अनामवीरांची माहिती (Unsung Hero's)

  • लुईस फर्नांडिस

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मी थेरे

     यांचा जन्म १९२५ मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां- विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला१४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने रणगाड्यांमधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण

      यांचा जन्म १८९० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यावेळी निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यांमधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झोरवान सिंग

    हे मुंबई येथील रहिवासी, १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना हत्यारांची मदत केली आणि इतरांनासुद्धा या लढ्यात सामील व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहीत केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची क्रांतिकारकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. सप्टेंबर, १८५७ मध्ये त्यांना १० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि १८५८ मध्ये अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना जानेवारी १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झाकीउद्दिन सुलेमानजी

    हे मुंबईचे रहिवासी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळाबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झिपरू जगताप

    हे कार्भेल, जिल्हा नाशिक येथील रहिवासी होते. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. गोंदिया येथे सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दिनांक १९ ऑक्टोबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बगलम येथून भाग घेतला. तेथील झालेल्या गोळीबारात, मारल्या गेलेल्या इतर चार जणांपैकी ते एक



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • झाफारमिया रफिकमिया

    यांचा जन्म १९९२ मध्ये नागपुरात झाला. दिनांक ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते सक्रियपणे सहभागी झाले. दिनांक १५ ऑगस्ट होते. १९४२ रोजी ते एका ब्रिटिशांविरोधी मिरवणुकीत सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • युसुफ अली इब्राहीमजी

    यांचा जन्म १९१० मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • येसा

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. '१८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्याच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • यासीन फतेह

    हे मुंबईचे रहिवासी होते. ते दिनांक २३ जानेवारी १९४६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या स्मरणार्थ निघालेल्या मोठ्या मिरवणुकीत सामील झालेसैंडहर्स्ट रोड, मुंबईच्या चौपाटीपासून निघाली होती. मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अडवले. त्यांनी रस्त्यावर बॅरिकेड लावले होते. मिरवणूक विठ्ठलभाई रोडच्या दिशेने वळवावी अशी पोलिसांची इच्छा होती. राज्यकर्त्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलक बॅरिकेडजवळ बसले.. त्यांच्यावर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि नंतर अंदाधुंद गोळीबार केला. यासीनला गोळी लागून गंभीर जखम झाले आणि त्याच दिवशी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • यशवंत पालेकर

    यांचा जन्म आर्वी, जिल्हा वर्धा येथे झाला. दिनांक ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधात आंदोलनात सामील झाले. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • यशवंत नाईक

    नाशिक येथील रहिवासी होते.१८५७ च्या उठावात यांनी नाशिक आणि अहमदनगर येथून भाग घेतला आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा आरोप ठेवण्यात आला. ते १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. दिनांक जुलै १८५९ रोजी ब्रिटिश सैन्याचा सामना करतांना नाशिक जवळ अम्बोरा येथे बंदुकीची गोळी लागून त्यांचे निधन झाले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • यशवंत गुलाणे

    यांचा जन्म १९२५ साली ठाणे जिल्ह्यात झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक १६ ऑगस्ट १९४२ रोजी च्या निदर्शनात ते पालघर येथून सामील झाले. ब्रिटिश-विरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • यशवंत गोविंद गावड

    यांचा जन्म १९२५ साली ठाणे जिल्ह्यात झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक १४ ऑगस्ट १९४२ रोजीच्या निदर्शनात ते पालघर येथून सामील झाले. निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • यादव पंजाराव

    हे १९०७ साली नागपूर येथे जन्माला आले, छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दिनांक १३ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ते जागीच मृत्यू पावले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठ्ठल खंडो वाकनीस

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ साली त्यांनी साताऱ्याचे रंगो बापुजी ह्यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांची साताऱ्याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना दिनांक सप्टेंबर १८५७ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील तुरुंगात फाशी देण्यात आले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वामनराव वानखेडे

    हे १९०७ वरुद अमरावती येथे जन्माला आले. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला, दिनांक १० ऑगस्ट १९४२ रोजी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा वामन त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ते जागीच मृत्यू पावले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वझीर खान

      हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी त्यांनी लोकांना प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा, तसेच देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यात त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वामनराव पाटील

    हे १९१४ साली वरुद, अमरावती येथे जन्माला आले. छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिनांक १० ऑगस्ट १९४२ रोजी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा वामन त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलसांनी अंदाधुंद गोळीबार केला त्यात ते जागीच मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वामन तांडेल

    हे मुंबई येथे १९१२ साली जन्माला आले. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १० ऑगस्ट १९४२ रोजी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, तेव्हा वामन त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला त्यात ते जागीच मृत्यू पावले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वाल्लू

    हे खानदेशाचे रहिवासी होते. १९५७ च्या उठावाच्या वेळी ते क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजाविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटिशांविरुद्द बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना जन्मठेपेची काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली अंदमान येथे पाठवण्यात आले. १८५९ मध्ये अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • विठ्ठलराव कोतवाल

    हे १९१२ मध्ये माथेरान, जिल्हा रायगड येथे जन्माला आले. ते कायद्याचे पदवीधर. ते भाई कोतवाल म्हणून जास्त प्रसिद्ध होते. १९४२ च्या भारत छोड़ो आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे ट्रॅकची मोडतोड करणे, फोन च्या वायरी कापणे, रस्ते आणि पूल नष्ट करणे अशी कामे करून ब्रिटिश सरकारला जेरीस आणले होते. दिनांक ३१ डिसेंबर १९४३ रोजी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुधागड येथे पोलिसांनी घेरले. त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत भाई कोतवाल यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले. दिनांक २१ जानेवारी १९४३ रोजी त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठ्ठलदास वल्लभदास चंदन

    हे वडाळा, मुंबई येथील रहिवासी. केवळ २१ वर्षाचे असताना, दिनांक ऑगस्ट १९३० रोजी सुरू झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतला. आझाद मैदानावर झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २३ एप्रिल १९३० रोजी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना हरकिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले. थोड्या उपचारानंतर त्यांना सोडण्यात आले. तेथून बाहेर पडल्यावर पुन्हा आझाद मैदानावर जाण्यासाठी त्यांनी गाडी पकडली. परंतु त्याच दिवशी त्यांचे स्टेशनवर निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठ्ठलभाई दल्लुभाई पटेल

    हे नवसारी गुजरात येथील रहिवासी. नवसारी येथे सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दिनांक ऑगस्ट १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. तसेच त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीच्या मीठ सत्याग्रहातही नवसारी येथे भाग घेतला. एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २३ एप्रिल १९३० रोजी पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्याच दिवशी त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठ्ठल शिंगरे

    यांचा जन्म १९०१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठ्ठल पवार

    हे मुंबई येथील रहिवासी होते. पूर्वी ते ब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्यात शिपाई होत, पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी वर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले आणि त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठ्ठल भगवानकर

    हे मुंबईचे रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. यांचा जन्म खडकी, जिल्हा वर्धा येथे झाला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधात १९४२ च्या आंदोलनात सामील झाले. आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दिनांक ऑगस्ट १९४२ साली त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विश्वनाथ धुडे

    हे १८८७ साली सातारा येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधात १९४२ च्या आंदोलनात सामील झाले. आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विश्राम नाथ खडके

    हे मुंबई येथील रहिवासी होते. पूर्वी ते ब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्यात शिपाई होते. पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले आणि त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, डिसेंबर १९४५ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विश्राम नानजी

    यांचा जन्म १९०१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झालेदिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विष्णू लेले

    हे साताऱ्याचे रहिवासी. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दिनांक मार्च १९३० रोजी सोलापुरातील ब्रिटिशविरोधी निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विष्णु खंडू बारबटे

    हे दिनांक १५ एप्रिल १९९५ साली वडगाव, सातारा येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. करो या मरो आणि छोडो भारत या गांधीच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला असतांना यांनी आंदोलनात भाग घेतला. १० सप्टेंबर रोजीच्या निदर्शनात हातात तिरंगा घेऊन ते सामील झाले. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादाचा नारा देत त्यांनी इस्लामपूर कचेरीवर तिरंगा फडकावत कूच केली. मोर्चेकऱ्यांना मामलतदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विष्णू गणेश पिंगळे

    हे १८८८ मध्ये तळेगाव, जिल्हा पुणे येथे जन्माला आले. १९१० मध्ये ते मुंबईत आले आणि माहिममधील पोतदार यांच्या अल्कली वर्कस येथे नोकरी केली. काम करताना ते हरी लक्ष्मण पाटील यांच्या संपर्कात आले. जपानी हातमाग उद्योगांनी त्यांना स्वदेशी आंदोलनाची प्रेरणा दिली. त्यांनी स्वतःची हातमाग गिरणी सुरू केली. नंतर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तिथे ते गदर पार्टिच्या संपर्कात आले. १९११ मध्ये ते कलकत्ता येथे परत आले. तिथे त्यांनी मेरठ आणि अंबाला येथे लष्करी छावणीला वारंवार भेट दिली. दिनांक २३ मार्च १९१५ रोजी त्यांना उच्च विस्फोटक बॉम्बसह अटक झाली. दिनांक १६ नोव्हेंबर १९९५ रोजी त्यांना लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विष्णू बारबटे

    हे सांगलीचे रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विवध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सांगलीतील मामलतदार कचेरीवर दिनांक १० सप्टेंबर १९४२ रोजी हल्ला केला. तेव्हा ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विनोद किनारीवाला

    हे दिनांक २० सप्टेंबर १९२४ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे जन्माला आले. विद्यार्थीदशेत त्यांनी दिनांक ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी अहमदाबाद शहरात झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. या निदर्शकांवर ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विनायकराव यावले

    ह्यांचा जन्म अमरावतीचा. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक ऑगस्ट १९४२ च्या निदर्शनात ते सामील झाले. सह निदर्शकांवर ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विनायक नारायण देशपांडे

    हे मुंबईचे रहिवासी. बंगालच्या फाळणीनंतर महाराष्ट्रात अनेक गुप्त संस्था उभ्या राहिल्या. १९०९ मध्ये जेव्हा गणेश सावरकरांना सरकारविरोधी साहित्य लिहिल्याबद्दल काळ्यापाण्याची शिक्षा झाली तेव्हा क्रांतिकारकांनी याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. जॅक्सनला स्थानिक नाट्यगृहात मराठी नाटकाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णा कर्वे यांना थिएटरमध्ये कलेक्टरला मारण्याचे काम सोपवण्यात आले होते. जॅक्सनच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यापैकी विनायक देशपांडे यांना दिनांक ११ एप्रिल १९१० रोजी ठाण्याच्या विशेष कारागृहात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विनायक बळवंत

    हे मुंबईचे रहिवासी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विठुजी

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना पैशांचीसुद्धा मदत केली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. मार्च, १८५८ मध्ये त्यांना काळ्यापाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि अंदमानला पाठवण्यात आले अटकेत असताना एप्रिल, १८५८ रोजी त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • विलायत अली खान

    विलायत अली खान हे सातारा येथील रहिवासी. ते आधी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी त्यांची सातारा येथे नियुक्ती झाली होती. तिथे ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक ऑगस्ट १८५७ मध्ये त्यांना काळ्यापाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक सप्टेंबर १८५९ रोजी अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वीर हस्सराम पमनानी

    त्यांचा जन्म दिनांक १० एप्रिल १८८९ साली सिंध येथे झाला. ते मुंबई विनायक बळवंत विद्यापीठाचे दुहेरी पदवीधर होते आणि सिंध येथे सरकारी नोकरीमध्ये सामील होते. त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रीय चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये ते असहकार आंदोलनात सामील झाले. १९३७ मध्ये ते विधानसभेत निवडून आले. एका अत्यंत सन्मानित सिंधी समाजाच्या धार्मिक नेत्याचा खून झाला आणि सांप्रदायिक संताप उसळून आला. त्यांनी सिंध विधानसभा मतदारसंघात चाललेल्या षडयंत्राचा उल्लेख केला. परिणामी, त्यांना गुप्त पद्धतीने ठार मारण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वासुदेव चापेकर

    हे पुणे येथे जन्माला आले. बाळ गंगाधर टिळकांच्या भाषणांनी त्यांच्यात राष्ट्रवादाची तीव्र भावना जागवली. प्रथम त्यांना भारतीय सैन्यात सामील व्हायचे होते. परंतु सैन्यात निवडले गेले नाही. त्यामुळे चापेकर बंधुंनी जो ब्रिटिश विरोधी लढ्यासाठी तरुणांचा एक गट बनवला होतो, त्यात ते सामील झाले. चापेकर बंधू, महादेव रानडे यांनी फितुरीमुळे डेव्हिड बंधुना ठार केले. पोलिसांनी त्यापैकी चापेकरांना  पकडून दिनांक मे १८९९ रोजी फाशी दिले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वासुदेव भगवंत जोगळेकर

    वासुदेव भगवंत जोगळेकर हे त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील रहिवासी. १८५७ च्या उठावाच्या वेळेस त्यांनी कोळी, भिल्ल आणि इतर आदिवासी लोकांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला. त्यांनी उघडपणे 'ईस्ट इंडिया कंपनी चा निषेध केला. ब्रिटिशांवर हल्ला करण्यास प्रोत्साहन दिले. ब्रिटिशांनी त्यांना पकडले आणि दिनांक डिसेंबर १८५७ रोजी त्र्यंबकेश्वर येथे सार्वजनिकरित्या फाशी दिले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वासुदेव नागभीडकर

    यांचा जन्म १९२० मध्ये नागपुरात झाला. दिनांक ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते सक्रियपणे सहभागी झाले. दिनांक १४ ऑगस्ट १९४२ च्या एका ब्रिटिशांविरोधी मिरवणुकीत ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वासूदेव बळवंत फडके

    यांचा जन्म दि. नोव्हेंबर १८४५ रोजी शिरढोण ता. पनवेल, जिल्हा रायगड येथे झाला. पुणे येथे शिक्षण घेत असतांना ते क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या संपर्कात आले. त्यामुळे त्यांच्या विचारांचा परिणाम होऊन ते ब्रिटीश विरोधी बनले, सन १८७० मध्ये ते पुणे येथील एका आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी ऐक्य वर्धिणी सभा नामक संस्थाही स्थापन केली होती. त्यांच्याच अनुषंगाने त्यांनी रामोशी नावाचा क्रांतिकारी गट स्थापन केला होता. त्याचे सुमारे ३०० सदस्य होते. यात कोळी, भिल्ल, धनगर या समाजाचे लोक होते. या गटाने व्यवसायिक आणि इतर श्रीमत लोकांवर सशस्त्र छापे सुरू केली. ब्रिटिश सरकारने वसुदेवांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले. परंतु ते हैदराबाद येथे पळून गेले. तेथे त्याने रोहिल्यांना आपल्या संस्थेमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. २० जुलै १८७९ रोजी कोलागडी गावाजवळील ब्रिटिश सैन्याने हेन्री विलियम डॅनियल यांच्या नेतृत्वाखाली फडके यांना पकडले आणि त्यांना एडन येथे पाठवले गेले, परंतु तेथून ते निसटले. काही दिवसांनी त्यांना पुन्हा पकडले गेले आणि तुरुंगात ठेवण्यात आले तिथे त्यांनी उपोषण सुरू केले. त्यातच त्यांचा १७ फेब्रुवारी १८८३ रोजी अंत झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वासुदेव बल्लाळ

    हे यवतमाळ येथे जन्मले दि. ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते विद्यार्थी दशेतच सहभागी झाले. विदेशी कापडाची होळी करण्याच्या प्रयत्नात असतांना त्यांना अटक झाली दोन वर्षाची कडक सजा देण्यात आली. तथे पोलिसी अत्याचारामुळे तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वसंत कुमार पेंन्से

    हे १९२१ मध्ये मुंबईत जन्माला आले. ते पशुचिकित्सा विद्यालयाचे विद्यार्थी होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. त्यावर दि. २३ फेब्रुवारी १९४६ रोजी गोळीबार करण्यात आला वसंत कुमार त्यात जखमी झाले त्यातच त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • वसंत दाते

    हे महाड, जिल्हा कुलाबा येथे १९२४ साली जन्माला आले. ते एस. पी. महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थी होते. दिनांक ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आपल्या काही मित्रांबरोबर त्यांनी महाड येथील मामलतदार कचेरीवर १० सप्टेंबरला हल्ला केला. तेव्हा ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वासनजी सिहेडा

    हे १९९६ मध्ये मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वामन वैद्य

    यांचा जन्म जिल्हा वर्धा येथे झाला. त्यांनी दिनांक ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नागपूर येथे ब्रिटिशांविरोधी आंदोलनातही सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वामन सदकापळ

    यांचा जन्म जिल्हा वर्धा येथे झाला. दिनांक ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नागपूर येथे ब्रिटिशांविरोधात आंदोलनात सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वल्लभ नाथ गोवारी

    हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. तसेच १९३० मध्ये धरासणा मीठ सत्याग्रहातही भाग घेतला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना अटक झाली आणि वरळी तुरुंगात नेण्यात आले. तेथे आजारी झाल्यामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, दिनांक १३ जुलै १९३० रोजी त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • वैद्य

    हे मुंबई येथील रहिवासी होते. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना दोन वर्षांची सजा फर्मावण्यात आली आणि त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात करण्यात आली. तेथे सप्टेंबर, १९३० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • उत्तमराव आंबेकर

    यांचा जन्म १९२० मध्ये किंडला, वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायंमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक १४ ऑगस्ट रोजीच्या निदर्शनात ते वर्धा येथे सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले. १९४५ मध्ये अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • उस्मान शेख

    यांचा जन्म १९२० मध्ये गुमगाव, नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी नागपुरात दिनांक १४ ऑगस्ट रोजी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • उंचा

    हे खानदेश येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी ते क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग  घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक १४ ऑक्टोबर १८५७ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • उमाकांत कडिया

    यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दिनांक १५ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा कड़िया त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • उद्धव खेमास्कर

    यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे १९२४ मध्ये झाला. तेथील ते शेतकरी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. दिनांक १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी चिमूर पोलीस स्टेशनवर हल्ला केला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • उदयराज जयंतराय

    हे मुंबई येथे १९०७ साली जन्माला आले. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दिनांक १५ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा उदयनराज त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ते मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • उदेभान कुबडे

    हे वडाळा, वर्धा येथे १९०७ साली जन्माला आले. छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिनांक १५ ऑगस्ट १९४२ रोगी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा कुबडे त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात ते तेथेच मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • तुलसी राम पांचघारे

    यांचा जन्म आर्वी, जिल्हा वर्धा येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधी आंदोलनातही सामील झाले. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तुलसी राम माळी

    यांचा जन्म धुमाळवाडी, जिल्हा अहमदनगर येथे झाला. धुमाळवाडी गावात मामलतदारांच्या जाचक कारभाराविरोधात सुरू झालेल्या जन आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९१८ मध्ये मामलतदाराच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ते सहभागी झाले होते आणि त्याबद्दल तसेच मामलतदारांविरुद्ध कट रचल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली होती. १९२४ मध्ये येरवडा तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • तुकाराम सतुबा सोनार

    यांचा जन्म १९३० मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तुकाराम पराशर

    यांचा जन्म १९२० साली नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते त्याच्या गावातून सामील झाले. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामु त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. तुरु पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तुकाराम कुडेकर

    यांचा जन्म १९०१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तुकाराम दादू

    यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दिनांक २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • त्र्यंबक माळी

    हे तालुका अडगाव, जिल्हा जळगाव येथील रहिवासी. यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी अनेक कारवायांमध्ये सहभाग घेतला. चळवळीदरम्यान दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • त्र्यंबकराव खेडकर

    हे १९१८ रोजी चिंचपूर, जिल्हा अहमदनगर येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी अनेक कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी त्यांनी सप्टेंबर १९४३ मध्ये वैयक्तिक सत्याग्रह केला. त्यांना अटक झाल्यावर तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • त्र्यंबक पटेल

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • त्र्यंबकलाल

    हे सुरत, गुजरात येथील रहिवासी. केवळ १८ वर्षांचे असताना त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. त्यांना जुलै, १९३० मध्ये अटक करण्यात आली. आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले. परंतु, ऑगस्ट, १९३० मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तुकाराम

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी हो १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता असून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक जानेवारी १८५८ मध्ये त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तिमिया शाहरे

    यांचा जन्म कुन्हाडी, जिल्हा भंडारा येथे झाला. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. गोंदिया येथे सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला. पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते जखमी झाले आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तिमाया गोवारी

    यांचा जन्म कुल्हाडी, जिल्हा भंडारा येथे झाला. त्यांनी १९३० मध्ये गोंदिया येथे सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. गोंदिया येथे सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दिनांक २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहातही त्यांनी भाग घेतला. पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तिमा

    हे कोरली, भंडारा येथील रहिवासी. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भंडारा येथे भाग घेतला. त्यांना काही दिवसांची शिक्षा झाली. तुरुंगातून बाहेर आल्यावर तिमा यांना परत अटक करण्यात आली. अटकेत असतानाच ते मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • ठाकूर प्रसाद नायक

    यांचा जन्म १९२० साली नागपुरात झाला. त्यांनी ब्रिटिशांविरोधी अनेक कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, आणि १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला. त्यांना ऑगस्ट, १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना नागपूर तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर, १९४२ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले. परंतु, त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • ठाकूरभाई देसाई

    हे सज्जान, सुरत, गुजरात येथील रहिवासी. १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून सप्टेंबर, १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • ठाकूर जीराभाई दवे

    हे खानपूर, गुजरातचे रहिवासी होते. त्यांनी कोळी, भिल्ल, साबंदीस आणि इतर आदिवासी लोकांना १८५७ च्या उठावात एकत्र आणण्यात पुढाकार घेतला. १८५७ च्या उठावाच्यावेळी गोवर्धनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना कानपूर येथे सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. एका ब्रिटिश कॅम्प वर हल्ला करताना त्यांना पकडले गेले.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • ठकू

    हे मुंबईचे रहिवासी. ते आधी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळीस ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक १७ सप्टेंबर १८५७ मध्ये त्यांना काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक १२ जून १८५८ रोजी त्यांना अंदमान येथे पाठवण्यात आले. अंदमानला अटकेत असताना दिनांक जून १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • ठाकोर अमस्ती

    हे मुंबईचे रहिवासी. ते आधी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळीस ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. पकडले आले. गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक १५ जून १८५७ मध्ये त्यांना काळ्यापाण्याची १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. १८५८ रोजी त्यांना अंदमान येथे तुरुंगात पाठवण्यात आले. दिनांक २१ जून १८५९ मध्ये अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामचंद्र पांडुरंग टोपे

