या उपक्रमांतर्गत खालील उपक्रमांचे नियोजन करण्यात यावे

- स्वच्छ भारत अभियान
- कौशल्य विकास
- एक भारत श्रेष्ठ भारत
- कृषी विपणन मधील एकवाक्यता
- आत्मनिर्भर भारत
- सबका साथ सबका विकास
- स्वस्थ भारत
- आरोग्य भारत
- आत्मनिर्भर भारत
- वन नेशन वन रेशन
- डिजिटल इंडिया

अंमलबजावणी या उपक्रमांतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम

21
Oct 23
आयटीआय उमरखेड येथे प्रधानमंत्री दौड मॅरेथॉन स्पर्धा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवस व विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून उमरखेड येथे पीएम स्किल रन या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ गो. सी. गावंडे कॉलेजचे प्राचार्य डॉ. कदम, श्री समर्थ फॅब्रिकेटर्स अँड स्ट्रक्चरल उमरखेडचे रामेश्वर बिच्चेवार, श्रीराम वर्कशॉपचे गणेश शिंदे उमरखेड यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले विजेत्या व सहभागी स्पर्धकांचा पारितोषिक वितरण समारंभ नितीन भुतडा व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये महिला व पुरुष गट यामध्ये एकूण 220 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदविला. स्पर्धेमध्ये पुरुष गटात राम विलास राठोड याने प्रथम क्रमांक ब्रम्हा भिकु आडे याने द्वितीय क्रमांक व चेतन शंकर बाभुळकर याने तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटामध्ये काचंन गजानन जाधव हिने प्रथम, भक्ती दिनेश हातगांवकर हिने द्वितीय तर पूजा गजानन राठोड हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आले. सदर स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी युनियन बँक ऑफ इंडिया ढाणकी, श्रीराम प्लायवूड अँड हार्डवेअर पुसद, माहेश्वरी एजन्सी उमरखेड, गोदावरी अर्बन बँक उमरखेड यांच्यावतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले. तसेच नितीन भुतडा यांच्यावतीने स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना नास्ता व चहा तसेच रामेश्वर बिच्चेवार यांच्यावतीने पाणी व्यवस्था करण्यात आली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य डी.पी.पवार व संपूर्ण आयटीआयची टीम तसेच आरोग्य पथक, वाहतूक पोलीस यांनी सक्रिय सहभाग घेऊन पीएम स्किल रन मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

अधिक माहिती...
12
Oct 23
*इंदिरा महाविद्यालय कळंब येथे रसायनशास्त्र अभ्यासमंडळाची स्थापना*

स्थानिक इंदिरा महाविद्यालय कळंब येथील रसायनशास्त्र विभागातर्फे केमिकल सोसायटीची स्थापना करण्यात आली .या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. प्रशांत जवादे , प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा. सरोज लखदिवे, इंदिरा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय , राळेगाव येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सतीश जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रशांत जवादे सरांनी अभ्यासमंडळाचे उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दशरथ चव्हाण यांनी यावर्षी विभागातर्फे होणाऱ्या उपक्रमांबद्दल माहिती दिली व रसायनशास्त्र अभ्यासमंडळ मधील नवनियुक्त विद्यार्थ्यांची नावे जाहीर केली. रसायनशास्त्र अभ्यासमंडळात अध्यक्ष क्रांतीकुमार अलोणे, उपाध्यक्ष युसरा काझी , कोषाध्यक्ष कु. काजल इंझाळकर, सचिव अजिंक्य धोबे ,सदस्य म्हणून विश्वजीत भुजाडे ,कु. पायल चांदोरे, तुबा काझी व कु. शिवानी डोडेवार या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. निळकंठ नरुले यांनी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्सा काझी तर आभार प्रदर्शन प्रा. स्नेहल खांडेकर यांनी केले .या कार्यक्रमासाठी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. प्राची बोंडे ,डॉ. सुरज देशमुख , श्री नरेश कोकांडे व रसायनशास्त्र पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले .या कार्यक्रम प्रसंगी डॉ. पांडुरंग इंगळे, प्रा. शितल राऊत ,डॉ. शरयू बोंडे ,प्रा. राहुल सिन्हा , प्रा. सखाराम सांगळे तसेच पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.

