या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- स्वच्छ भारत अभियान
- कौशल्य विकास
- एक भारत श्रेष्ठ भारत
- कृषी विपणन मधील एकवाक्यता
- आत्मनिर्भर भारत
- सबका साथ सबका विकास
- स्वस्थ भारत
- आरोग्य भारत
- आत्मनिर्भर भारत
- वन नेशन वन रेशन
- डिजिटल इंडिया

अंमलबजावणी या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

16
May 23
बालसंगोपन योजनेचा ९६८ बालकांना १ कोटी २५ लक्ष रुपयांचा लाभ वितरित नविन १०५० प्रस्तावाना मंजुरी

अनाथ, निराश्रीत, बेघर व अन्य आपत्तीत सापडलेल्या बालकांचे कौटुंबिक वातावरणात संगोपन व्हावे या हेतूने शासन बालसंगोपन योजना राबविते. जिल्ह्यात मार्च २०२३पर्यंत ९६८ बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आलेला असून १ कोटी २५ लक्ष २४ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य वितरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात २०२१-२२ मध्ये बाल संगोपन योजनेसाठी २९४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहरी भागातील ६६५ तर ग्रामीण भागातील २२८१ प्रस्तावाचा समावेश आहे. यापैकी १२३३ प्रस्तावांची गृह चौकशी पूर्ण झाली असून १०५० प्रकरणात सी डब्ल्यू सी ने बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्याचे आदेश केलेले आहेत अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी बैठकित दिली. यावेळी उर्वरित १७१३ प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेत. ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती मधील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी गृह चौकशी तात्काळ करण्यासाठी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकांना आदेश द्यावेत, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शाळा बाह्य मुले, रस्त्यावरची मुले, आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बालसंगोपन योजना आढावा बैठकित बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वासुदेव डायरे, बालकल्याण समिती सदस्य ॲड प्राची निलावार, वनिता शिरफुले, ॲड लीना ओक, फाल्गुन पालकर, माधुरी पावडे, देवेंद्र राजुरकर स्वप्नील शेटे उपस्थित होते.

अधिक माहिती...
16
May 23
घाटंजी येथे २३ मे रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी यांचे संयुक्त विद्यमाने २३ मे सकाळी १० वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घाटंजी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याकरीता एकूण ९०५ रिक्तपदे विविध नामांकित कंपन्या उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक,यवतमाळ, भुमी विकास इन्डस्ट्रीज, पुसद, आरोही इन्फो एफ आय मॅनेजमेंट लि. अकोला संभाजी नगर, वैभव एन्टर प्रायजेस, नागपूर, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि. पुणे, नवभारत फर्टिलायझर, अमरावती, धुत ट्रान्समिशन, औरगाबाद, परमस्किल ट्रेनिंग इंडिया प्रा.लि. औरंगाबाद/ पूणे, नवकिसान बायोप्लँटेक लि. नागपूर, मेगाफिड बायोटेक, नागपूर यांच्याकडुन उपलब्ध झालेली आहे. सदर मेळाव्यामध्ये इयत्ता १०वी, १२ वी, आय.टि.आय पदविकाधारक, पदवीधर तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेले इच्छुक उमेदवारांनी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहुन या संधीचा लाभ घेता येणार आहे. सदर मेळाव्यास उद्योजकांकडून उमेदवारांशी प्रत्यक्ष थेट मुलाखतीव्दारे रिक्तपदांकरीता निवड करण्यात येणार आहे. तरी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी या मेळाव्यामध्ये सहभाग नोंदवावा , असे आवाहन सहायक आयुक्त विद्या शितोळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,यवतमाळ यांनी केले आहे.

अधिक माहिती...
16
May 23
सावरगाव येथे शेतकरी मार्गदर्शन मेळावा २० मे ला*

आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या संकल्पनेतून २० मे रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,सावरगाव ता.कळंब येथे शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात हवामान तज्ञ पंजाब डख शेतक-याना मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने अक्षरश:धुमाकुळ घातला आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा कसा असेल? पिकांची देखभाल कशी करावी? पेरणी कधी करावी? या विषयाचे सखोल मार्गदर्शन शेतकऱ्यांना व्हावे याकरिता प्रसिध्द हवामान तज्ञ तथा हवामान अभ्यासक पंजाबराव डख,सहयोगी संशोधन संचालक प्रमोद यादगीरवार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, माजी आमदार अन्नासाहेब पारवेकर तथा आमदार प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकरी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. अशोक उईके यांनी केले आहे.