    यांचा जन्म १८१४ साली गोळा, पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांनी बिठूर येथे आपले कुटुंब हलवले. तेव्हा ते राणी लक्ष्मीबाई आणि रावसाहेब यांच्या संपर्कात आले. १८५१ मध्ये लॉर्ड डलहौसीने नानासाहेबांना त्यांच्या वडिलांच्या पेन्शनपासून वंचित केले. या घटनेवरून तात्या इंग्रजांचे शत्रू बनले. निष्ठा आणि कृतज्ञतेच्या नात्याने ते नानासाहेबांशी घट्ट जोडले गेले होते. मे, १८५७ मध्ये जेव्हा ब्रिटिशांविरोधी आंदोलन जोर धरत होते, तेव्हा त्यांनी कानपूर येथे तैनात असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैन्यावर विजय मिळवला आणि नानासाहेबांचा अधिकार प्रस्थापित केला. ते स्वतः सैन्याचे सेनापती बनले. कानपूरच्या यशानंतर दिनांक १६ ऑगस्ट १८५७ रोजी बिठूरच्या लढाईत त्यांनी सैन्याच्या मदतीने मेजर जनरल हॅवलॉकला पराभव केला. त्यानंतर झालेल्या लष्करी चकमकींमध्ये तात्या गनिमी लढाईतील एक अतुलनीय योद्धा म्हणून उदयास आले. ब्रिटिशांनी कानपूर पुन्हा ताब्यात घेतल्यावर, तात्यांनी ग्वाल्हेरच्या तुकडीच्या पाठिंब्याने जनरल विंडहॅमला कानपूरमधून माघार घेण्यास भाग पाडले. पण लवकरच त्यांच्या सैन्याचा कंपनीकडून पराभव झाला. तात्यांना त्यांचे मुख्यालय काल्पी येथे हलवावे लागले. सुमारे २०,००० लोकांचे सैन्य राणी लक्ष्मीबाईंच्या बचावासाठी आले आणि त्यांनी बुंदेलखंडमध्ये उठाव केला. सैन्याने चरखारीच्या इंग्रज समर्थक राजाचा पराभव केला आणि ते झाशीला पोहोचले. पण जनरल ह्यू रोझने तात्यांच्या सैन्याला अडथळा आणला आणि त्यांना पांगवले. नंतर तात्यांनी ग्वाल्हेरच्या तुकडीच्या मदतीने ग्वाल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. परंतु, तेथे आपले स्थान मजबूत करण्याआधीच जनरल ह्यू रोज विरुद्धच्या युद्धात त्यांचा पराभव झाला, ज्यात राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. त्यानंतर तात्या मध्य भारतात निघून आले. नंतर जनरल नेपियरच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. परंतु, त्यांनी राजस्थान, माळवा, बुंदेलखंड आणि खानदेशात दहा महिने ब्रिटिशांना गनिमी हल्ल्याने सळो की पळो करून सोडले होते. दुर्दैवाने दिनांक एप्रिल १८५९ रोजी त्यांचा विश्वासू मित्र मानसिंग याने विश्वासघात केला आणि पारोनच्या घनदाट जंगलात मेजर मीड नेत्यांना पकडले. लष्करी कोर्टाने खटला चालवला. तात्यांना दोषी ठरवून सिप्री येथे दिनांक १८ एप्रिल १८५९ रोजी फाशी देण्यात आले.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • तात्या आवजी

    हे सोलापूर येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च, १९३० रोजी रूपा भवानी चौक, सोलापूर येथे ब्रिटिशांविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले. लोकांनी ब्रिटिशांविरोधी केलेल्या कारवायांमध्ये काही पोलीस जखमी झाले. ह्या मोर्च्यात सहभागी तात्या आवजी हे गंभीर जखमी झाले आणि तेथेच मृत्यूमुखी पडले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • फझल मोहम्मद

    यांचा जन्म १९३० मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सायरेनेस ऊर्फ रामजी

    हे कोल्हापूरचे रहिवासी होते. ते आधी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळीस ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. जानेवारी, १८५७ मध्ये त्यांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. १८५८ रोजी त्यांना अंदमान येथे पाठवण्यात आले. १० जुलै १८५८ मध्ये अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुशिलाबाई बाळ

    यांचा १९०१ रोजी पुणे येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी ब्रिटिशांविरोधी अनेक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी सप्टेंबर, १९४२ मध्ये झालेल्या निदर्शनात त्या सामील झाल्या. त्यांना अटक झाल्यावर येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. नंतर हिंडलंग (कर्नाटक) तुरुंगात पाठवण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुन्तो

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

     


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुम्भेर

    हे मुंबईचे रहिवासी होते. ते आधी इंस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळीस ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक १२ ऑक्टोबर १८५७ मध्ये त्यांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. दिनांक १२ जून १८५८ रोजी त्यांना अंदमान येथे पाठवण्यात आले. पण दिनांक २२ ऑगस्ट १८५९ मध्ये अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुलोचना जोशी

    यांचा जन्म १९२१ साली शिराळे, जिल्हा सांगली येथे झाला. यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ब्रिटिशांविरोधी अनेक कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक ऑगस्ट रोजीच्या निदर्शनात ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अटक झाली आणि सहा महिन्यांची शिक्षा झाली. परंतु येरवडा तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा १९४२ साली तुरुंगातच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुलेमान शाह

    हे मालेगाव, नाशिक येथे जन्माला आले. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तिथेच त्यांना दिनांक जुलै १९२२ रोजी फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुकूर मोरे

    ह्यांचा जन्म १९२५ साली शिरगाव, जिल्हा पालघर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक १४ ऑगस्ट १९४२ च्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवरील ब्रिटिश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुखदेव सुरळकर

    हे शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी. यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ब्रिटिशांविरोधी अनेक कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या दिनांक १८ ऑगस्टच्या निदर्शनात ब्रिटिश खजिन्याची लूट आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अटक झाली. नागपूर येथील तुरुंगात पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा १९४२ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुखराम चव्हाण

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी ते क्रांतिकारकांना सातारा येथे सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी सातारा तुरुंगावर हल्ला करायची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला आणि तोफेच्या तोंडी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुखलाल गुजर

    हे शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी. यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या रमागणीसाठी झालेल्या दिनांक १८ ऑगस्टच्या निदर्शनात त्यांनी शेंदुर्णी गावातील टपाल कार्यालयावर हल्ला करायचा प्रयत्न केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुखदेव

    सोलापूर येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. दिनांक मे १९३० रोजी सोलापूरमध्ये ब्रिटिशांविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले. ह्या मोर्च्यात सहभागी सुखदेव जखमी झाले आणि तेथेच मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुफनिका रेहमान

    यांचा जन्म १९२३ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुधो नायक

    हे मुंबईचे रहिवासी होते. ते आधी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या उठावाच्या वेळीस ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. १८५७ मध्ये त्यांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानला अटकेत असताना डिसेंबर १८५९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सुध्या

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सातारा येथे सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला रआणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी सातारा तुरुंगावर हल्ला करायची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दिनांक नोव्हेंबर १८५७ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना दिनांक १७ जून १८५९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीपत मुरारी जाधव

    यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सोबरथ

    हे खानदेश येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजाविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सोमाभाई पांचाळ

    यांचा जन्म १९२७ मध्ये बडोद येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनाता यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. १८ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते कोटा येथे सामील झाले. यावेळी निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यातून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सोमा

    हे नाशिक येथील रहिवासी. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले. तिथेच नजरकैदेत त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शोभाजी चव्हाण

    या मुंबई रहिवासी आधी ईस्ट इंडिया कंपनीत होत्या. पण १८५७ च्या उठावात त्यांनी कंपनी सोडली आणि क्रांतिकारकांना सामील झाल्या. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्याना तोंड देताना शेवटी पकडल्या गेल्या. त्यांच्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या अंदमान येथेच १२ जून १८५८ रोजी कैदेत मरण पावल्या.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सिवन राजुकर

    यांचा जन्म १९२४ मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. १२ ऑगस्टला टेलीफोनच्या वायर कापून टाकत असताना त्यांच्यावर गोळीबारा झाला. ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सितुजी

    हे कोल्हापूर येथील निवासी. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. ऑक्टोबर १८५८ मध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठविण्यात आले. अटकेत असताना जुलै १८५८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सीताराम चांभार

    हा मंगरुळ, जिल्हा सांगली येथे राहणारा केवळ १२ वर्षांचा मुलगा होता. दिनांक १८ जुलै १९३० रोजी सविनय कायदेभंगाच्या आंदोलना दरम्यान, बिलाशी गावातील लोकांनी ब्रिटिश सरकारच्या वनकायद्यांचे उल्लंघन करत सागवानाचे झाड उपटून गावाच्या मंदिराजवळ ठेवले आणि राष्ट्रध्वज फडकवला. ब्रिटिश सरकारच्या वनकायद्यांचा तेथील स्थानिक लोकांच्या जमावाने जोरदार प्रतिकार केला. दिनांक सप्टेंबर १९३० रोजी ३०० सशस्त्र पोलिसांची एक तुकडी त्या ठिकाणी पोहोचली आणि तिने अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबारात सिताराम हा मुलगा जागीच ठार झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सिराराम भेवळे

    हे गोरेगाव, मुंबईचे रहिवासी होते. पूर्वी ते रब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्यात शिपाई होते, पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी त्यांना कोहिमा नागालँड येथील आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले. त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सिंधुताई तिखे

    ह्या खानदेशी येथील रहिवाशी होत्या १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात त्या पुण्याहून सामील झाल्या. निदर्शकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिंदे

    हे खानदेश येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. दिनांक ११ एप्रिल १८५७ मध्ये त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला आणि दिनांक १२ एप्रिल १८५८ रोजी त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सिदू शेवाळे

    हे मुंबईचे रहिवासी होते. पूर्वी ते ब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्यात शिपाई होते पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले. त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सिदू भिवा पवार

    हे दिनांक १५ जुलै १९०२ साली वडगाव, सातारा येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. 'करो या मरो आणि छोडो भारत या गांधींच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला असताना पवार यांनी आंदोलनात भाग घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पुरुषोत्तम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली २००० हून अधिकर  लोकांच्या निदर्शनात ते सामील झाले. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादाचा नारा देत त्यांनी वडूज कचेरीच्या इमारतीवर तिरंगा फडकावत कूच केली. मोर्चेकऱ्यांना मामलेदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला. त्या गोळीबारात सिदू मृत्यूमुखी पडले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • सिद्धेश्वर गोरे

    हे अमरावतीचे रहिवासी होते. ते कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपल्या भागातील लोकांना ब्रिटिश राजवटीचा प्रतिकार करण्यासाठी संघटित रकेले आणि ऑगस्ट १९४२ चे एप्रिल १९४३ या काळात आपल्या जिल्ह्यात जनआंदोलनाचे नेतृत्व केले. जानेवारी १९३१ रोजी सविनय आंदोलनादरम्यान ब्रिटिश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जरसिद्ध गोनाड पाटील

    यांचा जन्म १९२२ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • सुशिलाबाई

    यांचा १९०१ मध्ये पुणे येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय भाग घेतला. तसेचर ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ मध्ये नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हदपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात त्या सामील झाल्या. या निदर्शकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शंभू दौलत

    हे बडोदा, गुजराथ येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात ते सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजाविरुद्ध लढण्यात भाग घेतला. ते बऱ्याच क्रांतिकारकांच्या संपर्कात होते. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. ऑक्टोबर १८५८ मध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीरंग पाटील

    यांचा जन्म १८९६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निर्देशनाल ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीरंग भाऊ शिंदे

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. १९४२ साली त्यांनी खटाव तालुक्यातून ऑगस्ट क्रांती आंदोलनात भाग घेतला. 'करो या मरोआणि छोडो भारत या गांधीच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला असता शिंदे यांनी आंदोलनात भाग घेण्यास मागेपुढे पाहिले नाहीपुरुषोत्तम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली २००० हून अधिक लोकांच्या निदर्शनात ते सामील झाले. देशभक्तोपर गीते गात आणि राष्ट्रवादाचा नारा देत त्यांनी वडूज कचेरीवर तिरंगा फडकावता कूच केली. मार्चेकऱ्यांना मामलेदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला, परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला. श्रीरंग शिंदे त्यापैकी एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीराम धुर्वे

    हे तुमसर, जिल्हा भंडारा येथील रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ते तुमसर पोलिस स्टेशनवरील हल्ल्यात सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीराम बिंगेकर

    यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे १९२२ मध्ये झाला. तेथील ते शेतकरी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. दिनांक १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा झालेल्या ब्रिटिश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीकृष्ण सारडा

    हे १८९२ साली सोलापूर येथे जन्माला आले. ते एक कापड व्यापारी होते. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च १९३० रोजी सोलापूर मध्ये ब्रिटिशांविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले, लोकांनी केलेल्या ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये काही पोलीस जखमी झाले. या मोच्यांत सहभागी सारडा यांना अटक करण्यात आली आणि खुनाच्या आरोपाखाली त्यांना सोलापूर येथील तुरुंगात दिनांक १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रीधर उर्फ अण्णा फडणीस

    हे कोल्हापूर येथील निवासी. १८५७ च्या उठावात ते सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटिशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. ऑक्टोबर १८५८ मध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • श्रावण रघाटते

    यांचा १९१२ रोजी नागूपर येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश खजिन्याची लूट आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अटक झाली. नागपूर येथील तुरुंगात पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा १९४२ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शोभाराम वर्मा

    यांचा १९२० रोजी नागपूर येथे जन्म झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरुद्ध विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. ऑगस्ट १९४२ मध्ये ब्रिटिश खजिन्याची लूट आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना अटक झाली. नागपूर येथील तुरुंगात पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा १९४३ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम न्हावी

    यांचा १९९० मध्ये नागपूर येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश खजिन्याची लूट आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल नागपुरात सहा महिन्यांची शिक्षा झाली. तिथे तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे, त्यांचा १९४३ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम कोठारी

    यांचा १९२० मध्ये नागपूर येथे जन्म झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम भोसले

    मुंबईचे रहिवासी होते आधी ते ब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्यात शिपाई होते. पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटीश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले. त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवा पटोला

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध, साताऱ्याचे रंगो बापूजी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तेथील क्रांतिकारकांची साताऱ्याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना दिनांक सप्टेंबर १८५७ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील तुरुंगात फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवहरे

    यांचा जन्म १९२४ मध्ये नागपूर येथे झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या नागपूर येथील निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि १४ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • शिवराम विठ्ठल

    शिवराम विठ्ठल यांचा जन्म १९१८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. त्यातच २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवलाल पटेल

    हे दिनांक १४ जानेवारी १९०२ रोजी गुजरात येथे जन्माला आले. ते पेशाने डॉक्टर होते. दिनांक ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. अहमदाबाद शहरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. १९४३ साली त्यांना ब्रिटिशांविराधी कारवायांमध्ये सहभाग घेतला या आरोपाखाली अटक झाली. परंतु तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे, त्यांचा दिनांक २० मे १९४३ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम मोरे

    यांचा जन्म १९२४ मध्ये नागपूर येथे झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायामंध्ये सहभाग घेतला. दिनांक ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि १२ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम मोरे बहुश्रुत

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध, साताऱ्याचे रंगो बापूजी ह्यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना सामील झाले. तेथील क्रांतिकारकांची साताऱ्याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना दिनांक सप्टेंबर १८५७ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील तुरुंगात फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शेषराव मुधोळकर

    यांचा जन्म वरुड, अमरावती येथे झाली. त्यांनी दिनांक ऑगस्ट १९४२ रोजी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला या आरोपांखाली अटक झाली. परंतु तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा १९४४ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम

    यांचा जन्म १९०८ मध्ये नागपूर येथे झाला. छोडो भारत १९४२ च्या आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला, तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनास ते सामील झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि सप्टेंबर १९४३ रोजी त्यांचा जागीच मृत्यू झाला


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शय्याद छोटु

    यांचा जन्म १९२० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला, तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शेख मुम्मो

    हे मुंबईचे रहिवासी होते. हे आधी ईस्ट इंडिया कंपनीत शिपाई म्हणून काम करत होते. १८५७च्या उठावात ते क्रांतिकारकांना सामील झाले. इतरांनीसुद्धा तसे करावे म्हणून प्रोत्साहित केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. एप्रिल १८५८ मध्ये काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना दिनांक जुलै १९८५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शेख केसर अझीझ

    शेख केसर अझीझ यांचा जन्म १९२७ मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत मृत्यू झाला. आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. पोलिसांन केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • शेख अली अरब

     हे औरंगाबाद येथील रहिवासी. १८५७ च्या उठावात ते क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला आणि नोव्हेंबर १८५७ रोजी त्यांना काळया पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. १८५७ साली त्यांना अंदमानला पाठवण्यात आले. अंदमान येथेच ऑगस्ट १९५९ मध्ये कैदेत मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शेख गुलाम मोहिउद्दिन

     यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दिनांक २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रेहमान खान

    महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी; ते इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात होते. सातारा येथे तैनात होते परंतु १८५७ च्या उठावात परकीय राजवटीपासून स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली; त्यांनी ब्रिटिशांशी अनेक प्रसंगी लढा दिला साताऱ्यात; २४ जून १८५७ रोजी बंडखोरीसाठी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. १२ जून १८५८ रोजी त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले. १० जुलै १८५९ रोजी कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रेबेजी

    सातारा महाराष्ट्राचे रहिवासी १८५७ च्या उठावात त्यांनी बंडखोरांशी हातमिळवणी केली आणि साताऱ्यात अनेक ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला; त्यांनी ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे जप्त करण्यात आणि त्यांना बंडखोरांच्या ताब्यात देण्यात भाग घेतला; त्यावेळी कंपनीच्या सैन्याने त्यांना पकडले. बंडखोरांवर हल्ला केल्याबद्दल त्यांच्यावर सरकारी खजिना लुटणे, देशद्रोह आणि ब्रिटिशांविरुध्द बंड केल्याचा आरोप होता; मार्च १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि जुलै १८५८ मध्ये त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले; मे १८५९ मध्ये ते कैदेतच मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रावजी

    पूर्वीच्या पेठ राज्यातील रहिवासी (आता जिल्हा नाशिक, महाराष्ट्र); १८५७ च्या उठावात त्यांनी भाग घेतला आणि नाशिकमध्ये अनेक प्रसंगी 'ब्रिटिशांशी लढा दिला; इंग्रजांच्या चकमकीत त्यांना पकडण्यात आले आणि त्यांच्यावर कंपनी राजवट उलथून टाकण्यासाठी कट रचल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले. त्यानंतर अटकेतच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रतीलाल वाणी

    जन्म १९२२ मध्ये. धुलिया (आता जिल्हा नंदुरबार), महाराष्ट्र येथील रहिवासी वी पर्यंत शिक्षण घेऊन ते सक्रियपणे "छोडो भारत" मध्ये सामील झाले. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळ सुरू होता. कदाचित ऑगस्ट १९४२ च्या दुसऱ्या आठवड्यात त्यांच्या ब्रिटिशांविरोधी कारवायांसाठी अटक करण्यात आली आणि धुळे तुरुंगात ठेवण्यात आले. १९ मे १९४३ रोजी अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रतीलाल साखरोहंद

    जन्म बहुदा १९९५ मध्ये सोलापूर, महाराष्ट्र, हिराचंज यांचे सुपुत्र १९३० मध्ये महाराष्ट्रात सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला त्यांना अटक करून विसापूर किल्ल्यावर नजरकैदेत ठेवण्यात आले जेथे तुरुंग प्रशासनाने त्यांचा क्रूर छळ केला; त्याच अवस्थेत त्यांना येरवडा कारागृहात हलवले आणि त्यांची तब्येत खराब असूनही त्यांना तेथे कठोर परिश्रम करावे लागले. १९३० च्या उत्तराधांत चक्की फिरवताना रतीलाल साखरोहंद यांचे येरवडा तुरुंगात निधन


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रतन हरी पाटील

    गिरणी कामगार, अमळनेर (आता जि. जळगाव, महाराष्ट्र) चे सक्रिय कार्यकते; अमळनेर पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा सहभाग होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रतन हरी पाटील यांच्यासह ०९ जणांना गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • रशीद खान नवाब

    जन्म १८९६ मध्ये अहमदपूर, जि. वर्धा, महाराष्ट्र येथील. वी पर्यंत शिकलेले. ते ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" चळवळीत सामील झाले. त्यांच्या गावात ब्रिटिशांनी भारतातून बाहेर पडावे या मागणीसाठी केलेल्या सार्वजनिक निदर्शनावर पोलिसांनी त्यांना गंभीर झाल्या १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रावजी

    सातारा महाराष्ट्राचे रहिवासी १८५७ च्या उठावात त्यांनी आपल्या भागातील बंडखोरांशी हातमिळवणी केली आणि सातानऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला, कंपनी राज उलथून टाकण्यासाठी त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना शस्त्रे उचलण्यास प्रवृत्त केले; इंग्रजांनी साताऱ्यातील बंडखोरांच्या ठाण्यांवर केलेल्या हल्ल्यात त्यांना पकडले, त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि ब्रिटिशांविरुध्द बंड केल्याचा आरोप ठेवण्यात आला. मार्च १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली झाले. आणि जुलै १८५८ मध्ये अंदमान बेटांवर पाठवण्यात आले. ते जानेवारी १८५९ मध्ये बंदिवासात मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रंगारी भास्कर

    १९२१ मध्ये जन्मलेले नागपूर, महाराष्ट्राचे रहिवासी. नागपुरात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील "छोडो भारत" आंदोलनात भाग घेतला आणि सत्याग्रहींच्या हत्येच्या निषेधार्थ १३ ऑगस्ट १९४२ च्या आदल्या दिवशी झालेल्या निदर्शनात सामील झाले; रस्त्यावर तैनात असलेल्या ब्रिटिश पोलीस दलाने निदर्शकांवर अचानक गोळीबार केला त्यात भास्कर जागीच ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामराव गोहाड

    जन्म १९१२: बेनोडा, तालुका गरुड जि. अमरावती, महाराष्ट्र येथील पीठ गिरणी। मालक. चौथीपर्यंत शिकलेले. त्यांनी ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्याछोडो भारत" आंदोलनात सामील होण्यापूर्वी सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला होता. ब्रिटिशांविरुद्ध कारवायांसाठी त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली होती. आणि ०३ वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षासुनावण्यात आली होती. पोलिसांच्या छळामुळे ते गंभीर आजारी पडले तब्येतीच्या कारणास्तव त्यांची सुटका झाली. तरीही लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामप्रसाद भिमशंकर