अधिक माहिती...
9
Oct 23
इट राईट मिलेट मेळाव्याचे आयोजन

शहरात अन्न व औषध प्रशासन विभाग व माहेश्वरी मंडळ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक तृणधान्याचा आपल्या आहारात समावेश करण्याबाबत जनजागृतीसाठी महेश भवन, यवतमाळ येथे इट राईट मिलेट मेळावा नुकताच संपन्न झाला. नागरिकांनी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मिलेट्स रेसीपी व इतर पौष्टिक पदार्थांचा आस्वाद घेतला. या मेळाव्याचे उद्घाटन श्यामसुंदर काबरा यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ जयश्री उघाडे, माहेश्वरी मंडळाचे चंद्रकांत बागडी, विजय लाहोटी, शोभा मुंधळा उपस्थित होत्या. यावेळी डॉ जयश्री उघाडे यांनी जंक फूडचे दुष्परिणाम, मिलेट्सचा आहारातील महत्त्व सांगितले व विविध शंकांचे निरसन केले. सन 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामासह सकस व पोषण मुल्यांनी युक्त असे आहार घेणे आवश्यक आहे. भरड धान्य हे भारतीय अन्न संस्कृतीचा महत्त्वाचा घटक आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेवून दैनंदिन आहारात तृणधान्याचा वापर करणे आजच्या फास्टफुडच्या काळात गरजेचे बनले आहे. भगर, नाचणी, राजगिरा, कुट्टु, बाजरी, ज्वारी, कोदो, कुटकी, कांगनी, सावा इत्यादी भरडधान्यांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण कमी आढळते. त्यामुळे शरीरातल्या शुगर, कोलेस्टेरॉलच्या समस्या दुर होतात व ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मधुमेहच्या रुग्णांनी आहारात मिलेट्सचा समावेश केल्यास शुगर नियंत्रणात राहते. भरड धान्य हे कॅल्श‍ियम, आयर्न, फायबर व विटॅमीन्सने समृध्द असतात. कॅल्श‍ियममुळे हाडे मजबुत होतात, फायबरमुळे पाचन होण्यास मदत होते, आयर्नची भरपुर मात्रा असल्याने रक्त शुध्द होते व ते महिलांसाठी सुपर फुड म्हणून काम करते, असे मत अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे यांनी प्रास्ताविकात मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी घनश्याम दंदे, अमित उपलप व माहेश्वरी मंडळाचे महेश मुंदडा, अॅड वरुण भुतडा यांनी प्रयत्न केले.

अधिक माहिती...
9
Oct 23
डाक योजनांच्या जनजागृतीसाठी डाक सप्ताहाचे आयोजन

भारतीय डाक विभागाच्यावतीने संपूर्ण देशभरात डाक सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ डाक विभागाच्यावतीने दि. 9 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. हा डाक सप्ताह 13 ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार असून या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डाक विभागाच्या विविध योजना तसेच डाक खात्याच्या कार्यप्रणालीची माहिती जनतेला देवून जनजागृती करणे हा या मागचा उद्देश आहे. राष्ट्रीय डाक सप्ताहाचे निमित्ताने दि. 11 ऑक्टोबर रोजी डाक विभाग, यवतमाळ व डाक तिकीट संग्रह संघ, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ अशा डाक तिकीटांचे भव्य प्रदर्शन महिला विद्यालय, महादेव मंदिर रोड, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येत आहे. डाक तिकीट संग्रह करणे व त्यामधून आपल्या देशातील थोर क्रांतिकारी पुरुषांची, समाजसेवकांची माहिती तसेच कला, संस्कृती याची माहिती व्हावी हा या प्रदर्शनी मागचा मुख्य हेतू आहे. या प्रदर्शनीमध्ये निशुल्क प्रवेश आहे. या प्रदर्शनीला जनतेने तसेच शाळा, महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे भेट देऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन यवतमाळ विभागाचे डाकघर अधीक्षक गजेंद्र जाधव, डाक तिकीट संग्रह संघाचे समन्वयक डॉ. योगेंद्र मारू यांनी केले आहे.

अधिक माहिती...
9
Oct 23
मियावाकी प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धनाची प्रेरणा देणारा

