या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- राष्ट्रीय एकात्मता जोपासणाऱ्या संकल्पना व आदर्श
- वसुधैव कुटुंबकम
- एकता आणि शांततामय वातावरण
- नाविन्यपूर्ण शोध
- नवभारत कल्पना
- सर्वांगीण विकास
- चिरंतन विकास
- राष्ट्रीय सुरक्षा
- न्याय

नावीन्यपूर्ण कल्पना या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

9
Aug 23
राज्य राखीव पोलीस बल गट क्र.७ दौंड येथे "मेरी माटी, मेरा देश - मिट्टी को नमन, विरों का वंदन" उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजन

राज्य राखीव पोलीस बल गट क्र.७ दौंड येथे आजादी का अमृत महोत्सव सांगता सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित "मेरी माटी, मेरा देश - मिट्टी को नमन, विरों का वंदन" उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.

अधिक माहिती...
31
Jul 23
उत्कृष्ट सार्वजनिक गणेशमंडळांसाठी शासनाकडून पुरस्कार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून या स्पर्धेमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या 4 जुलै रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या, स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची पुरस्कारासाठी निवड दहा निकषांच्या आधारे करण्यात येणार आहे. या स्पर्धेत पर्यावरणपूरक मूर्तीसाठी दहा गुण, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत) 15 गुण, ध्वनिप्रदूषण रहीत वातावरणासाठी पाच गुण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखाव्यासाठी 20 गुण, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखाव्यासाठी 25 गुण असतील. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्यासाठी 20 गुण, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेल्या कार्याबद्दल 15 गुण, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटकांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक आदीबाबत केलेल्या कार्यासाठी 15 गुण, पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांसाठी 10 गुण, पारंपरिक, देशी खेळांच्या स्पर्धेसाठी 10 गुण असतील. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी, प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही, असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छतेसाठी प्रत्येकी पाच असे 25 गुण मिळून अशी 150 गुणांची ही स्पर्धा असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विहित नमुन्यात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर 5 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत. 8 सप्टेंबरपूर्वी अकादमीमार्फत जिल्हानिहाय अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय विजेत्यांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येणार असून उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी अध्यक्ष, जिल्हा नियोजन अधिकारी सदस्य सचिव तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, शासकीय कला महाविद्यालयातील कला प्राध्यापक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सदस्य असतील. अर्ज केलेल्या मंडळांच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून मंडळाकडून छायाचित्रीकरण करुन तसेच कागदपत्रे जमा करून गुणांक देण्यात येतील. या स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पहिल्या क्रमांकास 5 लाख रुपये, द्वितीय क्रमांकास 2 लाख 50 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकास 1 लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अधिक माहिती...
21
Jun 23
International Yoga Day, Dept of Community Medicine, Iggmc Nagpur Maharashtra

Dept of Community Medicine, Iggmc Nagpur celebrates International Yoga Day at PSM Lecture Hall, Iggmc Nagpur at 11.00AM on 21 june 2023

अधिक माहिती...
21
Jun 23
Celebration of International Yoga Day, Dept of Community Medicine, Iggmc Nagpur 21 june 2023

Dept of Community Medicine, Iggmc Nagpur celebrates International Yoga Day at PSM Lecture Hall Iggmc Nagpur at 11.00 AM on 21/06/2023

अधिक माहिती...
1
May 23
Maharashtra Sthapna Divas

Maharashtra Sthapna Divas karyakram

अधिक माहिती...
31
Mar 23
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिध्दी आणि प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ तयार करण्यात आलाय. आज यवतमाळ येथे या चित्ररथाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्यात आलाय. हा चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करून घेत लाभ घ्यावा असे आवाहन मा. संजय भाऊ राठोड यांनी केले.

