोन्ही वरील गोष्टीवर मात करुन आमच्या कंपनीने मॅगनेट फ्रि एनर्जीमुळे वरील दोषविरहित मोटार निर्माण करुन मोटारची क्षमता, खुपच मोठ्या प्रमाणात राहून मोटार सुस्थितीत चांगल्या प्रकारे सुरळीत चालते. त्यामुळे इलेक्ट्री मोटरच्या उत्पादनाबाबत जगभरातून प्रशंसा होत असून या मोटर्सची दखल घेण्यात आली आहे. यामुळे यवतमाळातील आकाश गड्डमवार व ईशान धर यांचे कौतुकाचे वर्षाव होत आहे.

अधिक माहिती...
19
Dec 22
यवतमाळकर संस्थांचे वाघाडी पुनरुज्जीवन हे इश्वरी कार्य -सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार   जलजागृती अभियानाचा शुभारंभ

यवतमाळमधील संस्थांनी वाघाडी पुनरुज्जीवनासाठी सुरु केलेली कामे इश्वरी कार्य असुन अशा कामांच्या मी सदैव पाठीशी होतो, आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.   वाघाडी येथे स्वच्छ- सुंदर वाघाडी अभियानाच्या जलजागृती मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमात उद्घाटनपर भाषणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, मुख्य वनसंरक्षक व्ही.टी.घुले, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, रघुनाथ कापर्ती, प्रदिप वडनेरकर, नितीन खर्चे, नितीन गिरी उपस्थित होते.   श्री. मुनगंटीवार म्हणाले, कलीयुगातला मनुष्यप्राणी स्वार्थी असल्याचे एकले होते, आता ते अनुभवतोय. प्राणवायु देणारे वृक्ष कापायचे, पोषण करणा-या नदीचे शोषण करायचे, ज्या नदीचे पाणी आपल्या शरीर व मनाला स्वच्छ करते ते पाणी अस्वच्छ करायचे अशी चुकीचे कार्ये श्रेष्ठ समजणाऱ्या मनुष्यप्राणांकडुन होत आहेत. मात्र या विषम परिस्थितीतही येथील संस्था एकत्रित येऊन स्वयंस्फुर्त सेवा कार्य करित असल्याचे कौतुक आहे. हेच इश्वरी कार्य आपल्याला वसुंधरेचं रक्षण करायला प्रेरणा देते. हे मनुष्याने समजुन घेतले पाहीजे. अन्यथा दंड करण्यापूर्वीच देव आपल्याला मृत्युदंड केल्याशिवाय राहणार नसल्याचे श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले. खासदार भावना गवळी यांनी या पर्यावरणपुरक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर आमदार मदन येरावार यांनीही या सेवा प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. संस्थांच्या वतीने अजय मुंधडा यांनी प्रास्ताविकातुन वाघाडी येथे सुरु असलेली मोहीम विषद केली. संतोष भोयर यांनी सुत्र संचालन केले तर अश्विन सवालाखे यांनी आभार मानले. आयोजनाकरिता अभियानात सहभागी पर्यावरण संरक्षण समितीचे संकल्प डांगोरे, शैलेश राव, यवतमाळ प्लॉगरचे भूषण क्षीरसागर, यामिनी घरत, टीडब्ल्युजे फाउंडेशनचे सुमंत ठाकरे, रचना हजारे, जनसेवा फाउंडेशनचे रामचंद्र ढोबळे, भुषण ढोबळे, बी काइंडचे अभीजीत गुल्हाने, प्रसाद वाजपेयी यांनी सहकार्य केले.

अधिक माहिती...
14
Dec 22
कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणा-या शासकीय तसेच खाजगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीतील चार पुरस्कार राज्याला राष्ट्रपती यांनी प्रदान केले. येथील विज्ञान भवनात आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री क्रीष्ण पाल, सचिव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सौंदर्या पाटील हिला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक .कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कुलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला असून आज राष्ट्रपती यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.