दिग्रसच्या पर्यटन वैभवात भर घालणारा अटल आनंदवन घनवन (मियावाकी) प्रकल्प दिग्रसवासियांसह सर्वांच्या पर्यटनासाठी उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धन व संरक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. पुसद वन विभागाने दिग्रस शहराजवळील भवानी टेकडी परिसरामध्ये उभारलेल्या अटल आनंदवन घनवन या मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले, पुसद वन विभागाचे उपवनसंरक्षक डॅा. बी.एन.स्वामी, सहायक वनसंरक्षक साईनाथ नरोड, तहसिलदार सुधाकर राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, सुधीर देशमुख, रविंद्र अरगडे, ॲड. विवेक बनगिनवार, प्रणित मोरे आदी उपस्थित होते. पालकमंत्री संजय राठोड यांनी मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन म्हणाले की, वन विभागाने उजाड जमिनीवर विविध झाडे लावून परिसराचा कायापालट केला आहे. ही कौतुकाची बाब आहे. आज आपण एका संक्रमण परिस्थितीला सामोरे जात आहोत. ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक भागात मानव-वन्यप्राण्यांत संघर्षाच्या तक्रारी होत आहेत. आपण वन्यजीवांच्या हद्दीत चाललो का, हा देखील विचार करण्याची गरज आहे. ऋतुचक्र बदलल्याचे अनुभव येत आहे. पूर्वीच्या ऋतुचक्रासाठी वनसंरक्षण केले पाहिजे. जैवविविधतेचे चक्र पाळले पाहिजे. लोकांमध्ये वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याची भावना रुजवण्याची गरज आहे. वन संरक्षण केल्यास निसर्ग टिकून राहील. वन विभागही त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत आहे. नव्या पिढीला वने, पशुपक्षी, वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोणातून या भवानी टेकडी उद्यानात सुविधा निर्माण करावी. राज्याचा वन मंत्री असतांना लोकांच्या मागणीनंतर वन विभागाच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून दिग्रसवासियांसह शाळकरी विद्यार्थी, पर्यटनप्रेमींसाठी पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. येणाऱ्या काळात या भागाचा अजून विकास होणार आहे. वन विभागाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. या परिसरात पर्यटक, विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनसंवर्धनाविषयी माहिती होण्यासाठी सर्वस्तरावरचे गार्डन तयार झाले पाहिजे. वन विभाग हा जनहिताचे कार्य करणारा विभाग आहे, ही भावना नागरिकांनी बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. राठोड यांनी व्यक्त केली. यावेळी यवतमाळ वन वृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले यांनी प्रास्ताविकात मियावाकी प्रकल्पाची आणि वनविभागाच्या विविध योजनांची माहिती देवून वनसंवर्धनाचे आवाहन केले. मियावाकी प्रकल्प : मियावाकी ही जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी तयार केलेली पद्धत आहे. हे जंगल जलद वाढण्यास, घनदाट आणि नैसर्गिक होण्यास मदत करते. या पद्धतीमध्ये उजाड जमीनीवरही अनेक प्रकारची झाडे एकत्र लावता येतात, ज्यामुळे प्रजातींमध्ये संतुलित वातावरण निर्माण होते. परिणामी, झाडे दहापट वेगाने वाढतात आणि जंगले सामान्यापेक्षा ३० पट घनदाट होतात. या पद्धतीमध्ये केवळ स्थानिक देशी झाडे लावली जातात. याच पद्धतीने दिग्रसमधील भवानी टेकडी परिसरातील कोलुरा गावात वन विभागाने एक हेक्टर मुरबाड जमिनीचा पोत सुधारुन वनीकरणासाठी जागा तयार करुन या जागेवर तीस हजार रोपांची लागवड केली आहे. या अटल आनंदवन धनवन (मियावाकी) प्रकल्पात आवळा, आंबा, पेरु, फनस, वड, पिंपळ, बकुली, निम, कांचन, सिताफळ, चिकू, डाळींब अशी विविध रोपे लावण्यात आली आहे.

अधिक माहिती...
9
Oct 23
जिल्हाधिकाऱ्यांची स्त्री रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयास भेट व पाहणी

जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच रुग्णालयीन सेवा, सुविधेच्या उपलब्धतेबाबत त्यांनी आरोग्य प्रशासनास निर्देश दिले. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा.मनोज तगडपल्लेवार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॅा.रवी पाटील उपस्थित होते. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी प्रसुतीगृह, वार्ड, शस्त्रक्रीयागृहाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॅा.आनंद आशिया, मेडीसिन विभाग प्रमुख डॅा.बाबा येलके, बालरोग विभाग प्रमुख डॅा.अजय केशवाणी, स्त्रीरोग विभागाचे डॉ. वऱ्हाडे, डॅा.अजय कुसुंबिवाल यांच्यासह विविध विभागाचे डॅाक्टर्स उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी रुग्णसेवा व स्वच्छतेचा सविस्तर आढावा घेतला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील बालके व महिलांच्या वार्डांसह सर्वच वार्डांची त्यांनी पाहणी केली. वार्डातील स्वच्छता, रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधांची पाहणी केली तसेच रुग्णांशी संवाद देखील साधला. महाविद्यालयातील औषधीसाठा, अत्यावश्यक यंत्रसामुग्रीची देखील पाहणी केली व सुचना केल्या. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घ्या. रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्त्री रुग्णालयातील अडीअडचणी व समस्यांची देखील त्यांनी माहिती घेतली. अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, असे ते म्हणाले. बालमृत्यू दर पुर्वी 4.6 टक्के इतका होता आता तो 3.7 टक्के इतका खाली आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. औषधे खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयांना आवश्यक असलेल्या औषधे खरेदीसाठी निधी दिला जातो. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील औषधींसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक औषधे खरेदीसाठी महाविद्यालयाला निधी निधी दिला जातो. या तिनही संस्थांच्या औषधे खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी सांगितले. जिल्ह्यात कुठेही औषधांची कमतरता नसल्याचे ते म्हणाले.