अधिक माहिती...
31
Mar 23
'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची प्रसिध्दी आणि प्रचार करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने 'शासकीय योजनांची जत्रा' हा चित्ररथ तयार करण्यात आलाय. आज यवतमाळ येथे या चित्ररथाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी असलेल्या शासकीय योजना जलद आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी, शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राज्यभर सुरू करण्यात आलाय. हा चित्ररथ ३५० गावांमध्ये ४४ दिवस फिरणार आहे. नागरिकांनी चित्ररथाच्या माध्यमातुन योजनांची माहिती करून घेत लाभ घ्यावा असे आवाहन मा. संजय भाऊ राठोड यांनी केले.

अधिक माहिती...
15
Mar 23
*महादीप परीक्षा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना नवी दिशा देणारा. - मा. ना. संजय राठोड पालकमंत्री यवतमाळ

शैक्षणिक सत्र 2022-23 मधील महादीप सामान्यज्ञान परीक्षेत गुणवत्ता यादीत प्राविण्य प्राप्त जिल्हा परिषद शाळांमधील 56 विद्यार्थ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना वरिल उद् गार मंत्री महोदयांनी काढले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून हा उक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जि. प. शाळामधून राबविण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला त्याचप्रमाणे,जिल्हास्तर अंतिम परीक्षेपर्यंत आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना यवतमाळ ते सेवाग्राम अशी हेलीकॉप्टर वारी करण्याची घोषणा ,मंत्रीमहोदयानी केली. हा उपक्रम प्रत्यक्ष राबविणारे अधिकारी, कर्मचारी व शिक्षक हे सुद्धा कौतकास पात्र आहे.त्यांची ही दखल शासनस्तरावर घेण्यात येईल. असे प्रशंसोद्गार काढून मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे अभिनंदन केले. यासमयी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, त्रॅकसुट, व सायकल भेट देऊन जिल्हा परिषद सभागृहात गौरविण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, विनय ठमके अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत थोरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ज्योती भोंडे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, प्रशांत गावंडे अधिव्याख्याता डाएट यवतमाळ उपस्थित होते.

अधिक माहिती...
6
Mar 23
पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

स्व. आप्पासाहेब अत्रे आश्रम शाळा फुलवाडी या. पुसद येथे पर्यावरण पूरक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा प्लास्टिक यासारख्या टाकाऊ वस्तु पासून होळी बनवून पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या वस्तूंचा नाश हो व सर्व पृथ्वीचे पर्यावरण प्रदूषण मुक्त हो हीच होलिकामायला मागणी केली.

अधिक माहिती...
5
Mar 23
Healthy Women, Healthy India

जागतीक महीला दीन8 मार्च निमित्य आज आरोग्य विभाग यवतमाळ व क्रीडा भारती ग्रुप तर्फे सायकल रॅली काढून या वर्षीची थीम healthy women, healthy India या विषयी जनजागृती करण्यात आली.

अधिक माहिती...
4
Mar 23
क्रिडासामन्यांच आयोजन व बक्षीसे

जि. प. विद्यार्थ्यांच्या क्रिडा सामन्यात सर्व विजयी खेळाडूंना पारितोषिक म्हणून सायकलभेट दिल्या. ग्रामीण भागात हर्षोल्हासात सायकली सह विजयी खेळाडूंची ठिकठिकाणी मिरवणूक काढण्यात आली. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या ईतिहासात पहिल्यांदा च एवढ्या भव्य प्रमाणात क्रिडासामन्यांच आयोजन व बक्षीसे देण्यात आली. आदरणीय डॉ. श्रीकृष्ण पांचाळ साहेब. मुकाअ यांचे मार्गदर्शनामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देता आले.