अधिक माहिती...
16
May 23
*जत्रा शासकीय योजनांची*

पंचायत समिती बाभुळगाव ग्राम panchyat. वेणी यांच्याकडून *जत्रा शासकीय योजनांची* या अभियानात एकूण 20 दिवयांग लाभार्थी यांना चेक स्वरूपात अनुदान वाटप करण्यात आले त्या प्रसंगी गट विकास अधिकारी श्री पवार,सरपंच,उपसरपंच,विस्तार अधिकारी सा v लाभार्थी उपस्थित होते

अधिक माहिती...
15
May 23
पाणी टंचाई बाबत विहिरीची पाहणी

मौजा मादनी येथील पाणी टंचाई बाबत विहिरीची पाहणी करताना 15 वा वित्त आयोग 10 टक्के पंचायत समिती स्तर अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर सोलर पंप सौर ऊर्जा panel बसविण्यात आले त्यामुळे विजेची बचत फार मोठ्या प्रमाणात होते

अधिक माहिती...
15
May 23
स्व-संरक्षणाकरीता महिलांसाठी शार्यै शिबिर

देवि सामका महिला बहुउद्देशिय संस्था वडी.एम.एम.आयुर्वेद कॉलेज, यवतमाळ यांच्यासंयुक्त विदमयाने दिनांक २७ व २८ मे रोजीसामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे महिलांसाठी शौर्य शिबिराचे आयोजन करण्यात येतआहे.या शिबिरामध्ये भारतीय पारंपारीक खेळ लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, मुद्ग, नॉनचॉक आदि शौर्य व क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपल्या देशात स्त्रीला देवी मानून पूजन केले जाते. मात्र लहान मुलींनाही आज शाळांमध्ये गुडटच, बॅडटच शिकवावे लागते.त्यामुळे स्त्रीला स्वसंरक्षणासाठी उभे रहावेच लागेल. त्यासाठी शक्ती वाहीनीची स्थापना करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये मुख्यत: यवमताळ दामीनी पथकाच्या प्रमुख मा.सौ.विजया पंधेरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे व तसेच योगासन, प्राणायाम वयांचे मार्गदर्शन मिळणार आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त महिला, मुली (वयोगट १५ ते ४०) यांनी भाग घ्यावा असे संस्थेचे सचिव सौ.चंदा राठोड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आवाहन केले आहे.

अधिक माहिती...
13
May 23
शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिलेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदार समाधान गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए या महामार्गाच्या दिग्रस शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकित दिले. या महामार्गांमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात यावे. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू करण्यासही त्यांनी सांगितले. दिग्रस शहरातील टाऊन हॉलचे बांधकामाचा आढावा घेताना टाऊन हॉलचे डिझाईन करून घेण्यात आले तसेच इतर अतिरिक्त बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन वास्तूविशारद यांच्याकडे पाठपुरावा करावा. मंजुरी प्राप्त दोन्ही बाबींचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कांत्राटदार आणि बांधकाम विभागाला दिल्या. दिग्रस शहरातील हिंदू स्मशानभूमी, भाजी मार्केटच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला दोन्ही बाबीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी तात्काळ निविदा बोलविण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले. दिग्रस शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झाले तरी काम सुरु केलेले नाही याबाबत पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तालुका क्रिडा संकुलचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून वॉल कंपाऊंड, लॉन टेनिस कोर्ट, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, तसेच इतर खेळांची मैदाने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. या बैठकिला तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

अधिक माहिती...
13
May 23
युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावे हे ठरवितांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक

