रामचंद्र पांडुरंग टोपे
यांचा जन्म १८१४ साली गोळा, पुणे येथे झाला. त्यांच्या वडिलांनी बिठूर येथे आपले कुटुंब हलवले. तेव्हा ते राणी लक्ष्मीबाई आणि रावसाहेब यांच्या संपर्कात आले. १८५१ मध्ये लॉर्ड डलहौसीने नानासाहेबांना त्यांच्या वडिलांच्या पेन्शनपासून वंचित केले. या घटनेवरून तात्या इंग्रजांचे शत्रू बनले. निष्ठा आणि कृतज्ञतेच्या नात्याने ते नानासाहेबांशी घट्ट जोडले गेले होते. मे, १८५७ मध्ये जेव्हा ब्रिटिशांविरोधी आंदोलन जोर धरत होते, तेव्हा त्यांनी कानपूर येथे तैनात असलेल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैन्यावर विजय मिळवला आणि नानासाहेबांचा अधिकार प्रस्थापित केला. ते स्वतः सैन्याचे सेनापती बनले. कानपूरच्या यशानंतर दिनांक १६ ऑगस्ट १८५७ रोजी बिठूरच्या लढाईत त्यांनी सैन्याच्या मदतीने मेजर जनरल हॅवलॉकला पराभव केला. त्यानंतर झालेल्या लष्करी चकमकींमध्ये तात्या गनिमी लढाईतील एक अतुलनीय योद्धा म्हणून उदयास आले. ब्रिटिशांनी कानपूर पुन्हा ताब्यात घेतल्यावर, तात्यांनी ग्वाल्हेरच्या तुकडीच्या पाठिंब्याने जनरल विंडहॅमला कानपूरमधून माघार घेण्यास भाग पाडले. पण लवकरच त्यांच्या सैन्याचा कंपनीकडून पराभव झाला. तात्यांना त्यांचे मुख्यालय काल्पी येथे हलवावे लागले. सुमारे २०,००० लोकांचे सैन्य राणी लक्ष्मीबाईंच्या बचावासाठी आले आणि त्यांनी बुंदेलखंडमध्ये उठाव केला. सैन्याने चरखारीच्या इंग्रज समर्थक राजाचा पराभव केला आणि ते झाशीला पोहोचले. पण जनरल ह्यू रोझने तात्यांच्या सैन्याला अडथळा आणला आणि त्यांना पांगवले. नंतर तात्यांनी ग्वाल्हेरच्या तुकडीच्या मदतीने ग्वाल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. परंतु, तेथे आपले स्थान मजबूत करण्याआधीच जनरल ह्यू रोज विरुद्धच्या युद्धात त्यांचा पराभव झाला, ज्यात राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. त्यानंतर तात्या मध्य भारतात निघून आले. नंतर जनरल नेपियरच्या सैन्याने त्यांचा पराभव केला. परंतु, त्यांनी राजस्थान, माळवा, बुंदेलखंड आणि खानदेशात दहा महिने ब्रिटिशांना गनिमी हल्ल्याने सळो की पळो करून सोडले होते. दुर्दैवाने दिनांक ८ एप्रिल १८५९ रोजी त्यांचा विश्वासू मित्र मानसिंग याने विश्वासघात केला आणि पारोनच्या घनदाट जंगलात मेजर मीड नेत्यांना पकडले. लष्करी कोर्टाने खटला चालवला. तात्यांना दोषी ठरवून सिप्री येथे दिनांक १८ एप्रिल १८५९ रोजी फाशी देण्यात आले.
संदर्भ
- स्वातंत्र्यसमरातील महाराष्ट्राचे
योगदान