    जन्म १९२५ सातपारी, तालुका पालघर, जि. ठाणे, महाराष्ट्र येथील ०८ ऑगस्ट १९४२ रोजी "छोडो भारत चळवळ सुरू झाली तेव्हा ते त्यात सामील झाले. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांनी भारतातून बाहेर पडावे या मागणीसाठी पालघर येथे काढलेल्या मोर्चात त्यांनी भाग घेतला. मोर्चेकर्त मामलतदार कार्यालयाजवळ आले असता पोलिसांनी त्यांच्यावर भिमशंकर अचानक गोळीबार केला ज्यात यांना गोळ्या लागल्या आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामजी

    महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी. त्यांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला आणि रंगो बापूजींच्या नेतृत्वाखाली सातारच्या बंडखोरांमध्ये सामील झाले. त्यांनी सर्व कैद्यांची सुटका करण्यासाठी, सरकारी मालमत्तेची तोडफोड करण्यासाठी आणि ब्रिटिशांना मारण्यासाठी सातारा आणि महाबळेश्वर वर हल्ला करण्याची योजना आखली होती. जून १८५७ मध्ये देशद्रोह इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध युद्ध करणे आणि तुरुंगातील कैद्याची सुटका करणे या आरोपावरून त्यांना पकडण्यात आले त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि। ०८ सप्टेंबर १८५७ रोजी गोळ्या घालून ठार मारले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामजी गोंड

    महाराष्ट्रातील औरंगाबादचे रहिवासीः १८५७ च्या उठावात त्यांनी आपल्या भागातील बंडखोरांशी हातमिळवणी केली आणि औरंगाबादमध्ये अनेक प्रसंगी ब्रिटिशांशी लढा दिला. निर्मळ, औरंगाबाद येथील तीव्र लढाई दरम्यान इंग्रजांनी त्यांना पकडले आणि इंग्रजांविरुध्द खून आणि बंड करण्याची सजा म्हणून १८६० मध्ये त्यांना फाशीची शिक्षासुनावण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामचंद्र सुतार

    जन्म १९१० चा. मालेगाव, जि. सांगली, महाराष्ट्र, येथील रहिवासी. पाचवी पर्यंत शिक्षण. ते ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" चळवळीत सक्रियपणे सामील झाले. अखेरच्या काळात त्यांनी विविध निषेध रॅलित मध्ये भाग घेतला. १९४२ च्या शेवटच्या तिमाहीत आणि १९४३ च्या सुरूवातीला त्यांना अटक करण्यात आली. कराड कारागृहात नजरकैदेत ठेवल्यानंतर काही दिवसांतच क्रूर शारीरिक छळामुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण पाटील

    ह्यांचा जन्म १९२५ साली पालघर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • लक्ष्मण पाचघरे

      जिल्हा अमरावती येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. अमरावती येथे सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दिनांक ८ ऑगस्ट १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि अमरावती तुरुंगात ठेवले, परंतु शारीरिक जखमांमुळे त्यांचा लवकरच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • लक्ष्मण नवाथे

    हे मुंबईत १९२० साली जन्माला • आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनातयांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर सैन्याने केलेल्या गोळीबारात से गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • लक्ष्मण मारी

      हे १९२० साली नागपूर येथे जन्माला आले. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करीत होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां- विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • लक्ष्मण कदम

      यांचा जन्म १९०६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • रामचंद्र चुरी

    जन्म १८९७ सातपाटी, तालुका पालघर जि. ठाणे, महाराष्ट्र येथील रहिवासी. एक शेतकरी ०८ ऑगस्ट १९४२ मध्ये "छोडो भारत" आंदोलनात ते सामील झाले. १४ ऑगस्ट १९४२ रोजी पालघर येथे ब्रिटिशांनी भारतातून बाहेर पडावे या मागणीसाठी आयोजित केलेल्या सार्वजनिक मोर्चात त्यांनी भाग घेतला. जेव्हा निदर्शक मामलतदार कार्यालयाजवळ पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. ज्यात रामचंद्र चुरी यांना गोळ्या लागल्या आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामचंद्र चौधरी

    तालुका वरुड, जि. अमरावती, महाराष्ट्र ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोड़ो भारत" आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ राजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. बेनोडा येथील धवलगिरी नदीच्या पुलाजवळ मोर्चकल्यांवर पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा त्यांना गोळ्या लागल्या आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामचंद्र बेणी

    जन्म १९०७ मध्ये. नि. नागपूर, महाराष्ट्राचे रहिवासी. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १३ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात झालेल्या एका निदर्शनात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामबिलास कृष्ण जोशी

    १९१८ मध्ये जन्मलेले. मुंबई महाराष्ट्राचे रहिवासी, ते भारतीय नौसेनेच्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात सामील झाले २२ फेब्रुवारी १९४६ रोजी अशाच एका रॅलीमध्ये भाग घेत असताना गुलावडी येथे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळ्या लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामास्वामी रामेश्वर

    जन्म १९२० मध्ये. मुंबई महाराष्ट्राचे रहिवासी.०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या 'छोडो भारत" चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १० ऑगस्ट १९४२ रोजी सामील झालेल्या एका पोलिसांनी गोळीबार केला. तेव्हा रामास्वामी रामेश्वर यांना गंभीर दुखापत झाली गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रमणलाल वाडीलाल

    जन्म १९९९ मध्ये. मुंबई महाराष्ट्राचे रहिवासी. एक कापड व्यापारी त्यांनी ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या 'छोडो भारत" आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी निघालेल्या निषेध रॅलीवर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात त्यांना गंभीर जखमा झाल्या आणि त्यांचा दि. १० ऑगस्ट १९४२ रोजी जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामा चव्हाण

    जन्म १९१०. जि. नागपूर, महाराष्ट्र चे रहिवासी. १०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोड़ो भारत" आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांनी भारत सोडण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात १२ ऑगस्ट (१९४२ रोजी नागपुरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखमा झाल्या. या जखमांमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झालारामचंद्र गोडे जन्म १८६२ चा. जि. नागपूर, महाराष्ट्राचे रहिवासी एक खाजगी कंपनी कर्मचारी आणि चौथी पर्यंत शिकलेले. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यावेळी १४ ऑगस्ट १९४२ रोजी पोलिसांच्या गोळीबारात गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. नागपूर शहरातील निषेध निदर्शनात त्यांचा सहभाग होता.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामा भान

    चिरनेर, जि. रायगड, महाराष्ट्र येथील रहिवासी ३० वर्षाचे पनवेलजवळील चिरनेर येथे सविनय कायदेभंगाच्या आंदोलना दरम्यान २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल (वन) सत्याग्रहात भाग घेतला. हे आंदोलन ब्रिटिशांचा निषेधार्थ होता, जे गावकऱ्यांना जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारत होते. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. पोलिसांच्या गोळीबारात चिरनेर आणि आजूबाजूच्या गावातील चौदा ते बीस जणांचा मृत्यू झाला. पोलीसांच्या गोळीबारात रामा भानला गोळ्या लागल्या आणि त्यांचा मृत्यू जे. जे. हॉस्पिटलमध्ये २७ सप्टेंबर १९३० रोजी दोन दिवसांनी झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामा बामा कोळी

    जन्म १९९० मध्ये. जि. रायगड, महाराष्ट्र येथील पनवेल जवळील चिरनेर गावात सविनय कायदेभंगाच्या आंदोलनादरम्यान २० सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल (वनसत्याग्रहात त्यांना जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याच्या निषेधार्थ होता. आंदोलनाच्या जोरावर पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यात चिरनेर आणि आजूबाजूच्या गावातील चौदा जणांचा मृत्यू झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांमध्ये रामा बामा कोळी यांचा समावेश आहे. जे. जे. हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता मुंबईत २७ सप्टेंबर १९३० रोजी वयाच्या २० या वर्षी त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम सिंग

    कोल्हापूर, महाराष्ट्राचे रहिवासी १८५७ च्या उठावात त्यांनी बंडखोरांच्या गटाचे नेतृत्व केले. आणि कोल्हापूरला अनेक ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला. दिल्लीच्या बंडखोरांना मदत करण्यासाठी दिल्लीवर मोर्चा काढण्यासाठी त्यांनी बंडखोरांना संघटित केले. कंपनीच्या सैन्याने त्यांना त्यांच्या एका साथीदारासह एका चकमकीत पकडले आणि ब्रिटिशांविरुध्द देशद्रोह आणि बंड केल्याचा आरोप ठेवून त्यांना जानेवारी १८५२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. परिणामी त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले, जिथे त्यांचा जुलै १८५९ मध्ये कैदेतच मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम सिंग

    औरंगाबाद, महाराष्ट्र येथील ;रहिवासी. १८५७ च्या उठावात त्यांनी आपल्या भागातील बंडखोरांशी हातमिळवणी केली आणि औरंगाबादमध्ये अनेक ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला त्यांनी बंडखोरांनी आर्थिक मदतही देऊ केली आणि ब्रिटिश निष्ठावंतांना मारण्यासाठी प्रवृत्त केले. कंपनीच्या सैन्याने त्यांना एका चकमकीत पकडले आणि देशद्रोह, बंडखोरांना मदत केल्याचा आरोप केला. जानेवारी १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि १८ जून १८५८ रोजी त्यांना अंदमानला पाठवण्यात आले. मार्च १८५९ मध्ये ते कैदेतच मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामराव राजे

    १८५७ मध्ये. जन्म, नाशिक, महाराष्ट्र येथील रहिवासी त्यांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला बंडखोरांच्या मदतीसाठी आपल्या मोठ्या भावासोबत, भगवंत राव राजेंसोबत काम केले. त्यांनी नाशिक परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांशी सामना केला आणि बंडखोर सैन्याला जुलमी परकिय राजवट संपवण्यासाठी निर्धाराने लढण्यासाठी प्रोत्साहित केले; त्यांना ब्रिटिशांनी अटक केली आणि देशद्रोह आणि विश्वासघाताचा खटला १८५८ मध्ये त्यांना फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम पुरुत

    कोल्हापूर (कोल्हापूर), महाराष्ट्र येथे इंग्रजी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात सेवा करत होते. परंतु १८५७ च्या उठावात त्यांनी नोकरी सोडली. आणि कोल्हापूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांशी लढा दिला. त्याने ब्रिटिश मालमत्ता आणि शस्त्रे जप्त करण्यात आणि लूट आपल्या सहकारी बंडखोरांच्या हाती देण्यातही भाग घेतला. कंपनीच्या सैन्याने बंडखोरांच्या ठाण्यावर केलेल्या एका हल्ल्यात त्यांना पकडले आणि त्यांच्यावर लूटमार आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुध्द बंडखोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. नोव्हेंबर १८५७ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ०१ जुलै १८५८ रोजी त्यांना अंदमान बेटांवर पाठवण्यात आले. २६ जून १८५९ रोजी अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • रामप्रसाद तिवारी

    १९२० चा जन्म. तालुका पालघर, जि. ठाणे, महाराष्ट्राचे रहिवासी सातवी पर्यंत शिकलेले. ते १०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" आंदोलनात सामील झाले. त्यांनी पालघर येथे ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून बाहेर पडावे यासाठी झालेल्या आंदोलनात भाग घेतला. जेव्हा निदर्शक मामलतदार कार्यालयाजवळ पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला, ज्यात राम प्रसाद तिवारी यांना गोळया लागल्या आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम प्रसाद रामदेव

    १९०६ मध्ये जन्मलेले, मुंबई महाराष्ट्राचे रहिवासी. ते भारतीय नौसेनेच्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमध्ये सामील झालेहोते. पोलिसांच्या गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. २२ फेब्रुवारी रोजी ते लालबाग येथे सामील झालेल्या रॅलीवर गोळीबार होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम कृष्ण मेस्त्री उर्फ करवीर

    जन्म १९१८ मध्ये. चिंचणी, तालुका डहाणू, जि. ठाणे, महाराष्ट्र येथील रहिवासी एक सुवर्णकार. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी चिंचणी गावातील हायस्कूलच्या मैदानावर ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याची मागणी करण्यासाठी झालेल्या जाहीर सभेत ते सामील झाले. पोलिसांनी येऊन मिरवणुकीवर गोळीबार केला. ज्यात करवीरला गोळ्या लागल्याने गंभीर जखमा झाल्या. या जखमांमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम धुर्वे

    जन्म १९३० मध्ये. तुमसर, जि. भंडारा, चे रहिवासी. वी इयत्तेचे विद्यार्थी त्यांनी ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" आंदोलनात भाग घेतला. १४ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांच्या गावात झालेल्या सार्वजनिक निदर्शनात ते सामील झाले. ठाण्याजवळ (पोलीस चौकी) पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम चौहान

    जन्म १९१०. नागपूर, महाराष्ट्राचे रहिवासी. यांचे सुपुत्र नागपुरात छापखान्यात नोकरीला. ०९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईत काँग्रेस नेत्यांच्या अटकेवर संपूर्ण देश खवळलेला असताना त्यांच्या छोड़ो भारत हाकेला अनुसरुन नागपुरातील जनतेने रस्त्यावर निदर्शने केली. निषेध आणि एकता कृती म्हणून १२ ऑगस्ट रोजी राम चौहान तेथे मिरवणुकीत सामील झाले. त्यांना ब्रिटिशांनी रोखून त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा त्यांनी ब्रिटिशांविरोधी घोषणा दिल्या. चौहान यांना गोळीबारात गंभीर जखमा झाल्या आणि १२ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रामचंद्र मोरे

    जन्म, मुंबई महाराष्ट्र येथील पूर्वी ते ब्रिटिश भारतीय सैन्याच्या बंगाल सेपर्स आणि मायनर्स रेजिमेंटमध्ये शिपाई होते. पण नंतर त्यांनी मलाया येथे १९४२ मध्ये इंडियन नॅशनल आर्मीत प्रवेश केला. त्यांनी INA च्या कंपनीत सैनिक म्हणून काम केले आणि बर्मा (आता म्यानमार) आघाडीवर अनेक ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला. १९४५ मध्ये जेव्हा ते सुरक्षित ठिकाणी जात होते तेव्हा इंग्रज सैन्याच्या अचानक हल्ल्यामध्ये ते मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम बिगेवार

    जन्म १९२० मध्ये चिमूर जि. चंद्रपूर येथे महाराष्ट्र ७वी पर्यंतच शिक्षण. त्यांनी ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमूर पोलीस स्टेशनवर निघालेल्या ब्रिटिशांविरोधी मिरवणुकीत ते सहभागी झाले. यात गोळीबारात झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राम भगवान

    परळ, मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी. परळ येथे सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. सोलापूर हुतात्मा दिनानिमित्त परळ येथे झालेल्या जल्लोषात उपस्थित होते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर, सभा पांगवण्यासाठी गोळीबार केला, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात राम भगवान यांच्यासह तीन जण जखमी झाले. त्यांच्या शरीरावर बंदुकीच्या १० पेक्षा अधिक जखमा होत्या. त्यांना के. . एम. रुग्णालयात दाखल केले, पण २१ जानेवारी १९३१ रोजी त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • शिवराम हरी

    जन्म १९०८ चा. खेड, जि. पुणे, महाराष्ट्र येथील. लहान वयात वाराणसीला आले आणि संस्कृत शिकले. वाराणसीत ते क्रांतिकारांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर ते क्रांतिकारक राजकारणात गेले. ब्रिटिश राजवटीविरुध्द क्रांतिकारी दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेऊन हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मी (HSRA) च्या सर्व महत्त्वाच्या बैठकांमध्ये भाग घेतला. पक्षात रघुनाथ या टोपणनावाने ओळखले जात होते. अदम्य धैर्याने राजगुरु हे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, जतीन दास आणि सुखदेव यांच्याशी जवळून संबंधित होते, कानपूर, आग्रा आणि लाहोर आंदोलनाची केंद्रे असलेल्या संयुक्त प्रांत आणि पंजाबमधील क्रांतीकारी योजना आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मध्ये जे.पी. सॉंडर्स (सहायक पोलीस अधीक्षक) यांना मारण्यात त्यांनी सहभाग घेतला. ते भूमीगत झाले होते पण पुण्यात ३० सप्टेंबर १९२९ रोजी मोटार-गॅरेज मध्ये शस्त्रांसह त्यांना अटक करण्यात आली. १९३० च्या दुसऱ्या लाहोर कट खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी त्यांना एक ठरविण्यात आले. भारतीय दंड संहितेच्या कलम १२१ आणि कलम ३०२ नुसार दोषी ठरले आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली. त्यांना लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. भगतसिंग आणि सुखदेव यांच्यासोबत सतलजच्या तिरावर राजगुरु आणि त्यांच्या साथीदारांच्या मृतदेहावर अधिकाऱ्यांनी गुप्तपणे अंत्यसंस्कार केले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राजारामजी औरंगपुरे

    जन्म १९१२ मध्ये यावली, तालुका आणि जि. अमरावती येथे. एक शेतकरी, चौथीपर्यंतच शिक्षण. त्यांनी ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या "छोडो भारत" आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशांनी भारतातून निघून जावे या मागणीसाठी १८ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांच्या गावात सुरू झालेल्या सार्वजनिक निदर्शनात सहभागी झाले, पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात त्यांना गोळी लागून त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राजाराम धुर्वे

    १९९४ मध्ये ता. साकोली, जि. भंडारा, महाराष्ट्र येथे जन्म, एक दुकानदार, सहावी पर्वत शिक्षण, ते ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत चळवळीत स्वेच्छेने सामील झाले. सार्वजनिक निदर्शनावर (ब्रिटिशांनी भारत सोडण्याची मागणीसाठी) पोलिसांनी केलेल्या दि. १४ ऑगस्ट १९४२ रोजीच्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याच दिवशी तुमसर पोलीस ठाण्याजवळ त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रहीमतुल्ला इस्माईल

    १९११ चा जन्म, मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी, से भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनांमध्ये सामील झाले (तपशीलासाठी, अब्दुल अलीवरील लिखाण पहा) ते सामील झालेल्या २२ फेब्रुवारी १९४६ मुंबईतील मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखम झाली त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रहीम भाई

    जन्म तालुका चिमूर, जि. चंद्रपूर येथील. ऑगस्ट १९४२ मध्ये सुरू झालेल्या ब्रिटिश विरोधी छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चिमूर पोलीस स्टेशनकडे निघालेल्या मिरवणुकीत ते सामील झाले आणि पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार केला तेव्हा त्यांना गंभीर जखमा झाल्या, जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ गोडी

    जन्म १८९७, नागपूर, महाराष्ट्र येथील त्यांनी १३ ऑगस्ट १९४२ रोजी छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि ब्रिटिश भारतातून निघून जावेत या मागणीसाठी आणि आदल्या दिवशी दुपारी नागपुरात पोलिसांच्या गोळीबारात मिरवणुका काढणाऱ्या जणांना मारल्याच्या निषेधार्थ त्यांचा सहभाग होता; ब्रिटिश पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला, ज्यात ५० जखमी आणि १७ ठार झाले; गोळीबारात ठार झालेल्यांपैकी गोडी हे एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ पांडुरंग

    जन्म १९३९ चा मुंबई येथील. त्यांनी भारतीय नौसेनेने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात सहभाग घेतला. २३ फेब्रुवारी रोजी केलेल्या अशा निदर्शनात भाग घेत असताना चिंचपोकळी पुलावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखमा झाल्या. नंतर त्याच जखमांमुळे त्यांचा २५ फेब्रुवारी १९४६ रोजी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ न्हावी

    जन्म चिरनेर तालुका उरण, जि. रायगड येथील. महाराष्ट्रातील सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतला, २५ सप्टेंबर १९१० रोजी चिरनेर येथील अक्का देवी मैदानात झालेल्या ब्रिटिश विरोधी निदर्शनात त्यांनी सहभाग घेतला आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखमा होऊन ते त्याच दिवशी मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ नेवारे

    जन्म १९०५, जि. नागपूर येथील. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सार्वजनिक निदर्शनांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नेवारे यांना गंभीर जखमा झाल्या. या जखमांमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ मोरेश्वर शिंदे

    चिरनेर, ता. उरण, जि. रायगड, येथील रहिवासी. चिरनेर गावात सविनय कायदेभंगाच्या आंदोलनादरम्यान सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेला जंगल (वन) सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. ब्रिटिश सरकारने गावकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन शिखरावर असताना, पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला. परिणामी चिरनेर आणि जवळच्या गावातील १४ लोक मृत्यूमुखी पडले. गोळीबारात गोळ्या लागल्याने रघुनाथ मोरेश्वर शिंदे यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ माजादेव

    १९२० मध्ये जन्मलेले, मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी. ते भारतीय नौसेनेच्या बंडाच्या समर्थनार्थ निदर्शनांमध्ये सामील झाले होते. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी चिंचपोकळी पुलाजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्यांपैकी ते एक होते. या जखमांमुळे २६ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • रघुनाथ गोवारी

    जन्म १८९७, जि. नागपूर, महाराष्ट्र येथील. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्याछोडो भारत " आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १३ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात सार्वजनिक निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्यांचा मृत्यू या गंभीर जखमांमुळे त्याच दिवशी झाला


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • राघू गोविंद

    १९९६ मध्ये जन्मलेले, मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी भारतीय नौसेनेच्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी अशा एका समर्थक रॅलीत सहभागी होत असताना गोल मंदिराजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना जीवघेण्या गोळ्या लागल्या. १६ मार्च १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पत्र भुसारी

    यांचा जन्म चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे १९१७ रोजी झाला. तेथील ते शेतकरी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि नागपूर तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पतलू

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध, साताऱ्याचे रंगो बापुजी यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना सामील झाले, तेथील क्रांतिकारकांची साताऱ्याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना सप्टेंबर १८५७ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. १८५७ मध्ये त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • परशुराम साळुंके

    यांचा जन्म १९२४ मध्ये पाटणकुडी, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते तुमसर पोलिस स्टेशनच्या मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला..