इयत्ता दहावी ,बारावी हा विद्यार्थ्यांसाठी टर्निग पॉईंट असतो. इथुन पुढे त्यांच्या करियरला सुरुवात होते. आज शिक्षणाचे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत. नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावे हे ठरवितांना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आजच्या करियर मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी मिळाली आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे आज छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करियर शिबिराचा शुभारंभ राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,यवतमाळचे प्राचार्य विनोद नागोरे, प्राचार्य औ.प्र.सं दारव्हा आर.यु.राठोड, प्राचार्य औ.प्र.सं.आर्णी सुधीर पाटबाने, प्रकल्प अधिकारी,आश्रम शाळा अंतरगाव उषा त्रिपाठी, तसेच प्राचार्य ओ.प्र.सं.लोणार जि.बुलढाणा प्रतिक गुल्हाने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. पालकमंत्री यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे. त्यासाठी विविध रोजगार मेळाव्याचे आयोजन नियमित करण्यात येत असते. पण विद्यार्थ्यांनी सुद्धा केवळ इंजिनियरिंग आणि मेडिकलचा करियरचे क्षेत्र न निवडता इतर अनेक क्षेत्रातील चांगल्या करियरच्या संधी घ्याव्यात. त्याचबरोबर शिक्षण घेतानाच इतर कौशल्ये सुद्धा आत्मसात करावित विचार मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केले. पालकमंत्र्यांनी यावेळी विविध दालनांना भेटी देवून प्रदर्शन दालनाचे फीत कापून उद्घाटन केले. याप्रसंगी उपस्थित युवक युवतींशी पालकमंत्री संजय राठोड यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना युवा करिअर या विषयावर मार्गदर्शन करतांना सांगितले की, इयत्ता 10 वी, 12 वी.नंतर काय?विद्यार्थ्यांनी कोणते करिअर निवडावे त्यासाठीच हे शिबिरे असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे,आणि विद्यार्थ्यांनी शिबिराचा जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा व आपला व्यक्तीमत्व विकास साधावा, असे आपल्या मार्गदर्शन भाषणातून सांगितले. या शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.

अधिक माहिती...
12
May 23
जिल्हा पोलीस दलाच्या पहिल्याच रक्तदान मोहिमेत ९०० बॉटल्सचे संकलन पोलीस अधीक्षकांनी केले रक्तदान

सिकलसेलसारख्या आजारावर मात करण्यासोबत विविध शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. प्रत्येकाला वेळेवर रक्त मिळावे यासाठी रक्त संकलन आवश्यक आहे. जिल्ह्यात रक्त तुटवडा भासू नये म्हणून रक्तदान मोहिम गरजेची आहे. यामुळे जनसामान्य नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले. स्थानिक दर्डा सभागृहात पोलिस दलाच्या वतीने या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, रेड क्रॉसचे सचिव किशोर दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी पालकमंत्री मार्गदर्शन करीत होते. जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या रक्ताच्या तुटवडयावर मात करण्यासाठी जिल्हा पाेलीस दलाने शुक्रवारी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. पोलीस दलाच्या इतिहासातील हे पहिलेच रक्तदान होते. पहिल्याच रक्तदान मोहिमेत एक हजार रक्त बॉटल्सचे संकलन करण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षकांनी रक्तदान करून रक्तदान मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी पोलीस दलासह स्वयंसेवी संस्था आणि नागरिकही रक्तदानासाठी उत्फुर्तपने पुढे आले होते. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी पोलीस दलाच्या वतीने आयोजीत रक्तदान शिबीरात सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. रक्त संकलनामुळे सरकारी रूग्णालयात गरजवंताना सहज रक्त उपलब्ध होण्यास मदत होईल. आणि वेळेवर उपचार करणे शक्य असल्याचे मत त्यांनी नोंदविले. किशोर दर्डा यांनी रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे. यामुळे अनेकांना जीवदान मिळते. दुर्धर आजारात रक्ताची नितांत आवश्यकता असते. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत नोंदवित रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. पहिल्या रक्तदान शिबीराचे संयोजक म्हणून वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज केदारे यांनी केले होते. यावेळी एसडीपीओ संपतराव भोसले, परिविक्षाधीन डिवायएसपी विनायक कोते, दिनेश बैसाने,अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, एलसीबी पीआय प्रदीप परदेसी, ठाणेदार रवींद्र जेधे (बाभूळगाव), दीपमाला भेंडे (लोहारा), उमेश बेसरकर (कळंब) , प्रकाश तुनकलवार (यवतमाळ ग्रामीण), संजय खंडारे (वडगाव जनगल), अजित राठोड (जिल्हा विशेष शाखा), शासकीय रक्तपेढीचे प्राध्यापक विशाल नरोटे, एकनिल ब्लड बँकेचे सागर तोडकर, डॉ. प्रकाश नंदुरकर, अविनाश लोखंडे, अनंत कौलगिकर, गोपाल शर्मा, संकल्प फाउंडेशन, दिनदयाल प्रबोधनी, दि अर्बन बँक आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला.