अधिक माहिती...
6
Oct 23
गांधी जयंती निमित्य भव्य रॅलीचे आयोजन

जागतीक लॉयन्स सेवा सप्ताहाची सुरुवात आज 2 ऑक्टोंबर पासून सुरु झाली. या दिवशी लॉयन्स क्लब, यवतमाळ व वेदधारीणी शाळा, पिंपळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने शांतता मिरवणुकीचे आयोजन सकाळी 9 वाजता वेदधारीणी शाळे जवळून करण्यात आले. या मिरवणुकीची सुरुवात एम. जे. एफ. मनोहर सहारे (झोन चेअर पर्सन) व शाळेचे संचालक डफले सर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. यासाठी 400 ते 500 विद्यार्थी व लॉयन्स क्लबचे 25 मेंबर उपस्थित होते. या मध्ये मुलांच्या घोषणांनी परिसर दणानुन गेला. कार्यक्रमाची रुपरेषा कार्यक्रम प्रमुख एम. जे. एफ. सुनिल जोशी तर अध्यक्ष मंगेश शिरभाते यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये मुलांकडून स्वच्छतेची शपथ घेतली. त्यानंतर एम. जे. एफ. मनोहर सहारे यांनी मुलांना उपदेशपर भाषण केले. याची सांगता व आभार प्रदर्शन सचिव संजय देशपांडे यांनी केले. लॉयन्स क्लब तर्फे सर्व मुलांना भेट वस्तुचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमला लॉयन्स क्लब तर्फे अभय गांधी, अशोक भंडारी, विजय खोरीया, विजय लाहोटी, मनोज अग्रवाल, शैलेश सिकची, निलीमा मंत्री, संजय मंत्री, राजकुमार अग्रवाल, रागीनी गावंडे, माधवर रुईकर, नारायण धुत, पंकज खवासे इत्याची उपस्थित होते. असे प्रसिध्दी प्रमुख शैलेश सिकची यांनी कळविले आहे.

अधिक माहिती...
6
Oct 23
दिग्रस तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण

दिग्रस तालुक्यातील कलगाव, कांदळी येथील एकूण ६ कोटी ६३ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकोपयोगी विकासाची कामे अविरत सुरु राहतील, असे प्रतिपादन त्यांनी आयोजित कार्यक्रमात बोलतांना केले. यावेळी कलगाव येथील आरोग्यवर्धीनी उपकेंद्राची नवीन इमारत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून शासनाचे उपक्रम राबवून परिसरातील गोरगरिब, महिलांना आधार द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. या भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॅा. आशिष पवार, तहसिलदार सुधाकर राठोड, माहिती अधिकारी पवन राठोड, गटविकास अधिकारी खारोडे, विविध विभागाचे अधिकारी, कलगावच्या सरपंच आस्मीता मनवर, कांदळीच्या सरपंच शेवकाबाई राठोड, कलगावच्या उपसरपंच साजेपरवीन अलीमोद्दीन शेखआणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, शहरी आणि ग्रामीण भागात रस्ते व पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा यासह विविध विकासकामे केली जात आहेत. विकासाची ही कामे अविरत सुरु राहील. नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहोत. होतकरू तरुणांसाठी ग्रामपंचायत तिथे अभ्यासिका, रोजगार मेळावे, आरोग्य शिबीर, विविध योजनांमधून घरकुल, वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी झटका मशीन, मागेल त्याला विहिर अशा विविध योजना, उपक्रम राबविल्या जात आहे. त्यातून लोकांची कामे केली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते कलगाव येथील तांदळी, आष्टा, कलगाव, वडगाव रत्यावरील पुलाचे बांधकाम, जल जीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम, आरोग्यवर्धीनी उपकेंद्र नवीन इमारतीचे बांधकाम, श्री महादेव मंदिरासमोर सांस्कृतिक भवनाचे बांधकाम, पंचमाता मंदिरासमोर सभागृहाचे बांधकाम, संत सेवालाल महाराज व जगदंबा माता मंदिरासमोर सभागृहांचे बांधकाम, नळ जोडणी, अंगणवाडी, सिमेंट रस्ते, नवीन विद्युत रोहित्र आणि स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम असे ४ कोटी ६३ लाख रुपये आणि कांदळी गावाजवळ पुलाचे बांधकाम, जलजीवन मिशनअंतर्गत पाणी पुरवठा, सिमेंट रस्ता, नळ जोडणी, नवीन रोहित्र उभारणी अशा २ कोटी एक लाख रुपये असे एकूण ६ कोटी ६४ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची भेट काही दिवसांपूर्वी कांदळी येथील शेतकरी गणेश प्रल्हाद चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची पालकमंत्री संजय राठोड यांनी भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. त्यांना शासनमार्फत योग्य ती मदत करण्यात येईल, असे आश्वस्त केले.