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • परशुराम रामा पाटील

    यांचा जन्म १९०६ मध्ये रायगड जिल्ह्यात झाला. पनवेलजवळील चिरनेर सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. ब्रिटिश सरकारने गावकऱ्यांना जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले गेले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार करून १४ जणांना ठार मारले, या १४ लोकांपैकी परशुराम हे एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • परशुराम घार्गे

    यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९०१ रोज वडगाव येथे झाला. १९४२ चे छोडो भारत आंदोलन सुरू होण्याआधी त्यांनी विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. 'करो या मरो' आणि छोडो भारत या गांधींच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत केला यांनी आंदोलनात भाग घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. परशुराम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली २००० हून अधिक लोकांनी आंदोलनात सहभाग घेतला. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादीचा नारा देत त्यांनी वडूज कचेरीवर तिरंगा कॉंग्रेस ध्वज फडकावत कूच केली. मोर्चेकऱ्यांना मामलतदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला, परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला आणि परशुराम त्यापैकी एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • परभती बराटे

    हे सुरजापूर, सातारा येथील रहिवासी होते. पूर्वी ते ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई होते पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले आणि त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पानसुरे

    हे कोल्हापूर येथील रहिवासी होते. ते आधी मुंबई येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कंपनीत कार्यरत होते. ते आंदोलकांच्या संपर्कात आले. १८५७ च्या उठावाच्या वेळी त्यांनी ब्रिटिश सेवा सोडली आणि आंदोलकांना सामील झाले. त्यांनी विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. जून १८५८ रोजी त्यांना ब्रिटिश पोलिसांनी पकडले आणि त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडखोरी आणि विद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आला. ऑक्टोबर १८५७ मध्ये त्यांना काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि ११ ऑक्टोबर १८५८ रोजी अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना १८५९ रोजी केदेतच मरण आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पन्नालाल

    यांचा जन्म १९३० मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडखेरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पानेड्या

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी. ते १८५७ च्या उठावात ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. जून १८५८ रोजी त्यांना ब्रिटिश पोलिसांनी पकडले आणि त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाखोरी आणि विद्रोह केल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ रोजी त्यांना काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलो आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना १८५८ साली त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडुरंग सोनावणे

    पांडुरंग सोनावणे यांचा जन्म १९२० मध्ये जिल्हा भंडारा येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि ते तुमसर पोलिस स्टेशनच्या मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडुरंग परीट

    यांचा जन्म १९०२ मध्ये नानोरी, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव चळवळी दरम्यान काढलेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. ते गावातील पोस्ट ऑफिस लुटायच्या प्रयत्नात असताना त्यांना अटक झाली आणि १२ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. राजकीय कैद्यांना बेड्या घालण्याच्या निषेधार्थ त्यांनी आमरण उपोषण केले आणि त्यातच त्यांचा १९४३ मध्ये मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडुरंग मांडले

    यांचा जन्म बेनोडा, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव चळवळी दरम्यान काढलेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. त्यांना अटक झाली आणि वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडुरंग मालपे

    यांचा जन्म लेणी, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी चले जाव चळवळी दरम्यान काढलेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडुरंग केणी

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडू विठू

    यांचा जन्म १९०६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पांडू पेंढारी

    पांडू पेंढारी यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पलू कणेर

    पलू कणेर यांचा जन्म तालुका आष्टी, जिल्हा वर्धा येथे झाला. ऑगस्ट १९४२ च्या छोड़ो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधात आंदोलनात सामील झाले. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. अमानुष छळ करूनही त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगण्यास नकार दिला. तुरुंगातच आत्महत्या केली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • पढ गोविंद

    पढ गोविंद यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.\


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • ओमार / उमर खान

    हे बडोदा, गुजरात येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध आंदोलकांना सामील झाले. गुजरात येथील आंदोलकांना त्यांनी हत्यारांची मदत केली. विविध ठिकाणी ब्रिटिशांशी लढले आणि इतरांनीसुद्धा आंदोलकांना सामील व्हावे म्हणून प्रोत्साहित केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायची, आंदोलकांना ती पुरवायची असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • निजामुददीन

    मुंबई महाराष्ट्रातील रहीवासी. १९३० डिसेंबर मध्ये मुंबई येथे सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. १३ डिसेंबर १९३० रोजी बाबू गेनू यांच्या अंतयात्रेत सामील झालेमिरवणुकीवर पोलिसानी केलेल्या लाठीमार मध्ये गंभीर जखमी झाले. निजामुद्दीन याना हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले. तेथे दि. १८ डिसेबर १९३० रोजी त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • निवृती अडूरकर

    जन्म १९१२ मध्ये. कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी. गाविंद अडूरकर यांचे सुपुत्र. चौथीपर्यंत शिकलेले. एक मजूर. ऑगस्ट मध्ये कोल्हापूरात इंगजाना भारतातून बाहेर पडण्याची मागणी करणाऱ्या मिरवणुकीत भाग घेत असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. जखमी अवस्थेत त्यांना अटक करण्यात आली. काही अपूऱ्या उपचारानंतर त्यांना कोल्हापूर जिल्हा कारागृहात टाकण्यात आले. तेथे काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • निखारे पांडू

    १९१२ मध्ये सांगडी, ता. साकोळी, जि. भंडारा येथे जन्म. एक विणकर. चौथीपर्यंत शिकलेले. त्यांनी ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत चळवळीत भाग घेतला. ब्रिटिशविरोधी करवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याबद्दल त्यांना पोलीसांनी अटक केली आणि तुरुंगात टाकले. भंडारा तुरुंगात पोलिसांच्या छळामुळे ऑगस्ट १९४२ मध्ये अटकेतच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नवसती असगर मिया

    १९१९ मध्ये जन्मलेले मुंबई, महाराष्ट्र येथील रहिवाशी. ते भारतीय नौदलनाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनामध्ये सामील झाले होते. त्या मिरवणुकीत भाग घेत असताना गंभीर जखमी झाले. जे. जे. रुग्णालयात २३ फेब्रुवारी १९४६ रोजी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नवाब कादिर अली खान

    नागपूर, महाराष्ट्राचे रहिवासी. १८५७ च्या उठावात त्यांनी भाग घेतला. आपल्या सहकाऱ्यांनाही त्यासाठी प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत केली आणि अनेक ठिकाणी ब्रिटिश आस्थापनांवर हल्ले केले. बंडखोरावर हल्ला करताना कंपनीच्या सैन्याने त्यांना पकडले आणि त्यांच्यावर देशद्रोह आणि बंडाचा आरोप लावला. त्यांना फाशीची शिक्षा सुनविण्यात आली २१ जून १८८२ रोजी फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नाथू टेकवाला

    जन्म १९९१ मध्ये. महाड, जिल्हा रायगड येथे. एक शेतकरी. ते १९४२ रोजी सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात सामील झाले. महाड पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. गोळीबारातील जखमांमुळे १० सप्टेबर १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नाथू नारायण घरत

    १८९६ मध्ये मुंबई येथे जन्म. भारतीय नौदलाच्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनामध्ये सामील झाले. २३ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबईमध्ये या निदर्शनावर ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा त्याना गोळीबारात गंभीर जखमा झाल्या आणि दाखल झाल्यानंतर लगेचच त्याचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नथोबा ढवळे

    जन्म १९१६, पुणे, महाराष्ट्र येथील चौथी शिकलेले. त्यांनी ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात सहभाग घेतला. एसपी कॉलेजजवळ झालेल्या निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. दि. १० ऑगस्ट १९४२ रोजी ससून रुगणालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरसू परीट

    जन्म १९२२ अकोला, महाराष्ट्र येथील. एक शेतकरी. त्यांनी ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या छोडो भारत चळवळीत सक्रिय भाग घेतला. १९४२ रोजी ब्रिटिशांनी भारतातून निघून जाण्याच्या मागणी करता पुकारलेल्या निदर्शनात भाग घेतला तेव्हा पोलीसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळया लागल्या त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरसिंगराव भातंब्रेकर

    जन्म १९०४, निलंगा उस्मानाबाद येथे. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला. १९३८ मध्ये पुन्हा सत्याग्रह केला. १९३८ मध्ये अटक करण्यात आली. नरसिंगराव भातांब्रेकर यांना ऊत तुरुंगवास झाला. तुरुंग अधिकाऱ्यांनी अतोनात छळ केला आणि १९३८ ला अटकेतच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरसया (नरसप्पा)

    जन्म १८७३ मध्ये सोलापूर, महाराष्ट्र येथे. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्शल लॉ लागू करताना झालेल्या निदर्शनात सामिल होते. १९३० मध्ये सोलापूर येथे पोलीसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर जखमा झाल्या. त्या जखमांमुळे त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरोत्तम नथुभाई पटेल

    मुंबई, महाराष्ट्र येथील रहीवासी एक सत्याग्रही. एक काँग्रेस स्वयंसेवक धरासणा येथील सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. सत्याग्रहींवरील पोलीसांनी केलेल्या लाठीमारामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथमोपचार देण्याऐवजी अटक करण्यात आली. त्यांना एक महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली. वरळी येथील कारागृहात आणण्यात आले. जे. जे. हॉस्पिटल मध्ये नथूभाई पटेल यांचे १३. जून १९३० रोजी न्यूमोनियाने निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारुजी नाईक

    सातारा महाराष्ट्र येथील रहीवासी. १८५७ च्या उठावात ते बंडखोर सैन्यात सामील झाले आणि सातारा परिसरात अनेक ठिकाणी इंग्रजांशी लढले. त्यांनी उघडपणे ब्रिटिश धोरणाचा निषेध केला आणि आपल्या लोकांना जुलमी विदेशी राजवटीच्या विरोधातील लढ्यात भाग घेण्यास प्रवृत्त केले. कंपनीच्या सैन्याने बंडखोरांवर केलेल्या हल्ल्यादरम्यान त्यांना पकडले आणि राजद्रोह बंड केल्याबद्दल खटला चालवला. २४ मार्च १८५८ रोजी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि जुलै १८५८ मध्ये त्यांना अंदमान बेटावर पाठविण्यात आले. २० ऑगस्ट १८५८ रोनी कैदेत मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरहरी केळकर

    जन्म १९१६ मध्ये, मुंबई येथे. महाराष्ट्र येथील  महाराष्ट्र येथील रहीवाशी वासुदवे केळकर याचे सुपुत्र. व्यवसायाने एक घरगुती नोकर. भारीय नौदलाने केलेल्या बंडखोरीच्या सन्मानार्थ झालेल्या एका निदर्शनात सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई रेलीत ब्रिटिश पोलीसांनी गोळीबार केला. गोळीबारात त्यांना गंभीर जखमा झाल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर लगेच त्याच दिवशी त्यांना मृत घोषित करण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायणराव बांगडे

    जन्म दिनांक १९ ऑक्टोबर १९१९, नागपूर महाराष्ट्र येथील. सातवीपर्यंत शिकले. त्यांनी ऑगस्ट १९४२ सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नागपुरात एका सार्वजनिक निदर्शकावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याना गंभीर जखमा झाल्या. त्याच दिवशी दुखापतींनी त्यांचा मृत्यू झाला. नागपुरातील इतवारी चौकात त्यांचे स्मारक उभारण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • नारायण

    जन्म १९०५ मध्ये सोलापूर, महाराष्ट्रात झाला. त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय भाग घेतला. मे रोजी महात्मा गांधीचा अटकेच्या निषेधार्थ ते मोठ्या मिरवणुकीत सामील झाले. पोलीसांनी त्यांचा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न करून त्यावर गोळीबार केला ज्यामध्ये अनेक लोक मारले गेले. गोळीबारात नारायण याना गोळी लागली आणि त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण वारके

    जन्म १९२२ मध्ये कलंकवाडी भुदरगड, कोल्हापूर येथील. कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजचे विद्यार्थी. ऑगस्ट १९४२ झालेल्या छोडो भारत चळवळीत सक्रिय भाग घेतला. १३ डिसेंबर ला कागल तालुक्यातील गारगाटी येथे सरकारी तिजोरीवर हल्ला करण्यासाठी त्यांनी तोडफोड करणाऱ्या गटाचे नेतृत्व केले. त्यावर पोलीसांनी गोळीबार केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण तावडे

    जन्म १९२२ मध्ये पारस, अकोला, महाराष्ट्र येथे एक शेतकरी. चौथीपर्यंत शिकलेले. दि. ऑगस्ट १९४२ छोडो भारत चळवळीत सामील झाले. ब्रिटिशविरोधी कारवायांसाठी अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात अधिकाऱ्यांचा छळ सहन झाला नाही. आणि १९४२ मध्ये अकोला कारागृहात मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण शेवडे

    सातारा, महाराष्ट्र येथील रहीवासी १८५७ च्या उठावात परकीय राजवटी विरुद्धच्या लढ्यात त्यांनी भाग घेतला. ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या ब्रिटिश आस्थापनांवरील हल्ल्यातही भाग घेतला. इंग्रजांविरुद्ध बंड केल्याचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. त्यांचा कोठीतच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण राव

    जन्म नोव्हेंबर १९१९. नागपूर येथे वी शिकले. नागपुरातील छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. आदल्या दिवशी सत्याग्रहींच्या हत्येविरोधात १३ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात आलेल्या निदर्शनात सहभागी झाले. निदर्शकांनी नागपूरच्या रस्त्यावर गर्दी केली आणि ब्रिटिशविरोधी घोषणा दिल्या. ब्रिटिश पोलीसांनी निदर्शकांवर गोळीबार करून त्यास प्रत्युतर दिले. त्यात १७ ठार आणि ५० जखमी झाले. यांचाही समावेश होता.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण राणे

    १९२४ मुंबई, महाराष्ट्र येथे जन्म झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. २४ फेब्रुवारी १९४६ रोजी ब्रिटिश पोलीसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळ्या लागल्या, त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

     


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण मोरे

    जन्म १९०९. मुंबई महाराष्ट्र येथील रहीवासी. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या निदर्शनामध्ये सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी लालबाग येथे निदर्शकांवर पोलीसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण लक्ष्मण

    १९२१ मध्ये मुंबई, महाराष्ट्राचे रहिवासी. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ मोर्च्यात ते सामील झाले. २३ फेब्रुवारी १९४५ रोजी त्यावर पोलिसांनी गोळीबार केला. त्यात ते गंभीर झाले २४ फेब्रुवारी १९४९ रोजी रुग्णालयात मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण खमेले

    १९०० मध्ये जन्म. नागपूर, महाराष्ट्र येथील रहिवासी चौथी पर्यंत शिकलेले. त्यांनी ऑगस्ट १९४२ रोजी छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याची मागणी करण्याच्या निदर्शकांवर १४ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात पोलीस गोळीबार झाला त्यात ते मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण कलार

    जन्म १९२०. नागपूर, महाराष्ट्र येथील. ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाले. १३ ऑगस्ट १९४२ रोजीच्या आंदोलनात सहभागी झाले या आंदोलकांवर पोलीसांनी गोळीबार केला त्यात ते जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण गोपाळ गोवारी

    मुंबई, महाराष्ट्रातील रहिवासी. एक सत्याग्रही आणि काँग्रेस स्वयंसेवक. धरासना येथील कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि सत्याग्रहावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथमोपचार देण्याऐवजी अटक करून वरळी येथील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले. १४ जुलै १९३० रोजी तुरुंगात आजारी पडल्यामुळे त्यांना जे. जे. हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नारायण गांधी

    १९२१ मध्ये मुंबई, महाराष्ट्र येथे जन्म. रामचंद्र गांधी याचे सुपुत्र. भारतीय नासेनेने केलेल्या बंडाच्या समथनार्थ काढलेल्या मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाले. या जखमांमुळे २५ फेब्रुवारी १९४९ रोजी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • नारायण दाभाडे

    जन्म १९२६. जि. पुणे महाराष्ट्र येथील. ते . ऑगस्ट १९४२ रोजी सुरु झालेल्या छोड़ो भारत आंदोलनात सामील झाले. संतप्त जनप्रदर्शनात भाग घेतला आणि ब्रिटिशांनी भारतातून बाहेर पडण्याची मागणी केली. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला त्यांना गोळ्या लागून ते गंभीर जखमी झाले. ऑगस्ट १९४२ रोजी पुणे येथील कॉंग्रेस कार्यालयात त्याच दिवशी त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरेन

    सातारा, महाराष्ट्रातील रहिवासी त्यांनी १८५७ या उठावात भाग घेतला आणि रंगो बापूजींच्या नेतृत्वाखाली सातारच्या बंडखोरांमध्ये सामील झाले. त्यांनी सर्व कैद्यांची सुटका करण्यासाठी सरकारी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारण्यासाठी सातारा आणि महाबळेश्वर येथे हल्ला करण्याची योजना आखली. जून १८५७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना पकडले. आणि त्यांच्यावर देशद्रोह, ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध युद्ध पुकारणे सरकारी मालमत्ता लुटणे आणि कैद्यांची सुटका करणे असे आरोप ठेवण्यात आले. त्यांना फाशीची शिक्षा सुनविण्यात येऊन सप्टेंबर १८५७ रोजी फाशी दिली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरेन सिंग

    ते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात शिपाई होते. खानदेश, महाराष्ट्र येथे तैनात होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी त्यांनी आपली सेवा सोडली आणि कंपनीची सत्ता उलथवून टाकण्याची प्रतिज्ञा घेऊन बंडखोर सैन्यात सामील झाले. खानदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ते इंग्रजांशी लढले. इंग्रजांनी त्यांना पकडून बंडखोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आणि ११ जून १८५८ रोजी त्यांना १० वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली. एप्रिल १८५९ मध्ये अंदमान बेटावर पाठविण्यात आले. २८ एप्रिल १८६० रोजी कैदेतच त्याचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नरहीभाई पटेल

    ओछ, गुजरात येथील रहिवासी. १९ वर्षाचे असताना मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. १९३१ मध्ये झालेल्या सत्याग्रहात भाग घेतला. सत्याग्रहींवर पोलीसांनी गोळीबार केला. गोळीबारात नरहीभाई पटेल याना गोळ्या लागून त्याचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नानुभाई पटेल

    जन्म १९११ करजिसन ता. कड़ी जिल्हा मेहसाणा, गुजरात. एक शेतकरी ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत चळवळीत भाग घेण्यापूर्वी त्यांनी १९३० साली सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. ३० सप्टेंबर १९४२ रोजी अहमदाबादमध्ये छोडो भारत आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा गोळीबारात नानुभाई पटेल यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नानक सिंग

    सातारा, महाराष्ट्र येथील रहीवासी साताऱ्यातील छोडो भारत आंदोलनात प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यासाठी योग्य जागा शोधण्याचे काम नानक सिंग यांनी सुरू केले. २५ फेब्रुवारी १९४२ रोजी अशाच एका योग्य जागेच्या शोधात नानक सिंग पोलिसाना सापडले. सातारा येथील मणदूर जंगलात पोलिसांबरोबर झालेल्या या चकमकीत नानकसिंग यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • नाना मुडके

    सातारा येथील रहिवासी होते. त्यांनी १८५७ च्या उठावात भाग घेतला आणि रंगो बापूजींच्यानेतृत्वाखाली साताऱ्यातील बंडखोरांशी हातमिळवणी केली. सर्व कैद्यांची सुटका करण्यासाठी सरकारी मालमता ताब्यात घेण्यासाठी आणि ब्रिटिशांना मारण्यासाठी सातारा आणि महाबळेश्वरवर हल्ला करण्याची योजना आखली. जून १८५७ मध्ये ब्रिटिशांनी यांना पकडले आणि यांच्यावर देशद्रोह, ईस्ट इंडीया कंपनीविरुद्ध युद्ध, सरकारी मालमता लुटणे आणि तुरुंगातील कैद्यांची सुटका करणे असे आरोप लावण्यात आहे. सप्टेंबर १८५७ रोजी त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनाविण्यात आली आणि तोफेने उडवून देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • मुथाण्णा पोशण्णा

    यांचा जन्म १९२१ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झालानमिया चव्हाण सातारा महाराष्ट्र येथील रहिवासी नायक चव्हाण १८५७च्या उठावात त्यांनी भाग घेतला आणि रंगो बापूजीच्या नेतृत्वाखाली साता-यातील बंडखोरामध्ये सामील झाला ज्यांनी सर्व कैद्यांची सुटका करण्यासाठी सरकारी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आणि ब्रिटिश अधिकान्यांना मारण्यासाठी सातारा आणिमहाबळेश्वरवर हल्ला करण्याची योजना आखली होती. जून १८५७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना पकडले आणि त्यांच्यावर देशद्रोह, ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध युद्ध करणे, सरकारी मालमता लुटणे आणि तुरुंगातील कैद्यांची सुटका करणे असे आरोप ठेवण्यात आले. सप्टेंबर १८५७ रोजी फाशी ची शिक्षा सुनावण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मुरलीधर बापूजी

    हे बडोदा गुजरात येथील रहिवासी. १८५७ च्या उठवात ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. क्रांतिकारकांना त्यांनी हत्यारांची मदत केली. ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यासाठी त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना प्रवृत्त केले. कंपनीच्या सैन्याने त्यांना पकडले आणि त्यांच्यावर राजद्रोह आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केल्याचा आरोप ठेवण्यात आला, त्यांना काळ्यापाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. ते सप्टेंबर १८५९ मध्ये अंदमानला बंदिवासात मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मुलजी भोला

    यांचा जन्म १९२५ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मुकादन

    हे १९०७ साली नागपूर येथे जन्माला आले. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १३ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जणांचा बळी गेला, त्याचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा मारुक त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला त्यात १७ जण ठार आणि ५० जण जखमी झाले त्यात मुकादम त्याच दिवशी तिथे मृत्यूमुखी पडले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मुहसीन

    यांचा जन्म १९३४ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मुद्द्वासू शेट्टी

    यांचा जन्म १९९६ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोतीरामजी पाचघरे

    यांचा जन्म १९०७ रोजी अमरावती येथे झाला. त्यांनी ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते सार्वजनिक मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोतीचंद

    हे सोलापूर येथील रहिवासी होते. याच्या सोबत्यांनी आयोजित केलेल्या राजकीय मोच्यात त्यांनी भाग घेतला. यांना अटक झाल्यावर यांच्यावर दरोडेखोरी आणि हत्येचा आरोप करून त्यांना मार्च १९१५ साली फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोती गुंसे

    हे बडोदा गुजरात येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. गुजरात येथील क्रांतिकारकांना त्यांनी हत्यारांची मदत केली. विविध ठिकाणी ब्रिटिशांशी लढले आणि इतरांनीसुद्धा सेनानींना सामील व्हावे म्हणून प्रोत्साहित केले. ब्रिटिश खजिना आणि शस्त्रे लुटायचा क्रांतिकारकांना तो पुरवायचा असे काम त्यांनी केले. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोरारभाई पोचीयाभाई

    यांचा जन्म नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांनी ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि इंग्रजांना छोडो भारत चळवळीत ते सार्वजनिक मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोरारभाई पटेल

    यांचा जन्म फालीया, सुरत गुजरात येथे झाला. त्यांनी ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते सार्वजनिक मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोकल झुम्कीराम भावसर

    हे गिरणी कामगार चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते होते. अंमळनेर येथील आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी निदर्शनात देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादाचा नारा देत सामील झाले. मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला, परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला आणि भावसार त्यापैकी एक होते.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहिपसिंग

    हे अहमदनगर येथील रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध, क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी अनेक वेळा ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यात भाग घेतला. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. रोजी मार्च १८५८ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि १८५८ रोजी त्यांना अंदमानला येथे पाठवण्यात आले. ऑगस्ट १८५८ ला अंदमान येथेच कैदेत मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहनलाल पटेल