अधिक माहिती...
13
Feb 23
जलयुक्त 2.0 अंतर्गत शिवार फेरी

आजरा तालुकेतील जलयुक्त 2.0 अंतर्गत निवडलेल्या गावामध्ये शिवार फेरी आयोजन शनिवार , रविवार, सोमवार या तीन दिवसात करण्यात आले होते या वेळी मा.तहसीलदार सो आजरा,मा उप अभियंता जलसंपदा , पाटबंधारे, RFO, मा.गटविकास अधिकारी,मा.तालुका कृषी अधिकारी , सरपंच ग्रासमिती सदस्य गावकरी व इतर कार्यालयाचे अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते

अधिक माहिती...
26
Jan 23
प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक लहू आप्पाण्णा कांबळे वय90 वर्षे .राशिवडे यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिक लहू आप्पाण्णा कांबळे वय90 वर्षे .राशिवडे यांचा घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

अधिक माहिती...
13
Jan 23
आरटीओ विभागामार्फत महामार्गावर चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी

फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताह दरम्यान नव्हे तर महामार्गावर वाहन चालकाची त्रैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा उप प्रादेशिक विभागामार्फत कार्यरत रहावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूरमधून याचा प्रारंभ व्हावा ,अशी अपेक्षा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी व्यक्त केली .निमित्त होते रस्ता सुरक्षा अभियान मोहिमेचे ... कागल आरटीओ चेकपोस्ट येथे वाहन चालक - कार्यालयीन कर्मचारी - स्थानिक ग्रामस्थांचे डोळे तपासणी शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय माहिती कार्यालयाचे उप संचालक डॉ. संभाजी खराट होते . या प्रसंगी श्री. काटकर यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय ( कोल्हापूर ) तर्फे या सप्ताह निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तर डॉ. खराट म्हणाले, वाहन चालवणे ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे. याकरिता व्यापक प्रबोधन व्हावे, यासाठी सर्वांनी सामुहिक प्रयत्न करावे, असे आवाहन करुन कोल्हापूर आर टी ओ ने रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले . यावेळी बोलताना संतोष कुलकर्णी यांनी समाजातील विविध घटकांसह प्रशासकीय विविध जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांच्या आरोग्य तपासणी आणि इतर उपचारासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून वालावलकर हॉस्पिटल सदैव कार्यरत राहील, असे सांगितले . प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विजयसिंह भोसले यांनी केले. यावेळी सहाय्यक संचालक (मा.) फारुक बागवान, विशाल बागडे, रोहन पांडकर, राहुल नलवडे, उदय केंबळे, वैभव तोरणे यांच्यासह इतर मोटर वाहन निरीक्षक तसेच डॉ. विरेंद्र वणकुद्रे, श्री पंत वालावलकर हॉस्पीटल, ( शिवाजी उधमनगर कोल्हापूर ) आरोग्य मित्र - शिबीर समन्वयक राजेंद्र मकोटे, अशोक माने, मनिषा रोटे, राहुल माने आदी मान्यवर उपस्थित होते .

अधिक माहिती...
29
Dec 22
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सुरू

राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज,निवेदने याबाबत त्वरीत कार्यवाही होणे आवश्यक असते. सदर कार्यवाहीत अधिकाधिक प्रभावीपणा, लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांची पदसिध्द विशेष कार्यकारी अधिकारी म्हणुन तर नायब तहसिलदार शिल्पा नगराळे, आणि अव्वल कारकुन वैशाली कावलकर यांची नेमणुक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सचिवालय कक्षात जिल्ह्यातील जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे, त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदने यांचेवर उचित कार्यवाही करण्यात येईल.

अधिक माहिती...
23
Dec 22
पुराभिलेख कोल्हापूर विभागाकडील निवडक व दुर्मिळ कागद पात्रांचे प्रदर्शन.

पुराभिलेख कोल्हापूर विभागाकडील निवडक व दुर्मिळ आदेश कागद पात्रांचे व चायाचीत्रांचे प्रदर्शन लक्ष्मी विलास पालेस येथील कलादालनात भरविण्यात आले होते.या प्रदर्शनाचे उद्घाटन उप संचालक माहिती व जनसंपर्क विभाग कोल्हापूर तसेच जिल्हा माहिती अधिकारी कोल्हापूर, उपजिल्हाधिकारी(निवडणूक) जिल्हाधिकारी कार्यालय,कोल्हापूर. यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सदर प्रदर्शन दि.२३/११/२०२२ ते २५/११/२०२२ अखेर प्रेक्षकांसाठी खुले ठेवण्यात आले होते.या प्रदर्शनास अनेक मान्यवर,पर्यटक, शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्फूर्त भेट देवून उत्तम प्रतिसाद दिला. या दिवशी शहरातील एतिहासिक वास्तू, पुरावशेष यांच्या छायाचित्रांच्या आधारे टेक्सटाईल डिझाईनिंगची स्पर्धा फाशनडिझाईनिंगच्या विद्यार्थीनिसाठी करण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये ५४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला,प्रथम ३ क्रमांकाच्या स्पर्धकांना प्रशस्ती पत्र,रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले.