अधिक माहिती...
6
Oct 23
लोकशाही दिनात ६० तक्रारी प्राप्त ; प्रकरणे निकाली काढा - जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण ६० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि ३ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्याभरातून आलेल्या सामान्य नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरीक, व्यावसायिकांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांच्या समस्या, अडीअडचणी जाणून घेत त्यांची प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विविध प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

अधिक माहिती...
5
Oct 23
सेंट अलॉयसिस इंग्लिश मिडियम स्कुल यवतमाळ येथे विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास साध्य व्हावा यासाठी सेंट अलॉयसिस इंग्लिश मिडियम स्कुल धामणगांव रोड, यवतमाळ येथे विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनीच्या अध्यक्षस्थानी सेंट अलॉयसिस स्कुलच्या प्राचार्या सिस्टर फातिमा फर्नाडिस यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे, गटशिक्षणाधिकारी विद्या वैद्य, विस्तार अधिकारी दिपीका गुल्हाने, साधन व्यक्ती शुभांगी भोयर उपस्थित होत्या. यावेळी `डायव्हर्स नेटवर्क ऑफ सायन्स’ या विषयावर आधारीत विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. विज्ञानातून विद्यार्थ्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा व अंधश्रद्धा नाहीशी व्हावी या दृष्टिने हे विज्ञान प्रदर्शनी महत्वपूर्ण आहे. या विज्ञान प्रदर्शनीत इ. १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विषय निहाय वर्ग ५ ते १० चे २६२ प्रयोगाचे सादरीकरण केले. तसेच वर्ग १ ते ४ चे १०० विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण केले. असे एकूण ३६२ प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले या विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विज्ञान प्रयोगाचे परिक्षक म्हणून निलेश तिखीले, प्रशांत त्रिपाठी, अभय देशपांडे, श्रीमती रचना राऊत यांनी काम पाहिले. विज्ञान प्रदर्शनीत अव्वल ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनी यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, श्रीमती सुजन मँथू, श्रीमती वीटोरिया रेड्डी, श्रीमती डिना जेकप, श्रीमती मोहीनी चिकटे, श्रीमती वैशाली देशमुख, श्रीमती ज्योत्स्ना गुल्हाने, श्रीमती उषा सि.के., श्रीमती सिमा जोशी तसेच शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.असे एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून राजहंस मेंढे यांनी कळविले आहे.

अधिक माहिती...
5
Oct 23
2027 पर्यंत यवतमाळ जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणनुसार वर्ष २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग संसर्ग हे उदिष्ट लक्षात ठेवुन कुष्ठरोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हयाचा धोरणात्मक कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्याचे बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा मुख्य वनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. गोपाळ पाटील हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले. जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, सहाय्यक संचालक डॉ. आडकेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. गोपाळ पाटील यांच्या नियोजनाखाली 2027 पर्यंत यवतमाळ जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येणार असून जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत प्रभावी आरोग्य शिक्षण देऊन कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे, सर्व स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. तसेच गावनिहाय कुष्ठरोगाबाबत प्रभावी घरोघर सर्वेक्षण करुन निघालेल्या सर्व संशयीत कुष्ठरुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, त्यांच्या सहवासीतांना कुष्ठरोग प्रतिबंधात्मक औषधोपचार देणे सुरु करणे, शोधलेल्या तसेच जिल्ह्यात जोखमी भागामध्ये कुष्ठरोगाबाबत विविध मोहीम घेण्यात येणार आहे.या मोहिमेत केंद्र सरकारच्या आयुष्मान भव उपक्रमाव्दारे सर्व शासकीय दवाखान्यात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या नागरीकांची कुष्ठरोग विचारात घेऊन पूर्ण तपासणी करणे याप्रकारच्या कृती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

अधिक माहिती...
5
Oct 23
‘वंदन’ सन्मान सोहळा

मोहनलाल-शांताबाई राठी चॅरिटेबल फॉउंडेशन यवतमाळच्या वतीने दिला जाणारा २०२३ यावर्षीचा प्रतिष्ठेचा 'वंदन' सन्मान सोहळा यावर्षी अकोला येथील एकविरा मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या सुचिता व श्रीकांत बनसोड या दाम्पत्यास जाहीर झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्थानिक महेश भवनमध्ये होणार आहे. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह व ५१ हजार असे वंदन पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा वंदन सन्मानाचे आठवे वर्ष आहे. बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक यांच्या अध्यक्षेतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शिवम अध्यात्मिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान धारेवाडी ता. कऱ्हाड येथील सुप्रसिद्ध वक्ते इंद्रजित देशमुख हे उपस्थित राहतील.