अधिक माहिती...
12
May 23
ज्वारी, मका खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता २० मे पर्यंत मुदतवाढ

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत राज्य शासनामार्फत ज्वारी,मका खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडमार्फत ५ खरेदी केंद्र उघडण्यात आलेले आहे. ज्वारी, मका, बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीकरिता आता २० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महागांव तालूक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागांव, पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, पांढरकवडा, झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रिया सहकारी संस्था पाटण, पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु), पुसद, आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपुर, आर्णी यांचा समावेश आहे. या हंगामापासुन ज्या शेतकऱ्यांचा ७/१२ आहे त्याच शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. त्याशिवाय नोंदणी पुर्ण होणार नाही.शेतकरी नोंदणी मोबाईल ॲपव्दारे होत असुन लाईव्ह फोटो देखील मोबाईल ॲपव्दारे अपलोड करता येणार आहे. त्यामुळे शेतमालाची विक्री करावयाची आहे त्याच शेतकऱ्याने लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी स्वत: खरेदी केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. भरडधान्य ज्वारी, मका खरेदी करिता शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी दिनांक ४ मे ते २० मे २०२३ पर्यंत करण्यात येणार असुन प्रत्यक्षात खरेदी दिनांक ४ मे ते ३० जून २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांना ज्वारी, मका नोंदणीसाठी व खरेदीकरिता जिल्हा पणन अधिकारी अर्चना माळवे यांनी आवाहन केले आहे.

अधिक माहिती...
12
May 23
शासन आपल्या दारी’ अभियानाचा आज शुभारंभ

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या दि.१३ मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. राज्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ आणि विविध महत्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. राज्यभर या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कक्षामार्फत राज्यातील अभियानाचे समन्वयन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या अभियानाचे प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुकास्तरावर देखील जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा, तालुकास्तरावर २ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘ शासन आपल्या दारी’ अभियानाच्या शुभारंभाच्या निमित्ताने दौलतनगर येथे बेरोजगार युवक-युवतींकरिता ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा’ व महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला आहे. अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम, महारोजगार मेळावा आणि महाआरोग्य शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
12
May 23
अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचा दौरा

अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे शनिवार दिनांक १३ मे रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दिनांक १३ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजता औद्योगीक प्रशिक्षण संस्था,येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर कार्यक्रमास उपस्थिती व सकाळी ११ वाजता घाटंजीकडे प्रयाण दुपारी १२ वाजता दारव्हा कडे प्रयाण दुपारी १वाजून ४५ मिनिंटानी स्वागत समारोह कार्यक्रामास उपस्थिती.दुपारी २ वाजून १५ मिनिंटानी शासकीय विश्रामगृह दारव्हा येथे आगमन व राखीव दुपारी ३ वाजता दारव्हा येथील विविध विकास कामाचे भुमीपुजन संदर्भात चर्चा.दुपारी ३ वाजून ३० मिनिंटानी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळकडे प्रयाण तर दुपारी ४ वाजून ३० मिनिंटानी खरीप हंगाम आढावा २०२३ बैठक तसेच सायंकाळी ५ वाजून ३० मिनिंटानी जिल्हा खनिज प्रतिष्ठाण च्या नियामक परिषद जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थिती.तसेच ६ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नविन नियोजन भवन इमारतीचे भूमीपुजन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती.व सायंकाळी ६ वाजून १५ मिनिंटानी निवास्थानकडे प्रयाण आगमन व राखीव.