अधिक माहिती...
10
Dec 22
जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी

जिल्हा ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी - जिल्हाधिकारी राहुल रेखावार ग्रंथदिंडी, कविसंमेलन, काव्य नाट्यानुभव, व्याख्यान, ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचकांनी लाभ घ्यावा कोल्हापूर दि. 6 (जिमाका): जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने दिनांक 9 व 10 डिसेंबर रोजी जिल्हा ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध साहित्यिक कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या ग्रंथोत्सव सोहळ्यासाठी जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे ज्येष्ठ कादंबरीकार दि.बा.पाटील उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार दिनांक 9 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या या ग्रंथोत्सवात शुक्रवार, दिनांक 9 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथपूजन व ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही ग्रंथदिंडी राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा- दसरा चौक - बिंदू चौक- शिवाजी रोड- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावरुन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे येईल. यात अनेक मान्यवर, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक, सार्वजनिक ग्रंथालयातील पदाधिकारी, कर्मचारी व ग्रंथप्रेमींचा सहभाग असणार आहे. या ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक किरण गुरव यांच्या हस्ते ग्रंथ पूजनाने होणार आहे. दुपारी 3 वाजता कविवर्य पाटलोबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली “कविसंमेलन” होणार असून या कविसंमेलनामध्ये चंद्रकांत पोतदार, निलेश शेळके, अनिल महाजन, सचिन इनामदार, दिनकर खाडे, मंदार पाटील, विष्णु पावले, विक्रम राजवर्धन, आनंद रंगराज, सुप्रिया आवारे, संजय थोरात, भिमराव पाटील, आनंदा शिंदे, राजेंद्र कोळेकर, सतीश तांदळे आदिंचा सहभाग राहणार असून सुनंदा शेळके सूत्रसंचालन करणार आहेत. ग्रंथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार दि. 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता “कुटुंब रंगलंय काव्यात” हा विसुभाऊ बापट यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर दुपारी 3 वाजता शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली “ऐकाल तर वाचाल” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते थिंक बँक लाईव्ह (मराठीतील प्रसिद्ध युट्युब चॅनेल) चे संपादक विनायक पाचलग असणार आहेत. दुपारी 4 वाजता ग्रंथोत्सव सोहळ्याचा समारोप सभारंभ ज्येष्ठ लेखिका श्रीमती सुमित्रा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ. पांडुरंग सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शाहीर आझाद नायकवडी यांच्या शाहीरी पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे. ग्रंथोत्सवात दि. 9 व 10 डिसेंबर या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल ठेवण्यात येणार असून यामध्ये राज्यातील नामांकित प्रकाशन संस्था तसेच शासकीय प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी तथा ग्रंथोत्सव 2022 जिल्हा समन्वय समितीच्या सदस्य सचिव अपर्णा वाईकर यांनी दिली आहे.

अधिक माहिती...
9
Dec 22
कोल्हापूर ग्रंथेात्सव २०२२

कोल्हापूर ग्रंथेात्सव २०२२ दि. ९/१२/२०२२ व दि. १०/१२/२०२२

अधिक माहिती...
6
Dec 22
रक्तदान शिबिर व चित्रकला प्रदर्शन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा प्रशासनामार्फत दि. २६/११/२०२२ ते दि. ६/१२/२०२२ या कालावधीत समता पर्वाचे आयोजन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६/१२/२०२२ रोजी रक्तदान शिबिर व चित्रकला प्रदर्शनाचे ऐतिहासिक बिंदू चौकात आयोजन केले होते. यामध्ये नागरिकांनी उत्फु नर्त सहभाग नोंदविला.

अधिक माहिती...
3
Dec 22
तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण या विषयावर प्रमुख वक्त्या तृतीयपंथी मंडळ सदस्य श्रीमती दिलशाद मुजावर, राज्यस्तर व राष्ट्रीय पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर वरील ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र याचे वितरण कार्यक्रम