अधिक माहिती...
4
Oct 23
अतिवृष्टी, पूरबाधितांच्या मदतीसाठी जिल्ह्याला 204 कोटींचा निधी

जिल्ह्यात जून ते जुलै या कालावधीत अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे शेतीपिक व शेतजमिनीचे नुकसान झालेल्या बाधितांना मदत देण्यासाठी जिल्ह्याला 204 कोटी 87 लाख रुपयास शासनाने मंजुरी दिली आहे. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नातून अमरावती विभागात जिल्ह्याला सर्वाधिक निधी मंजूर झाला आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे दोन हेक्टरपर्यंत बाधित क्षेत्र 2 लाख 17 हजार 241.57 हेक्टर एवढे आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या 2 लाख 63 हजार 609 आहे. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 185 कोटी 10 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त 10,757.73 हेक्टर बाधित क्षेत्रासाठी 19 कोटी 76 लाख 63 हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीबाधितांच्या मदतीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 1 हजार 71 कोटी 77 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा जीआर महसूल व वन विभागाकडून बुधवारी जारी करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता व इतर नुकसानीकरिता बाधितांना मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे. अमरावती व औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी जून ते जुलै या महिन्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. त्यानुसार निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली आहे. हा निधी डीबीटी प्रणाली मार्फत वितरित करावे. सर्व लाभार्थ्यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्यात यावी. महसूल व वन विभागाच्या दि.27 मार्च 2023 च्या शासन निर्णयानुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार दोन हेक्टरच्या मर्यादित असल्याची खातरजमा करण्यात यावी. शेतजमीनीच्या नुकसानीकरिता मदत अल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुज्ञेय असून शेतजमीनीचे नुकसान झाल्याचे प्राधिकृत अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक आहे. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. ही मदत देताना केंद्र शासनाने चक्रीवादळ, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठीच्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री करावी. राज्य शासनाने घोषित केलेल्या अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तीसाठी अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मि.मी.पेक्षा जास्त नोंद झालेली असल्यास आणि त्यामुळे मंडळातील गावामध्ये 33 टक्क्यापेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झालेले असल्यास ही मदत अनुज्ञेय राहील. मात्र, ज्या ठिकाणी पूर आलेला असेल त्या ठिकाणी अतिवृष्टीचा निकष लागू राहणार नाही, असे निधी मंजुरीच्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
4
Oct 23
जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएस पोर्टलवरच करावी

जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात जन्म-मृत्यू घटनेची नोंदणी ही नागरी नोंदणी पद्धती अर्थात सिव्हील रजिस्ट्रेशन सिस्टीम (सीआरएस) पोर्टलवरच करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी नागरिकांसह पंचायत समितीच्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना केल्या आहेत. नागरी नोंदणी पद्धतीअंतर्गत जन्म-मृत्यू नोंदणीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या सभेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर राठोड, इंडियन मेडीकल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष डॅा. स्नेहा भुयार, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) डॉ. पी. सी. चव्हाण, सांख्यिकी अधिकारी सी. जी. जाधव, माहिती अधिकारी पवन राठोड, महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. देशभरात जानेवारी 2016 पासून जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी ही केंद्र शासनाच्या सीआरएस पोर्टलवर सुरु करण्यात आलेली आहे. परंतु शहरी भागातील नगरपरिषद, पंचायत व शासकीय आरोग्य संस्था वगळता, सद्यस्थितीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत, जन्म-मृत्यू नोंदणी केंद्र, महसुली गावांमधून सीआरएस पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी यापुढे शंभर टक्के ग्रामपंचायत, महसुली गावातील जन्म-मृत्यू नोंदणी केंद्रातून, जन्म-मृत्यू घटनेची नोंदणी, फक्त सीआरएस पोर्टलवरच करण्यात यावी. जेणेकरून मयत व्यक्तीच्या नावावरील विम्याचा दावा, बँक खात्यावरील रक्कम व शासकीय योजनेअंतर्गत देय असलेले लाभ मिळण्यास वारसांना अडचण येणार नाही, अशा सूचना त्यांनी दिल्या. केंद्र शासनाचा जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 व महाराष्ट्र राज्य जन्म-मृत्यू नोंदणी नियम 2000 नुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात जन्म-मृत्यूच्या घटनांची नोंदणी होत असते. जिल्ह्यात शहरी भागातील 17 नगरपरिषद व पंचायत, 16 शासकीय आरोग्य संस्था आणि ग्रामीण भागातील 1801 नोंदणी केंद्र, 69 शासकीय आरोग्य संस्था याप्रमाणे एकूण 1903 नोंदणी केंद्रामार्फत जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी करण्यात येते. जन्म-मृत्यू घटनांची नोंदणी घटना घडल्यापासून विहीत मुदतीत म्हणजे 21 दिवसात आवश्यक माहिती प्राप्त झाल्यावर संबंधित निबंधक विनामूल्य करतात. परंतु विहित कालावधीत नोंदणी न केल्यास दंड भरावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी विहित मुदतीतच घटनेची माहिती संबंधित निबंधकास देवून जन्म-मृत्यू, घटनेची नोंद वेळत करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून विनाकारण पैसे व वेळ दोन्हीही खर्च होणार नाहीत. या कायद्यानुसार घटना ज्या निबंधकाच्या कार्यक्षेत्रात घडली. त्याच निबंधकाकडे नोंद होत करावी. जुन्या ज्या नोंदीत बाळाचे नाव न टाकता जन्म नोंदणी केलेली आहे. अशा नोंदणीबाबत आता बाळाचे नाव नोंदवून बाळाच्या नावानिशी प्रमाणपत्र देण्याची मुदत शासनाने दि. 27 एप्रिल 2026 पर्यंत वाढवून दिलेली आहे. ज्या नागरिकांनी पूर्वी बाळाचे नाव न टाकता जन्म नोंदणी करून बाळाचे जन्म प्रमाणपत्र घेतलेले आहे. त्यांनी लवकरात लवकर बाळाचे नाव टाकून प्रमाणपत्र घेऊन जावे, असे आव्हान करण्यात आले आहे. तसेच मुदतीनंतर जुन्या नोंदीमध्ये बाळाचे नाव टाकून बाळाच्या नावानिशी प्रमाणपत्र देण्याची मुदत वाढवली जाणार नाही, असेही सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