अधिक माहिती...
22
Dec 22
तरुण उद्योजक आकाश गड्डमवार यांच्या कंपनीने पटकविले 10 लाखाचे प्रथम पुरस्कार

भारत सरकार अंतर्गत गुजरात सरकारने नविन इलेक्ट्री मोटर दोन, तीन व चार चाकी वाहन इलेक्ट्री मोटर्सने चालविण्याकरिता सुधारित, नविन तांत्रिक दृष्ट्या मोटर बनविण्याकरीता नविन उद्योजकाकडून इलेक्ट्रीक व्हेईकल इन्होवेशन चॅलेंज कॅम्प्स, देव ढोलेरा अहमदाबाद येथे आवेदन पत्र प्रकल्पासहीत मागवून 23 राज्यामधून 114 शहरामधून प्रकल्पाकरीता 1160 कंपनीचे आवेदन पत्र प्राप्त झाले. या आवेदनपत्रातून प्राप्त झालेल्या प्रकल्पाचे तांत्रिक समितीकडून छाननी करुन दिनांक 27/11/2022 ते 20/11/2022 पर्यंत पहिल्या राउंडमध्ये जवळपास 800 कंपनीतून 100 कंपनीची प्रकल्पाची निवड दुसर्‍या राउंडमध्ये करण्यात आली. या कंपनी दि. 17/12/2022 ते 20/11/2022 पर्यंत प्रकल्पाची छाननी करुन अंतिम फेरीमध्ये 18 कंपन्याची निवड करण्यात आली. या 18 कंपनी मधून पहिले पारितोषिक रु. 10 लाख गॅरोड्राईव्ह मशिनरी प्रा. लि. यवतमाळ (पुणे) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर कंपनी ही यवतमाळ, महाराष्ट्र राज्य, स्टार्टपमध्ये कंपनीची स्थापना करुन, या कंपनीचे डायरेक्टर आकाश सुर्यकांत गड्डमवार व ईशान धर हे आहेत. आकाश गड्डमवार व ईशान धर हे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स बंगलौर येथे दोन वर्ष रिर्सचर म्हणून काम केले. तद्नंतर वरील प्रमाणे स्वतःची कंपनी सुरु केली. सद्य परिस्थितीत इलेक्ट्रीक व्हेईकल मध्ये लागणारे साहित्य व पार्ट मॅगनेट सहित चायना देशावर अवलंबून रहावे लागतात तसेच चायना मोटर संबंधी दोन किलो मॅगनेटचे उत्पादन करतांना 96 किलो प्रदुषण वातावरणामध्ये वाढ करीत असते. सदर मोटार जास्त गरम झाली तर मोटारची कार्यशक्ती/परफार्मन्स कमी होतो. या दोन्ही वरील गोष्टीवर मात करुन आमच्या कंपनीने मॅगनेट फ्रि एनर्जीमुळे वरील दोषविरहित मोटार निर्माण करुन मोटारची क्षमता, खुपच मोठ्या प्रमाणात राहून मोटार सुस्थितीत चांगल्या प्रकारे सुरळीत चालते. त्यामुळे इलेक्ट्री मोटरच्या उत्पादनाबाबत जगभरातून प्रशंसा होत असून या मोटर्सची दखल घेण्यात आली आहे. यामुळे यवतमाळातील आकाश गड्डमवार व ईशान धर यांचे कौतुकाचे वर्षाव होत आहे.