    हे बडोदा येथील रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी १८ ऑगस्ट १९४२ रोजीच्या दिवशी एका प्रचारासाठी जात असताना भडोच स्टेशन वर पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना देता गोळीबार केला त्यात त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहनलाल ओवजी

    हे मुंबईचे रहिवासी होते. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. जानेवारी १९३१ रोजी काळबादेवी येथील मिरवणुकीत त्यांनी भाग घेतला. ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहनलाल मेघराज

    यांचा जन्म १९३४ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहनदास पटेल

    यांचा जन्म गुजरात येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते सार्वजनिक मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहन कला

    यांचा जन्म १९२० मध्ये मेहसाणा, गुजरात येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोड़ो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोड़ो भारत चळवळीत ते सार्वजनिक मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद शबान भिकारी

    हे मालेगाव, नाशिक येथील रहिवासी होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. दारूच्या दुकानांवर बहिष्कार करणे, लोकांना संघटित करणे, अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. आंदोलन करताना पोलिसांनी जी धरपकड केली त्यात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात डांबले. त्यांच्यावर शिपायांवर हल्ल्या केल्याचा आरोप ठेवून त्यांना जुलै, १९२२ रोजी येरवाडा तुरुंगात फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद हुसेन

    हे मालेगाव, नाशिक येथील रहिवासी होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. दारूच्या दुकानांवर बहिष्कार टाकणे लोकांना संघटित करणे, अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. आंदोलन करताना पोलिसांनी जी धरपकड केली त्यात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात डांबले. तेथे पोलिसांच्या अमानुष छळामुळे १९२२ साली त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद हुसेन

    मुन्शी हे पुणे येथील रहिवासी. ते मुरूल दुदा यांच्या नेतृत्वाखाली १८५७ साली ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी अनेक वेळा ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यात भाग घेतला. बरेच ठिकाणी इंग्रजांविरुद्ध शिपायांचे बंड सुरू केले. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि आरोप करून त्यांना १४ ऑगस्ट १८५७ रोजी फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद अब्दुल गफूर

    हे मालेगाव, नाशिक येथील रहिवासी होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. दारूच्या दुकानांवर बहिष्कार करणे लोकांना संघटित करणे, अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. आंदोलन करताना पोलिसांनी जी धरपकड केली त्यात ह्यांना अटक झाली. त्यांच्यावर हल्ल्याचा आरोप ठेवून त्यांना १८ जानेवारी, १९२३ रोजी येरवाडा तुरुंगात फाशी देण्यात आली. मोहम्मद अझीझ यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद वजीर

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद सिद्धिक

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या कामाठीपुरा येथील एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मोहम्मद हुसेन आदमजी

    यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मिश्रीलाल झांबर

    हे शेंदुर्णी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील रहिवासी. यांनी १९४२च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. १८ ऑगस्ट रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात त्यांनी शेंदुर्णी गावातील टपाल कार्यालयावर हल्ला करायचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि तुरुंगात डांबले. तेथे पोलिसांच्या अमानुष छळामुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मीर फिदा

    है औरंगाबाद येथील रहिवासी होते. ते आधी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीत होते, पण  १८५७ च्या उठावात त्यांनी कंपनी सोडली आणि क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी औरंगाबाद येथे बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला. २४ जून १८५७ रोजी त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. आणि त्याच दिवशी सगळ्यांसमोर फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • म्हर्दिया

    हे अहमदनगर येथील रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध, क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी अनेक वेळा ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यात भाग घेतला. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना जून १८५७ रोजी पकडले आणि फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मेधी खान

    हे मुंबईचे रहिवासी होते. १८५७ च्या उठावात ते स्वातंत्र्य सेनानींना सामील झाले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला. ब्रिटिश आस्थापनांवर हल्ला करण्यासाठी त्याने आपल्या सहकाऱ्यांनाही प्रवृत्त केले. ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला. २३ जानेवारी १८५८ रोजी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठवण्यात आली आणि १२ जून १८५८ रोजी अंदमानला येथे पाठवण्यात आले. एप्रिल १८५९ ला अंदमान येथेच कैदेत मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मिनसाहेब

    खुर्द हे औरंगाबादचे रहिवासी होते. ते १८५७ च्या उठावात सामील झाले आणि औरंगाबादच्या वेगवेगळ्या भागांतून इंग्रजांविरुद्ध लढले. एप्रिल १८७० रोजी निर्मल भागाच्या दिशेने येणाऱ्या इंग्रज सैन्याशी झालेली चकमकीत ते मारले गेले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मथुराबाई माटे

    ह्या पुणे येथील रहिवासी होत्या. त्यांनी ऑगस्ट १८९४ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभागी झाल्या. पुणे येथील एका निदर्शनावर झालेल्या गोळीबारात त्या मृत्यू पावल्या.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुती तांबे

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुती कृष्ण

    यांचा जन्म १९९६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुती जाधव

    हे मुंबईचे रहिवासी होते. पूर्वी ते ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई होते पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले आणि त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुती गडवे

    हे मुंबईचे रहिवासी होते. पूर्वी ते ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई होते पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटिश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढले आणि त्यात त्यांना प्राणघातक जखमा झाल्या. त्यांना बर्मा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डिसेंबर १९४४ मध्ये त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुती चोहाटकर

    हे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी होते. भारत १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते त्यांच्या गावातून सामील झाले. ब्रिटिशविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक झाली आणि त्यांना बेतुल येथे तुरुंगात ठेवण्यात आले. १९४३ साली तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुती भेरू

    कांबळी यांचा जन्म १९११ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मारुक ठाकरे

    हे १८९७ साली नागपूर येथे जन्माला आले. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. १३ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जणांचा बळी गेला. त्याचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

    तेव्हा मारुक त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात १७ जण ठार आणि ५० जण जखमी झाले. त्यात ठाकरे त्याच दिवशी तिथे ते मृत्यूमुखी पडले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • माओजी धर्मा

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्याच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तिथेच त्यांना जुलै १९२२ रोजी फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मंजूर अहमद

    यांचा जन्म १९२७ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा त्याचवेळी तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मन्युएल बोस

    यांचा जन्म १९२७ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा त्याचवेळी तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मनुभाई पटेल

    यांचा जन्म गुजरात मध्ये झाला. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोड़ो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. ते एका ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण गणपत

     यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मनुभाई मेहता

    यांचा जन्म गुजरात मध्ये झाला. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. ते एका ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण भिकाजी गोडबोले

     हे अकोल्यात १९२७ साली जन्माला आले. १९४२ मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. त्यांना दिनांक ८ ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ६ महिन्यांची सजा सुनावण्यात आली. तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारांमुळे त्यांची तब्येत खालावली आणि अकोल्याच्या तुरुंगात त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मानसिंग

    हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध, साताऱ्याचे रंगो बापूजी ह्यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना सामील झाले. तेथील क्रांतिकारकांची साताऱ्याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना जून १८५७ रोजी पकडले आणि १२ जून १८५७ रोजी तोफेने उडवून देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्ष्मण गणेश जोशी

      यांचा जन्म दिनांक २९ सप्टेंबर १९१५ रोजी कराड, जिल्हा सातारा येथे झाला. त्यांनी १९३० आणि १९३२ मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च १९३२ रोजी त्यांना अटक झाली आणि त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात झाली. अटकेत असताना दिनांक १९ सप्टेंबर १९३२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मनू

    हे सुंथ (आता गुजरात) येथील रहिवासी. १९०७ मध्ये गुजरात आणि राजस्थान च्या काही भागांमध्ये भिल्ल चळवळीत भाग घेतला. भिल्लांच्या लढाया आणि ब्रिटिश विरोधी मेळावे यांनी इंग्रज बेजार झाले. त्यांनी सैन्य बोलावले. १७ नोव्हेंबर १९१३ रोजी या सैन्याने भिल्लांवर हल्ला केला. त्यात अनेक पकडले गेले, काही जखमी झाले आणि मनूसह इतर २५ जण मारले गेले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लाल्ताप्रसाद लक्ष्मण

     यांचा जन्म १९२४ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनीकेलेल्या गोलपीठा येथे गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मंजुळाबाई पाटील

    ह्या मुंबईच्या रहिवासी. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात त्या सक्रियपणे सहभागी झाले. १० ऑगस्ट १९४२ रोजी त्या एका ब्रिटिशविरोधी मोर्चामध्ये त्या सामील झाल्या. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लालजी महार

     यांचा जन्म १९१७ मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशां विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक ८ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यात निदर्शकांवर सैन्याने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • मंजी

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्याच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लक्षाम्मा राज्जम्मा

    यांचा जन्म १९११ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • मणिशंकर धीरजलाल

    यांचा जन्म १९२२ मध्ये गुजरात येथे झाला. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. ते एका ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी मारले गेले. केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • लगी रामचंद्र

     यांचा जन्म १९१४ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मणिराम गोंड

    यांचा जन्म चिमूर जिल्हा चंद्रपूर येथे १८९२ रोजी झाला. तेथील ते शेतकरी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा त्यांना ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली आणि त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून सप्टेंबर १९४२ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • माणिकलाल पटेल

    यांचा जन्म १९२२ मध्ये गुजरात येथे झाला. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोड़ो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. २८ ऑगस्ट १९४२ च्या दिवशी एका प्रचारासाठी जात असताना भडोच स्टेशन वर पोलिसांनी त्यांना ओळखले आणि कोणतीही पूर्वसूचना देता गोळीबार केला त्यात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कृष्णराव पवार

    यांचा जन्म अमरावती येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात झालेल्या जखमांमुळे ते त्याच दिवशी मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • माणिकराव देशमुख

    हे नागपूर येथील रहिवासी. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले.

    १४ ऑगस्ट १९४२ रोजी ते एका ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • माणिकलाल गुणवंतलाल

    यांचा जन्म १९२६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थं झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कृष्णराव महादेव काकडे

      यांचा जन्म १९२० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिनांक १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर रणगाड्यातून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मंगलदास श्रॉफ

    हे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते होते. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. सोलापूर येथे ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि नंतर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कृष्णा सुकुमार सिंग

      यांचा जन्म १९३१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मंगल कैसा

    है मुंबई चे रहिवासी होते. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा त्याच दिवशी तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कृष्णा राऊत

      यांचा जन्म आष्टी, जिल्हा वर्धा येथे १९१७ साली झाला. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला आणि १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला. त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून सप्टेंबर १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • कृष्णा मारुती

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. गोळीबारात झालेल्या जखमांमुळे ते १९३० साली मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     



     

  • कृष्णा काकडे

    यांचा जन्म नागपूर येथे १९९८ साली झाला. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला आणि १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात झालेल्या जखमांमुळे ते त्याच दिवशी मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मालोजी जोशी

    हे गुजरात येथील रहिवासी. १९५७ च्या उठावात ते गरबदास पटेल याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र सेनानींना सामील झाले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना तोफेने उडवून देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कृष्णा गोपाळ कर्वे

    त्यांचा जन्म नाशिकमध्ये झाला. बंगालच्या फाळणीनंतर महाराष्ट्रात अनेक गुप्त संस्था उभ्या राहिल्या. १९०९ मध्ये जेव्हा गणेश सावरकरांना सरकारविरोधी लिहिल्याबद्दल काळ्या पाण्याची शिक्षा झाली तेव्हा क्रांतिकारकांनी याचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. जॅक्सनला स्थानिक नाट्यगृहात मराठी नाटकाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. अनंत कान्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णा कर्वे यांच्याकडे थिएटरमध्ये कलेक्टरला मारण्याचे काम सोपवण्यात आले होते. जॅक्सनच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. आणि त्यांना ठाण्याच्या विशेष कारागृहात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • कोंडीबा कोळी

      यांचा जन्म १९२० साली पुणे येथे झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी गडीतळ, हडपसर येथे निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मलप्पा धनशेट्टी

    यांचा जन्म १८९८ रोजी सोलापूर येथे झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत कामाला होते. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च १९३० रोजी सोलापूर मध्ये ब्रिटिशांविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. मे १९३० रोजी त्यांनी एका मोठ्या मायचे नेतृत्व केले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले. ब्रिटिशांविरोधी लोकांनी केलेल्या कारवायांमध्ये काही पोलीस जखमी झाले. या मोर्च्यात सहभागी धनशेट्टी यांना अटक करण्यात आली आणि खुनाच्या आरोपाखाली त्यानी सोलापूर येथील तुरुंगात १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मल्लिकार्जुन स्वामी

    हे सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्त होते. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. सोलापूर येथे ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • किशन

      चा जन्म १९१८ मध्ये नागपुरात झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १३ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हदपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर यावेळी पोलिसांनी स्वेर गोळीबारात केला. त्यात १७ माणसे मरण पावली. किशन त्यामधील एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • किसन रामपाल

      यांचा जन्म १९२७ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • किसन जगू निखाडे

      यांचा जन्म १९२८ मध्ये नागपुरात झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • किसन भाऊ

      यांचा जन्म १९२९ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • किसनभाऊ ढेंगळे

      हे १८९६ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मल्हार राजे

    यांचा जन्म १९३६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनीकेलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • किसन बंडू भोसले

    हे दि. १५ एप्रिल १९९० रोजी वडगाव, सातारा येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. 'करो या मरो' आणि 'छोडो भारत' या गांधींच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला असता किसन यांनी आंदोलनात भाग घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पुरुषोत्तम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली २००० हून अधिक लोकांच्या निदर्शनात ते सामील झाले. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादीचा नारा देत त्यांनी वडूज कचेरी इमारतीवर तिरंगा फडकावत कूच केले. मोर्चेकऱ्यांना मामलेदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला. परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला. किसन त्यापैकी एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • मायकी मेडी

    यांचा जन्म १९२० मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • किसन आत्माराम अहिर

    यांचा जन्म खडकी, जिल्हा वर्धा येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. पोलिसांच्या अटकेतून ते एकदा यशस्वीपणे पळाले, पण शेवटी मणदूर गावात पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • महिपत नाईक

    नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. त्यांच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. नाशिक, अहमदनगर येथील अनेक ठिकाणी त्यांनी ब्रिटिश आस्थापनांवर हल्ले केले आणि त्यांची मालमत्ता लुटली. २१ डिसेंबर १८५७ रोजी नाशिक येथे कंपनीच्या सैन्याने त्यांना मारले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • खाशाबा मारुती शिंदे

    हे दि. १५ एप्रिल १९१५ साली वडगाव, जिल्हा सातारा येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. 'करो या मरो' आणि 'छोडो भारत या गांधींच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत झाला असता. खाशाबा यांनी आंदोलनात भाग घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पुरुषोत्तम घार्गे यांच्या नेतृत्त्वाखाली २,००० हून अधिक लोकांच्या निदर्शनात ते सामील झाले. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादीचा नारा देत त्यांनी वडूज कचेरीवर तिरंगा फडकावत कूच केली. मोर्चेकऱ्यांना मामलेदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला. परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला. खाशाबा त्यापैकी एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • केशवराव ताथोडे

     यांचा १९१५ साली बेलोरा, जिल्हा अमरावती येथे जन्म झाला. ते कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी आपल्या भागातील लोकांना ब्रिटिश राजवटीचा प्रतिकार करण्यासाठी संघटित केले आणि ऑगस्ट १९४२ ते एप्रिल १९४३ या काळात आपल्या जिल्ह्यात जनआंदोलनाचे नेतत्त्व केले. दि. १६ एप्रिल १९४३ रोजी त्यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • महादू सरोकार

    यांचा जन्म १९९५ रोजी गुमगाव, जिल्हा नागपूर येथे झाला. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात  ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • केशवराव श्रावण ढोंगे

      हे १९२३ साली वर्धा येथे जन्माला आले. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ८ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हदपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते आष्टी, वर्धा येथे सामील झाले. त्यावेळी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • महादू

    हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला. आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्याच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • केशव तळवलकर

      हे १८९१ साली आष्टी, जिल्हा वर्धा येथे जन्माला आले. महाराष्ट्राच्या क्रांतिकारी चळवळीत ते सामील झाले. नंतर पोलिसांच्या अटकेपासून स्वतःला यशस्वीपणे वाचवत ते सीमा ओलांडून गोव्यात गेले. तेथून ते अमेरिकेला जाणाऱ्या जहाजात बसले. सॅन फ्रान्सिस्कोमध्येही त्यांनी भारतीय क्रांतिकारी चळवळीसाठी सक्रियपणे काम केले. १९१८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • महादेव सोनार

    हा १० वर्षांचा छोटा मुलगा. भंडारा येथे १९३३ रोजी जन्माला आला. केवळ दुसरी इयत्तेचा विद्यार्थी होता. ऑगस्ट १९४२ च्या ब्रिटिशविरोधी मोर्चामध्ये तो सामील झाला. तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि तेथेच मृत्यू पावला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • केशव लिंगायत

    यांचा १९१८ रोजी वर्धा येथे जन्म झाला. भारत १९४२ च्या छोडो आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. दि. ८ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते वर्धा येथे सामील झाले. यावेळी निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • केशव ढोगे

     यांचा १९२० रोजी नागपूर येथे जन्म झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर यावेळी झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • केशव अमृता कोळूगडे (जाधव)

     ह्यांचा जन्म दि. १ मे १८९५ रोजी इंदोली, जिल्हा सातारा येथे झाला. त्यांनी १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनात भाग घेतला. त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिश विरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • महादेव रानडे

    यांचा जन्म पुणे येथे झाला. चाफेकर बंधूनी जो ब्रिटिश विरोधी लढ्यासाठी तरुण पुरुषांचा एक गट बनवला होता त्यात ते सामील झाले. चाफेकर बंधूंनी, डेव्हिड बंधूना ठार मारण्याचा निर्णय घेतला दि. फेब्रुवारीला त्यांनी डेव्हिड बंधूना ठार केले. गणेश नीलकंठ या द्रविड बंधूंच्यामुळे दामोदरपंतांना फाशी झाली, म्हणून वासुदेवराव महादेव रानडे यांनी द्रविड बंधूंना ठार करण्याची प्रतिज्ञा केली. तत्पश्चात वासुदेव चाफेकर महादेव रानडे यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. १८ एप्रिल १८९९ रोजी दामोदरपंतांस, १० मे १८९९ रोजी बाळकृष्णपंत, १२ मे १८९९ रोजी वासुदेवराव महादेव रानडे यांना येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कटु माना

      यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे १८९२ रोजी झाला. ते शेतकरी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा झालेल्या ब्रिटिश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     


  • महादेव लोहार

    यांचा जन्म सातारा येथे झाला. हे केवळ १४ वर्षांचे विद्यार्थी होते. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ऑगस्ट १९४२ च्या ब्रिटिशांविरोधी मोर्चामध्ये ते सामील झाले, तेव्हा ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • महादेव देसाई

    यांचा जन्म दि. जानेवारी १८९२ रोजी गुजरात येथे झाला. हे व्यवसायाने वकील होते. गांधीजींच्या संपर्कात आल्यावर ते त्यांचे वैयक्तिक सचिव झाले. १९३० रोजी सुरू झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतला. दि. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. त्या दरम्यान त्यांना अटक झाली. १९४५ साली अगाखान पॅलेस येथे नजरकैदेत ते मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • महादेव पावडे

    यांचा जन्म दि. १९२० साली परसोडा, अमरावती येथे झाला. दि. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि. १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी बेनोडा पोलीस स्टेशनवर हल्ला केला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि वर्षांची शिक्षा देण्यात आली. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • करवीरय्या स्वामी

      हे १९९६ साली कापसी, जिल्हा कोल्हापूर येथे जन्माला आले. भारत १९४२ च्या छोडो आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध • कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते त्यांच्या गावातून सामील झाले. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. गारगोटी येथे सरकारी खजिन्यावर हल्ला करण्यात त्यांचा पुढाकार होता. तेव्हा झालेल्या पोलिसी गोळीबारात ते जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • कारभारी भाऊ

     हे १८९६ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • महादेव बारमासे

    हे १९०७ साली मुंबईत जन्माला आले. ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. त्याआधी महाराष्ट्रात १९३० रोजी सुरू झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी भाग घेतला. दि. १६ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांनी बेनोडा पोलीस स्टेशनवर हल्ला केला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि वर्षांची शिक्षा देण्यात आली. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • महादेव सुतार

    यांचा जन्म गंगापूर, भुदरगड येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १३ डिसेंबर १९४२ रोजी ते कागल तालुक्यातील मोर्च्यात सामील झाले असता, निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात झालेल्या जखमांमुळे ते त्याच दिवशी मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कस्तुरबा गांधी

     ह्या पोरबंदर, गुजरात येथे दि. ११ एप्रिल १८६९ रोजी जन्माला आल्या. दक्षिण आफ्रिकेत तसेच भारतातील गांधीजींच्या सर्व सामाजिक आणि राजकीय उपक्रमांमध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. 

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • महादेव फवाडे

    यांचा जन्म अमरावती येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १६ ऑगस्ट १९४२ रोजी ते एका मोर्चात सामील झाले असता, निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात झालेल्या जखमांमुळे ते त्याच दिवशी मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • मगनभाई पटेल

    यांचा जन्म नवसारी, गुजरात येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते सामील झाले. २२ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांच्या गावातील एका जाहीर सभेत ते उपस्थित राहिले असताना पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • माधवराव वामनराव झुमडे

    यांचा १९२४ रोजी नागपूर येथे जन्म झाला. आधी ते एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, मिरवणुकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. नंतर त्यांनी आत्महत्या केली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • माधवराव श्रावण देशमुख

      यांचा जन्म १९२० साली आष्टी, जिल्हा वर्धा येथे झाला. छोड़ो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधात आंदोलनात सामील झाले. १९४२ च्या छोडो भारत च्या आंदोलना दरम्यान त्यांनी आष्टी पोलीस ठाण्यावर हल्ला केला, ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • काशिनाथ पागधरे

     ह्यांचा जन्म १९२५ साली सटपती, जिल्हा पालघर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • काशिनाथ बाबाजी उर्फ बायजी फडताडे

    ह्यांचा १९१७ साली मुंबईत जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १० ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • करवीरय्या स्वामी

    हे १९९६ साली कापसी, जिल्हा कोल्हापूर येथे जन्माला आले. भारत १९४२ च्या छोडो आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते त्यांच्या गावातून सामील झाले. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. गारगोटी येथे सरकारी खजिन्यावर हल्ला करण्यात त्यांचा पुढाकार होता. तेव्हा झालेल्या पोलिसी गोळीबारात ते जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. 