अधिक माहिती...
4
Oct 23
अमृत कलश जिल्हाधिकारी यांच्या स्वाधिन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय वर्षानिमित्त ‘मेरी माटी, मेरा देश’ आभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत यवतमाळ नगरपरिषदेने तयार केलेला अमृत कलश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सुपूर्द करण्यात आला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक दादाराव डोल्हारकर यांच्यासमवेत अधिकारी, कर्मचारी तथा नगरपरिषदेचे शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थ्यांनी या कलशाची शोभायात्रा काढली. यासंदर्भात प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधतांना मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त न.प.प्रशासनाच्यावतीने राबविलेल्या विविध उपक्रमानुसार ‘मेरी माटी मेरा देश’ हे अभियान राबविले होते. त्यानुसार यवतमाळची पावनभुमी असलेल्या व स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा देणाऱ्या आझाद मैदान येथील मुठभर मातींसह शहरातल्या २८ प्रभागातील माती आणि तांदूळ गोळा करून तयार केलेला हा अमृत कलश आज ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांना स्वाधिन करण्यात आला. मुख्याधिकारी पुढे म्हणाले की, पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून 'मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्योत्तर देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील वीर शहिदांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्ली येथे तयार होणाऱ्या अमृत वाटीकेकरीता देशभरातील माती एकत्रित करण्यात आली असून यवतमाळची ही माती जिल्हाधिकारी यांच्या मार्फत लवकरच दिल्लीला रवाना होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडलेल्या विशेष दुतासोबत हा अमृत कलश दिल्लीला पाठवला जाईल असेही त्यांनी सांगितले.

अधिक माहिती...
4
Oct 23
उमरी स्मारक येथे पंधरवड्याचा समारोप

अमृत कलशाच्या माध्यमातून एक चिमूट माती गोळा झाली पाहिजे, म्हणजे एकात्मतेचे स्मरण होईल. देशाच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिले त्यांचे स्मरण केले जावे, असे प्रतिपादन आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी केले. उमरी स्मारक येथे सेवा पंधरवडा समारोपप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मीरा पागोरे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, तालुका कृषी अधिकारी सुरेश गावंडे, पोलिस उपनिरीक्षक पराडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सतीश होते. मानलवार, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती प्रज्ञाताई भूमकाळे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, नगरपंचायतचे विरोधी पक्ष गटनेता अनिकेत पोहेकर, शहीद मधुकर घोटेकर यांच्या पत्नी संगीता घोटेकर आदी मंचावर विराजमान होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. कार्यक्रमाला नितीन परडखे, संजय राठी विकी परडखे, गौतम लांडगे किशोर दामेधर, मिलिंद नवाडे, मुकुंद कासेशिट्टीवार, गणेश मैधने, अजमिरे, कोडापे, पवन मानलवार, बालू देशमुख, सोनाली चव्हाण, सोनू शर्मा प्रामुख्याने उपस्थित सकाळी गावामधून प्रभातफेरी काढण्यात आली. यात राष्ट्रपुरुषांच्या वेशात सजवलेल्या ट्रॅक्टरवर बसून असलेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. प्रभातफेरीमध्ये विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाप्रसंगी आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते संगीता मधुकर घोटेकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी केले. आभार ए. पी. पोपळकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उमरी येथील नागरिकांचेही सहकार्य लाभले आहे

अधिक माहिती...
3
Oct 23
गावकऱ्यांनी राबविले श्रमदान, गावकऱ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