अधिक माहिती...
22
Dec 22
तरुण उद्योजक आकाश गड्डमवार यांच्या कंपनीने पटकविले 10 लाखाचे प्रथम पुरस्कार

भारत सरकार अंतर्गत गुजरात सरकारने नविन इलेक्ट्री मोटर दोन, तीन व चार चाकी वाहन इलेक्ट्री मोटर्सने चालविण्याकरिता सुधारित, नविन तांत्रिक दृष्ट्या मोटर बनविण्याकरीता नविन उद्योजकाकडून इलेक्ट्रीक व्हेईकल इन्होवेशन चॅलेंज कॅम्प्स, देव ढोलेरा अहमदाबाद येथे आवेदन पत्र प्रकल्पासहीत मागवून 23 राज्यामधून 114 शहरामधून प्रकल्पाकरीता 1160 कंपनीचे आवेदन पत्र प्राप्त झाले. या आवेदनपत्रातून प्राप्त झालेल्या प्रकल्पाचे तांत्रिक समितीकडून छाननी करुन दिनांक 27/11/2022 ते 20/11/2022 पर्यंत पहिल्या राउंडमध्ये जवळपास 800 कंपनीतून 100 कंपनीची प्रकल्पाची निवड दुसर्‍या राउंडमध्ये करण्यात आली. या कंपनी दि. 17/12/2022 ते 20/11/2022 पर्यंत प्रकल्पाची छाननी करुन अंतिम फेरीमध्ये 18 कंपन्याची निवड करण्यात आली. या 18 कंपनी मधून पहिले पारितोषिक रु. 10 लाख गॅरोड्राईव्ह मशिनरी प्रा. लि. यवतमाळ (पुणे) या कंपनीची निवड करण्यात आली आहे. सदर कंपनी ही यवतमाळ, महाराष्ट्र राज्य, स्टार्टपमध्ये कंपनीची स्थापना करुन, या कंपनीचे डायरेक्टर आकाश सुर्यकांत गड्डमवार व ईशान धर हे आहेत. आकाश गड्डमवार व ईशान धर हे इंडियन इन्स्टीट्युट ऑफ सायन्स बंगलौर येथे दोन वर्ष रिर्सचर म्हणून काम केले. तद्नंतर वरील प्रमाणे स्वतःची कंपनी सुरु केली. सद्य परिस्थितीत इलेक्ट्रीक व्हेईकल मध्ये लागणारे साहित्य व पार्ट मॅगनेट सहित चायना देशावर अवलंबून रहावे लागतात तसेच चायना मोटर संबंधी दोन किलो मॅगनेटचे उत्पादन करतांना 96 किलो प्रदुषण वातावरणामध्ये वाढ करीत असते. सदर मोटार जास्त गरम झाली तर मोटारची कार्यशक्ती/परफार्मन्स कमी होतो. या दोन्ही वरील गोष्टीवर मात करुन आमच्या कंपनीने मॅगनेट फ्रि एनर्जीमुळे वरील दोषविरहित मोटार निर्माण करुन मोटारची क्षमता, खुपच मोठ्या प्रमाणात राहून मोटार सुस्थितीत चांगल्या प्रकारे सुरळीत चालते. त्यामुळे इलेक्ट्री मोटरच्या उत्पादनाबाबत जगभरातून प्रशंसा होत असून या मोटर्सची दखल घेण्यात आली आहे. यामुळे यवतमाळातील आकाश गड्डमवार व ईशान धर यांचे कौतुकाचे वर्षाव होत आहे.