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कारभारी भाऊ

      हे १८९६ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • कानुजी कोंडकर

     हे १९३१ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • कमलाकर विठ्ठल दांडेकर

    यांचा १९२४ साली महाड, जिल्हा रायगड येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. आपल्या काही मित्रांबरोबर त्यांनी महाड येथील पोस्ट ऑफिसवर १० सप्टेंबरला हल्ला केला. तेव्हा ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • कमलचंद रुगी

      यांचा १९२७ साली नागपूर येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ मध्ये नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • कमलचंद ऋषी वासनिक

      यांचा दि. २४ ऑगस्ट १९२३ रोजी नागपूर येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ मध्ये नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर ब्रिटिश सैन्याने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले. आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • कमल धोंडे

    यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते परळ येथे सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • कालिदास मिठाईवाला

     सोलापूर येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च १९३० रोजी सोलापूर मध्ये ब्रिटिशांविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले. ह्या मोर्च्यात सहभागी कालिदास जखमी झाले आणि तेथेच मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • कलमेश्वर लहानू

    यांचा जन्म १९९२ मध्ये नागपुरात झाला. त्यांनी ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले आणि १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला. त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आलो आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना नागपूर तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर, १९४३ मध्ये त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • के पितांबर राजा

    यांचा जन्म १९०६ मध्ये मुंबई येथे झाला. ते एक हॉटेल व्यवसायिक होते. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २३ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात से गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • जंगलोजी ढोरे

     यांचा जन्म खडकी, जिल्हा वर्धा येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दि. १५ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा जंगलाजी त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्याच दिवशी तिथे ते मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जीवनलाल ठाकूरलाल दिवाण

    यांचा १९०१ रोजी मुंबईत जन्म झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी मुंबईतील रानडे  रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जानु रामू भंडारे

    हे १९२४ साली मुंबई येथे जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २३ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जंगलू धोंडबाज ढोरे

    यांचा जन्म १९२० मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १५ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. ह्या निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यामधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • जंगल वाडीपरे

      यांचा जन्म १९२० मध्ये वर्धा, येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला, तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यातून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • जंगल धोंडीबा कुणबी

      यांचा जन्म १९२० मध्ये वर्धा येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ८ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यातून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जनाराव सेलूकर

      यांचा जन्म १९२० मध्ये नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यांतून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जमना रंगारी

    यांचा जन्म १९३५ मध्ये मेवाड, नागपूर येथे झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. निदर्शकांवर सैन्याच्या रणगाड्यातून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जमाल मोहम्मद

    हे १९२६ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जयसिंग गणपत केदार

     हे मुंबईत १९२१ साली जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी मुंबईतील रानडे रस्त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दि. २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जयरामजी बडोने

    यांचा जन्म यावली, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला ह्या आरोपाखाली त्यांना दि. ८ ऑगस्ट १९४२ रोजी अटक झाली आणि ४ वर्षांची शिक्षा झाली. परंतु बेतुल, मध्यप्रदेश येथील तुरुंगात पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • जगदेवराव पाटील

      हे दि. ५ मार्च, १९०० रोजी चांदूर, जिल्हा बुलढाणा येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना ६ महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. तिथून बाहेर आल्यावर त्यांनी “राष्ट्रमाता" हे वर्तमानपत्र काढायला सुरुवात केली. दि. १७ मार्च १९३९ रोजी त्यांचा इंग्रज पोलिसांनी गुढरित्या खून केला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • जगन्नाथ शिंदे

    हे १९१७ साली सोलापूर येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च १९३० मध्ये सोलापूर मध्ये ब्रिटिशांविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले. ब्रिटिशांविरोधी लोकांनी केलेल्या कारवायांमध्ये काही पोलीस जखमी झाले. ह्या मोर्च्यात सहभागी झालेल्या जगन्नाथ यांना अटक करण्यात आली आणि खुनाच्या आरोपाखाली त्यांना सोलापूर येथील तुरुंगात दि. १२ जानेवारी १९३१ रोजी फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • जगन्नाथ पाटस्कर

      हे १९१७ साली भाळवणी, जिल्हा सोलापूर येथे जन्माला आले. ते पेपर विक्रेता म्हणून काम करत होते. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला आणि १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला. त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना सोलापूर येथील तुरुंगात फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


     

  • इस्राईल अल्लारखाँ

    हे मालेगाव, जिल्हा नाशिक येथे १८९२ साली जन्माला आले. ते एका खाजगी कंपनीत कामाला होते. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तिथेच त्यांना दि. ६ जुलै १९२२ रोजी फाशी देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • इमाम अली जोखम

    हे १९०६ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हुसैन इस्माईल

    हे १९३४ साली मुंबईत जन्माला आले. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • हिरालाल कालर

     यांचा जन्म खडकी, जिल्हा वर्धा येथे झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. आष्टी येथे ब्रिटिशांविरोधात आंदोलनात सामील झाले. मिरवणुकांवर सैन्याच्या रणगाड्यामधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले, त्यात १९४२ साली त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हिरालाल जयस्वाल

     यांचा जन्म सोतेफळ, जिल्हा अमरावती येथे झाला. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला आणि १९४२ मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला. त्यांना ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर १९४३ मध्ये त्यांना दयनीय अवस्थेत सोडण्यात आले. परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हिराजी पाटील

     यांचा जन्म १९०० साली कर्जत, जिल्हा रायगड येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. सिध्दगड येथे ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. यावेळी रणगाड्यामधून केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि १९४२ साली त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • हिराजी महादेव बिंबले

     यांचा जन्म नागपुरात झाला. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. नागपुरातील एका दारूच्या दुकानांवर बहिष्कार टाकण्याचे आंदोलन करतांना दि. २७ फेब्रुवारी १९२१ रोजी ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला या अंदाधुंद गोळीबारात हिराजी जागीच ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • हसुराम बुधाजी घरत

    यांचा जन्म १९०६ मध्ये रायगड जिल्ह्यात झाला. पनवेलजवळील चिरनार सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दि. २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. ब्रिटिश सरकारने गावकऱ्यांना जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले गेले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार करून १४ जणांना ठार मारले, त्यात हसूरामही होते. गंभीर जखमी झाल्याने केईएम रुग्णालयात दि. ३० सप्टेंबर १९३० रोजी भरती केले गेले जिथे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • हाशीम मोहम्मद

    यांचा जन्म १९२२ मध्ये नागपूरात झाला. त्यांनी १९४२ मध्ये असहकार आंदोलनात नागपूर येथे भाग घेतला. दि. १२ ऑगस्ट, १९४२ रोजी ते एका ब्रिटिशांविरोधी मिरवणुकीत सामील झाले. त्यात झालेल्या गोळीबारात ते मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हरीश्चंद्र

    यांचा जन्म १९०७ साली नागपुरात झाला. त्यांनी १९२१ मध्ये असहकार आंदोलनात भाग घेतला. नागपुरातील दारूबंदी आंदोलन आणि विविध मेळाव्यांमध्येही भाग घेतला. दि. २७ फेब्रुवारी, १९२१ रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

     

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • हरिप्रसाद रघुविर

     यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला, भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. तीन बत्ती येथे निदर्शकांवर ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळ्या लागल्या. जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू दि. ३ मार्च १९४६ रोजी झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • हरिलाल कहार

    यांचा जन्म १९२४ मध्ये खडकी, जिल्हा वर्धा येथे झाला. हे शेतकरी होते. १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि. ६ ऑगस्ट, १९४२ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात नेलेल्या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या पोलीस गोळीबारामुळे रुग्णालयात मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हरिबा बेंडे

    यांचा जन्म १९२० मध्ये चिकोडी, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथे झाला. दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते लढाऊ स्वयंसेवक म्हणून सक्रियपणे सहभागी झाले. ते कुस्तीपटू होते. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हरी शिंदे

    मुंबईत जन्मलेले हरी शिंदे, हे दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले.पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हरी सजना

     यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दि. २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • हरी रामोशी

     यांचा जन्म १८४० मध्ये कळंबी, जिल्हा सातारा येथे झाला. वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या रामोशी क्रांतिकारी गटाचे ते सक्रिय सदस्य होते. ब्रिटिश राज्याविरोधी अनेक कारवायांमध्ये ते सक्रिय सामील होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी निधी हवा म्हणून त्यांनी अनेक ब्रिटिश व्यावसायिकांवर घातलेल्या अनेक छाप्यांमध्ये भाग घेतला. त्यांना ब्रिटिशांनी सोलापूरमध्ये पकडले आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिली. १८८० मध्ये त्यांना जेजुरी येथे फाशी दिली गेली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • हरी फये

     यांचा जन्म १९२० मध्ये करडी, जिल्हा भंडारा येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते तुमसर पोलीस स्टेशनच्या मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • येरप्पा

     यांचा जन्म सोलापूर, येथे झाला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि. ८ मार्च १९३० रोजी सोलापुरातील ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • हरबा

    यांचा जन्म १८८६ मध्ये नागपुरात झाला. १९२१ मध्ये त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. नागपूर शहरातील दारूबंदीसाठीच्या विविध मेळाव्यात ते सहभागी झाले. दि. २७ फेब्रुवारी, १९२१ रोजी जुलमी ब्रिटिश सरकारच्या विरोधात जमलेल्या केलेल्या निदर्शकांवर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबत त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • हरबा महार

    यांचा जन्म १९१२ मध्ये नागपुरात झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिश विरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. मिरवणुकांवर सैन्याच्या रणगाड्यामधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • गुणवंत शाह

     यांचा जन्म १९२४ साली अहमदाबाद येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि ९ डिसेंबर १९४३ साली छोडो भारत चळवळी दरम्यान ते एका मिरवणुकीत सामील झाले असताना पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुणवंतराय माणेकलाल

    हे मुंबईचे रहिवासी होते. ते दि. २३ जानेवरी १९४६ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्माच्या स्मरणार्थ निघालेल्या मोठ्या मिरवणुकीत सामील झाले, जी सँडहर्स्ट रोड, बॉम्बेच्या चौपाटीपासून निघाली होती. मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी अडवले होते, त्यांनी रस्त्यावर बॅरिकेड लावले होते. मिरवणूक विठ्ठलभाई रोडच्या दिशेने वळवावी अशी पोलिसांची इच्छा होती. राज्यकत्यांचा निषेध करण्यासाठी मोर्चेकर्त बॅरिकेडजवळ बसले. त्यांच्यावर पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला आणि नंतर मिरवणुकीवर अंदाधुंद गोळीबार केला. गुणवंतराय यांना गोळी लागून गंभीर जखम झाली आणि त्याच दिवशी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गंगू

    हे खानदेश येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटीशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. मार्च १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना १८५९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुंगा

     हे पेठ, नाशिक येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावात यांनी भाग घेतला आणि इंग्रजांशी झालेल्या चकमकीत पकडले गेले. त्याच्यावर देशद्रोह आणि कंपनीची सत्ता उलथून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमान बेटावर पाठवण्यात आले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुंडा सुतार

     यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांनी १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि १९४३ साली छोडो भारत चळवळी दरम्यान ते एका मिरवणुकीत सामील झाले असताना पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुंडा नागपुरे

    यांचा जन्म १९२० मध्ये खडकी येथे झाला. हे शेतकरी होते. १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि. ६ ऑगस्ट १९४२ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात मोर्च्यात सहभागी झालेले असताना पोलिसांच्या गोळीबारात ते ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुंडा कुंभार

     यांचा जन्म सांगली, महाराष्ट्र येथे झाला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. १९३० साली सोलापुरातील ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुणवंत माणेकलाल शाह

     यांचा जन्म अहमदाबाद येथे झाला. दि. ८ ऑगस्ट, १९४२ रोजी झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दि. ९ जानेवारी, १९४३ रोजी शहरात, जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा त्यात उत्साहाने सहभागी झाले. या सभेवर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला त्याच दिवशी तिथे ते ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुलाम हुसेन अली मोहम्मद

     यांचा जन्म १९०६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुलाबराव नागपुरे

    यांचा जन्म १९२० मध्ये खडकी येथे झाला. हे शेतकरी होते. १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि. ६ ऑगस्ट १९४२ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात मोर्च्यात सहभागी झालेले असताना पोलिसांच्या गोळीबारात ते ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गुलाबराव धुडे

    सन १९०० मध्ये वडाळा, जि. वर्धा, महाराष्ट्र येथे जन्म. चौथीपर्यंत शिक्षण. शेतकरी. दि. ०८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सहभागी. ऑगस्ट १९४२ मध्ये झालेल्या निदर्शनात सहभागी झाले असताना मारले गेले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • • गोविंदराव उतरणकर

    दि. १५ मार्च, १९१७ राजी पाटम, जि. मेहसाना, गुजरात येथे जन्म. शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत. दि. ८ ऑगस्ट, १९४२ राजी सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सहभागी. दि. २५ डिसेंबर १९४२ च्या विषनगर येथील निदर्शनावर पोलीसांच्या गोळीबारात शांतीबेन पटेल व त्यांचे पिता सकलचंद पटेल यांचा बचाव करताना गोविंदराव जखमी झाले व त्यातच त्यांचा दि. १५ जानेवारी १९४३ रोजी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गोविंदस्वामी नायडू

     यांचा १९२० रोजी मुंबई येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. दि. १० ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हरपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. तेव्हा झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात ते ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • गोविंद मालपेकर

    यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गोविंद मालपे

     यांचा जन्म १९२१ मध्ये आष्टी येथे झाला. हे शेतकरी होते. १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. वर्धा येथे ऑगस्ट १९४२ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात मोर्चात सहभागी झाले असतांना पोलीस गोळीबारामुळे मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • गोविंद गणेश ठाकूर

    ह्यांचा जन्म १९२५ साली नांदगाव, पालघर येथे झाला. १९४२ च्या छोड़ो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशविरोधी विविध कार्यामध्ये सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. मिरवणुकांवर ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोवर्धनदास महादेव

    यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले दि.२२१९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारण से गंभीर जखमी झाले तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोवर्धनभाई रणछोड़भाई

     यांचा जन्म भडोच, गुजरात येथे झाला. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि. ८ मार्च १९३० रोजी मोठ सत्याग्रहात भाग घेतला तेव्हा निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोर्धनदास रामी

    यांचा जन्म १९२२ रोजी अहमदाबाद येथे झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ९ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला त्याच दिवशी तिथे ते ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपी कृष्ण

    हे बडोदा, गुजरात येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. ते बऱ्याच आंदोलकांच्या संपर्कात होते, त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दि. १९ जून १८५७ मध्ये त्यांना काळ्यापाण्याच्या जन्मठेपीची शिक्षा ठोठावण्यात आली. एप्रिल १८५८ रोजी अंदमानला पाठवण्यात आले. अंदमानला अटकेत असताना १८५८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • गोपाळराव नंधारधमे

     यांचा १९२० रोजी वर्धा येथे जन्म झाला. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. दि. ८ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते वर्धा येथे सामील झाले. नंतर त्यांनी भूमिगत होऊनही काम केले. परंतु वर्धा कॅम्प येथे झालेल्या पोलिसांच्या गोळीबारात ते ठार झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपाळ हर्ष

     हे ब्रह्मपुरी, चंद्रपूर येथील रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात भाग घेतल्यामुळे त्यांना अटक झाली आणि १९४४ मध्ये तुरुंगातच त्याचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपाळ कृष्ण

     हे बडोदा, गुजरात येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. ते बन्याच स्वतंत्र सेनानींच्या संपकांत होते. त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा भोगत असताना अंदमान येथील तुरुंगात त्याचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपाळ कृष्ण पाटणकर

     हे अभिनव भारत आणि इंडिअन रेव्होल्युशनरी पार्टीचे सदस्य होते.. त्यांनी ब्रिटीशांविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आंदोलकांना बंदुका आणि स्फोटके पुरविण्याचे काम त्यांनी केले. १९१० साली ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला ह्या आरोपाखाली अटक झाली. येरवडा तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपाळ जोशी

    हे १८५७ च्या उठावात क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांनी बऱ्याच ठिकाणी ब्रिटिशांशी लढा दिला आणि ब्रिटिशांच्या हल्ल्यांना तोंड देताना शेवटी पकडले गेले. त्यांच्यावर ब्रिटिशांच्या विरुद्ध बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला. १८५८ मध्ये त्यांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपीची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानला त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपाळ चुटके

     हे भंडारा येथील रहिवासी होते. १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. दि. १४ ऑगस्ट १९४२ रोजी ते एका मिरवणुकीत सामील झाले असता पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोपाळ उर्फ काशीरसागर तेली

     ह्यांचा जन्म हुपरी, कोलानापूर येथे झाला. १९४० च्या कोल्हापूरच्या सत्याग्रह चळवळीत ते सामील झाले. त्यांना अटक झाली. तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि १९४५ मध्ये कारागृहात त्यांचे निधन झाले


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गोंड रावजी

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. यांनी त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि. १३ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, त्यांना अटक झाली आणि १८ महिन्याची शिक्षा झाली. तुरुंगातील अमानुष अत्याचारांमुळे १९४२ रोजीत्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • गोंविद पटेल

    हे खानदेश येथील रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी स्वतंत्र सेनानींना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. त्यांनी इतरांनाही ब्रिटीशांविरुद्ध बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला आणि १८५८ रोजी त्यांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     



  • गिड्डा

    हे रेवा कंथा, गुजरात येथील रहिवासी होते. १९०७ मध्ये गुजरात आणि राजस्थान च्या काही भागांमध्ये भिल्ल चळवळीत भाग घेतला. भिल्लांच्या लढाया आणि ब्रिटीश विरोधी मेळावे यांनी इंग्रज बेजार झाले, आणि त्यांनी सैन्य बोलावले. दि. १७ नोव्हेंबर १९१३ रोजी या सैन्याने भिल्लांवर हल्ला केला. त्यात अनेक पकडले गेले, तर काही जखमी झाले. गिड्डा यांच्यासह इतर २५ जण मारले गेले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • घनश्यामदास दोशी

    हे नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी होते. दि. ८ ऑगस्ट १९४२ साली सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले. निदर्शकांवर ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळ्या लागल्या. जखमी झाल्यामुळे दि. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • घनश्याम गुलाबचंद

     हा केवळ ८ वर्षांचा मुलगा होता. छोडो भारत आंदोलनादरम्यान, ९ सप्टेंबर १९४२ रोजी गांधींच्या अटकेच्या पहिल्या मासिक स्मरण दिनाच्या निमित्त एक मिरवणुक काढली गेली. ज्यात बहुतेक शाळकरी मुलांचा समावेश होता, घनश्याम या मिरवणुकीत सामील झाला. त्या दरम्यान उपनिरीक्षकावर हल्ला झाल्यामुळे पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला, यात घनश्याम जागीच ठार झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गेनू रामजी

    यांचा जन्म १९१६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थझालेल्या एका निदर्शनात ते शिवाजी पार्क येथे सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी • पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणू रोशन

    यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते भेंडी बाजार येथे सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २३ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गर्बादास पटेल

    हे गुजरात चे रहिवासी होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी जीवाभाई ठाकूर ह्याच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळ्या ठिकाणी इंग्रजांविरुद्ध लढण्यात भाग घेतला. एका ब्रिटीश कॅम्पवर हल्ला करताना त्यांना पकडण्यात आले. ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केल्याचा आरोप ठेवण्यात आला, त्यांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अंदमानला बंदिवासात ते मरण पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपत येवले

    हे यावली, अमरावती येथील रहिवासी. यांनी १९४२च्या छोडो भारतआंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ८ ऑगस्ट रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यांना अटक करण्यात आली. आणि नागपूर तुरुंगात ठेवण्यात आले. तुरुंगात त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना अत्यवस्थ अवस्थेत सोडण्यात आले, परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपतराव शिंदे

    पाटील हे मुंबई येथील रहिवासी. यांनी १९४२च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ८ ऑगस्ट रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, तेथे ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     



     

  • गणपती पाटील

    ह्यांचा जन्म १९१२ साली शिराळे, जिल्हा सांगली येथे झाला. यांनी १९४२च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ८ ऑगस्ट रोजी ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, तेथे ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

     

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • गणपत सल्गर

     पूर्वी ब्रिटिश भारतीय सैन्यात शिपाई होते. पण नंतर १९४२ मध्ये मलाया येथे ते भारतीय राष्ट्रीय सैन्यात सामील झाले. त्यांना हवालदार म्हणून नियुक्त केले गेले आणि ब्रिटीश सैन्याचा सामना करण्यासाठी बर्मा आघाडीवर तैनात करण्यात आले. ते शत्रूशी अत्यंत शौर्याने लढत असताना डिसेंबर १९४४ मध्ये हुतात्मा झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपत पाटील

     यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपत मोरे

     यांचा जन्म १९१२ मध्ये कोल्हापूर येथे झाला. दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनात लढाऊ स्वयंसेवक म्हणून सक्रियपणे सहभागी झाले. त्यांना दि. ८ ऑगस्ट १९४२ मध्ये अटक करण्यात आली आणि ६ महिन्याची सजा सुनावण्यात आली. तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि कोल्हापूरच्या तुरुंगात त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • गणपत माळी

    यांचा जन्म, जिल्हा अहमदनगर १९१८ मध्ये धुमाळवाडी गावात झाला. मामलतदारांच्या जाचक कारभाराविरोधात सुरू झालेल्या जनआंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. १९१८ मध्ये मामलतदारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ते सहभागी झाले आणि त्याबद्दल तसेच मामलतदारांविरुद्ध कट रचल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांना काळ्या पाण्याच्या जन्मठेपीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अंदमानला अटकेत असताना १९२३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपत महादेव

     यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपत खरोटे

     यांचा जन्म १९२६ मध्ये नागपूर येथे झाला १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १२ ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, मिरवणुकांवर ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि वैद्यकीय मदत देण्याऐवजी त्यांना अटक करून चिंचणी तुरुंगात नेण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • गणपत जाधव

     यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपत बुराडे

     यांचा जन्म १९२६ मध्ये नागपूर येथे झाला १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट १९४२ रोजी नागपुरात ब्रिटीशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, मिरवणुकांवर ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • गणू विठू

    यांचा जन्म १९०६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

     

  • गंगुबाई

    यांनी मे १९३० मध्ये मीठ सत्याग्रहात भाग घेतला. दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनादरम्यान, त्या सक्रियपणे सहभागी झाल्या. ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला ह्या आरोपाखाली अटक झाली आणि हिंडलंग बेळगाव येथील तुरुंगात पोलीस छळामुळे २० डिसेंबर १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गंगाराम सावळाराम

     हे सोलापूर येथे जन्माला आले. त्यांनी १९३० मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च १९३० रोजी रूपा भवानी चौक, सोलापूर एक ब्रिटीशविरोधी एक मोर्चा काढण्यात आला. लोकांनी केलेल्या ब्रिटीशविरोधी कारवायांमध्ये काही पोलीस जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाले आणि मरण पावले. ह्या मोर्च्यात सहभागी गंगाराम हे गंभीर जखमी झाले. आणि तेथेच मृत्यूमुखी पडले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गंगाराम पोशण्णा