तृतीयपंथी व्यक्ती या समाजाचाच एक भाग -तृतीयपंथी मंडळाचे सदस्या दिलशाद मुजावर कोल्हापूर दि.3(जिमाका) : तृतीयपंथी व्यक्ती या समाजाचाच एक भाग आहे. त्यांना कुठलीही उपेक्षेची वागणूक देणे कायद्याने गुन्हा आहे अशी माहिती तृतीयपंथी मंडळाचे सदस्या श्रीमती दिलशाद मुजावर यांनी आपल्या मनोगतात दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत ६ नोव्हेंबर संविधान दिन ते ६ डिसेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन हा कालावधी सामाजिक न्याय पर्वाचा एक भाग म्हणून तृतीयपंथी व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि कल्याण या विषयावर प्रमुख वक्त्या तृतीयपंथी मंडळ सदस्य श्रीमती दिलशाद मुजावर, राज्यस्तर व राष्ट्रीय पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर वरील ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र याचे वितरण कार्यक्रम आज हुपरी येथील शेंदुरे महाविद्यालयात करण्यात आला. यावेळी कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे, तृतीयपंथी मंडळाचे सदस्य तथा प्रमुख वक्त्या श्रीम. दिलशाद मुजावर, तृतीयपंथी मंडळ राज्यस्तरावरील सदस्य श्रीम. मयुरीताई आळवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. भोसले, उपप्राचार्य श्री.शिंदे ,शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, व तृतीयपंथी व्यक्ती आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या दिलशाद मुजावर म्हणाल्या की, समाजामध्ये असणारी एलजीबीटीक्यू घटकासंदर्भात माहिती सांगून तृतीयपंथी व्यक्ती या समाजाचाच एक भाग असून त्यांच्या संदर्भात असणारे कायदे ,अधिनियम त्यांच्यासाठी काम करताना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणताना येणाऱ्या अडचणी आणि त्या सर्वांवर मात करून समाजाने कोणत्या पद्धतीने त्यांना स्वीकारलं पाहिजे, त्या समाजाचाच एक भाग असून त्यांना कुठलीही उपेक्षेची वागणूक देणे कायद्याने गुन्हा असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हास्तरावर ,राज्यस्तरावर होणारे विविध उपक्रम याची माहितीही त्यांनी दिली . कोल्हापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी यावेळी तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय समितीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबाबत माहिती दिली. तसेच समाजामध्ये सदर व्यक्तींना सामावून घेण्यासाठी समाजाने तसेच तृतीयपंथी व्यक्तींनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. सदस्य मयुरीताई आळवेकर यावेळी म्हणाल्या की, या समाजाचा भाग असताना येणाऱ्या अडचणी व त्या सोडवताना समाजाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले यांनी कार्यक्रमास शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तृतीयपंथीयांसाठी राष्ट्रीय पोर्टलवरील ओळखपत्र व ओळख प्रमाणपत्र देण्यात आले.

अधिक माहिती...
1
Dec 22
एड्स नियंत्रण विभागामार्फत 'एड्स दिनानिमित्त' जनजागृती फेरी.

मुक्त संवाद साधून एचआयव्ही रोखूया: अभिनेते सौरभ चौगुले एड्स नियंत्रण विभागामार्फत 'एड्स दिनानिमित्त' जनजागृती फेरी. "संवादाच्या माध्यमातून योग्य माहिती घेऊन संसर्गितांना समानतेची वागणूक देऊया", असे आवाहन कलर्स मराठी वहिनी वरील' जीव माझा गुंतला' मालिकेत 'मल्हार' ही भूमिका साकारणारे अभिनेते सौरभ चौगुले यांनी केले. जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे एड्स दिनानिमित्त आयोजित केलेल्या प्रभात फेरी उद्घाटन प्रसंगी 'युथ आयकॉन' म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रदीप दीक्षित अध्यक्षस्थानी होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक हूबेकर, प्राचार्या डॉ.सुप्रिया देशमुख , अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सरिता थोरात,बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक , डॉ.विनायक भोई , सहाय्यक आरोग्य अधिकारी मनिष पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीश कांबळे, अधिसेविका नेहा कापरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, निरंजन देशपांडे , राजेंद्र मकोटे हे प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना सौरभ चौगुले म्हणाले की , "युवा वर्गाने संकोच बाजूला ठेवून एकमेकांशी मोकळा संवाद साधला पाहिजे. योग्य शास्त्रोक्त ज्ञान मिळवले पाहिजे युवकांनी पुढाकार घेऊन एड्स जनजागृती करायला हवी". अभिमान संस्थेचे विशाल पिंजानी एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी शून्यावर आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रयत्न केले पाहिजेत. असे मनोगतात सांगितले. जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर यांनी प्रास्ताविकामध्ये 'आपली एकता आणि समानता, एचआयव्ही सहज जगणाऱ्यांकरिता'(Equalize)हे यावर्षीचे एड्स दिनाचे ब्रीदवाक्य असल्याचे सांगून जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एचआयव्ही एड्स नियंत्रणासाठी चालू असलेले कामकाज व उपक्रम याबद्दल माहिती दिली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक हुबेकर यांनी उपस्थितांना एड्स मुक्ती, आणि कलंक व भेदभाव दूर करण्याची शपथ दिली. यावेळेस एड्स दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पोस्टर्स स्पर्धांचे पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच २०२३ च्या आरोग्य दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी , एव्हरेस्ट वीर कस्तुरी सावेकर यांच्यासह शहरातील महाविद्यालयांचे प्राध्यापक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि एड्स नियंत्रण कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन विनायक देसाई यांनी केले तर आभार मकरंद चौधरी यांनी मानले.

अधिक माहिती...