अधिक माहिती...
19
Dec 22
यवतमाळकर संस्थांचे वाघाडी पुनरुज्जीवन हे इश्वरी कार्य -सुधीर मुनगंटीवार यांचे गौरवोद्गार   जलजागृती अभियानाचा शुभारंभ

यवतमाळमधील संस्थांनी वाघाडी पुनरुज्जीवनासाठी सुरु केलेली कामे इश्वरी कार्य असुन अशा कामांच्या मी सदैव पाठीशी होतो, आहे आणि भविष्यातही राहणार असल्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.   वाघाडी येथे स्वच्छ- सुंदर वाघाडी अभियानाच्या जलजागृती मोहीमेच्या शुभारंभ कार्यक्रमात उद्घाटनपर भाषणाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, मुख्य वनसंरक्षक व्ही.टी.घुले, उपवनसंरक्षक आनंद रेड्डी, रघुनाथ कापर्ती, प्रदिप वडनेरकर, नितीन खर्चे, नितीन गिरी उपस्थित होते.   श्री. मुनगंटीवार म्हणाले, कलीयुगातला मनुष्यप्राणी स्वार्थी असल्याचे एकले होते, आता ते अनुभवतोय. प्राणवायु देणारे वृक्ष कापायचे, पोषण करणा-या नदीचे शोषण करायचे, ज्या नदीचे पाणी आपल्या शरीर व मनाला स्वच्छ करते ते पाणी अस्वच्छ करायचे अशी चुकीचे कार्ये श्रेष्ठ समजणाऱ्या मनुष्यप्राणांकडुन होत आहेत. मात्र या विषम परिस्थितीतही येथील संस्था एकत्रित येऊन स्वयंस्फुर्त सेवा कार्य करित असल्याचे कौतुक आहे. हेच इश्वरी कार्य आपल्याला वसुंधरेचं रक्षण करायला प्रेरणा देते. हे मनुष्याने समजुन घेतले पाहीजे. अन्यथा दंड करण्यापूर्वीच देव आपल्याला मृत्युदंड केल्याशिवाय राहणार नसल्याचे श्री मुनगंटीवार यावेळी म्हणाले. खासदार भावना गवळी यांनी या पर्यावरणपुरक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. तर आमदार मदन येरावार यांनीही या सेवा प्रकल्पाला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले. संस्थांच्या वतीने अजय मुंधडा यांनी प्रास्ताविकातुन वाघाडी येथे सुरु असलेली मोहीम विषद केली. संतोष भोयर यांनी सुत्र संचालन केले तर अश्विन सवालाखे यांनी आभार मानले. आयोजनाकरिता अभियानात सहभागी पर्यावरण संरक्षण समितीचे संकल्प डांगोरे, शैलेश राव, यवतमाळ प्लॉगरचे भूषण क्षीरसागर, यामिनी घरत, टीडब्ल्युजे फाउंडेशनचे सुमंत ठाकरे, रचना हजारे, जनसेवा फाउंडेशनचे रामचंद्र ढोबळे, भुषण ढोबळे, बी काइंडचे अभीजीत गुल्हाने, प्रसाद वाजपेयी यांनी सहकार्य केले.

अधिक माहिती...
14
Dec 22
कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कोल्हापूरच्या सौंदर्या पाटीलला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ऊर्जा संवर्धनासाठी आज सर्वोत्कृष्ट कार्य करणा-या शासकीय तसेच खाजगी संस्थांना गौरविण्यात आले. यामध्ये विविध श्रेणीतील चार पुरस्कार राज्याला राष्ट्रपती यांनी प्रदान केले. येथील विज्ञान भवनात आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’चे औचित्य साधून केंद्रीय ऊर्जा विभागाच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळयाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंह, केंद्रीय राज्यमंत्री क्रीष्ण पाल, सचिव व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विविध श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कार आणि राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सौंदर्या पाटील हिला राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिस-या क्रमांकाचे पारितोषिक .कोल्हापूरच्या हिराराम गर्ल्स हायस्कुलची नववीत शिकणारी सौंदर्या पाटील या विद्यार्थिनीने राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला असून आज राष्ट्रपती यांच्या हस्ते तिचा पदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी समाजात सातत्याने जाणीवजागृती करण्याच्या उद्देशाने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने 2005 पासून दरवर्षी ऊर्जा संवर्धन या विषयावर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजित केली जाते. शालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशा तीन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाते.

अधिक माहिती...