अधिक माहिती...
12
May 23
शहरातील अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिग्रस शहरातील विविध अपूर्ण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व अपूर्ण कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिलेत. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागिय अधिकारी आणि तहसिलदार समाधान गायकवाड, जिल्हा क्रिडा अधिकारी नंदा खुरपुडे, मुख्याधिकारी ज्ञानेश सोनवणे उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 ए या महामार्गाच्या दिग्रस शहरातून जाणाऱ्या मार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकित दिले. या महामार्गांमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात यावे. मानोरा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत महामार्गाचे काँक्रिटीकरण चालू करण्यासही त्यांनी सांगितले. दिग्रस शहरातील टाऊन हॉलचे बांधकामाचा आढावा घेताना टाऊन हॉलचे डिझाईन करून घेण्यात आले तसेच इतर अतिरिक्त बाबींची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी घेऊन वास्तूविशारद यांच्याकडे पाठपुरावा करावा. मंजुरी प्राप्त दोन्ही बाबींचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी कांत्राटदार आणि बांधकाम विभागाला दिल्या. दिग्रस शहरातील हिंदू स्मशानभूमी, भाजी मार्केटच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला दोन्ही बाबीसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून यासाठी तात्काळ निविदा बोलविण्याची कार्यवाही सुरू करावी असे आदेश त्यांनी दिले. दिग्रस शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर देऊन सहा महिने झाले तरी काम सुरु केलेले नाही याबाबत पालकमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली. तालुका क्रिडा संकुलचे बांधकाम 95 टक्के पूर्ण झाले असून वॉल कंपाऊंड, लॉन टेनिस कोर्ट, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक, तसेच इतर खेळांची मैदाने तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. या बैठकिला तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

अधिक माहिती...
11
May 23
*यवतमाळात बिंदुमाधव जोशी स्मृतिदिन साजरा* *ग्राहक चळवळ बळकट करा*-- *डॉ.नारायण मेहरे*

ग्राहक शोषण मुक्तीसाठी स्वयंसिद्ध ग्राहक चळवळ निर्माण करणे हीच ग्राहक चळवळीचे प्रणेते स्व. बिंदुमाधव जोशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ.नारायण मेहरे यांनी येथे केले.ग्राहक पंचायतीचे संस्थापक स्वर्गीय बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अँड राजेश पोहरे, ज्येष्ठ कार्यकर्ते राधामल जाधवांनी यावेळी मंचावर उपस्थित होते. डॉ. नारायण मेहरे पुढे म्हणाले ग्राहकांचे शोषण थांबविण्यासाठी स्व. बिंदुमाधव जोशी यांनी अथक परिश्रम घेऊन ऐतिहासिक ग्राहक संरक्षण कायदा तयार केला. त्याअंतर्गत सर्व व्यवस्था ग्राहकाभिमुख कशा राहतील अशीच कायद्याची रचना केली. परंतु अजूनही हा कायदा सर्वसामान्य ग्राहकापर्यंत पोहोचला नाही,असे सांगून ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी शेवटच्या ग्राहकांना या कायद्याचा लाभ मिळावा यासाठी जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. ग्राहक चळवळ बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अभ्यास करून अधिक वेळ देण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी आपल्या भाषणातून केले. श्री जाधवानी यांनी आपल्या भाषणात स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.सद्यस्थितीत ग्राहकांची कशी लूट होत आहे हेसुद्धा त्यांनी आपल्या भाषणात अनेक उदाहरणे देऊन सांगितले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ग्राहक पंचायतीचे दैवत स्वामी विवेकानंद आणि स्व. बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. अ‍ॅड.राजेश पोहरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृप्ती गोळे यांनी केले तर शहर सचिव डॉ शेखर बंड यांनी उपस्थितांचे आभार मानले. सिव्हिल लाईन्स येथील किराणा असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा संघटक हितेश सेठ, अनंत भिसे, मोहन कुलकर्णी, चंद्रकांत गड्डमवार, प्रकाश चणेवार,प्रकाश रेगुंडावार, संतोष डोमाळे ,शिवदासजी मानकर, विक्रमभाई शहा,वंदना बोरीकर ,वंदना बोरुंदीया या कार्यकर्त्यांसह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

अधिक माहिती...
11
May 23
बॅंकर्स जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकित सूचना

खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. यावर्षी सर्व बँकांना मिळून दोन हजार कोटी रुपयांचा लक्षांक असून आजपर्यंत केवळ एकवीस टक्के कर्ज वाटप झाले आहे. ही रक्कम मागिल वर्षाच्या तुलनेत कमी असून सर्व बँकांनी त्यांना दिलेल्या लक्षांकाच्या ५० टक्के कर्ज वाटप मे अखेरपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल भवन येथे आज बॅंकर्सची जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी त्यांनी सदर सूचना दिल्यात. या बैठकिला नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक दीपक पेंदाम, लिड बँक मॅनेजर अमर गजभिये, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी क्रांती काटोले, आत्म्याचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, एस बी आय चे श्रिकांत कोहळे, बॅंक ऑफ बरोदा आर एम सोमकुवर, बॅंक ऑफ ईंडियाचे सचिनचंद्र पाटिदार, वायडीसीसी चे श्री सिद्दिकी तसेच इतर बँकांचे जिल्हा समन्वयक व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पीक कर्ज, पी एम किसान योजनेसाठी आधार सिडिंग महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तसेच शासकीय अनुदानित योजनाचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध झाल्यासच ते उपयुक्त ठरते. त्यांना बियाणे, खते आणि लागवडीची तयारी करण्यासाठी कर्जाची रक्कम कामी येते. त्यामुळे जुन अखेरपर्यंत पिक कर्जाचा १०० टक्के लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न बॅंकांनी करावा. यावर्षी केंद्र सरकार सोबतच राज्य सरकारसुद्धा पी एम किसान योजनेसारखी योजना राबवित आहे. त्यामुळे शेतक-यांचे ई- केवायसी आणि आधार सिडिंग करणे महत्वाचे आहे. जिल्ह्यात अद्याप ३६ हजार ८०६ पात्र शेतक-यांचे ई-केवायसी व आधार सीडिंग शिल्लक आहे. त्यापैकी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडे सर्वाधिक २५ हजार २८० शेतकऱ्यांचे आधार ई -केवायसी व सीडिंगचे काम शिल्लक आहे. यांनी यासाठी विशेष व्यव्स्था करुन २५ मे पर्यंत सर्व बॅंकांनी आधार सीडिंग पूर्ण करावे. त्यासाठी ग्रामस्तरावर सुचना देऊन शेतक-यांची यादी आणि बॅंकेचे नाव कळवावे. तसेच यातील मयत अपात्र वगळण्याचे कामही पूर्ण करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात. बैठकिला येतांना बॅंक प्रमुखांनी परिपूर्ण माहिती घेऊन उपस्थित रहावे असेही त्यांनी सांगितले.

अधिक माहिती...
11
May 23
निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळा मान्सुन पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश

मान्सून कालावधीत वीज पडणे, नदी-नाल्यांना पूर येणे, साथीचे आजार, धरणसाठ्यातून पाण्याचा विसर्ग अशा बाबी हातळण्यातील निष्काळजीपणामुळे होणारी जीवित हानी टाळण्यासाठी नागरिकांमध्ये योग्य माहिती देवून जनजागृती करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. मान्सुन पुर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा साथरोग अधिकारी तन्वीर शेख, मुख्याधिकारी डोल्हारकर तसेच दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सिंचन मंडळाचे सर्व कार्यकारी अभियंता, उपविभागीय अधिकारी, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, सर्व नगरपरिषद मुख्याधिकारी, तहसिलदार, कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे यांनी याप्रसंगी जिल्ह्यातील पूर प्रवण गावांचे ओळख करणे, मुख्य नद्यांच्या प्रवाहामधील अडथळे काढणे, नैसर्गिक जलाशयांचे साफसफाई करणे व त्यातील गाळ काढणे, नदीकाठावरील बंधारे व साठवण तलावाचे बळकटीकरण व डागडूजी आदि कामे मे महिन्यापुर्वी करण्याचे निर्देश दिलेत. जिल्ह्यातील सर्व धरणे १०० टक्‍के सुरक्षीत असल्‍याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिल्या. सर्व प्रमुख धरणावर नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, धरणातील पाण्याच्या साठ्यावर लक्ष ठेवणे, धरणाच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावकऱ्यांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबद्दल सावधगिरीचा इशारा देणे इत्‍यादी बाबत कृती आराखडा तयार ठेवण्यास सांगितले. पुराच्या पाण्यामुळे संपर्क तुटणा-या अतिसंवेदनशील गावांची यादी करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यात याव्या. बचाव पथकासाठी उपलब्ध असलेले जेसीबी, क्रेन, गाडी, ट्रक, व्हॅन, मॅन पावर इत्यादी साहित्य सामुग्री अद्यावत करण्‍यात यावी. नगर परिषद क्षेत्रातील नाले सफाई करणे. नियंत्रण कक्षाचे कामकाज 24 तास चालू ठेवणे, आपत्ती पूर्व सूचना देणारे संबंधित संस्थाचे दूरध्वनी ‌क्रमांकाची यादी अद्ययावत करणे व त्याची वेळोवेळी पडताळणी करणे, आपत्ती विषयक पूर्वसूचनांचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. पुलावरून पाणी वाहून जाण्याची शक्यता लक्षात घेता अशा ठिकाणी कोणीही पुराच्या पाण्यात जाणार नाही याबाबत स्थानिक अधिकारी कर्मचारी यांनी नियोजन करावे व संबंधीतांना आवश्यक पूर्वसूचना द्याव्या. तसेच नदी पातळी वाढल्यावर तेथे कोणी पोहायला जाणार नाही, याबाबत नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यास सांगितले. मान्सून कालावधीत विज पडून मोठ्या प्रमाणात जिवित हानी होत असते. हे टाळण्यासाठी भारतीय मौसम विभागाने तयार केलेले ‘दामिनी’ ॲपचा वापर सर्वांनी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. दामिनी ॲप मध्ये जेथे वीज पडणार आहे त्या भागाची स्थलदर्शक माहिती विज पडण्याच्या 15 मिनिटापुर्वी दर्शविण्यात येते. त्यामुळे त्या भागातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईलवर पूर्वसुचना देवून खबरदारी घेण्याचा मेसेज करून जीवीत हाणी टाळता येईल. विद्युत पुरवठा, दूरध्वनी, रस्ते व पुल आपत्तीच्या वेळीसुध्दा सुरळीत चालू राहतील याची खबरदारी घ्यावी. अत्यावश्यक वस्तूंचा साठा , पूर परिस्थितीत व पूर परिस्थिती ओसरल्यानंतर लागणारे औषधीद्गव्यांचे पूर्व नियोजन, प्राथमिक आरोग्य केंद्गासाठी लागणार्‍या औषधांचा साठा सुनिश्चित करून, साथ रोगांवर नियंत्रण व उपाययोजनेचा आराखडा तयार ठेवण्यात यावा. जनावरांचे औषधांचा मुबलक साठा तसेच जनावरांसाठी पुरेसा चाऱ्याचा साठा ठेवणे, आपत्कालीन परिस्थितीतही शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यांचेही नियोजन करण्‍याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले. बांधकाम सुरू असलेले वाहतुकीचे महत्वाचे मार्ग पावसाळ्यापुर्वी पूर्ण करणे व ते विहित कालावधीत पुर्ण होणे शक्य नसल्यास पर्यायी मार्गाची व्यवस्था देखील पावसाळ्यापुर्वी पुर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी बैठकीत पीपीटीद्वारे माहितीचे सादरीकरण केले.बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

अधिक माहिती...
11
May 23
प्रदूषणविरहित एस टी बसचे पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ आगारात दाखल झालेल्या नविन तंत्रज्ञानाच्या बी.एस.६ प्रदुषण विरहीत १० साध्या बसेसचे लोकार्पण आज अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी फीत कापून व पूजा करून बसेसचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी बसची पहाणी केली व बस चालवण्याचा आनंदही घेतला. उपस्थित अधिका-याकडून त्यांनी अद्यावत यंत्रणा असलेल्या बसची इत्यंभुत माहिती जाणुन घेतली. अशा आणखी नविन ४० बसेस विभागास प्राप्त करून देण्याकरिता पाठपुरावा करून बसेस मिळवून देण्याचे आश्वाशीत केले. बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत व बस स्थानकातील रोड दुरूस्ती करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यानी दिल्या. उपस्थित चालक,वाहक यांच्याशी त्यांनी संवाद साधुन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी उपमहाव्यस्थापक श्रीकांत गभणे, यवतमाळ आगर प्रमुख दिप्ती वड्डे, विभाग नियंत्रक अमोल गोंजारी, विभाग वाहतूक अधिकारी उमेश इंगळे, कामगार अधिकारी सुनिल मडावी, विभागीय लेखा अधिकारी गणेश शिंदे,वाहतूक निरिक्षक हरीष थोरात तसेच बस स्थानकातील प्रवासी उपस्थित होते.