उमरखेड पंचायत समिती अंतर्गत केंद्र व राज्य सरकारणे उपक्रम हाती घेतला १ ऑकटोबर पासून एक तास श्रमदाण करून स्वच्छतेचा संदेश चालु आहे पोफाळी ग्राम पंचायत ने माझ्ये गाव सुंदर गाव स्वच्छ गाव ही संकल्पना राबून उपक्रम पोफाळी ग्राम पंचायतने राबविली आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती निर्मीत स्वच्छता ही सेवा १ ऑकटोबर ला पोफाळीचे सरपंच रेखा क्षिरसागर व उपसरपंच पायघण, ग्रामविकास अधिकारी कोथळकर, तथा ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी व ग्रामस्थ यांना ग्रामपंचायत परिसर तथा बस स्थानक परिसर स्वच्छताकेली एक तारीख एक तास स्वच्छता हीच सेवा या उपक्रमातर्गत सर्वानी सहभाग घेतला.

अधिक माहिती...
3
Oct 23
रक्तदान शिबिराचे आयोजन

इंदिरा महाविद्यालयात डॉ. यशवंत मोरेश्वर दोंदे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ०५/१०/२०२३ सकाळी ११:३० ते ३:३० वाजेपर्यंत करण्यात येणार आहेत. सदर रक्तदान शिबिर हे एकनील ब्लड बँक यवतमाळ, राष्ट्रीय सेवा योजना इंदिरा महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान सर्वश्रेष्ठ दान हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहेत. तरी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व गावातील सर्व नागरिक यांना जाहीर आवाहन करण्यात येते

अधिक माहिती...
3
Oct 23
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे. या अभियानाअंतर्गत सन 2023-24 मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. योग्य मशागत पध्दतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधीचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे इत्यादी कारणांमुळे उत्पादकता कमी होत आहे. नवीन लागवडीप्रमाणेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे ही जिल्ह्याची फळपिकांची एकूण उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची बाब आहे. सन 2023-24 मध्ये राज्यामध्ये जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे. या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत असून यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिकू या फळपिकांचा समावेश आहे. या घटकांतर्गत जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम 40 हजार रूपये प्रति हेक्टर ग्राह्य धरुन त्याच्या 50 टक्केप्रमाणे जास्तीत जास्त रक्कम 20 हजार रूपये प्रति हेक्टर प्रमाणे अनुदान देय आहे. तसेच यामध्ये कमीत-कमी 0.20 हेक्टर व कमाल दोन हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील. पुनरुज्जीवन कार्यक्रमासाठी फळपिकनिहाय बागांचे किमान व कमाल वय राहील. त्यानुसार आंबा फळपिकाचे कमीत कमी वय 20 वर्ष तर जास्तीत जास्त वय 50 वर्ष, चिकू कमीत कमी वय 25 वर्ष तर जास्तीत जास्त वय 50 वर्ष, संत्रा कमीत कमी वय 10 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष आणि मोसंबी फळपिकाचे कमीत कमी वय 8 वर्ष तर जास्तीत जास्त वय 25 वर्ष राहील. जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, योजनेच्या अधिक माहितीसाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

अधिक माहिती...
3
Oct 23
बाभुळगाव येथे अमृत कलश यात्रा व स्वच्छता ही सेवा कार्यक्रम

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत बाभुळगाव तालुकास्तरीय अमृत कलश यात्रा व स्वच्छता ही सेवा पंधरवाडा कार्यक्रम दि.१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान उमरी स्मारक या ठिकाणी ग्रामपंचायत उमरी व पंचायत समिती बाभूळगाव यांचा संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. हा कार्यक्रम आमदार डॉ. प्रा.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनाखाली तसेच बाभुळगाव तहसीलदार मिराताई पागोरे व गटविकास अधिकारी रविकांत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमावेळी वीरपत्नी श्रीमती घोटेकर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत उमरीच्या सरपंच सोनाली शेळके, पोलिस पाटील शुद्धोधन ढेपे, उपसरपंच मंदाताई गोटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक गटविकास अधिकारी रविकांत पवार यांनी केले. सूत्रसंचलन स्मिता गोलर यांनी केले तर विस्तार अधिकारी अविनाश पोपळकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाकरिता बाभुळगाव गटशिक्षणाधिकारी गणेश मैघणे, कृषी अधिकारी अंबरकर, विस्तार अधिकारी मंगेश देशपांडे, कृषी विस्तार अधिकारी चंद्रशेखर हेडावू, व्ही.एम.कोडापे, केंद्रप्रमुख विलास काळे, प्यारेलाल वानखडे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश भुमकाळे, सतिषणी मालनवार, नितीन परडखे, अनिकेत पोहकर, सचिव कुमरे, उमरी शाळेचे मुख्याध्यापक पारधी, माजी समाज कल्याण सभापती प्रज्ञाताई भुमकाळे तसेच स्वामी विवेकानंद हायस्कूल चिमनापूर व पीएनबी शाळा बाभुळगाव येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक माहिती...