     यांचा जन्म १९३४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गंगाराम भांडगे

    हे सोलापूर येथील रहिवासी होते. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ८ मार्च १९३० रोजी सविनय कादेभांगाच्या आंदोलना दरम्यान एका ब्रिटीश विरोधी निदर्शनात सक्रियपणे सहभागी झाले. या ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गंगाधर भिला पाटील

     हे गिरणी कामगार चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते होते. अंमळनेर येथील आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी निदर्शनात देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादीचा नारा देत सामील झाले. मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला. परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला आणि गंगाधर त्यापैकी एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • गणेश सुखाराम कारखानीस

     हे साताऱ्याचे रहिवासी होते. १८५७ साली ते ब्रिटीश राजवटीविरुद्ध, साताऱ्याचे रंगो बापूजी ह्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांना सामील झाले. तेथील आंदोलकांनी साता-याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. दि. ८ जून १८५७ रोजी तोफेने उडवून देण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणेश जोशी

    हे १९१७ साली पुण्यात जन्माला आले. दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या छोडो भारत आंदोलनादरम्यान, ते पुण्याला दि. १२ ऑगस्ट १९४२ रोजी एका ब्रिटीश विरोधी निदर्शनात सक्रियपणे सहभागी झाले. तेथे सैन्याने केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गण्या

     हे भंडारा, मराठवाडा येथील रहिवासी होते. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि. ८ मार्च १९३० रोजी सविनय कादेभांगाच्या आंदोलना दरम्यान विदेशी कापड आणि दारूच्या दुकानांवर हल्ला करण्यात त्यांनी भाग घेतला. या ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गणपती कलर

    यांचा जन्म नागपूर येथे झाला. भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.आष्टी येथे ब्रिटीशांविरोधात आंदोलनात सामील झाले. १९४४ साली पोलिसांनी त्यांना पकडले असता त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • गजानन रानडे

     हे सोलापूर येथील रहिवासी. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ८ मे १९३० रोजी सविनय कायदेभांगाच्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. या ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • ग. पाटील

     हे १९२२ साली पुण्यात जन्माला आले. दि. ८ ऑगस्ट १९४२ पासून सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात अंबराई पोलीस स्टेशन जवळ झालेल्या ब्रिटीश विरोधी निदर्शनात सक्रियपणे सहभागी झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • ग. मोराई

    मोराई हे सिंध (पाकिस्तान) येथील रहिवासी होते. ते ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या पायदळाच्या २१ व्या कंपनीत कार्यरत होते. १८५७ च्या उठावाच्या वेळी त्यांनी ब्रिटीश सेवा सोडली. १८५७ च्या उठावाच्या वेळी ते क्रांतिकारकांना सामील झाले. त्यांना ब्रिटीश पोलिसांनी पकडले आणि त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. आणि देहांत शासन देण्यात आले. दि. १८ सप्टेंबर १८५७ रोजी त्यांना तोफेने उडविण्यात आले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • इसूर सिंग

    हे ईस्ट इंडियाच्या कंपनीत शिपाई होते. १८५७ च्या बंडात ते नोकरी सोडून ब्रिटिशांविरोधात लढू लागले. अखेर ते पकडले जाऊ कट व बंडखोरीचा आरोप ठेवण्यात आला.त्याखाली त्यांना सम जन्मठेप सुनावून १८५९ साली मुंबईतून अंदमानात पाठविण्यात आले. दिनांक १८ जुलै १८५९ रोजी ते तेथेच मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • द्वारकादास

    यांचा जन्म नागपूर येथे १८९८ साली झाला. ते दिनांक १३ ऑगस्ट १९४२ रोजी 'चले जाव' आंदोलनात सहभागी झाले. चार निदर्शकांची इंग्रजांना हत्या केल्याच्या विरोधात दिनांक १२ ऑगस्ट, १९४२ रोजी नागपुरात निदर्शन करण्यात आले होते. त्यावर पोलिसांनी गोळीबार करून १७ जणांचा जीव घेतला, तर ५० जण जखमी झाले. हत्येमध्ये द्वारकादास यांचा समावेश होता.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • ज्ञानू जाधव

    यांचा जन्म दिनांक १५ जानेवारी, १९०४ रोजी दुशेरे, सातारा जिल्हा येथे झाला. दिनांक ८ ऑगस्ट, १९४२ च्या "चले जाव" आंदोलनात ते सहभागी झाले होते. सरकारी मालमत्ता व दूरध्वनीच्या तारा नष्ट करण्यात ते सामील होते. औंध संस्थानाविरुद्ध ब्रिटिशांनी पुकारलेल्या लढाईत ते सामील होते. त्यात त्यांना दिनांक ६ मार्च, १९४४ रोजी गोळीबारात मृत्यू आला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • दिनकर धुरी

    यांचा जन्म १९१६ ला मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ ते दिनांक २२ फेब्रुवारी, १९४६ रोजीच्या निदर्शनात सहभागी झाले होते. लालबाग, मुंबई येथील या निदर्शनात त्यांना पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू आला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • दिन मोहम्मद अब्दुल अली

    हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांचा जन्म १९२९ साली झाला. भारतीय नौदलाच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ ते आंदोलनात सहभागी झाले. या दरम्यान दिनांक २३ फेब्रुवारी, १९४६ साली नागपाडा, मुंबई येथे निदर्शकांवर झालेल्या गोळीबारात त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • दिलदार खान

    यांचा जन्म नागपूर येथे झाला. १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात ते सहभागी होते. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांनाही इंग्रजांविरुद्ध प्रोत्साहित केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने त्यांना पकडले. त्यांच्यावर देशद्रोह व ब्रिटिश राजवटीविरुद्ध कटाचा आरोप ठेवून त्यांना १८६२ साली फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • धुलय सावला

    जन्म १९२२ साली मुंबई येथे झाला. भारतीय नौदलाच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ केलेल्या दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ च्या निदर्शनात ते सहभागी झाले. त्यावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जबर जखमी होऊन त्याच दिवशी मृत्यू पावले.

     

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • धोंडूसिंग बढाढी

    १९२५ साली रामटेक, जिल्हा नागपूर येथे जन्म झाला. ऑगस्ट १९४२ च्या "चले जाव " आंदोलनात ते सहभागी झाले. यासाठी दिनांक १३ ऑगस्ट, १९४२ रोजी चौकी गावाच्या दिशेने जाणाऱ्या आंदोलकांना ते सामील झाले. धोंडू सिंग यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. तेथे पोलिसी छळामुळे त्यांना मृत्यू आला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • धोंडू राम

    १९२६ मध्ये मुंबई येथे जन्म झाला. त्याने भारतीय नौदलाच्या बंडाच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनामध्ये भाग घेतला. हे आंदोलन दिनांक २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी दादर येथे झाले. निदर्शकांवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या. त्यात गंभीर जखमी होऊन ते मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • • धोंडू गणपत

    १९२६ साली मुंबईत जन्मले. भारतीय नौदलाच्या बंडखोरीच्या समर्थनार्थ केलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले. दिनांक २२ फेब्रुवारी १९४६ या दिवशी आंदोलकांवर झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी होऊन निधन पावले


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • धनसुकलाल गोवर्धनदास

     ह्यांचा जन्म १९२६ साली नंदुरबार येथे झाला. दि. ८ ऑगस्ट १९४२ साली सुरू झालेल्या चले जाओ आंदोलनात ते सहभागी झाले. निदर्शकांवर ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर गोळ्या लागल्या. जखमी झाल्यामुळे १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • धाकु गवत्राय फाफरेकर

     ह्यांचा जन्म चिरनार, रायगड येथे झाला. चिरनार येथील महाराष्ट्रातील सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अक्का देवी मैदान, चिरनार येथे ते सामील झाले. दि. २५ सप्टेंबर १९३० रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • देवजी भोये

    ह्यांचा जन्म चणकापूर, जिल्हा नाशिक येथे १८९५ रोजी झाला. सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान २५ ऑक्टोबर, १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी नाशिक येथे भाग घेतला. ब्रिटिश सरकारने गावकऱ्यांना जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले गेले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार करून ४ जणांना ठार मारले, या ४ लोकांपैकी देवजी हा एक होता.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • दया सोमा

     ह्यांचा जन्म मुंबई येथे झाला. दि. ८ ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. १० ऑगस्ट १९४२ रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते मुंबई येथे सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला तेव्हा ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • दत्तू शंभु

    यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • दत्तात्रेय जोशी

     ह्यांचा जन्म १९२४ रोजी, पुणे येथे झाला. ते महाराष्ट्र माध्यमिक शाळेचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेतच दि. ८ ऑगस्ट १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दिय ८ ऑगस्ट १९४२ रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते नागपूर येथे सहभागी झाले. १९४३ साली त्यांना ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला ह्या आरोपाखाली अटक झाली. परंतु तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे, त्यांचा १९४४ साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • दत्ताराम भाऊ कोयंडे

     यांचा जन्म १९०७ साली, रत्नागिरी येथे झाला. दि. १६ एप्रिल १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • दत्ताराम खडपे

    यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने केलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

     

  • दयाभाई वारणे

     यांचा जन्म १९२९ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर  जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     

  • दत्ताराम भाऊ कोईम्बडे

    यांचा जन्म रत्नागिरी येथे झाला. 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि.8 मार्च 1930 रोजी ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळै त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाल.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • दशरथ बाळकू माळी

    यांचा जन्म 1929 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. 22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • दामोदर चाफेकर

    यांचा जन्म हिरभाऊ चापेकर या एका किर्तनकारांच्या घरी दि.25 जून, 1869 रोज झाला. दामोदरवर लहाणपणापासूनच टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. पुण्यामध्ये 1897 मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडीत रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या बहाण्याने इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हौदोस घातला. इंग्रजांविरुध्दात असंतोष पसरु लागला रँड हा अत्यंत क्रूर, खूनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. दामोदरपंतांनी रँडचा वध करण्याची योजना आखली. दि.22 जून, 1897 रोजी पुण्यातील गणेशखिंडीत दामोदरपंतांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूंनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांनी दामोदरपंतांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण वासुदेव चाफेकर, तसेच रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंतांना दि.18 एप्रिल, 1898 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना दि.8 मे, 1899 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चाफेकरांना दि.8 मे, 1899 रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि रानडयांना दि.10 मे, 1899 रोजी फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • दगडू काटले

    यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि.8 मार्च,1930 रोजी सोलापुरातील ब्रिटिशविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     



  • चिंटू राजाराम

    यांचा जन्म 1921 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि 24 फेब्रुवारी रोजी ज्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चिंतसिंग जयरामसिंग

    यांचा जन्म 1921 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. 22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि 24 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चिंतामण फरकडे

    हे नागपूर येथे 1922 साली जन्माला आले. विद्यार्थीदशेतच दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट, 1942 रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यापत आले होते तेव्हा ते नागपूर येथे सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चिंतामण बारी

    हे 1922 साली, चिंचणी, ठाणे येथे जन्माला आले. विद्यार्थीदशेतच दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोघी कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट 1942, रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते ते नागपूर येथे सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. तेव्हा ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चित्रा बराय

    यांचा जन्म 1924, साली जिल्हा वर्धा येथे झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ब्रिटिशांविरोधी कारवायांध्ये सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट, 1942 रोजी शहरात, गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा चित्रा त्यात उत्साहाने सहभागी झाले. या मेळाव्यावर पोलिसांनी अंदाधुंद गोळीबार केला. 1943 साली त्यांना ब्रिटीशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला हया आरोपाखाली अटक झाली. परंतु तुरुंगातील पोलीस छळामुळे झालेल्या जखमांमुळे, त्यांचा 1944 साली मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चीनामा गुड्डी

    यांचा जन्म 1903 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि 24 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चिमा साहेब

    हयांचा जन्म दि.8 जानेवारी, 1831 रोजी कोल्हापूर येथे झाला. 1857 च्या लढयात ते ब्रिटीश राजवटीविरुध्द क्रांतिकारकांना सामील झाले. हया लढयातील ते महत्वाचे घटक होते. दि.6 डिसेंबर 1857 त्यांनी ब्रिटीश राजवटीच्या विरोधात कोल्हापूर येथे आंदोलन केले. तेथील आंदोलकांना त्यांनी हत्यारांची मदत केली आणि इतरांनीसुध्दा आंदोलकांना सामील व्हावे म्हणून प्रोत्साहित केले. ब्रिटिशं खजिना आणि शस्त्रे लुटायचा, स्वातंत्र्य सेनानींना तो पुरवायचा असे काम त्यांनी केले. चिमा साहेब यांना अशा कामगिरी बद्दल नाना साहेब पेशव्यांकडून चांदीची तलवार देण्यात आली. दि.31 मार्च 1858 रोजी त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला आणि कराची सिंध येथे 11 वर्षे बंधक म्हणून ठेवण्यात आले. दि.15 मे, 1869 रोजी त्यांचा तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • छोटू अझीझ

    यांचा जन्म 1921 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी 1946, रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि 24 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • छोटाभाई पटेल

    हयांचा जन्म 1908 साली दुलादरा, गुजरात येथे झाला. दि.8 ऑगस्ट, 1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते सक्रियपणे सहभागी झाले. दि.18 ऑगस्ट, 1942 ला ते एका ब्रिटिशविरोधी मिरवणुकीत डाकोर येथे सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चलोरे भूराजी

    हे 1919 साली तुमसर, जिल्हा भंडारा येथे जन्माला आले. त्यांनी 1942 च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि छोडो भारत चळवळीत ते तुमसर पोलीस स्टेशनच्या मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • चांद साहेब पटावेदार

    यांचा जन्म 1905 साली आरळे, जिल्हा सांगली येथे झाला. ते शेतकरी होते. दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. येथे ब्रिटीशांविरोधात आंदोलनात सामील झाले. ब्रिटीशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना तुरुंगात ठेवण्या आले. तुरुंगात पोलिसांनी केलेल्या अत्याचारांमुळे त्यांची तब्येत बिघडली म्हणून डिसेंबर, 1943 मध्ये त्यांना अत्यवस्थ सोडण्यात आले. परंतु त्यानंतर लवकरच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • छगन लोहार

    हे पाचोरा, जळगाव येथे जन्माला आले. दि.8ऑगस्ट, 1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात ते सक्रियपणे सहभागी झाले. दि.15 ऑगस्ट 1942 ला ते एका ब्रिटीशांविरोधी मिरवणुकीत पाचोरो येथे सामील झाले. निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बुलाकिदास कुशालचंद जाजू

    हे 1902 साली वर्धा येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. 18 ऑगस्ट,1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या मोर्च्यातील निदर्शकांवर ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बुधू फरीदीन

    यांचा जन्म मालेगाव, जिल्हा नाशिक येथे झाला. 1921 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकर आंदोलनात सामील झाले. नागपुरातील दारुच्या दुकानांवर बहिष्कार करताना जी धरपकड केली. येरवडयाच्या तुरुंगात त्यात यांचा समावेश होता. अटकेत असताना 1859 साली त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बिंदू नारायण कुलकर्णी

    हे कोल्हापूर येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. 18 ऑगस्ट, 1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनावर ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भुसारी भगवानजी सखाराम

    हे जिल्हा जळगाव येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.18 ऑगस्ट, 1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनावर ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भुर्या कलार

    हे गोंदिया, जिल्हा भंडारा येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट,1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. 18 ऑगस्ट, 1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनावर ब्रिटीश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भूपाल अनुशरे

    हे कोल्हापूर येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट,1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट,1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनामध्ये ब्रिटीश पोलिसांनी त्यांना अटक केली. तुरुंगातील अत्याचारांमुळे 1942 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भोलाराम किरड

    हे गोंदिया, जिल्हा भंडारा येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. ऑगस्ट,1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भोलागिरी बुवा

    हे सोलापूर येथे जन्माला आले. त्यांनी 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला. मार्च, 1930 रोजी रुपा भवानी चौक, सोलापूर येथे ब्रिटिशांविरोधी लोकांनी केलेल्या कारवायांमध्ये काही पोलिस जखमी झाले.हया मोर्च्यात सहभागी भोलगिरी बुवा हे गंभीर जखमी झाले आणि तेथेच मृत्युमुखी पडले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     



  • भोई ऊर्फ कडू अर्जून

    भोई हे महाड, जिल्हा कुलाबा येथे जन्माला आले. त्यांनी दि.8 ऑगस्ट 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. आपल्या काही मित्रांबरोबर त्यांनी महाड येथील मामलेतदार कचेरीवर 10 सप्टेंबरला हल्ला केला. तेव्हा ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भीमराव

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते एक गिरणी कामगार होते. महाराष्ट्रात 1930 रोजी सुरु झालेल्या सविनय कायदेभंग चळवळीत एका सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. दि.9 मे 1930 गस्त घालणाऱ्या लष्करी दलाने केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भीमराव गणपत काळे

    यांचा जन्म बेनोडा, जिल्हा अमरावती येथे झाला. दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी ब्रिटीशांविरोधी मोर्चा काढला. तेव्हा ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भीमराव देशमुख

    यांचा जन्म 1906 साली देवरा, जिल्हा अमरावती येथे झाला. दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी ब्रिटिशांविरोधी मोर्चा काढला. तेव्हा ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भीमा शेवाळे

    यांचा जन्म 1907 साली मुंबई येथे झाला. दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनलात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी ब्रिटिशांविरोधी मोर्चा काढला. तेव्हा ब्रिटिश पोलिसांच्या गोळीबारात  ते गंभीर जखम. झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भिकाजी सहदेव

    यांचा जन्म 1926 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने केलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भय्याजी खारवे

    यांचा जन्म नागपर येथे झाला. ते एक विद्यार्थी होते. दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी ब्रिटिशांविरोधी मोर्चा काढला. तेव्हा ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भावडू भुसारा

    हयांचा जन्म बिलवली, जिल्हा नाशिक येथे 1890 मध्ये झाला. सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दि.25 ऑक्टोबर, 1930 रोजी सुरु झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी नाशिक येथे भाग घेतला. ब्रिटीश सरकारने गावकऱ्यांना जवळच्या जंगलातू सरपण गोळा करण्याचा आधिकार नाकारल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले गेले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार करुन 4 जणांना ठार मारले. या 4 लोकांपैकी भावडू हा एक होता.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भाऊलाल परदेशी

    यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे 1926 मध्ये झाला. तेथील ते शेतकरी होते. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. दि.16 ऑगस्ट, 1942 रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा झालेल्या ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  • भाऊगिर गिरी

    यांचा जन्म अमरावती, महाराष्ट्र  येथे झाला. 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि.8 मार्च, 1930 रोजी सोलापुरातील ब्रिटिशांविरोधी निदर्शनावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भाऊ

    यांचा जन्म नाशिक येथे झाला. 1857 च्या उठावात ते सामील झाले. त्यांनी बऱ्याच वेगवेगळया ठिकाणी इंग्रजांविरुध्द लढण्यात भाग घेतला. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांनाही ब्रिटिशांविरुध्द बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. 1859 रोजी नाशिक येथील मिठ्सागर लढताना त्यांना अटक झाली आणि त्यांना काळया पाण्याच्या जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. 1859 मध्ये अंदमानला अटकेत असताना त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भास्कर रंगारी

    यांचा जन्म 1921 मध्ये नागपूर येथे झाला. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.14 ऑगस्ट, 1942 रोजी नागपुरात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, मिरवणुकांवर सैन्याच्या रणगाडयामधून झालेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भास्कर पिंगळे

    यांचा जन्म कर्जत तालुक्यात माथेरान येथे झाला. ते एक विद्यार्थी होते. दि.8 ऑगस्ट, 1942 च्या छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. त्यांनी दि.2 जानेवारी, 1942 ब्रिटिशांविरोधी मोर्चा काढला. तेव्हा ब्रिटीश पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भास्कर कर्णिक

    यांचा जन्म 1913 मध्ये रत्नागिरी येथे झाला. त्यांनी ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट, 1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात, 1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जमलेल्या निदर्शकांना अटक झाली. तुरुंगातील अत्याचारामुळे 1943 च्या सुरुवातीय त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     



  • भानुदास

    यांचा जन्म सोलापूर, महाराष्ट्र येथे झाला. 1930 मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. दि.8 मार्च, 1930 रोजी सोलापुरातील ब्रिटिशांविरोधी निदर्शनांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गंभीर दुखापत झाली. आणि त्याचमुळे त्यांचा त्याच दिवशी मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भानजी नानजी

    यांचा जन्म 1921 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने केलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भान खेपू हुल्ला

    यांचा जन्म सोलापूर येथे झाला. यांनी मे, 1930 मध्ये धरासणा मीठ सत्याग्रहात भाग घेतला आणि त्यांना पुण्याजवळ ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या मारामुळे ते गंभीर जखमी झाले आणि नंतर दि.15 जून, 1930 रोजी दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भैरु रावजी चव्हाण

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते एक गिरणी कामगार होते. दि.7 नोव्हेंबर, 1938 रोजी ते स्वतंत्र मजूर पक्षाच्या अवहानानुसार औद्योगिक विवाद कायदा, 1938 च्या निषेधार्थ संपात सामील झाले. स्प्रिंग मिल येथे धरणे आंदोलात सहभागी झाले असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात 15 नोव्हेंबर, 1938 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भगवानजी भुसारी

    यांचा जन्म आडगाव, जिल्हा जळगाव येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट, 1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि.18 ऑगस्ट, 1942 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनावर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबतच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भगवानदास कालिदास

    यांचा जन्म 1926 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले.आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भगवान खराडे

    भगवान खराडे यांचा जन्म सांगली येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट, 1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. दि.13 ऑगस्ट,1942 रोजी नागपुरात ब्रिटिशांना हद्दपार करण्याच्या मागणीसाठी अटक झाली आणि 18 महिन्याची शिक्षा झाली. तुरुंगात त्यांना कॉलराची लागण झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भागोजी सावळाराम वाघमारे

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. ते एक गिरणी कामगार होते. दि.7 नोव्हेंबर, 1938 रोजी ते स्वतंत्र मजूर पक्षाच्या आवहनानुसार औद्योगिक विवाद कायदा, 1938 च्या निषेधार्थ संपात सामील झाले. स्पिंग्र मिल येथे धरणे आंदोलनात सहभागी झाले असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दि.15 नोव्हेंबर, 1938 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • भादुजी लोंडसे

    यांचा जन्म 1924 मध्ये जिल्हा भंडारा येथे झाला. त्यांनी 1942 च्या छोडो भारत आंदोलनात भाग घेतला आणि दि.14 ऑगस्ट, 1942 रोजी छोडो भारत चळवळीत ते तुमसर पोलिस स्टेशनच्या मिरवणुकीत सामील झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बेनी राम

    यांचा जन्म 1907 साली नागपूर येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.13 ऑगस्ट, 1942 रोजी, नागपुरात पोलिसांनी केलेल्या 4 आंदोनलकारांच्या हत्येचा निषेध म्हणून ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनामध्ये यांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबतच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बतीराम

    यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. नागपूर शहरातील दारुबंदीसाठी विविध मेळाव्यात ते सहभागी झाले. दि.13 ऑगस्ट, 1942 रोजी, नागपुरात पोलिसांनी केलेल्या 4 आंदोलनकारांच्या हत्येचा निषेध म्हणून ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शनामध्ये यांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबत त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बर्नाड परेरा

    यांचा जन्म 1921 मध्ये मुंबई येथे झाला. रॉयल इंडियन नेव्ही रेटिंग बंडखोरीच्या भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बापुजी मारुती तांबे

    यांचा जन्म 1927 साली नागपूर येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.27 फेब्रुवारी, 1921 रोजी जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्यसा निदर्शनावर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबतच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बापुलाल चुनीलाल

    यांचा जन्म 1885 मध्ये मुंबई येथे झाला. रॉयल इंडियन नेव्ही रेटिंग बंडखोरीच्या भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

     


  • बापू खेडूपकर

     यांचा जन्म 1926 मध्ये मुंबई येथे झाला. रॉयल इंडियन नेव्ही रेटिंग   बंडखोरीच्या भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि 23 फेब्रुवारी, रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बापू केशव

    यांचा जन्म 1924 मध्ये मुंबई येथे झाला. रॉयल इंडियन नेव्ही रेटिंग बंडखोरीच्यिा भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात उते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बापू हरी सारंग

    यांचा जन्म 1928 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान




  • बंडू सुभान

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बळवंत शिरीसकर

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थझालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. 22 फेब्रुवारी 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभी जखमी झाले आणि त्यांचा तेथेच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळू रघू काळूगडे

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दि.23 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बळवंत जावडे

    जन्म 1924 मध्ये कोल्हापूर येथे झाला. दि.8 ऑगस्ट, 1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात लढाऊ स्वयंसेवक म्हणून सक्रियपणे सहभागी झाले. ते कुस्तीपटू होते. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.


      संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळकृष्ण पोतदार

    हयांचा जन्म हुपरी, कोलानपूर येथे झाला. 1940 च्या कोल्हापूरच्या सत्याग्रह चळवळीत ते सामील झाले. त्यांना अटक झाली. तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि 1943 मध्ये कारागृहात त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान



  • बाळकृष्ण दिगम्बर

    हे सातारा येथे जन्माला आले. 1942 च्या छोडो भारत आंदोलननात यांनी सक्रिय सहभाग घेतला.तसेच ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला. करो या मरो आणि छोडो भारत या गांधीच्या घोषणेने संपूर्ण देश जागृत केला. बाळकृष्ण यांनी आंदोलनात भाग घेण्यास मागेपुढे पाहिले नाही. पुरुषोत्तम घार्गे यांच्या नेतृत्वाखाली 2000 हून अधिक लोकांच्या निदर्शनात ते सामील झाले. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादीचा नारा देत त्यांनी वडूज कचेरीवर तिरंगा काँग्रेस ध्वज फडकावत कूच केली. मोर्चेकऱ्यांनामामलेतदारांनी रोखले आणि पोलिसांनी गोळीबार केला, परिणामी नऊ जणांचा मृत्यू झाला आणि बाळकृष्ण त्यापैकी एक होते.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळकृष्ण चाफेकर

    यांचा जन्म हरिभाऊ चाफेकर या एका किर्तनकारांच्या घरी दि.25 जून, 1869 रोजी झाला. यांच्यावर लहानपणापासूनच टिककांच्या विचारांचा प्रभाव होता. पुण्यामध्ये 1897 मध्ये प्लेगची साथ आली. प्लेगपीडीत रुग्णांना शोधून उपचार करण्याच्या बहाण्याने इंग्रजांनी पुण्यातील घराघरात शोध मोहीम उघडली. अत्याचाराचा हैदोस घातला. इंग्रजांविरुध्दात असंतोष पसरु लागला. रँड हा अत्यंत क्रुर, खुनशी इंग्रज अधिकारी पुण्याच्या नागरिकांवर अत्याचार करण्यात अग्रेसर होता. चाफेकर बंधूनी रँडचा वध करण्याची योजना आखली. दि.22 जून, 1897 रोजी पुण्यातील गणेशखिंडीत चाफेकर बंधू आणि त्यांच्या सहकार्यांनी रँड आणि आयर्स्टचा वध केला. गणेश आणि रामचंद्र या द्रविड बंधूनी केलेल्या गद्दारीमुळे इंग्रजांनी बाळकृष्ण चाफेकर यांना पकडले. त्यानंतर काही दिवसातच बाळकृष्ण वासुदेव चाफेकर, तसेच रानडे या सर्वांनाच पकडण्यात आले. इंग्रजांनी दामोदरपंताना दि.18 एप्रिल, 1898 रोजी पुण्यातील येरवडा तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर वासुदेव चापेकरांना दि.8 मे, 1899 रोजी तर बाळकृष्ण चाफेकरांना आणि रानडयांना, दि.10 मे, 1899 रोजी फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळकृष्ण भास्कर

    यांचा जन्म 1924 मध्ये मुंबई येथे झाला. रॉयल इंडियन नेव्ही रेटिंग बंडखोरीच्या भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बळीरामाजी बोराडे

    यांचा जन्म अमरावती येथे झाला. 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनात सक्रिय भाग घेतला. अनेक ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाले, निदर्शनातही ते सामील झाले, निदर्शनातही ते सामील झाले. देशभक्तीपर गीते गात आणि राष्ट्रवादीचा नारा देत त्यांनी तिरंगा काँग्रेस ध्वज फडकावत कूच केली. मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला, त्यात बोराडे मृत्यू पावले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बलातम

    हयांचा जन्म पुणे येथे झाला. विदयार्थीदशेतच दि.8 ऑगस्ट, 1942 छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.8 ऑगस्ट 1942 रोजी शहरात गांधी अटकेचा निषेध करण्यासाठी जाही सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते पुणे येथे सहभागी झाले. 1943 साली त्यांनी ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभाग घेतला त्यादरम्यान पोलिसांनी गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळाजी रायपूरकर

    यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे झाला. तेथील ते शेतकरी होते. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये चिमूर येथे पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा झालेल्या ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


     संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळाजी पराई

    यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे झाला. तेथील ते शेतकरी होते. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. दि.16 ऑगस्ट, 1942 रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा झालेल्या ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळा धुमाळ

    यांचा जन्म धुमाळवाडी, जिल्हा अहमदनगर येथील 1918 मध्ये धुमाळवाडी गावात मामलतदारांच्या जाचक कारभाराविरोधात सुरु झालेल्या जनआंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. 1918 मध्ये मामलतदारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात ते सहभागी झाले आणि त्याबद्दल तसेच मामलतदारांविरुध्द कट रचल्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली होती. 1919 कारागृहात त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाळ सावंत

    यांचा जन्म 1927 साली वसई येथे झाला. यांनी त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जमलेल्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबत त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बकाराम धुंडे

    यांचा जन्म 1900 साली वर्धा येथे झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतेला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटीशांनी भारतातून निघून जावे अर्थात चले जाओ चळवळी दरम्यान काढलेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. बाकेराव यांना अटक झाली. त्यांना 20 वर्षांची शिक्षा झाली, तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि 1943 मध्ये नागपूर कारागृहात त्यांचे निधन झाले.


         संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाज्या

    यांचा जन्म 1903 मध्ये नागपुरात झाला. 1921 मध्ये त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. नागपूर शहरातील दारुबंदीसाठी, विविध मेळाव्यात ते सहभागी झाले. दि.27 फेब्रवारी, 1921 जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात जमलेल्या निदर्शकांवर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबत त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाजीराव बिसन

    यांचा जन्म 1892 मध्ये नागपुरात झाला. त्यांनी छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.16 ऑगस्ट, 1942 रोजी ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि.16 ऑगस्ट, 1942 रोजी ब्रिटीशांनी भारतातून निघून जावे, चले जाओ चळवळी दरम्यान काढलेल्या हया मागणीसाठी काढलेल्या मिरवणुकीत ते सामील झाले. पोलिसांनी त्यांना अटक केली. तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि दि.11 फेब्रुवारी, 1943 रोजी नागपूर कारगृहात त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाजा गणेश कोष्टी

    यांचा जन्म 1908 मध्ये नागपुरात झाला. 1921 मध्ये त्यांनी असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. नागपूर शहरातील दारुबंदीसाठी, विविध मेळाव्यात ते सहभागी झाले. दि.27 फेब्रुवारी, 1921, जुलमी ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शकांवर, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबत त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बच्चूभाई बाबूलाल

    यांचा जन्म 1916 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि 23 फेब्रुवारी, 1946 रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबुराव झिरे

    यांचा जन्म चिमूर, जिल्हा चंद्रपूर, येथे 1892 साली झाला. तेथील ते शेतकरी होते. 1942 च्या छोडो भारत आंदोलनात यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये चिमूर येथे सहभाग घेतला. दि.16 ऑगस्ट, 1942 रोजी त्यांनी चिमूर पोलिस स्टेशनवर हल्ला केला तेव्हा झालेल्या ब्रिटीश सैन्याच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबुराव सरवटे

    यांचा जन्म 1916 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनाला ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि दि.23 फेब्रुवारी, 1946 रोजी ज्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबुराव जावळेकर

    हे 1920 साली मुंबईत जन्माला आले. दि.8 ऑगस्ट,1942 पासून सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. पोलिसांच्या धरपकडीत त्यांना अटक झाली. तुरुंगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि तुरुंगातच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबुराव जाधव

    हे 1916 साली मुंबईत जन्माला आले. दि.8 ऑगस्ट,1942 पासुन सुरु झालेल्या छोडो भारत आंदोलनात सक्रियपणे सहभागी झाले. पोलिसांच्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबुराव हरी चव्हाण

    यांचा जन्म 1916 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक 22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनली केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.



     संदर्भ- स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबू सखाराम रेडेकर

    यांचा जन्म 1896 मध्ये  मुंबई येथ झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दिनांक 22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.


                     संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबू ज्योती जाधव

    यांचा जन्म सातारा येथे झाला. छोडो भारत यात सक्रीय भाग घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात माहीमू सुरु केली. आणि त्यांना अटक करुन सांगली मध्यवर्ती तुरुंगात ठेवले. तेथून पळून जायचा यशस्वी प्रयत्न केला. जवळची नदी ओलांडून जाताना दुर्दैवाने त्यात ते बुडाले.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबू गेनू

    यांचा जन्म पुणे जिल्हयातील आंबेगाव येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. ते मुंबईतील एका कापूस गिरणीत कामाला होते. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाच्या दरम्यान केलेल्या परदेशी कपडयांविरोधात त्यांनी सक्रिय भाग घेतला. नोकरी निमित्त मुंबई येथ वास्तव्य. पण मनात स्वातंत्र्याचा ध्यास होता. 1930 साली वडाळा येथे झालेल्या सत्याग्रहात यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली. पुढे शिक्षा भोगून परतताच मुंबईत विदेशी कपडयाच्या बंदीच्या चळवळीत ते सक्रीय झाले. दि.12 डिसेंबर, 1930 रोजी विदेशी कपडे घेऊन ट्रक आला. दुकानाकडे जाणारा ट्रक बाबू गेनू यांनी अडवला. पोलिसांनी त्यांना बाजूला खेचण्याचा प्रयत्न केला पण बाबू गेनू रस्त्यावरच पडून आडवे झाले. ट्रक पुढे जाऊ देईनात. उद्दाम इंग्रजी ड्रायव्हरने तो ट्रक या 22 वर्षाच्या तरुणाच्या अंगावरुन पुढे नेला. बाबु गेनूंना हौतात्म्य लाभले.




    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबू दगडू

    यांचा जन्म मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.



    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबू केशव तावडे

    यांचा जन्म 1928 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान


  • बाबू गणपत

    यांचा जन्म 1931 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. 22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • बाबा सरतोडा

    हयांचा जन्म सातारा येथे झाला. 1857 साली ते ब्रिटीश राजवटीविरुध्द, साताऱ्याचे रंगो बापुजी हयांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांना सामील झाले. तेथील आंदोलकांची साताऱ्याच्या तुरुंगातून सुटका करण्याची योजना आखली. वेगवेगळया ठिकाणी इंग्रजांविरुध्द लढण्यात भाग घेतला. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुध्द बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. कोल्हापुरात त्यांना पकडले गेल्यावर त्यांच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना देहांत शासन देण्यात आले. दि.8 सप्टेंबर,1857 रोजी त्यांना गोळया मारुन ठार केले गेले . संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • बाबिया गायकवाड

    बाबिया गायकवाड हयांचा जन्म सातारा येथे झाला. हे 1857 च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सातारा येथे सामील झाले. वेगवेगळया ठिकाणी इंग्रजांविरुध्द लढण्यात भाग घेतला. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुध्द बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. कोल्हापुरात त्यांना पकडले गेल्यावर आरोप ठेवण्यात आला. त्यांना देहांत शासन देण्यात आले. दि.8 सप्टेंबर 1857 रोजी त्यांना तोफेने उडविण्यता आले. संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • बबन कोंडीबा

    बबल कोंडीबा यांचा जन्म 1928 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्य समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • बाबाजी

    हयांचा जन्म कोल्हापूर येथे झाल. हे 1857 च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. हे 1857 च्या उठावाच्या वेळी क्रांतिकारकांना सामील झाले. वेगवेगळया ठिकाणी इंग्रजांविरुध्द लढण्यात भाग घेतला. त्यांनी आपल्या सहकारी शिपायांनाही ब्रिटिशांविरुध्द बंड करायला आणि त्यांची शोषणकारी राजवट उलथून टाकण्यासाठी प्रवृत्त केले. कोल्हापूरात त्यांना पकडले गेल्यावर त्याच्यावर ब्रिटीश राजवटीच्या विरोधात बंडाचा आरोप ठेवण्यात आला. 1859 मध्ये त्यांना काळया पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आणि अंदमानला पाठवण्यात आले. अटकेत असताना 1860 साली त्यांचा मृत्यू झाला. संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • बबाई लक्ष्म्ण

    यांचा जन्म 1924 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि.22 फेब्रुवारी, 1946 रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्या गंभीर जखमी झाल्या आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान

  • आण्णा पाटील


      यांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवयांमध्ये सहभाग घेतला 1945 च्या काळात ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले तेव्हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर तखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यु झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • आण्णा होरे


     पटास्कर हे 1865 साली सांगली येथे जन्माला आले. त्यांनी 1930 मध्ये सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतला आणि 1942 मध्ये छोडो भारत आंदोलनातही भाग घेतला 1939 ते 1942 दरम्यान त्यांनी युध्दाविरोधी प्रचारात भाग घेतला. ब्रिटिशविरोधात कारवयांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना ऑगस्ट 1942 मध्ये अबक करण्यात आली. तुंरुगातील पोलिसांच्या अत्याचारामुळे त्यांची तब्येत खालावली आणि फेब्रुवारी 1943 साली तुंरुगातच त्यांचे निधन झाले.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अनंत लक्ष्मण कान्हेरे


    यांचा जन्म 1991 साली रत्नागिरी येथे झाला. शाळेत असताना त्यांच्यावर लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, एस.ए.परांजपे यांचा प्रभाव होता. गणू वैद्य यांनी त्यांना मित्र मेळा हया गुप्त संस्थेत सहभागी करुन घेतले. बंगालच्या फाळणीनंतर महाराष्ट्रात अनेक गुप्त संस्था उभ्या राहील्या. 1909 मध्ये जेव्हा गणेश सावरकर सरकार विरोधी साहित्य लिहील्याबद्दल काळया पाण्याची शिक्षा झाली. तेव्हा क्रांतिकारांनी यांचा बदला घेण्ण्याचा निर्णय घेतला. जॅक्सनला स्थानिक नाट्यगृहात मराठी नाटकाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले. अनंत कांन्हेरे, विनायक देशपांडे आणि कृष्णा कर्वे यांना थिएटरमध्ये कलेक्टरला मारण्याचे काम सोपवण्यात आले होते. जॅक्सनच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना ठाण्याच्या विशेष कारागृहात दि. 11 एप्रिल 1910 रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • आनंदराव हिंगणेकर

     

    यांचा जन्म 1992 मध्ये नागपुरात झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. तसेच ब्रिटीशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. 8 ऑगस्ट 1942 रोजी नागपुरात ब्रिटीशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले. त्यांना अटक करुन तुरुंगात टाकण्यात आले. त्यांची तब्बेत बिघडली म्हणून डिसेंबर मध्ये त्यांना अत्यवस्थ सोडण्यात आले. परंतु त्यानंतर काही महिन्यात त्यांचे निधन झाले


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • आनंद माया पाटील


      यांचा जन्म 1904 मध्ये रायगड जिल्हयात झाला. पनवेलजवळील चिरनार सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान दि. 25 सप्टेंबर 1930 रोजी सुरु झालेल्या जंगल सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला. ब्रिटिश सरकारने गावक-यांना जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन केले गेले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार करुन 14 जणांना ठार मारले, या 14 लोकांपैकी आनंद हा एक होता.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अमृतलाल भगवादास


    यांचा जन्म्‍ 1918 मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अमरीया तेलंग


      यांचा जन्म १८९८ मध्ये नागपुरात झाला. नागपूर शहरातील दारूबंदीसाठी विविध मेळाव्यात ते सहभागी झाले. दि. १३ ऑगस्ट १९४२ रोजी, नागपुरात पोलिसांनी केलेल्या आंदोलनकांच्या हत्येचा निषेध म्हणून ब्रिटीश सरकारच्या विरोधात आयोजित केलेल्या निदर्शकांमध्ये अमरीया यांचा समावेश होता. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इतर काही निदर्शकांसोबत त्यांचा मृत्यु झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अम्बराम कांजी

     यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई  येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • आलू बेमट्या म्हात्रे


     ह्यांचा जन्म चिरनार, रायगड येथे १९०६ साली झाला. चिरनार येथील  महाराष्ट्रातील सविनय  कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. दि. २५ सप्टेंबर १९३० रोजी सुरू झालेल्या जंगल सत्याग्रहात  भाग घेतला ब्रिटीश सरकारने गावकऱ्यांना जवळच्या जंगलातून सरपण गोळा करण्याचा अधिकार नाकारल्याचा  निषेध म्हणून हे आंदोलन केले गेले. पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार करून १४ जणांना ठार मारले, या १४  लोकांपैकी म्हात्रे हे होते.

    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अली मोहम्मद


    ह्यांचा जन्म चिरनार, रायगड येथे १९०६ साली झाला. चिरनार येथील महाराष्ट्रातील सविनय कायदेभंग चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अक्का देवी  मैदान चिरनार येथे ते सामील झाले. दि. २५ सप्टेंबर, १९३० रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अक्षयधन मथुरारे भट

     

    यांचा जन्म १९१४ मध्ये  मुंबई येथे झाला . भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • एकनाथ


     यांचा जन्म १९१५ साली पुणे येथे झाला. छोडो भारत आंदोलनात सक्रिय सहभाग त्यांनी भाग घेतला तसेच ब्रिटिशांविरोधी विविध कारवायांमध्ये सहभाग घेतला. दि. ११ फेब्रुवारी१९४२ साली पुण्यात झालेल्या नागपुरात  ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनात ते सामील झाले, आणि जमावाने सरकारी मालमत्तेवर हल्ले करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जमावावर गोळीबार केला. त्यात एकनाथ यांचा जागीच मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

     

  • अबुकर मोहम्मद


     यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात  सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि त्याच दिवशी तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल रहमान

     

    यांचा जन्म १९१६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर  जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल खलिफा अब्दुल खलिफा


      हे मालेगाव, नाशिक येथे १८९२ साली जन्माला आले. १९२१ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखालील खिलाफत आणि असहकार आंदोलनात सामील झाले. पोलीस आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकीत एका पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ब्रिटिशांविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आणि तीन वर्षाची शिक्षा होऊन त्यांना येरवडा तुरुंगात ठेवण्यात आले. तेथील पोलिसांच्या अत्याचारामुळे १९२१ साली त्यांचा मृत्यू झाला..

    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल रझाक अजीज

     यांचा जन्म १९१६ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल सत्तार मुहम्मद उमर


      यांचा जन्म १९२४ मध्ये मुंबई येथे झाला भारतीय नौसेनेने रोजी सोलापुरातील ब्रिटिशांविरोधी निदर्शनात पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२  फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल रसूल रशीद


    यांचा जन्म १९१० साली | जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा सोलापूर येथे झाला. सोलापुरातील पोलीस. ठाण्यावर हल्ला आणि दंगल घडवून आणली. १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत  सक्रिय सहभाग घेतला. दि. मार्च, १९३० रोजी सोलापुरातील ब्रिटिशांविरोधी निदर्शनात पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना दि. १२ जानेवारी १९३१ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल रहमान अजीज

     यांचा जन्म १९११ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात  ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

     


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल रशीद

     यांचा जन्म १९१० साली सोलापूर येथे झाला. तिथे ते व्यापार युनियन कामगार जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा होते. दि. मे, १९३० रोजी त्यांना अटक मृत्यू झाला. करण्यात आली. सोलापुरातील पोलीस ठाण्यावर हल्ला आणि दंगल घडल्याच्या आरोप करून अब्दुल रहमान अजीज त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अब्दुल रहमान अजीज यांचा जन्म १९११ मध्ये दि. १२ जानेवारी १९३१ रोजी पुण्याच्या येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल रहमान

     

    अब्दुल रहमान यांचा

     यांचा जन्म १९३१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल कादर


     यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल नरुद्दीन


    यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी,१९४६  रोजी त्यांचा मृत्यू झाला


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 


  • अब्दुल गनी


             यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील | झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले | आणि २४ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अजीज अब्दुल


      अजीज यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडाच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी, १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी१९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल मलिक दिलावर

     यांचा जन्म १९३१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी,१९४६  रोजी त्यांचा मृत्यू झाला


    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान 

  • अब्दुल करीम


     यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी, १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

    संदर्भ - स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान  

  • अब्दुल अली

     यांचा जन्म १९२१ मध्ये मुंबई येथे झाला. भारतीय नौसेनेने पुकारलेल्या बंडखोरीच्या समर्थनार्थ झालेल्या एका निदर्शनात ते सामील झाले. दि. २२ फेब्रुवारी १९४६ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आणि २४ फेब्रुवारी, १९४६ रोजी त्यांचा मृत्यू झाला


                                                                                                                                   संदर्भ - स्वांतत्र्यसमरातील महाराष्ट्राचे योगदान