अधिक माहिती...
10
May 23
जिल्ह्यात फोर्टिफाईड तांदळाचे वितरण सुरू फोर्टिफाईड तांदूळ पोषणयुक्त व गुणसंवर्धित

पोषणतत्व व गुणसंवर्धित फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करण्यास केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत लाभार्थ्यांना राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही प्रधानमंत्री यांची महत्वाकांक्षी योजना असून त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात सदर फोर्टिफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झालेली आहे. फोर्टिफाईड तांदुळ थॅलेसिमिया व सिकलसेल, ॲनेमिया रोखण्यासाठी उपयुक्त आहे. फोर्टिफाईड तांदुळामध्ये लोह, फॉलिक ॲसिड, विटामिन बी 12 सुक्ष्म अन्नद्रव्ये असून लाभार्थ्यांच्या आरोग्याचे दृष्टीने शासनाने जाणीवपुर्वक वितरण सुरु केले आहे. तसेच सदरचा फोर्टिफाईड तांदूळ सकृतदर्शनी तांदळात भेसळ असल्यासारखा वाटू शकतो. हा तांदुळ पाण्यावर तरंगू शकतो. पण तो सामान्य तांदळा प्रमाणे सेवनासाठी वापराला जातो. फोर्टीफाईड तांदुळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका/अडचणी असल्यास संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 07235- 242246 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी केले आहे.

अधिक माहिती...
9
May 23
समाजातील अंधश्रद्धा दूर करून विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे

बामसेफ तथा भारत मुक्ती मोर्चा जिल्हा युनिट यवतमाळ यांच्या विद्यमाने दि. ७/५/२०२३ ला सहकार भवन, आर्णी रोड, यवतमाळ येथील एक दिवशीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे उद््घाटन प्रदीप वादाफळे (प्रदेशाध्यक्ष, ओ.बी.सी. आरक्षण समर्थक परिषद) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर मुख्य मार्गदर्शक डी.आर. ओहोळ राष्ट्रीय प्रधान महासचिव बामसेफ, नईदिल्ली यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून सुरेश मडावी, अधिक्षक अभियंता महावितरण कंपनी यवतमाळ, अनिल तोडे कार्यकारी अभियंता, मनोहर सहारे, सेवानिवृत्त अभियंता, संजय मानकर सेवानिवृत्त अभियंता, राजुभाऊ मडावी, प्रोटानचे गजानन उल्हे, जिल्हाध्यक्ष किशोर राठोड,कनाके यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थितांनी थोर समाज से वकांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून प्रशिक्षणात सुरूवात करण्यात आली. या प्रसंगी प्रास्ताविक विजय सोनुले यांनी केले. त्यानंतर मुख्यमार्गदर्शक डी. आर.ओहोळ यांनी शिक्षणातून समाजातील अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे व विज्ञानवादी दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, जीवनात वेळ ही मौल्यवान आहे त्यामुळे जीवनात वेळेला अतिशय महत्त्व आहे. प्रशिक्षणार्थ्यांनी वेळेला महत्त्व द्यावे प्रशिक्षण हे शत्रुसाठी जहर असून आपल्यासाठी अमृत आहे. असे ते म्हणाले. कोणत्याही विचारधारेला तर्क लावून विचार करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे शिक्षण ही व्यापक संकल्पना आहे. शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. खरं आणि खोटं यामध्ये ओळखण्याचे कौशल्य म्हणजे शिक्षण. शिक्षणातून खर्‍याचे समर्थन व खोट्याचा विरोध करता आला पाहिजे. शिक्षणातून समजदार समाज निर्माण झाला पाहिजे. असे महत्वपूर्ण विचार उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना दिले. या प्रशिक्षणाचे सुत्रसंचलन प्रदीप जाधव यांनी केले. या प्रसंग जिल्हातील विविध संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. असे राजहंस मेंढे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.

अधिक माहिती...
9
May 23
शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे 13 मे रोजी सकाळी १० वाजता युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराकरिता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड उद्घाटक म्हणून तर आमदार मदन येरावार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. या शिबिरामध्ये इयत्ता १०वी, १२वी नंतर काय ? भविष्यातील रोजगाराच्या संधी,व्यक्तिमत्व विकास, बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण व रोजगाराच्य संधी ई.बाबत विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहे. तरी या करिअर शिबिराकरिता जिल्ह्यातील सर्व १०वी./१२वी.परीक्षा दिलेले विद्यार्थी तसेच त्यांचे पालक आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांनी उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आव्हान संस्थेचे प्राचार्य व्ही.जे.नागोरे यांनी केले आहे.

अधिक माहिती...